Shuru
Apke Nagar Ki App…
आई नऊ महिने वेदना सहन करून, आपले संपूर्ण आयुष्य मुलांसाठी जगते. स्वतःसाठी तिच्या वाट्याला काहीच येत नाही, तरीही ती फक्त मुलांच्या आनंदातच आपले जग शोधते.
My Lovely School
आई नऊ महिने वेदना सहन करून, आपले संपूर्ण आयुष्य मुलांसाठी जगते. स्वतःसाठी तिच्या वाट्याला काहीच येत नाही, तरीही ती फक्त मुलांच्या आनंदातच आपले जग शोधते.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आई नऊ महिने वेदना सहन करून, आपले संपूर्ण आयुष्य मुलांसाठी जगते. स्वतःसाठी तिच्या वाट्याला काहीच येत नाही, तरीही ती फक्त मुलांच्या आनंदातच आपले जग शोधते.1
- सारडा सर्कल परिसरातील पक्के बांधकाम पत्र्याचे शेड अतिक्रमण हटविले नाशिक :- आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक महापालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई केल्यानंतर नाशिककरांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर अखेर सारडा सर्कल परिसरातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई महानगरपालिकेमार्फत करण्यात आली, ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि परिसरातील वाढती अव्यवस्था लक्षात घेता प्रशासनाने वेळेत ठोस निर्णय घेणे आवश्यक होते. झालेली कारवाई ही नागरिकांच्या आवाजाला मिळालेला प्रतिसाद आहे. महानगरपालिका आयुक्त व संबंधित प्रशासनाचे धन्यवाद! व्यक्त करत नाशिककरांच्या हिताचे प्रश्न यापुढेही प्राधान्याने मार्गी लागतील, ही अपेक्षा. आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली आहे1
- नाशिकमधील मुंबई-आग्रा महामार्गावर तीव्र उष्णतेमुळे भरधाव कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला. यात कार पलटी होऊन चालक जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.1
- कर्नालमध्ये एका वैज्ञानिकच्या घरात घुसून एका वृद्ध महिलेवर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्याचा आरोप स्कूल व्हॅन चालकावर असून, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.1
- महाराष्ट्रामध्ये रिंग रोडच्या कामासाठी प्रशासनाने बळाचा वापर करत नागरिकांची घरे आणि जमिनी तोडल्या आहेत. या कारवाईमुळे बाधित नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.1
- पिण्याच्या पाण्याचे राजकारण थांबवा, अन्यथा 'शिवसेना स्टाईल' आंदोलन; अमोल शिंदेंचा इशारा येवला नगरपालिकेने शहराचा पाणीपुरवठा चार दिवसांआड केल्याच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, "येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्याचे राजकारण करू नका, नियमित पाणीपुरवठा करा; अन्यथा शिवसेना स्टाईलने हंडा मोर्चा काढला जाईल," असा गर्भित इशारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला आहे. शहरातील पाणीटंचाईच्या तक्रारी वाढल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी गंगासागर तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगरपालिकेच्या नियोजनावर जोरदार टीका करण्यात आली. अमोल शिंदे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून जे नियोजन तीन दिवसांआड होते, ते आता चार दिवसांवर का गेले? निवडणुकीच्या जाहीरनाम्यात 'रोज पाणी देऊ' असे आश्वासन दिले गेले होते, मात्र आज परिस्थिती उलट झाली आहे. गेल्या २० वर्षांपासून मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असूनही शहराचा पाणी प्रश्न सुटू शकला नाही, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. शहराचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी, पांडुरंग शेळके,गोरख सुराशे,गोरख दाणे,विजय मोरे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास येत्या काळात नगरपालिका प्रशासनाविरुद्ध 'हंडा मोर्चा' निघणार हे निश्चित मानले जात आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- सुरगाणा तालुक्यातील श्रीभुवन येथे सुरू असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड झाले आहे. यामुळे या रस्त्याच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कामातील पारदर्शकतेवर शंका उपस्थित होत आहे. संबंधित विभागाने तातडीने या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.1
- भोंदूगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेला अशोक खरातला शिर्डी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत नाशिक कारागृहात पाठवले आहे. त्याची पत्नी कल्पना खरात अवैध सावकारी प्रकरणात अजूनही फरार आहे, ज्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबईत खरातविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा ताबा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.1