Shuru
Apke Nagar Ki App…
भोकरदन | दर्शरथबाबा चॅरिटेबल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये दि.12 ते 15ऑगस्ट भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन..! भोकरदन | दर्शरथबाबा चॅरिटेबल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये दि.12 ते 15ऑगस्ट भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन..!
Bharat 24Taas News
भोकरदन | दर्शरथबाबा चॅरिटेबल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये दि.12 ते 15ऑगस्ट भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन..! भोकरदन | दर्शरथबाबा चॅरिटेबल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल मध्ये दि.12 ते 15ऑगस्ट भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन..!
- श्रावण मालक हिवाळेPartur, Jalna🙏12 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन फाळणीच्या वेदनांना उजाळा; जालन्यात ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त विविध उपक्रम ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत परिसंवाद, रॅली, प्रदर्शनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : भारताच्या फाळणीदरम्यान लाखो नागरिकांना सोसाव्या लागलेल्या वेदना, विस्थापन आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत्या १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ देशभर साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त जालना जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. फाळणीच्या काळातील इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्या काळातील सामाजिक परिणाम तसेच संघर्षातून मिळणारे धडे विद्यार्थ्यांना समजावेत, यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये परिसंवाद, चर्चासत्रे, प्रश्नमंजुषा आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. यासोबतच ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम, ‘हर घर तिरंगा’ अभियान, ‘वंदे मातरम्’ विषयावरील प्रदर्शन, तिरंगा रंगाची रोषणाई, तिरंगा ई-बाईक रॅली, तिरंगा रॅली, ‘सेल्फी विथ तिरंगा’ तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. फाळणीच्या काळातील घटनांवर आधारित छायाचित्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि माहितीपर साहित्याचे प्रदर्शन भरवून नागरिकांना त्या काळातील परिस्थितीची माहिती करून दिली जाणार आहे. या उपक्रमांमधून फाळणीच्या कटू आठवणींचे स्मरण करताना देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रभावना अधिक बळकट करण्याचा संदेश दिला जाणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि विविध शैक्षणिक संस्थांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे1
- अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा1
- चिखली:-माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक एक दीड वर्षांपासून शाळेतच आला नाही. कार्यालयीन कामकाजाचे नावावर शिक्षक सतत गैरहजर .. पगार मात्र सुरळीत सुरू. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर . सहावी ते आठवी चे विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान .1
- विविध मांगणयासाठी दी.10/08/2026 रोजी पासून छत्रपति संभाजी नगर आयुक्त कार्यालय समोर अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समिति चे उपोषण शुरू विविध मांगणयासाठी दी.10/08/2026 रोजी पासून छत्रपति संभाजी नगर आयुक्त कार्यालय समोर अ.अ.भ्रष्टाचार विरोधी समिति चे उपोषण शुरू1
- कांदा उत्पादक शेतकऱ्याला दमदाटी; आंदोलन होताच तासाभरात दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द! गंगापुर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्याला व्यापाऱ्यांकडून दमदाटी व अरेरावी केल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अवघ्या एका तासात संबंधित दोन्ही व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांशी अरेरावी करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.1
- सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई,अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित सिल्लोड एसटी डेपो कॅन्टीनवर FDAची धडक कारवाई अस्वच्छता, अपूर्ण रेकॉर्ड आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; परवाना तत्काळ निलंबित सिल्लोड प्रतिनिधी : ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने सिल्लोड एसटी बस डेपोतील M/s S.T. Canteen Upahar Gruh येथे धडक तपासणी केली. तपासणीदरम्यान कॅन्टीनमध्ये स्वच्छतेचा अभाव, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक नोंदींची कमतरता अशा अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. फरशीपासून स्वयंपाकघरापर्यंत अस्वच्छता कॅन्टीनच्या तळमजल्यावरील फरशीवर धूळ, माती, वेष्टने आणि पॅकेजिंगचा कचरा आढळला. भिंतींचे पापुद्रे निघालेले असून रंग उडालेला व भिंती काळवंडलेल्या होत्या. खिडक्यांना कीटक व उंदीर रोखण्यासाठी आवश्यक वायर मेशही बसवलेली नव्हती. भांडी घासण्याची जागाही अत्यंत अस्वच्छ असल्याचे तपासणीत समोर आले. FSSAI परवाना फलक आणि पाणी तपासणी अहवालही नाही कॅन्टीनमध्ये FSSAI परवाना दर्शनी भागात लावलेला आढळला नाही. तसेच पाणी तपासणीचा अद्ययावत अहवाल उपलब्ध नव्हता. बेसन, तेल व काही किराणा मालाच्या खरेदीच्या नोंदी उपलब्ध असल्या तरी चिप्स, नमकीन आदी खाद्यपदार्थांच्या खरेदीचे रेकॉर्ड सादर करता आले नाही. ‘मयूर ब्रँड’ चणाडाळीचा साठा आणि त्याचे खरेदी रेकॉर्डही तपासणीवेळी उपलब्ध नव्हते. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नाही; कॅन्टीनचा परवाना निलंबित अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्रे उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांकडे ॲप्रन व हातमोजेही नव्हते. हात धुण्याची तसेच कपडे बदलण्याची स्वतंत्र सुविधा आढळली नाही. साफसफाईचे वेळापत्रक आणि कीटक नियंत्रणाचे रेकॉर्डही उपलब्ध नव्हते. उघड्या कचराकुंड्या, अयोग्य सांडपाणी वाहिन्या आणि अस्वच्छ परिसरामुळे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्या. या सर्व त्रुटींची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने सदर कॅन्टीनचा परवाना तत्काळ निलंबित (Suspend Forthwith) केला असून कॅन्टीन बंद करण्यात आले आहे.1
- पंचायत समिति व तहसील कार्यालय सिल्लोड में विशेष लोकसंपर्क शिविर का आयोजन आमदार अब्दुल सत्तार की नई पहल: सिल्लोड वासियों की समस्याओं का तत्काल समाधान#Sillod #SillodNews #SillodTaluka #ChhatrapatiSambhajinagar #Aurangabad #MaharashtraNews #SillodKar1
- न्यायालयाची प्रतिष्ठा राखणे ही पक्षकारांचीच नैतिक जबाबदारी; जालन्यातून राज्य व देशव्यापी जनजागृती मोहिमेचा प्रारंभ एम.एस.एस. लॉ कॉलेजमध्ये आज सकाळी ११ वाजता पहिला कार्यक्रम न्यायालयाची प्रतिष्ठा राखणे ही पक्षकारांचीच नैतिक जबाबदारी; जालन्यातून राज्य व देशव्यापी जनजागृती मोहिमेचा प्रारंभ एम.एस.एस. लॉ कॉलेजमध्ये आज सकाळी ११ वाजता पहिला कार्यक्रम आज दिनांक 11 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : देशाच्या सर्वोच्च न्यायालयात अलीकडच्या काळात घडलेल्या धक्कादायक घटनांनी न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला आव्हान दिले आहे.1
- चिखली:-अमर रहे अमर रहे, च्या घोषणा देत शेलसुर च्या वीरपुत्राला भावपूर्ण अखेरचा निरोप . शासकीय इतमामात झाले विरपुत्र हरिदास कापसे वर अंत्यसंस्कार . मुलगा ऋग्वेद ने दिला वडिलांना मुखाग्नी. तीन राऊंड फायरिंग करत आर्मी जवान सह पोलिसांनी दिली सलामी1