Shuru
Apke Nagar Ki App…
पारध येथे चैत्र नवरात्र उत्सवात पारंपरिक स्वाऱ्यांची भक्तिमय परंपरा जिवंत शांततेने पार पाडली
अब तक न्यूज महाराष्ट्र
पारध येथे चैत्र नवरात्र उत्सवात पारंपरिक स्वाऱ्यांची भक्तिमय परंपरा जिवंत शांततेने पार पाडली
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Jansagar 9 Marathi1
- पत्रकार रामेश्वर दरेकर साहेब यांच्यावरील कारवाई आणि त्याविरोधात 'ऑल इंडिया पँथर सेने'ने घेतलेली आक्रमक भूमिका हा विषय सध्या लोकशाहीतील 'चौथ्या स्तंभा'च्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी प्रश्नांची भीती वाटते का? एखाद्या पत्रकाराने शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडल्या तर ते 'गुन्हा' कसे ठरतात? सरकारला जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा प्रश्न विचारणाऱ्याचा आवाज दाबणे सोपे वाटते का? लोकशाही की हुकूमशाही? संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करण्याऐवजी, कायद्याचा धाक दाखवून पत्रकारांना गप्प करणे ही अघोषित आणीबाणी नाही का? कारवाईचा निकष काय? ज्या वेगाने पत्रकारांवर गुन्हे दाखल होतात, त्याच वेगाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा कष्टकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी सरकार पावले का उचलत नाही? कारवाईचा रोख नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांकडेच का असतो? दडपशाहीने प्रश्न सुटतील का? रामेश्वर दरेकर यांच्यासारख्या पत्रकाराला कायदेशीर कचाट्यात अडकवून तुम्ही प्रश्न संपवू पाहत आहात की ते अधिक प्रखर करू पाहत आहात? ही दडपशाही जनतेचा असंतोष वाढवणारी ठरणार नाही का? पोलिस प्रशासनाचा राजकीय वापर? सामान्यांचा आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध पोलिस यंत्रणेचा वापर करणे हा सत्तेचा दुरुपयोग नाही का? ऑल इंडिया पँथर सेनेने उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ एका संघटनेचे नसून संपूर्ण लोकशाही प्रेमी जनतेचे आहेत, त्याचे उत्तर सरकार कधी देणार? लोकशाहीत टीका सहन करण्याची क्षमता हा सत्तेचा दागिना असतो. जेव्हा लेखणीवर निर्बंध येतात, तेव्हा समाज अधोगतीकडे जातो. रामेश्वर दरेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध करणे हा केवळ एका व्यक्तीचा बचाव नसून, तो 'बोलण्याच्या स्वातंत्र्याचा' बचाव आहे. या प्रकरणात सरकारने केवळ कारवाई मागे न घेता, पत्रकारांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. 1
- रिपोर्टर सिल्लोड मुजीब शेख1
- तुळजापुरात खाकीचा माज : भाविकांना अमानुष मारहाण, पार्किंग वादातून पोलिस-भाविक झटापट तुळजापूर (धाराशिव) : श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात पार्किंगच्या मुद्द्यावरून पोलिस आणि भाविकांमध्ये झालेल्या झटापटीत काही महिला भाविकांसह अनेकांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे तुळजापूरमध्ये खळबळ उडाली असून, सोशल मीडियावर “खाकीचा माज” अशी तीव्र टीका होत आहे. घटना नुकतीच घडली असून, मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. पार्किंग व्यवस्थेबाबत वाद झाल्याने पोलिसांनी भाविकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद ते हाणामारीपर्यंत मजल गेली. उपलब्ध व्हिडिओ फुटेजमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांकडून भाविकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे दृश्य स्पष्ट दिसत आहे. यात महिला भाविकांचाही समावेश असल्याने संताप व्यक्त होत आहे. डीवायएसपी निलेश देशमुख यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी या घटनेत सहभागी असल्याचे सांगितले जात आहे. भाविकांकडून पोलिसांवर अमानुष मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे, तर पोलिस बाजूने नियमांचे उल्लंघन आणि अडथळा आणल्याचे कारण दिले जाण्याची शक्यता आहे. तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तिपीठ आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येतात. मात्र पार्किंग, गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत वारंवार तक्रारी येत असतात. या घटनेने भाविकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या काय? घटनेची पोलिस प्रशासनाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे. मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने लक्ष घालून पार्किंग आणि भाविक सुविधा सुधारण्याची मागणी होत आहे.1
- समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिलांचा जागीच मृत्यू, ३ जखमी.. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली1
- विठाबाई नारायणगावकर तमाशा महिला कलावंताना जबर मारहाण.घारगाव पोलिस स्टेशनला कलावंत आक्रमक.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1