फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : भारताच्या फाळणीदरम्यान लाखो नागरिकांना सोसाव्या लागलेल्या वेदना, विस्थापन आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत्या १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ देशभर साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जालना जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फाळणीच्या काळातील इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्या काळातील सामाजिक परिणाम तसेच संघर्षातून मिळणारे धडे विद्यार्थ्यांना समजावेत, यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये परिसंवाद, चर्चासत्रे, प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यासोबतच ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, ‘हर घर तिरंगा’ अभियान, ‘वंदे मातरम्’ विषयावरील प्रदर्शन, तिरंगा रंगाची रोषणाई, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली, ‘सेल्फी विथ तिरंगा’ तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. फाळणीच्या काळातील घटनांवर आधारित छायाचित्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि माहितीपर साहित्याचे प्रदर्शन भरवून नागरिकांना त्या काळातील परिस्थितीची माहिती करून दिली जाणार आहे. या उपक्रमांमधून फाळणीच्या कटू आठवणींचे स्मरण करताना देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रभावना अधिक बळकट करण्याचा संदेश दिला जाणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे
फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : भारताच्या फाळणीदरम्यान लाखो नागरिकांना सोसाव्या लागलेल्या वेदना, विस्थापन आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत्या १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ देशभर साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जालना जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फाळणीच्या काळातील इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्या काळातील सामाजिक परिणाम तसेच संघर्षातून मिळणारे धडे विद्यार्थ्यांना समजावेत, यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये परिसंवाद, चर्चासत्रे, प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यासोबतच ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, ‘हर घर तिरंगा’ अभियान, ‘वंदे मातरम्’ विषयावरील प्रदर्शन, तिरंगा रंगाची रोषणाई, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली, ‘सेल्फी विथ तिरंगा’ तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. फाळणीच्या काळातील घटनांवर आधारित छायाचित्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि माहितीपर साहित्याचे प्रदर्शन भरवून नागरिकांना त्या काळातील परिस्थितीची माहिती करून दिली जाणार आहे. या उपक्रमांमधून फाळणीच्या कटू आठवणींचे स्मरण करताना देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रभावना अधिक बळकट करण्याचा संदेश दिला जाणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे
- भोकरदन | दर्शरथबाबा चॅरिटेबल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये दि.12 ते 15ऑगस्ट भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन..! भोकरदन | दर्शरथबाबा चॅरिटेबल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये दि.12 ते 15ऑगस्ट भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन..!1
- सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर ‘Safe Food, Safe Maharashtra’ची धडक कारवाई; परवाना निलंबित सिल्लोड येथील एसटी बस डेपोमधील कॅन्टीनवर ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने धडक तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन तसेच स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या. कॅन्टीनमध्ये अपूर्ण खरेदी नोंदी, पाणी तपासणी अहवालाचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी न झाल्याचेही निदर्शनास आले. या त्रुटींमुळे कॅन्टीनचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून कॅन्टीन बंद करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.1
- जनता दरबार सिल्लोड: आपकी हर समस्या का त्वरित निवारण#Sillod #SillodNews #SillodTaluka #ChhatrapatiSambhajinagar #Aurangabad #MaharashtraNews #SillodKar1
- छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस छ.संभाजीनगर...शासन आदेश धुडकावून मनपात नोकर भरतीचे धाडस ANCHOR: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) मध्ये कंत्राटी पद्धतीने कोणतीही पदभरती करण्यात येऊ नये असे स्पष्ट आदेश शासनाने २३ जुलै रोजी काढले. महापालिकेला २४ जुलै रोजी आदेश मिळाले. अधिकाऱ्यांनी आदेशावर सही केली. त्यानंतरही महापालिकेच्या आरोग्य विभागाने २७जुलै रोजी ६ नर्सची तर १० डॉक्टरांची निवड प्रक्रिया ६ ऑगस्टला पूर्ण करून संबंधितांना ऑर्डरही दिल्याची धक्कादायक माहिती आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शासन आदेश उशिराने मिळाला, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली आहे. शासनादेश आला, त्यावर प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सही करून एनएचएम विभागाचे कार्यक्रम अधिकाऱ्यांना 'मार्क' करून पाठविले. कार्यक्रम अधिकाऱ्यांनी शासनादेशाकडे दुर्लक्ष करीत २७ जुलै रोजी नर्स पदासाठी ६ उमेदवारांची १० नेमणूक केली. हा प्रयोग यशस्वी होताच ६ ऑगस्ट रोजी १० डॉक्टरांच्या नियुक्तीचा घाट घातला. शासनाचा आदेश उशिराने मिळाला. आदेश येताच तातडीने भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.1
- Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉 Navin Singh Oberoi ने Imtiaz Jaleel को दी जन्मदिन की खास बधाई! 🎉1
- न्यायालयाची प्रतिष्ठा राखणे ही पक्षकारांचीच नैतिक जबाबदारी; जालन्यातून राज्य व देशव्यापी जनजागृती मोहिमेचा प्रारंभ एम.एस.एस. लॉ कॉलेजमध्ये आज सकाळी ११ वाजता पहिला कार्यक्रम न्यायालयाची प्रतिष्ठा राखणे ही पक्षकारांचीच नैतिक जबाबदारी; जालन्यातून राज्य व देशव्यापी जनजागृती मोहिमेचा प्रारंभ एम.एस.एस. लॉ कॉलेजमध्ये आज सकाळी ११ वाजता पहिला कार्यक्रम आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : देशाच्या सर्वोच्च न्यायालयात अलीकडच्या काळात घडलेल्या धक्कादायक घटनांनी न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला आव्हान दिले आहे.1
- विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा,बैठकीतील चर्चा व निर्णयांची प्रतिनिधींनी दिली माहिती विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात प्रशासन व संबंधित प्रतिनिधींची बैठक पार पडली. बैठकीतील चर्चा व निर्णयांची माहिती प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना दिली. मागण्या मान्य होण्याबाबत पुढील कार्यवाहीची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.1
- पंचायत समिति व तहसील कार्यालय सिल्लोड में विशेष लोकसंपर्क शिविर का आयोजन आमदार अब्दुल सत्तार की नई पहल: सिल्लोड वासियों की समस्याओं का तत्काल समाधान#Sillod #SillodNews #SillodTaluka #ChhatrapatiSambhajinagar #Aurangabad #MaharashtraNews #SillodKar1
- जालन्यात खाकी वर्दीचा थरकाप! सुंदरनगरमध्ये तब्बल २२ तलवारी अन् घातक शस्त्रांचा महासाठा जप्त; राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनने खळबळ! जालन्यात खाकी वर्दीचा थरकाप! सुंदरनगरमध्ये तब्बल २२ तलवारी अन् घातक शस्त्रांचा महासाठा जप्त; राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनने खळबळ! १० ऑगस्ट २०२६ सोमवार प्रतिनिधी. जी.बी हिवराळे जालना शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सुंदरनगर परिसरात चंदनझिरा पोलिसांनी अत्यंत धडक आणि धाडसी कारवाई करत एकाच झटक्यात २२ तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा तब्बल १ लाख ३४ हजार रुपयांचा अत्यंत घातक शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. या थरारक कारवाईमुळे जालना पोलिसांच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, गुन्हेगारी विश्वात एकच कंप सुटला आहे चंदनझिरा पोलीस ठाणे, जालना मुख्य संशयित आरोपी: शेख माजेद शेख लतिफ कारवाईचे स्वरूप: गुप्त माहितीच्या आधारे सुंदरनगर परिसरातील संशयिताच्या घरावर अचानक टाकलेला छापा. सविस्तर घटनाक्रम व धक्कादायक खुलासे: १. गुप्त खबऱ्याची टिप आणि पोलिसांची ग्रँड एन्ट्री: १० ऑगस्ट २०२६ रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाला अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली की, जालना शहरातील सुंदरनगर भागातील एका घरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शस्त्रे लपवून ठेवण्यात आली आहेत. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित घराची झडती घेतली. २. हादरवून टाकणारा शस्त्रसाठा जप्त: पोलिसांनी जेव्हा घरातील साहित्याची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या अंगावर काटा आला. घरात एक-दोन नव्हे, तर तब्बल २२ धारदार तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा युद्धाच्या तयारीसारखा महासाठा सापडला. पोलिसांनी हा सर्व १ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल तात्काळ जप्त केला. ३. जालना, भोकरदन ते परतूर टार्गेट: प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती अत्यंत संतापजनक आहे. हा सर्व शस्त्रसाठा केवळ बाळगण्यासाठी नव्हे, तर जालना, भोकरदन आणि परतूर या शहरांमधील विविध भागांत गुन्हेगारी कारवायांसाठी विक्री करण्याच्या उद्देशाने आणला गेला होता. ४. राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनचा पर्दाफाश: या रॅकेटचे धागेदोरे राजस्थानात जुळले असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही सर्व घातक शस्त्रे थेट राजस्थानमधील अजमेर येथून मागवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुढील तपास सुरू: पोलिसांनी मुख्य आरोपी शेख माजेद शेख लतिफ याला बेड्या ठोकल्या असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. हा शस्त्रसाठा नेमका कोणासाठी मागवला होता, यामागे मोठे रॅकेट किंवा कोणती मोठी गँग कार्यरत आहे का, याचा कसून तपास आता चंदनझिरा पोलीस करत आहेत. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.1