Shuru
Apke Nagar Ki App…
Daulat Zanan
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पुणे जिल्ह्यातील थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलाला मोठे भगदाड पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या पुलाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती व स्ट्रक्चरल ऑडिट न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.1
- पिंपरी-चिंचवडमध्ये वारकरी संप्रदायावरील वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यावर झालेल्या शाईफेकीला भाजपा आमदार महेश लांडगे यांनी जाहीर पाठिंबा दिला. वारकरी संप्रदायावर टीका करून धार्मिक तेढ निर्माण करणे सहन केले जाणार नाही, असा इशारा लांडगेंनी दिला.1
- महामेट्रोच्या कामामुळे निगडी महामार्गावर एका दुचाकीस्वाराचा जीव गेला. या घातक प्रकारामुळे पिंपरी चिंचवडकरांनी महामेट्रो संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.1
- पुण्यात वाहतूक नियंत्रित करताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा संयम सुटला. त्यांनी एका ट्रक चालकावर थेट दगड उगारला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.1
- आई नऊ महिने वेदना सहन करून, आपले संपूर्ण आयुष्य मुलांसाठी जगते. स्वतःसाठी तिच्या वाट्याला काहीच येत नाही, तरीही ती फक्त मुलांच्या आनंदातच आपले जग शोधते.1
- पिण्याच्या पाण्याचे राजकारण थांबवा, अन्यथा 'शिवसेना स्टाईल' आंदोलन; अमोल शिंदेंचा इशारा येवला नगरपालिकेने शहराचा पाणीपुरवठा चार दिवसांआड केल्याच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, "येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्याचे राजकारण करू नका, नियमित पाणीपुरवठा करा; अन्यथा शिवसेना स्टाईलने हंडा मोर्चा काढला जाईल," असा गर्भित इशारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला आहे. शहरातील पाणीटंचाईच्या तक्रारी वाढल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी गंगासागर तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगरपालिकेच्या नियोजनावर जोरदार टीका करण्यात आली. अमोल शिंदे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून जे नियोजन तीन दिवसांआड होते, ते आता चार दिवसांवर का गेले? निवडणुकीच्या जाहीरनाम्यात 'रोज पाणी देऊ' असे आश्वासन दिले गेले होते, मात्र आज परिस्थिती उलट झाली आहे. गेल्या २० वर्षांपासून मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असूनही शहराचा पाणी प्रश्न सुटू शकला नाही, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. शहराचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी, पांडुरंग शेळके,गोरख सुराशे,गोरख दाणे,विजय मोरे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास येत्या काळात नगरपालिका प्रशासनाविरुद्ध 'हंडा मोर्चा' निघणार हे निश्चित मानले जात आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- सांगली जिल्ह्यात जमिनीच्या वादातून संजय भोकरे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. पोलिसांनी याची माहिती मिळताच, तात्काळ कारवाई करत फिल्मी स्टाईलने आरोपींना बेड्या ठोकल्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.1
- न्यू मुंबई चायनीज बिडकीन बस स्टॅन्ड समोर आहे. मुंबई चायनीज दुसरी शाखा फारोळा. मुंबई चायनीज मालक इमरान शहा यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .1
- नसरापूर अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यात काढला मोर्चा ; नागरिक मोठ्या संख्येने सहभागी विक्रम शिंदे /भोर दि.१० नसरापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यातील बालगंधर्व चौकातून मूक मोर्चा काढण्यात आला. “चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे” आणि आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात पीडित मुलीचे आई-वडीलही सहभागी झाले होते. पुणे शहरातील विविध भागांतून नागरिक, महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संताप व्यक्त केला.1