बोरी अडगाव येथे शाळांच्या स्वच्छतागृह नूतनीकरण व एनसीडी स्क्रीनिंग उपक्रमाचा भव्य शुभारंभ खामगाव: पंचायत समिती खामगाव अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वच्छता व आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बोरी अडगाव येथे सुमारे २.५ कोटी रुपयांच्या CSR निधीतून ८ शाळांच्या स्वच्छतागृह नूतनीकरण कार्याचा तसेच मोबाईल मेडिकल युनिटद्वारे एनसीडी (असंसर्गजन्य रोग) स्क्रीनिंग उपक्रमाचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाला राज्याचे कामगार मंत्री मा. ना. अॅड. आकाश फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच औद्योगिक सुरक्षा सहसंचालक शारदा बुंदोले, ओएसडी निलेश देठे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमाचे आयोजन बीडीओ चंदनसिंह राजपूत, बीईओ उमेश जैन आणि केंद्रप्रमुख हरिदास पाटेखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.CSR अंतर्गत मोठा निधी, खाजगी क्षेत्राचा सहभाग या प्रकल्पासाठी महिंद्रा CIE, स्कोडा-फोक्सवॅगन आणि ट्रॅक कॉम्पोनंट्स लिमिटेड या कंपन्यांनी CSR निधी दिला आहे. तसेच ग्लोबल वेल्फेअर फाउंडेशन व अपेक्षा होमियो सोसायटी यांनी अंमलबजावणी भागीदार म्हणून काम पाहिले. या माध्यमातून ग्रामीण शाळांमध्ये स्वच्छतागृह सुविधा उभारण्यास मोठा हातभार लागणार आहे.आरोग्य तपासणीद्वारे जनजागृती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांच्या नेतृत्वाखाली मोबाईल मेडिकल युनिटद्वारे शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थांची एनसीडी तपासणी करण्यात आली. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या आजारांचे लवकर निदान होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे.या शाळांचा समावेश या उपक्रमात बोरी अडगाव, निपाणा, हिवरखेड, पिंपळगाव, अंबिकापूर, चिंचपूर, चितोडा, चितोडा उर्दू व धापटी येथील जिल्हा परिषद शाळांचा समावेश करण्यात आला आहे.स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमावेळी सरपंच सौ. पूजा वाघमारे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शिवहरी घडेकार, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य व स्वच्छता या दोन महत्त्वाच्या घटकांना चालना देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
बोरी अडगाव येथे शाळांच्या स्वच्छतागृह नूतनीकरण व एनसीडी स्क्रीनिंग उपक्रमाचा भव्य शुभारंभ खामगाव: पंचायत समिती खामगाव अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वच्छता व आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बोरी अडगाव येथे सुमारे २.५ कोटी रुपयांच्या CSR निधीतून ८ शाळांच्या स्वच्छतागृह नूतनीकरण कार्याचा तसेच मोबाईल मेडिकल युनिटद्वारे एनसीडी (असंसर्गजन्य रोग) स्क्रीनिंग उपक्रमाचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाला राज्याचे कामगार मंत्री मा. ना. अॅड. आकाश फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच औद्योगिक सुरक्षा सहसंचालक शारदा बुंदोले, ओएसडी निलेश देठे यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमाचे आयोजन बीडीओ चंदनसिंह राजपूत, बीईओ उमेश जैन आणि केंद्रप्रमुख हरिदास पाटेखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.CSR अंतर्गत मोठा निधी, खाजगी क्षेत्राचा सहभाग या प्रकल्पासाठी महिंद्रा CIE, स्कोडा-फोक्सवॅगन आणि ट्रॅक कॉम्पोनंट्स लिमिटेड या
कंपन्यांनी CSR निधी दिला आहे. तसेच ग्लोबल वेल्फेअर फाउंडेशन व अपेक्षा होमियो सोसायटी यांनी अंमलबजावणी भागीदार म्हणून काम पाहिले. या माध्यमातून ग्रामीण शाळांमध्ये स्वच्छतागृह सुविधा उभारण्यास मोठा हातभार लागणार आहे.आरोग्य तपासणीद्वारे जनजागृती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांच्या नेतृत्वाखाली मोबाईल मेडिकल युनिटद्वारे शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थांची एनसीडी तपासणी करण्यात आली. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या आजारांचे लवकर निदान होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे.या शाळांचा समावेश या उपक्रमात बोरी अडगाव, निपाणा, हिवरखेड, पिंपळगाव, अंबिकापूर, चिंचपूर, चितोडा, चितोडा उर्दू व धापटी येथील जिल्हा परिषद शाळांचा समावेश करण्यात आला आहे.स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमावेळी सरपंच सौ. पूजा वाघमारे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शिवहरी घडेकार, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य व स्वच्छता या दोन महत्त्वाच्या घटकांना चालना देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
- खामगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका २६ वर्षीय जेसीबी ऑपरेटरला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना जळका भडंग फाट्यावर घडली आहे. या मारहाणीत ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून त्याच्या खिशातील २५ हजार रुपयेही गहाळ झाल्याची तक्रार त्याने पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शंकरनगर येथील रहिवासी पवन रामदास क्षीरसागर (वय २६) हे निपाणा येथील ज्ञानेश्वर बोचरे यांच्या जेसीबीवर ऑपरेटर म्हणून काम करतात. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास, जेसीबीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते दुरुस्तीसाठी खामगावकडे जात होते. जळका भडंग येथील वाकुड जाणाऱ्या रस्त्याच्या फाट्यावर एक चारचाकी गाडी उभी होती, जिचा दरवाजा उघडा होता. पवन यांनी गाडीतील व्यक्तीला दरवाजा लावून घेण्यास सांगितले. याच साध्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि गाडीतील व्यक्तींनी पवन यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पवन क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रवी सोळंके, महेंद्र दामोदर, अरविंद दामोदर आणि कपिल दामोदर (सर्व रा. जळका भडंग) यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत पवन यांच्या तोंडावर, छातीवर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. मारहाणीदरम्यान त्यांचे शर्ट फाटले असून खिशातील २५,००० रुपये देखील गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. पवन यांना उपचारासाठी खामगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, पवनला रक्ताची उलट्या झाल्या असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तो सध्या आयसीयूमध्ये (ICU) उपचार घेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. पिंपळगाव राजा पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.1
- अकोला : समाजात फोफावत चाललेली बुवाबाजी, अनिष्ट रूढी-परंपरा यावर प्रहार करत आणि महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देत, 'सावित्रीबाई फुले भिशी ग्रुप' (ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ) यांच्या वतीने नुकताच एक अनोखा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुमारे १५० ते २०० महिलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात सामाजिक बांधिलकीसोबतच प्रबोधनाचा जागर पाहायला मिळाला. सामाजिक दातृत्वाचे दर्शन कार्यक्रमाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले ग्रुपने आपल्या दातृत्वाची परंपरा कायम ठेवली. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मोफत शिबिरासाठी ३,५०० रुपये किमतीचा एक स्टँडिंग फॅन भेट म्हणून देण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा शारदा गोपाळराव धनोकार यांनी केले. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या पब्लिक स्कूल पातुरच्या प्राचार्य विद्या निलेश गाडगे यांनी 'आजच्या युगात मुलांना मोबाईलपासून दूर कसे ठेवावे' या विषयावर महिलांशी संवाद साधला. यावेळी स्वागत गीताने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रुपमधील ज्येष्ठ महिलांनी तसेच इतर सदस्यांनी सादर केलेल्या समूह नृत्य आणि वैयक्तिक नृत्याविष्काराने कार्यक्रमात रंगत भरली. नाटिकेतून बुवाबाजीवर ओढले ताशेरे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित सादर केलेली नाटिका. समाजात देवाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू महाराजांचे वास्तव या नाटिके द्वारे मांडण्यात आले. यामध्ये मैत्री प्रवीण लोखंडे यांनी भोंदू महाराजची भूमिका साकारली. या विषयावर राज्य अन्न व पुरवठा आयोगाच्या सौ. मायाताई इरतकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यांची लाभली उपस्थिती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती सावित्री ब्रिगेड माळी समाज महिला मंडळ भिशी ग्रुपच्या अध्यक्षा जयश्री तडस, ग्रुप लीडर्स माधुरी दाते, भारती शेंडे, कल्पना तायडे, स्मिता वरोकार, विद्या घाटोळ, सोनिया निमकर, हेमा वरोकार, माधुरी धनोकार, अलका ढोमणे व शारदा धनोकार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कुंदाताई लोखंडे, पुष्पा वाढोकार, लता धनोकार, रत्ना हुसे, तेजस्विनी चिंचोलकर, सुनंदा हुसे, वर्षा जढाळ, कुसुम बेलसरे, पद्मा बहाड, स्मिता देशमुख, शितल हाडोळे, उषा देवघरे, वनमाला चिंचोलकार, सरिता चिंचोलकार, मंगला मसने, विशाखा काळे, शुभांगी काळे, माधुरी काळे, ज्योती असोलकार, ममता आसोलकार, नीता सांगोकार, उषा नाथे, गोदावरी कलोरे यांसह मोठ्या संख्येने महिला सदस्य सहभागी होत्या.1
- बुलढाणा जिल्ह्याच्या ऐतिहासिक भेंडवड घट मांडणीचे भाकीत जाहीर.... देशावर नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती आणि अर्थव्यवस्था ढासाळेल1
- "संगणक युगातही शब्दाचा मान; भेंडवळच्या वाघ महाराजांनी वर्तवले यंदाचे सविस्तर भविष्य!"1
- *राज्यात सध्या 'खरात' प्रकरणामुळे अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. नेमके काय आरोप केलेत श्याम मानवांनी? पाहूया हा रिपोर्ट.बुलढाण्यातील शासकीय विश्रामगृहात आज श्याम मानव यांनी घेतलेली पत्रकार परिषद चांगलीच गाजली. २०१३ मध्ये जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आल्यानंतर, २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच असल्याचे श्याम मानवांनी म्हटले आहे.अंमलबजावणीसाठी समिती नेमली गेली, परंतु निधी मिळवण्यासाठी त्यांना मंत्रालयात वारंवार चकरा माराव्या लागल्या. सरकारने आपल्याला केवळ 'झुलवत' ठेवले, असा थेट आरोप त्यांनी केला.केवळ वरिष्ठ पातळीवरच नव्हे, तर स्थानिक स्तरावरही अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना पाठीशी घातले जात असल्याचे सांगत, एका भाजप नगरसेवकाने प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला.काँग्रेसच्या कार्यकाळात अशा कार्यात कधीही अडथळा आला नव्हता, मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात उदासीनता दाखवली जात असल्याचे मानवांनी सूचित केले.1
- पिकांची नासाडी आणि रोगराईचे सावट; भेंडवळच्या अंदाजाने बळीराजाची चिंता वाढली.1
- महाराष्ट्रातील लाखो शेतकरी, व्यापारी आणि नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, ती भेंडवळची प्रसिद्ध घटमांडणी 2026 अखेर जाहीर झाली आहे. यंदा पाऊस कसा राहणार? शेती पिकांची स्थिती काय असेल? बाजारभाव कसे राहू शकतात? आणि शेतकऱ्यांसाठी कोणते संकेत समोर आले आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे पारंपरिक पद्धतीने घटमांडणी केली जाते. अनेक दशकांपासून ही परंपरा सुरू आहे. ग्रामीण भागात या संकेतांकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जाते. यंदाच्या घटमांडणीतील सर्वात मोठा मुद्दा – पावसाचा अंदाज यंदा मान्सून समाधानकारक राहण्याचे संकेत व्यक्त करण्यात आले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून काही भागात पावसाची सुरुवात चांगली होऊ शकते. सुरुवातीच्या सरींमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढू शकतो. काही भागात मुसळधार पाऊस आणि नदी-नाले भरून वाहण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ऑगस्ट महिन्यातही काही ठिकाणी चांगला पाऊस कायम राहू शकतो. मात्र काही भागात अतिवृष्टीचे संकेत व्यक्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. शेती पिकांबाबत मोठे संकेत यंदा खरीप हंगामासाठी वातावरण अनुकूल राहू शकते असे सांगितले जात आहे. विशेषतः: कापूस सोयाबीन तूर मूग उडीद या पिकांसाठी चांगले वातावरण तयार होऊ शकते. मात्र पाऊस जास्त झाल्यास काही भागात पिकांवर रोगराई, किडीचा प्रादुर्भाव किंवा पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ शकते. बाजारभाव कसे राहू शकतात? घटमांडणीनुसार काही पिकांना चांगला दर मिळण्याचे संकेत आहेत. विशेषतः: कापूस तीळ या पिकांमध्ये चांगली तेजी राहू शकते. तर काही डाळी व इतर पिकांमध्ये चढ-उतार राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्री करताना बाजाराचा अभ्यास करून निर्णय घ्यावा. जनजीवनावर परिणाम जर मुसळधार पाऊस झाला तर काही भागात: रस्ते वाहतूक विस्कळीत होणे वीजपुरवठा खंडित होणे पूरस्थिती निर्माण होणे शेतातील नुकसान होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला पेरणी घाईघाईत करू नका. स्थानिक पावसाची खात्री करून निर्णय घ्या. पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवा. बियाणे, खत आणि औषधे आधीच तयार ठेवा. पीक विमा आणि नोंदणी वेळेत करा. हवामान खात्याचा अधिकृत अंदाज बघत राहा. महत्वाची सूचना मित्रांनो, भेंडवळची घटमांडणी ही पारंपरिक लोकपरंपरेवर आधारित संकेत पद्धती आहे. हा अधिकृत वैज्ञानिक हवामान अंदाज नाही. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना हवामान विभाग आणि कृषी तज्ञांचा सल्ला घ्या. निष्कर्ष एकूणच पाहता, यंदा चांगल्या पावसासह काही भागात अतिवृष्टी, शेतीसाठी संधी आणि काही ठिकाणी आव्हाने असे मिश्र चित्र दिसत आहे.1
- संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेली आणि सुमारे साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेली बुलडाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीची भविष्यवाणी आज पहाटे जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये देशावर नैसर्गिक आपत्ती येईल, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन अर्थव्यवस्था ढासाळेल, शेवटच्या दोन महिन्यांमध्ये पाऊस चांगला राहील मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भेंडवळ या ठिकाणी गेल्या साडेतीनशे पेक्षा अधिक वर्षापासून एका शेतामध्ये अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला गट मांडणी केली जाते त्यामध्ये शेतामध्ये खड्डा खोदून मातीचे मडके त्यामध्ये पाणी आणि काही पदार्थ ठेवले जातात याच खड्ड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे धान्य ठेवले जाते आणि अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी त्या संपूर्ण धान्य आणि पदार्थाचे निरीक्षण करून त्या आधारे वर्षभराचं भाकीत वर्तवलं जातं हेच भाकीत यावर्षी जाहीर करण्यात आला आहे.1