चांदूर रेल्वे उपविभागाच्या वतीने धामणगाव रेल्वे येथील 'गणेश इन' सभागृहात श्री छत्रपती शिवाजी महाराज भव्य 'महाराजस्व समाधान शिबिर' अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करत जयंतीनिमित्त या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचे व शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, विविध शासकीय दाखले आणि प्रशासकीय कामे एकाच छताखाली जलद गतीने मार्गी लावणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील शेकडो नागरिकांना व शेतकऱ्यांना विविध महसुली कामांचा तात्काळ निपटारा करून शासकीय दाखले व कल्याणकारी योजनांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड, नगराध्यक्षा सौ. अर्चना अडसड (रोठे अक्का), उपविभागीय अधिकारी (महसूल) आणि महसूल विभागाचे विविध वरिष्ठ अधिकारी विशेष रूपाने उपस्थित होते. तसेच धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चांदूर रेल्वे उपविभागाच्या वतीने धामणगाव रेल्वे येथील 'गणेश इन' सभागृहात श्री छत्रपती शिवाजी महाराज भव्य 'महाराजस्व समाधान शिबिर' अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करत जयंतीनिमित्त या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचे व शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, विविध शासकीय दाखले आणि प्रशासकीय कामे एकाच छताखाली जलद गतीने मार्गी लावणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील शेकडो नागरिकांना व शेतकऱ्यांना विविध महसुली कामांचा तात्काळ निपटारा करून शासकीय दाखले व कल्याणकारी योजनांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड, नगराध्यक्षा सौ. अर्चना अडसड (रोठे अक्का), उपविभागीय अधिकारी (महसूल) आणि महसूल विभागाचे विविध वरिष्ठ अधिकारी विशेष रूपाने उपस्थित होते. तसेच धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- चांदूर रेल्वे उपविभागाच्या वतीने धामणगाव रेल्वे येथील 'गणेश इन' सभागृहात श्री छत्रपती शिवाजी महाराज भव्य 'महाराजस्व समाधान शिबिर' अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडले. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करत जयंतीनिमित्त या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचे व शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न, विविध शासकीय दाखले आणि प्रशासकीय कामे एकाच छताखाली जलद गतीने मार्गी लावणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील शेकडो नागरिकांना व शेतकऱ्यांना विविध महसुली कामांचा तात्काळ निपटारा करून शासकीय दाखले व कल्याणकारी योजनांचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड, नगराध्यक्षा सौ. अर्चना अडसड (रोठे अक्का), उपविभागीय अधिकारी (महसूल) आणि महसूल विभागाचे विविध वरिष्ठ अधिकारी विशेष रूपाने उपस्थित होते. तसेच धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महसूल अधिकारी-कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- वर्धा जिल्ह्यातील आर्वी बसस्थानकावर जागोजागी अत्यंत मोठे खड्डे पडले असून बसेसच्या येण्या-जाण्याच्या मुख्य मार्गावरच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानकातून बसेस बाहेर जाताना आणि आत येताना बसची बॉडी खड्ड्यांमध्ये आदळत आहे. याच गाड्यांमधून दररोज प्रवासी आणि शालेय विद्यार्थी प्रवास करत असल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून अपघाताची दाट शक्यता बनली आहे. जुलै महिना सुरू झाला तरीही बसस्थानकावरील हे खड्डे अद्याप बुजवण्यात आलेले नाहीत. या बसस्थानकाच्या नवीन सिमेंटिंकरण आणि मजबुतीकरणासाठी ₹3 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे, तरीही अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. कोणतेही कारण नसताना वर्षानुवर्षे कामे लांबवत ठेवण्याची प्रथाच आर्वीचे स्थानिक लोकप्रतिनिधी चालवत आहेत. स्थानिक विधानसभा आमदार, विधान परिषद आमदार, राज्यसभा खासदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून गाढ झोपेत आहेत. तसेच राज्याचे परिवहन मंत्री आणि मुंबईतील महामंडळ प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असून त्यांना स्थानिक नागरिकांची कोणतीही काळजी नसल्याची स्थिती आहे. या सर्व प्रकारावर आम आदमी पार्टी आर्वीचे संयोजक अक्षय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. परिवहन मंत्री आणि राज्य सरकारने या समस्येची तात्काळ दखल घेऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.4
- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून वर्धा येथे आयोजित तीन दिवसीय महाआरोग्य शिबिरात तब्बल ६,६०८ नागरिकांनी विविध आजारांची मोफत तपासणी करून घेतली. आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील हे पहिले शिबिर पार पडले असून, यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग अधिक राहिला. तपासणी करून घेतलेल्यांमध्ये ३,०८७ पुरुष आणि ३,५२१ महिलांचा समावेश आहे. या शिबिरात सर्वाधिक ४,१८६ नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. त्याशिवाय ६३८ रुग्णांची हाडरोग, ५९६ रुग्णांची कान-नाक-घसा, ३५४ रुग्णांची दंत, ३२५ रुग्णांची त्वचारोग आणि १३२ महिलांची स्त्रीरोग तपासणी करण्यात आली. ४,२२५ नागरिकांची औषधवैद्यक, १,०४७ जणांची असंसर्गजन्य आजार, ३०१ रुग्णांची HLH, १९७ रुग्णांची मानसोपचार, ३९४ रुग्णांची ईसीजी आणि ७ महिलांची स्तन कॅन्सर तपासणी झाली. या तपासणीदरम्यान ५८ रुग्णांमध्ये हृदयरोग, १०६ जणांमध्ये मधुमेह व रक्तदाब तर २२ संशयित कर्करोग रुग्ण आढळले. शिबिरात ३,८१७ रुग्णांना औषधांचे तर ३,२६१ नागरिकांना चष्म्यांचे वितरण करण्यात आले. शिबिरामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ३४५ नागरिकांचे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यात आले, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे ६६ रुग्णांचे आर्थिक मदतीचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच १९९ अपंग बांधवांकडून आवश्यक साहित्यासाठी मोजमाप घेण्यात आले. या पहिल्याच शिबिराला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नागरिकांना पुढील तीन शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील महाआरोग्य शिबिरे ८ व ९ ऑगस्ट रोजी तळेगाव (शामजीपंत), १० व ११ ऑगस्ट रोजी हिंगणघाट आणि १३ व १४ ऑगस्ट रोजी देवळी येथे आयोजित केली जाणार आहेत.1
- कळंब येथील रॉयल पॅलेस येथे २५ जुलै रोजी दुपारी एक वाजता 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते पार पडले. या शिबिरामध्ये कळंब, बाभुळगाव, केळापूर व पांढरकवडा तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, स्वामित्व सनद, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेसह विविध महसुली सेवांचा लाभ प्रदान करण्यात आला. त्यासोबतच लोकसेवा हक्क कायदा, जीवंत सातबारा मोहीम, अभिलेख दुरुस्ती, घरकुल योजना आणि राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील २७ विभागांच्या सहभागातून आयोजित या अभियानाद्वारे ३,८१५ हून अधिक लाभार्थ्यांना ५,७०७ विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून, नागरिकांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार धीरज स्थूल, तहसीलदार अमित भोईटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- टिटंबा येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर खासदार बळवंत वानखडे यांनी या आश्रम शाळेला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेची गंभीर दखल घेत आदिवासी आश्रम शाळेचे अधीक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश प्रकल्प अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.1
- अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत १ लाख ६० हजार ४३५ रुपये किमतीचा अवैध देशी आणि विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार झाला आहे.1