महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत आमगाव विधानसभेच्या वतीने २२ जुलै २०२६ रोजी विजयालक्ष्मी सभागृह, रिसामा, रेल्वे स्टेशन रोड, आमगाव येथे विधानसभा स्तरीय 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' अत्यंत उत्साहात पार पडले. पावसाचे दिवस असूनही या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शिबिराला गोंदियाचे जिल्हाधिकारी मंदार पत्की, अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश यशवंतराव हर्षे, आमगाव पंचायत समिती सभापती योगिताताई यशवंतराव पुंडे, देवरी पंचायत समिती सभापती अनिल बिसेन, तसेच उपविभागीय अधिकारी, विविध तालुक्यांचे तहसीलदार आणि महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. शिबिरामध्ये सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापले स्टॉल लावून नागरिकांच्या समस्या लेखी स्वरूपात स्वीकारल्या आणि त्यांच्या समाधानाचे मार्ग सुचवले. आमदार संजय पुराम यांनी संपूर्ण स्टॉलला भेट देऊन पाहणी केली आणि जनतेच्या समस्यांचे त्वरित निवारण करण्याचे निर्देश दिले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आणि पूर्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रशासनाने यापुढेही जनतेच्या समस्यांचे सातत्याने समाधान करत राहावे, असे निर्देश देत आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर पट्टे वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक वैयक्तिक व प्रशासकीय समस्यांचे जागेवरच निराकरण करून शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये नुकसानग्रस्तांना मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घरांचे यशस्वी हस्तांतरण करण्यात आले, पात्र नागरिकांना जागेचे पट्टे (हक्कपत्र) आणि शिधापत्रिका (रेशन कार्ड) वितरित करण्यात आले. यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागामार्फत उपस्थितांना रोपांचे वाटप करण्यात आले.
महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत आमगाव विधानसभेच्या वतीने २२ जुलै २०२६ रोजी विजयालक्ष्मी सभागृह, रिसामा, रेल्वे स्टेशन रोड, आमगाव येथे विधानसभा स्तरीय 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' अत्यंत उत्साहात पार पडले. पावसाचे दिवस असूनही या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शिबिराला गोंदियाचे जिल्हाधिकारी मंदार पत्की, अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश यशवंतराव हर्षे, आमगाव पंचायत समिती सभापती योगिताताई यशवंतराव पुंडे, देवरी पंचायत समिती सभापती अनिल बिसेन, तसेच उपविभागीय अधिकारी, विविध तालुक्यांचे तहसीलदार आणि महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. शिबिरामध्ये सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापले स्टॉल लावून नागरिकांच्या समस्या लेखी स्वरूपात स्वीकारल्या आणि त्यांच्या समाधानाचे मार्ग सुचवले. आमदार संजय पुराम यांनी संपूर्ण स्टॉलला भेट देऊन पाहणी केली आणि जनतेच्या समस्यांचे त्वरित निवारण करण्याचे निर्देश दिले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आणि पूर्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रशासनाने यापुढेही जनतेच्या समस्यांचे सातत्याने समाधान करत राहावे, असे निर्देश देत आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर पट्टे वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक वैयक्तिक व प्रशासकीय समस्यांचे जागेवरच निराकरण करून शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये नुकसानग्रस्तांना मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घरांचे यशस्वी हस्तांतरण करण्यात आले, पात्र नागरिकांना जागेचे पट्टे (हक्कपत्र) आणि शिधापत्रिका (रेशन कार्ड) वितरित करण्यात आले. यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागामार्फत उपस्थितांना रोपांचे वाटप करण्यात आले.
- महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत आमगाव विधानसभेच्या वतीने २२ जुलै २०२६ रोजी विजयालक्ष्मी सभागृह, रिसामा, रेल्वे स्टेशन रोड, आमगाव येथे विधानसभा स्तरीय 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' अत्यंत उत्साहात पार पडले. पावसाचे दिवस असूनही या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शिबिराला गोंदियाचे जिल्हाधिकारी मंदार पत्की, अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश यशवंतराव हर्षे, आमगाव पंचायत समिती सभापती योगिताताई यशवंतराव पुंडे, देवरी पंचायत समिती सभापती अनिल बिसेन, तसेच उपविभागीय अधिकारी, विविध तालुक्यांचे तहसीलदार आणि महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. शिबिरामध्ये सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापले स्टॉल लावून नागरिकांच्या समस्या लेखी स्वरूपात स्वीकारल्या आणि त्यांच्या समाधानाचे मार्ग सुचवले. आमदार संजय पुराम यांनी संपूर्ण स्टॉलला भेट देऊन पाहणी केली आणि जनतेच्या समस्यांचे त्वरित निवारण करण्याचे निर्देश दिले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त आणि पूर्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रशासनाने यापुढेही जनतेच्या समस्यांचे सातत्याने समाधान करत राहावे, असे निर्देश देत आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर पट्टे वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक वैयक्तिक व प्रशासकीय समस्यांचे जागेवरच निराकरण करून शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये नुकसानग्रस्तांना मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घरांचे यशस्वी हस्तांतरण करण्यात आले, पात्र नागरिकांना जागेचे पट्टे (हक्कपत्र) आणि शिधापत्रिका (रेशन कार्ड) वितरित करण्यात आले. यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी वनविभागामार्फत उपस्थितांना रोपांचे वाटप करण्यात आले.1
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र (देवाभाऊ) फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै २०२६ रोजी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे 'देवाभाऊ कृषी माउली' सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या प्रसंगी एकल (विधवा) महिलांना शेतीकामासाठी उपयुक्त असणाऱ्या कृषी साहित्याचे वाटप करून त्यांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने कौतुकास्पद पुढाकार घेण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. लाभार्थी महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.1
- देवाभाऊ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तिरोडा येथे 'कृषि माऊली' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या विशेष समारंभादरम्यान एकल महिलांना शेतीकामासाठी उपयुक्त असलेल्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. बापू की आवाज न्यूजचे प्रतिनिधी नितेश बाबू यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती दिली आहे.1
- साकोली शहरात आज विद्यार्थी संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या साकोली बंदच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळत असून हा बंद पूर्णपणे यशस्वी ठरत आहे. या भव्य मोर्चामध्ये हजारो नागरिक, तरुण आणि मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. आंदोलकांकडून दिल्ली सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली जात असून "मोदी हटाव, देश वाचवा" अशा घोषणा दिल्या जात आहेत. या आंदोलनादरम्यान मोदी, अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. "मोदी जब जब डरता आहे, पोलीस को आगे करता आहे" अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध केला आहे. देशहिताच्या या कामात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.1
- महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने तहसील कार्यालयावर शांततापूर्ण जनमोर्चा काढण्यात आला. शिक्षण व्यवस्थेतील नैतिक उत्तरदायित्व, श्री सोनम वांगचुक यांच्या जनहिताच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेणे आणि लोकशाही हक्कांच्या संरक्षणासाठी हे आंदोलन करण्यात आले. या जनमोर्चाच्या माध्यमातून तहसीलदारांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे केंद्रीय शिक्षणमंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे. तसेच नीट (NEET) व इतर स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका गळतीची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. परीक्षा अनियमिततेमुळे आत्महत्या केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुटुंबास १ कोटी रुपयांची आर्थिक मदत व एका सदस्यास शासकीय नोकरी देण्यात यावी, तसेच दोषी अधिकारी व परीक्षा माफियांची संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याशिवाय, श्री सोनम वांगचुक व आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांच्या लोकशाही हक्कांचा आदर करावा आणि केंद्र सरकारने विद्यार्थी, पालक व प्रतिनिधींशी तात्काळ संवाद साधावा, असा आग्रह धरण्यात आला. या मोर्चात नगरसेवक कुणाल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अमोल टेंभुर्णे, नगरसेवक निर्मला नंदेश्वर, त्रिवेणी चौधरी, डी. जी. रंगारी, दिलीप मातुरकर यांच्यासह विविध सर्वपक्षीय कार्यकर्ते, महामाया महिला सामाजिक न्याय संघटना, महिला संघटना आणि विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.2
- देशाच्या शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होत असलेल्या खेळखंडोबाविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि युवा नेते अभिजीत दीपके आमरण उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांचा तीव्र निषेध करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना एकत्र आल्या आहेत. कुही येथे मांडला रोड ते थेट तहसील कार्यालयापर्यंत एक प्रचंड आणि 'महा-आक्रमक मोर्चा' काढण्यात आला. मांडला रोडवरून सुरू झालेल्या या जनसमुदायात सत्ताधारी आणि विरोधी अशा सर्व पक्षांचे नेते, कार्यकर्ते, शेतकरी, पालक आणि हजारो नागरिक दलीय मतभेद विसरून रस्त्यावर उतरले. "विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा" आणि "सोनम वांगचुक व अभिजीत दीपके यांच्या मागण्या पूर्ण करा" अशा जोरदार घोषणांनी मांडला रोड ते तहसील कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला. मांडला रोडवर प्रचंड गर्दी जमल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. परीक्षांमधील घोळ, पेपर लीक आणि शैक्षणिक नुकसान यामुळे पालक व विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आला असून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. हा आक्रमक मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर उपविभागीय अधिकारी (SDO) करिश्मा प्रताप चौधरी आणि प्रशांत झाडे यांना महामहिम राष्ट्रपतींच्या नावे अत्यंत कडक शब्दांतील निवेदन सुपूर्द करण्यात आले. दिल्लीत उपोषणाला बसलेल्या प्रदर्शनकर्त्यांच्या मागण्यांवर २४ तासांच्या आत निर्णय झाला नाही आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आला नाही, तर मांडला रोडवरून सुरू झालेला हा लढा संपूर्ण नागपूर जिल्हा ठप्प करेल, असा थेट इशारा सर्वपक्षीय आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.1
- माजी आमदार सुधीर पारवे यांच्या उमरेड मतदारसंघातील विविध गावांमध्ये १० हजार झाडे लावण्याच्या संकल्पनेतून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक २ जुना धान्यगंज येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. सुधीर पारवे फाउंडेशन, लक्ष्मणा बहुउद्देशीय संस्था (भिवापूर) आणि भारतीय जनता पार्टी उमरेड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन व हरित भविष्याचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. हा वृक्षारोपण कार्यक्रम “एक पेड, माँ के नाम” या संकल्पनेखाली पार पडला. या अभियानाअंतर्गत वड, पिंपळ, कडूनिंब, आवळा, जांभूळ, करंजी आणि उंबर यांसारख्या विविध प्रकारच्या झाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. या प्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष व गटनेते सतीश चौधरी, आरोग्य व स्वच्छता विभाग सभापती वैष्णवी लाडेकर, शिक्षण सभापती वैशालीताई राजेश बांदरे, नगरसेवक प्रणय मधुकर मेश्राम, महामंत्री राकेश नौकरकर, महामंत्री गिरीश लेंडे, अमितजी लाडेकर, तुषारजी ढोरे, विशालजी बेले, बालाजी मुंगले, राजूजी वाघमारे, निखिलजी नकाते, संजयजी नखाते, विश्लेष चकोले आणि हिमांशू बहादुरे यांच्यासह सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- गोंदिया जिल्ह्यातील पुराडा येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने 'देवाभाऊ माऊली कृषी सोहळा' मोठ्या उत्साहात पार पडला. बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी आमदार संजय पुराम यांच्या 'समृद्धी' निवासस्थानी आयोजित या उपक्रमांतर्गत परिसरातील एकल शेतकरी महिलांना खरीप हंगामासाठी आवश्यक कृषी साहित्याचे वाटप करण्यात आले. सध्या खरीप हंगामाची कामे सुरू असल्याने शेतीसाठी आवश्यक साहित्य वेळेवर उपलब्ध व्हावे, या उद्देशाने जिल्हा परिषद सदस्या तथा माजी बालकल्याण सभापती सविता पुराम यांच्या हस्ते कृषी साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, समाजात अशा महिलांना हवा तसा मान-सन्मान मिळत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ बॅनर्स-पोस्टर्स लावण्यापेक्षा महिलांना उपयुक्त साहाय्य द्यावे आणि महिला कृषी बिल निघाल्यामुळे त्यांचा सन्मान व्हावा, या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच हा अभिनव उपक्रम आगामी काळात संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या कार्यक्रमाला प्रज्ञाताई संगीतवार, पिंकी कटकवार, नूतन कोयें, अंबिका बंजार, अंजू बिसेन, ममता अंबादे, शिल्पा बांते आणि प्रभा सलामे यांच्यासह विविध गावांमधील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने लाभार्थी महिला उपस्थित होत्या. या उपक्रमामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला असून स्थानिक पातळीवर या कार्यक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.1