logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सिल्लोड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहा मध्ये संपन्न झाले आहे सदरील कार्यक्रमाला सिल्लोड शहरातील विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती

20 hrs ago
user_Sham Thakur
Sham Thakur
सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
20 hrs ago

सिल्लोड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहा मध्ये संपन्न झाले आहे सदरील कार्यक्रमाला सिल्लोड शहरातील विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सिल्लोड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहा मध्ये संपन्न झाले आहे सदरील कार्यक्रमाला सिल्लोड शहरातील विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती
    1
    सिल्लोड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहा मध्ये संपन्न झाले आहे सदरील कार्यक्रमाला सिल्लोड शहरातील विविध कार्यालयातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त
    1
    वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त 
वडोद तांगडा येथिल देवीची वाडी रस्त्याची दुरवस्था शेतकरी खराब रस्त्यामुळे त्रस्त
    user_Samadhn kalam
    Samadhn kalam
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • भोकरदन स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
    1
    भोकरदन स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
स्लॅब गळती दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये लाटले? भोकरदन बस स्थानक प्रकरण
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • ⚡ Bharat 24taas News च्या बातमीची ऊर्जा राज्यमंत्र्यांनी घेतली दखल..! कमलकीशोर जोगदंडे भोकरदन | प्रतिनिधी भर पावसात जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पोलवर चढून दुरुस्ती करणारे महावितरणचे लाईनमन दिपक देवरे यांचा व्हिडिओ Bharat 24taas News चे Digital Media news Editor कमलकिशोर जोगदंडे यांनी सर्वप्रथम प्रसिद्ध केला होता. या वृत्ताची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी स्वतः लाईनमन दिपक देवरे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करत अभिनंदन केले तसेच भर पावसात काम करताना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कार्याची दखल शासन स्तरावर घेतली गेल्याने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. Bharat 24taas News ने सर्वप्रथम प्रकाशित केलेल्या या बातमीमुळे या घटनेला राज्यस्तरावरही विशेष महत्त्व प्राप्त झाले. Bharat 24taas News
    1
    ⚡ Bharat 24taas News च्या बातमीची ऊर्जा राज्यमंत्र्यांनी घेतली दखल..!
कमलकीशोर जोगदंडे 
भोकरदन | प्रतिनिधी
भर पावसात जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पोलवर चढून दुरुस्ती करणारे महावितरणचे लाईनमन दिपक देवरे यांचा व्हिडिओ Bharat 24taas News चे Digital Media news Editor कमलकिशोर जोगदंडे यांनी  सर्वप्रथम प्रसिद्ध केला होता.
या वृत्ताची दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांनी स्वतः लाईनमन दिपक देवरे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करत अभिनंदन केले तसेच भर पावसात काम करताना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.
कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कार्याची दखल शासन स्तरावर घेतली गेल्याने महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. Bharat 24taas News ने सर्वप्रथम प्रकाशित केलेल्या या बातमीमुळे या घटनेला राज्यस्तरावरही विशेष महत्त्व प्राप्त झाले.
Bharat 24taas News
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    11 hrs ago
  • सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर.. प्रेस नोट *सिल्लोड येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न* *११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ* *प्रशासनाने जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनावे; शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा – आमदार अब्दुल सत्तार* सिल्लोड (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' सिल्लोड शहरातील डोंगरगाव फाटा येथील स्वस्तिक लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. या शिबिरात महसूल, ग्रामविकास, कृषी, एकात्मिक बाल विकास, वन विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नगर परिषद आदी विविध विभागांच्या योजनांअंतर्गत सुमारे ११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेले लोककल्याणकारी सरकार असल्याचे सांगितले. ग्रामसभा व विविध उपक्रमांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. महसूल प्रशासन हे केवळ कागदपत्रांची पूर्तता करणारे कार्यालय नसून जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तत्त्वांवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा उल्लेख करताना सांगितले की, महाराजांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाची उभारणी केली. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व दुर्बल घटकांच्या हिताला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याच विचारांवर राज्य शासन कार्यरत असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून विविध विकासात्मक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनापासून पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. भ्रष्टाचारामुळे शासनाची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. दिव्यांग, आदिवासी, शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे तसेच सर्व वंचित घटकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. नागरिकांशी सुसंवाद ठेवून त्यांचे समाधान होईल अशा पद्धतीने प्रशासनाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. ------------- प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या संदर्भात बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी पीक विमा हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अधिकार असून तो मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगितले. येत्या विधिमंडळ अधिवेशनात या विषयावर शासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ------------ यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोकहिताचे निर्णय घेतले जात असल्याचा उल्लेख केला. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना विनम्र अभिवादन केले. ---------- नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आपल्या भाषणात सिल्लोड शहरातील बेघर नागरिकांसाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून म्हाडा योजनेंतर्गत पाच हजार घरांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती देत नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी प्रास्ताविकात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचा तसेच निकाली काढलेल्या प्रकरणांचा आढावा सादर केला. तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड) व तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव) यांनी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी ग्रामविकास विभागाच्या योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करून योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार अब्दुल सत्तार व मान्यवरांनी स्वस्तिक लॉन्स परिसरात विविध विभागांनी उभारलेल्या शासकीय स्टॉलची पाहणी केली. तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची खरेदी करून त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन दिले व नागरिकांनी स्थानिक बचत गटांच्या उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. सिल्लोड नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व पुष्पगुच्छाद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी मानले. ------ यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड), तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव), गटविकास अधिकारी रत्नाकर पगार (सिल्लोड), गटविकास अधिकारी अमोल जगताप (सोयगाव), नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप (सिल्लोड), भारत कासार ( सोयगाव ), नायब तहसीलदार तुकाराम बनकर ,बळीराम मुंडे , संभाजी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (सोयगाव) प्रभाकर काळे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख (सोयगाव) धरमसिंग चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन गाडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, अब्दुल आमेर अ. सत्तार, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी सभापती रामदास पालोदकर, विश्वासराव दाभाडे, नगर परिषद शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, संदीप राऊत, राजाराम पाडळे, जयराम चिंचपुरे, नानासाहेब रहाटे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, सुरेखा शिंदे, शिवसेना शहरप्रमुख मनोज झंवर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरसेवक रउफ बागवान, अकील वसईकर, आसिफ बागवान, सिद्धेश्वर आहेर, डॉ. फिरोज पठाण, बबलू पठाण, नूर मोहंमद कुरेशी, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, संजय डमाळे, राजूमिया देशमुख, अंबादास सपकाळ, मोतीराम पाडळे, पंकज जयस्वाल आदींसह शासनाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, लाभार्थी तसेच विविध गावांतील आजी-माजी सरपंच, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    सिल्लोड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर..
प्रेस नोट
*सिल्लोड येथे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न*
*११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ*
*प्रशासनाने जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनावे; शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा – आमदार अब्दुल सत्तार*
सिल्लोड (प्रतिनिधी)  महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' सिल्लोड शहरातील डोंगरगाव फाटा येथील स्वस्तिक लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उदघाटन आमदार अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. या शिबिरात महसूल, ग्रामविकास, कृषी, एकात्मिक बाल विकास, वन विभाग, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, नगर परिषद आदी विविध विभागांच्या योजनांअंतर्गत सुमारे ११ हजार ५०० हून अधिक लाभार्थ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्य शासन हे सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असलेले लोककल्याणकारी सरकार असल्याचे सांगितले. ग्रामसभा व विविध उपक्रमांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
महसूल प्रशासन हे केवळ कागदपत्रांची पूर्तता करणारे कार्यालय नसून जनतेच्या विश्वासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने संवेदनशीलता, पारदर्शकता आणि तत्परता या तत्त्वांवर काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा उल्लेख करताना सांगितले की, महाराजांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाची उभारणी केली. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक व दुर्बल घटकांच्या हिताला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याच विचारांवर राज्य शासन कार्यरत असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून विविध विकासात्मक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मनापासून पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
भ्रष्टाचारामुळे शासनाची प्रतिमा मलिन होते. त्यामुळे भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. दिव्यांग, आदिवासी, शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे तसेच सर्व वंचित घटकांना त्यांच्या हक्काच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. नागरिकांशी सुसंवाद ठेवून त्यांचे समाधान होईल अशा पद्धतीने प्रशासनाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
-------------
प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या संदर्भात बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी पीक विमा हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अधिकार असून तो मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगितले. येत्या विधिमंडळ अधिवेशनात या विषयावर शासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
------------
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विविध लोकहिताचे निर्णय घेतले जात असल्याचा उल्लेख केला. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
----------
नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आपल्या भाषणात सिल्लोड शहरातील बेघर नागरिकांसाठी आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून म्हाडा योजनेंतर्गत पाच हजार घरांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती देत नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी प्रास्ताविकात 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अंतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांचा तसेच निकाली काढलेल्या प्रकरणांचा आढावा सादर केला. तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड) व तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव) यांनी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी ग्रामविकास विभागाच्या योजनांची माहिती देत पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करून योजनांचा लाभ घ्यावा, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार अब्दुल सत्तार व मान्यवरांनी स्वस्तिक लॉन्स परिसरात विविध विभागांनी उभारलेल्या शासकीय स्टॉलची पाहणी केली. तसेच महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची खरेदी करून त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन दिले व नागरिकांनी स्थानिक बचत गटांच्या उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.
सिल्लोड नगर परिषदेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व पुष्पगुच्छाद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार तहसीलदार अंकिता ताकभाते यांनी मानले.
------
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अंकिता ताकभाते (सिल्लोड), तहसीलदार मनीषा मेने (सोयगाव), गटविकास अधिकारी रत्नाकर पगार (सिल्लोड), गटविकास अधिकारी अमोल जगताप (सोयगाव), नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप (सिल्लोड), भारत कासार ( सोयगाव ), नायब तहसीलदार तुकाराम बनकर ,बळीराम मुंडे , संभाजी पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख (सोयगाव) प्रभाकर काळे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख (सोयगाव) धरमसिंग चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन गाडे, जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, अब्दुल आमेर अ. सत्तार, सय्यद नासेर हुसेन, राजू बाबा काळे, माजी जि.प.अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी सभापती रामदास पालोदकर, विश्वासराव दाभाडे, नगर परिषद शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, संदीप राऊत, राजाराम पाडळे, जयराम चिंचपुरे, नानासाहेब रहाटे, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, सुरेखा शिंदे, शिवसेना शहरप्रमुख मनोज झंवर, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरसेवक रउफ बागवान,  अकील वसईकर, आसिफ बागवान, सिद्धेश्वर आहेर, डॉ. फिरोज पठाण, बबलू पठाण, नूर मोहंमद कुरेशी,  शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, संजय डमाळे, राजूमिया देशमुख, अंबादास सपकाळ, मोतीराम पाडळे, पंकज जयस्वाल आदींसह शासनाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, लाभार्थी तसेच विविध गावांतील आजी-माजी सरपंच, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 min ago
  • जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    1
    जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
जुन्या जालन्यात एकता भवनच्या इमारतीचे छताचे प्लास्टर कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • भिवंडीत धोकादायक इमारत कोसळली; चार जणांचा मृत्यू, दहाजण अडकण्याची शक्यता भिवंडीत धोकादायक इमारत कोसळली; चार जणांचा मृत्यू, दहाजण अडकण्याची शक्यता भिवंडी, ३१ जुलै भिवंडी शहरातील भंडारी कंपाउंड, नारपोली येथील गंगाराम वाडी परिसरात काल रात्री सुमारे साडेअकरा वाजता चार मजली कोहिनूर अपार्टमेंटच्या बी-विंगचा एक भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून सुमारे सहा ते दहा मजूर अजूनही अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. इमारत आधीच भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने ‘कॅटेगरी सी’ म्हणजे अत्यंत धोकादायक म्हणून घोषित केली होती. प्रशासनाकडून चार नोटिसा देण्यात आल्या होत्या आणि बहुतेक रहिवासी बाहेर काढले होते. तरीही ग्राउंड फ्लोअरवर दुरुस्तीचे काम सुरू असताना आणि काही व्यक्ती आत असताना इमारत कोसळली, असे प्राथमिक माहितीवरून समजते. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ), अग्निशमन दल, पोलीस आणि महानगरपालिकेच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकर्त्यांना लोखंड आणि काँक्रिटचे ढिगारे कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. मृतदेह आयजीएम रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. भिवंडी वेस्टचे आमदार महेश चौगुले यांनी सांगितले, “ही कोहिनूर इमारत भंडारी कंपाउंडमध्ये आहे. महानगरपालिकेने ती धोकादायक म्हणून वर्गीकृत केली होती. इमारत रिकामी होती, पण ग्राउंड फ्लोअरवर काम सुरू होते. सहा-सात मजूर अडकले असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफ आणि पोलीस टीम घटनास्थळी आहेत.” भिवंडीतील अनेक इमारती अनधिकृत आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे धोकादायक असल्याची समस्या गेली अनेक वर्षे सुरू आहे. या घटनेमुळे सुरक्षा नियमांचे पालन आणि अंमलबजावणीबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. बचावकार्य सध्याही वेगाने सुरू आहे.
    1
    भिवंडीत धोकादायक इमारत कोसळली; चार जणांचा मृत्यू, दहाजण अडकण्याची शक्यता
भिवंडीत धोकादायक इमारत कोसळली; चार जणांचा मृत्यू, दहाजण अडकण्याची शक्यता
भिवंडी, ३१ जुलै
भिवंडी शहरातील भंडारी कंपाउंड, नारपोली येथील गंगाराम वाडी परिसरात काल रात्री सुमारे साडेअकरा वाजता चार मजली कोहिनूर अपार्टमेंटच्या बी-विंगचा एक भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून सुमारे सहा ते दहा मजूर अजूनही अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
इमारत आधीच भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने ‘कॅटेगरी सी’ म्हणजे अत्यंत धोकादायक म्हणून घोषित केली होती. प्रशासनाकडून चार नोटिसा देण्यात आल्या होत्या आणि बहुतेक रहिवासी बाहेर काढले होते. तरीही ग्राउंड फ्लोअरवर दुरुस्तीचे काम सुरू असताना आणि काही व्यक्ती आत असताना इमारत कोसळली, असे प्राथमिक माहितीवरून समजते.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ), अग्निशमन दल, पोलीस आणि महानगरपालिकेच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकर्त्यांना लोखंड आणि काँक्रिटचे ढिगारे कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. मृतदेह आयजीएम रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
भिवंडी वेस्टचे आमदार महेश चौगुले यांनी सांगितले, “ही कोहिनूर इमारत भंडारी कंपाउंडमध्ये आहे. महानगरपालिकेने ती धोकादायक म्हणून वर्गीकृत केली होती. इमारत रिकामी होती, पण ग्राउंड फ्लोअरवर काम सुरू होते. सहा-सात मजूर अडकले असण्याची शक्यता आहे. एनडीआरएफ आणि पोलीस टीम घटनास्थळी आहेत.”
भिवंडीतील अनेक इमारती अनधिकृत आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे धोकादायक असल्याची समस्या गेली अनेक वर्षे सुरू आहे. या घटनेमुळे सुरक्षा नियमांचे पालन आणि अंमलबजावणीबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. बचावकार्य सध्याही वेगाने सुरू आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.