सर्वधर्मसमभावाचे सुंदर प्रतीक! येवला शहरात पाहायला मिळाला हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रेरणादायी नजरा येवला शहरात मुस्लिम बांधवांनी काढलेल्या या भव्य मिरवणुकीत हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. धार्मिक श्रद्धा आणि शिस्तीचे दर्शन घडवत असतानाच या मिरवणुकीने संपूर्ण शहरात शांतता आणि बंधुभावाचा संदेश दिला." "विशेष म्हणजे, या मिरवणुकीचे आकर्षण ठरले ते येवल्यातील सामाजिक ऐक्य! शिवसेना शिंदे गटाचे गटनेते गणेश शिंदे, युवा नेते अमोल शिंदे आणि शिंदे-पाटील फाउंडेशनचे सर्वच कार्यकर्ते यांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या बांधवांचे उत्साहात स्वागत करत अल्पहार वाटण्यात आला. दरम्यान याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन गटनेते गणेश भाऊ शिंदे युवा नेते अमोल शिंदे यांच्या वतीने सत्कार देखील करण्यात आले यावेळी शहर काजी शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक नगरसेवक सुनील शिंदे व शिंदे फाउंडेशन चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरात ठिकठिकाणी हिंदू बांधवांनी पुढे येत मुस्लिम बांधवांचे उत्स्फूर्त स्वागत केले आणि ईदच्या गोड शुभेच्छा दिल्या. आजच्या काळात जिथे दुराव्याची भाषा बोलली जाते, तिथे येवल्याच्या मातीतून मात्र 'सर्वधर्मसमभाव' आणि 'गंगा-जमुना संस्कृती' चे अत्यंत प्रेरणादायी दर्शन घडले आहे."
सर्वधर्मसमभावाचे सुंदर प्रतीक! येवला शहरात पाहायला मिळाला हिंदू-मुस्लिम ऐक्याचा प्रेरणादायी नजरा येवला शहरात मुस्लिम बांधवांनी काढलेल्या या भव्य मिरवणुकीत हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. धार्मिक श्रद्धा आणि शिस्तीचे दर्शन घडवत असतानाच या मिरवणुकीने संपूर्ण शहरात शांतता आणि बंधुभावाचा संदेश दिला." "विशेष म्हणजे, या मिरवणुकीचे आकर्षण ठरले ते येवल्यातील सामाजिक ऐक्य! शिवसेना शिंदे गटाचे गटनेते गणेश शिंदे, युवा नेते अमोल शिंदे आणि शिंदे-पाटील फाउंडेशनचे सर्वच कार्यकर्ते यांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या बांधवांचे उत्साहात स्वागत करत अल्पहार वाटण्यात आला. दरम्यान याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन गटनेते गणेश भाऊ शिंदे युवा नेते अमोल शिंदे यांच्या वतीने सत्कार देखील करण्यात आले यावेळी शहर काजी शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक नगरसेवक सुनील शिंदे व शिंदे फाउंडेशन चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरात ठिकठिकाणी हिंदू बांधवांनी पुढे येत मुस्लिम बांधवांचे उत्स्फूर्त स्वागत केले आणि ईदच्या गोड शुभेच्छा दिल्या. आजच्या काळात जिथे दुराव्याची भाषा बोलली जाते, तिथे येवल्याच्या मातीतून मात्र 'सर्वधर्मसमभाव' आणि 'गंगा-जमुना संस्कृती' चे अत्यंत प्रेरणादायी दर्शन घडले आहे."
- येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय येवला: येथील प्रसिद्ध श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात भौम प्रदोषानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी श्री भौमनाथ महादेवाची विशेष महापूजा आणि आकर्षक भस्मारती पार पडली. भौम प्रदोषानिमित्त श्री भौमनाथ महादेवांचा मनमोहक शृंगार करण्यात आला होता. भौमनाथ महादेव हे मंगळ देवाचे स्वामी आणि अत्यंत आवडते रूप मानले जातात. महाआरतीनंतर आयोजित करण्यात आलेल्या भजन संध्येने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय झाला होता. या सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. दरम्यान, पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंदिर व्यवस्थापनातर्फे विशेष आवाहन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात प्रदोषानिमित्त ज्या भाविकांना मंदिरात महाप्रसादाची (पंगत) सेवा द्यायची असेल, त्यांनी लवकरात लवकर मंदिर समितीशी संपर्क साधावा. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- टिपू सुलतान फोटोवरून पुन्हा वाद ! फोटो काढायला लावणार - दादा भुसे मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.1
- शिक्षण मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, खाजगी क्लासेससाठी नवीन धोरण, धाकधूक वाढली..1
- आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज , आपले गाडीचे पेपर (RC)हरवले, खराब झालं,5 मिनिटात काढून मिळेल. License हरवले, मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक फक्त 1 मिनीटात,pan कार्ड नवे, अपडेट, दुरुस्ती सर्व संबंधित कामासाठी,account open,मनी ट्रांसफर, पैसे काढणे,mobile दुरुस्ती, software, सेल, service and charger,battery, झेरॉक्स, color xerox, महा ID कार्ड, accessories, ऑनलाईन प्रिंट,संपर्क सुपर मोबाईल galaxy AND MULTI Services वाळूज ,1
- शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य1
- पुस्तकांचा तुटवडा निफाड तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तकांच्या १,५२७ संचांची कमतरता; तातडीने पुस्तके द्या, अन्यथा शिक्षण विभागाला टाळे ठोकू : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके पूर्णपणे उपलब्ध झालेली नाहीत. तालुक्यात तब्बल १,५२७ संचांचा तुटवडा असून, पुस्तकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा तुटवडा तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत; अन्यथा शिक्षण विभागाच्या दालनास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी दिला. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक पुस्तकांची मागणी नोंदवून ती जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर वितरित करण्याची व्यवस्था असते. मात्र, यंदा शाळा सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अनेक विद्यार्थ्यांच्या हातात अद्याप पुस्तके पोहोचलेली नाहीत. निफाड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दुसरी, चौथी, पाचवी, सहावी व सातवीच्या पुस्तकांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. विशेषतः दुसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने जुन्या पाठ्यपुस्तकांचा वापर करणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. काही शाळांमध्ये शिक्षकांनी जुनी पुस्तके जमा करून तात्पुरती व्यवस्था केली असली तरी नवीन पुस्तके उपलब्ध नसल्याने अध्यापनात अडथळे येत आहेत. या प्रश्नाबाबत प्रकाश पाटील यांनी निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप व सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे जाब विचारला. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे चर्चेतून समोर आल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी लासलगाव शिवसेना शहरप्रमुख प्रमोद पाटील, लासलगाव शहर विकास समितीचे राजेंद्र कराड, संदीप उगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वर्गनिहाय तुटवडा इयत्ता २ री — ७ संच इयत्ता ४ थी — २७ संच इयत्ता ५ वी — ७६८ संच इयत्ता ६ वी — ६१४ संच इयत्ता ७ वी — १११ संच एकूण — १,५२७ संच “विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारी मोफत पुस्तके वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पुस्तकांचा तुटवडा तातडीने दूर करून सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण संच उपलब्ध करून द्यावेत.” — प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य1
- दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .1
- येवला येथील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसंदर्भात अध्यक्ष सचिन कळमकर आणि उपाध्यक्ष मोहन शेलार यांची पत्रकारपरिषद येवला येथील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर व उपाध्यक्ष मोहन शेलार यांनी पत्रकार परिषदेत पाणीपट्टी वाढीची घोषणा केली. जिल्हा परिषदेकडून मिळणारे ५०% वीजबिल प्रोत्साहन अनुदान बंद झाल्याने आणि वीज बिल व देखभाल खर्चात प्रचंड वाढ झाल्याने योजनेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून ग्रामपंचायतींसाठी पाणीपट्टीत ३०% तर व्यावसायिक ग्राहकांसाठी २०% वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरानुसार ग्रामपंचायतींना प्रतिलाख लिटरसाठी १६२५ रुपये मोजावे लागतील.1