logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पंढरपूर-मंगळवेढा सीमेवरील माण नदीकाठच्या गावांना उजनी कालव्यातून दरवर्षीप्रमाणे यंदा रोटेशननुसार पाणी न सोडल्याने खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा आणि नियोजनशून्य कारभारावर गंभीर आरोप केला आहे. नागरिक, शेतकरी आणि पशुधनाच्या हितासाठी तातडीने पाणी सोडण्यात यावे, अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. माण नदीतील या पाण्याचा लाभ गुंजेगाव, मारापूर, घरनिकी, मल्लेवाडी, शरदनगर, सिद्धेवाडी, ढवळस, धरणगाव, नेपतगाव, तावशी, गार अकोले, सरकोली, तनाळी, तपकीर शेटफळ, ओझेवाडी, मुडवी आणि शंकरगाव या गावातील नागरिक, शेतकरी व पशुपालकांना होतो. पिण्याच्या पाण्यासोबतच शेती आणि जनावरांसाठी हे पाणी अत्यंत महत्त्वाचे असून, यंदा रोटेशन चुकल्याने संपूर्ण परिसरात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक व शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या प्रश्नाबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनाची तातडीने दखल घेत खासदार शिंदे यांनी पंढरपूर-मंगळवेढा मार्गावरील सिद्धेवाडी पुलाला भेट दिली. यावेळी त्यांनी उजनी कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेत शेतकरी व ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या आणि माण नदीसाठी तातडीने पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. खासदार प्रणिती शिंदे यांनी भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता सुभीरवेद्र खांडेकर यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधूनही माण नदीसाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. याप्रसंगी भीमा कालवा मंडळाचे कार्यकारी अभियंता कथले, उजनी कालवा विभागाचे अभियंते पंडित, हळकुडे यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी उजनी कालवा विभागाच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि हा अधिकाऱ्यांचा गंभीर हलगर्जीपणा असल्याचे म्हटले. अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे नमूद करत, पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होतात तर पाण्याचे योग्य नियोजन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. खत-बियाण्यांच्या वाढलेल्या किमती, पेट्रोल-डिझेलची दरवाढ, डिझेलचा तुटवडा आणि पाण्याअभावी शेतकरी संकटात सापडले असताना, शासन आणि प्रशासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कोणतीही संवेदनशीलता उरलेली दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. भर उन्हाळ्यात नागरिक, शेतकरी आणि जनावरे पाण्यासाठी त्रस्त असल्याने तात्काळ माण नदीसाठी पाणी सोडण्याची मागणी पुन्हा एकदा करत, अन्यथा शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि पाणी मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.

1 hr ago
user_Akkalkot news
Akkalkot news
Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
1 hr ago
37a0ea9b-37c8-48df-bdad-e6e19251c96b

पंढरपूर-मंगळवेढा सीमेवरील माण नदीकाठच्या गावांना उजनी कालव्यातून दरवर्षीप्रमाणे यंदा रोटेशननुसार पाणी न सोडल्याने खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा आणि नियोजनशून्य कारभारावर गंभीर आरोप केला आहे. नागरिक, शेतकरी आणि पशुधनाच्या हितासाठी तातडीने पाणी सोडण्यात यावे, अन्यथा शेतकऱ्यांसह तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. माण नदीतील या पाण्याचा लाभ गुंजेगाव, मारापूर, घरनिकी, मल्लेवाडी, शरदनगर, सिद्धेवाडी, ढवळस, धरणगाव, नेपतगाव, तावशी, गार अकोले, सरकोली, तनाळी, तपकीर शेटफळ, ओझेवाडी, मुडवी आणि शंकरगाव या गावातील नागरिक, शेतकरी व पशुपालकांना होतो. पिण्याच्या पाण्यासोबतच शेती आणि जनावरांसाठी हे पाणी अत्यंत महत्त्वाचे असून, यंदा रोटेशन चुकल्याने संपूर्ण परिसरात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक व शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या प्रश्नाबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनाची तातडीने दखल घेत खासदार शिंदे यांनी पंढरपूर-मंगळवेढा मार्गावरील सिद्धेवाडी पुलाला भेट दिली. यावेळी त्यांनी उजनी कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेत शेतकरी व ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या आणि माण नदीसाठी तातडीने पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. खासदार प्रणिती शिंदे यांनी भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता सुभीरवेद्र खांडेकर यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधूनही माण नदीसाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. याप्रसंगी भीमा कालवा मंडळाचे कार्यकारी अभियंता कथले, उजनी कालवा विभागाचे अभियंते पंडित, हळकुडे यांच्यासह परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी उजनी कालवा विभागाच्या नियोजनशून्य कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि हा अधिकाऱ्यांचा गंभीर हलगर्जीपणा असल्याचे म्हटले. अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे नमूद करत, पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होतात तर पाण्याचे योग्य नियोजन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. खत-बियाण्यांच्या वाढलेल्या किमती, पेट्रोल-डिझेलची दरवाढ, डिझेलचा तुटवडा आणि पाण्याअभावी शेतकरी संकटात सापडले असताना, शासन आणि प्रशासनाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कोणतीही संवेदनशीलता उरलेली दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. भर उन्हाळ्यात नागरिक, शेतकरी आणि जनावरे पाण्यासाठी त्रस्त असल्याने तात्काळ माण नदीसाठी पाणी सोडण्याची मागणी पुन्हा एकदा करत, अन्यथा शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि पाणी मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • निर्भीड आपली जनता मिडिया ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथील विश्वजित मंगल कार्यालयात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते, माजी जि. प. उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, मोहोळ तालुक्यातील समाजाच्या विविध क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करून सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्याला जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन पुरोगामी विचार जपणारा तालुका संबोधले. निर्भीड आपली जनता मिडिया ग्रुपने तालुक्यातील कर्तृत्ववान व्यक्तींचा केलेला हा गौरव इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्या म्हणाल्या. समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घेतली जाणे आणि हा संदेश समाजात पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. अशा सन्मानामुळे भविष्यात आणखी अनेक जण सामाजिक कार्यासाठी पुढे येण्यास प्रेरित होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळराजे पाटील, निर्भीड आपली जनता मिडिया ग्रुपचे संपादक व कार्यक्रमाचे आयोजक सोमनाथ मुसांडे, सभापती अस्लम चौधरी, मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, आरिफ पठाण, पांडुरंग सरवळे यांच्यासह मोहोळ तालुक्यातील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    निर्भीड आपली जनता मिडिया ग्रुपच्या वर्धापन दिनानिमित्त मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथील विश्वजित मंगल कार्यालयात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते, माजी जि. प. उपाध्यक्ष बाळराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, मोहोळ तालुक्यातील समाजाच्या विविध क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करून सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्याला जात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन पुरोगामी विचार जपणारा तालुका संबोधले. निर्भीड आपली जनता मिडिया ग्रुपने तालुक्यातील कर्तृत्ववान व्यक्तींचा केलेला हा गौरव इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्या म्हणाल्या. समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घेतली जाणे आणि हा संदेश समाजात पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. अशा सन्मानामुळे भविष्यात आणखी अनेक जण सामाजिक कार्यासाठी पुढे येण्यास प्रेरित होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळराजे पाटील, निर्भीड आपली जनता मिडिया ग्रुपचे संपादक व कार्यक्रमाचे आयोजक सोमनाथ मुसांडे, सभापती अस्लम चौधरी, मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार, आरिफ पठाण, पांडुरंग सरवळे यांच्यासह मोहोळ तालुक्यातील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (अहिल्यानगर) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ३१ मे रोजी अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकास भेट देऊन पुष्पहार अर्पण केला आणि त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि विकासाभिमुख कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, अहिल्याबाईंचे जीवन हे सुशासन, जनसेवा आणि स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी राज्यकारभारात जनहिताला सर्वोच्च स्थान देत समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले. देशभरातील अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार, मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि पायाभूत सुविधांची उभारणी करून अहिल्याबाईंनी भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी मोलाचे योगदान दिले, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. त्यांचे कार्य आजही समाजाला दिशा देणारे आणि प्रेरणा देणारे आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "लोककल्याण, न्याय आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण करणाऱ्या राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना ३०१ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौंडी नगरीत जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी राज्यमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजहित व राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.
    1
    राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (अहिल्यानगर) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ३१ मे रोजी अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकास भेट देऊन पुष्पहार अर्पण केला आणि त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि विकासाभिमुख कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, अहिल्याबाईंचे जीवन हे सुशासन, जनसेवा आणि स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांनी राज्यकारभारात जनहिताला सर्वोच्च स्थान देत समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले. देशभरातील अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार, मंदिरे, घाट, धर्मशाळा आणि पायाभूत सुविधांची उभारणी करून अहिल्याबाईंनी भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी मोलाचे योगदान दिले, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. त्यांचे कार्य आजही समाजाला दिशा देणारे आणि प्रेरणा देणारे आहे, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, "लोककल्याण, न्याय आणि सेवाभावाचा आदर्श निर्माण करणाऱ्या राज्यमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना ३०१ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन," अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, समाजबांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चौंडी नगरीत जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी राज्यमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजहित व राष्ट्रहितासाठी कार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    Advertising agency Latur, Maharashtra•
    14 hrs ago
  • उदगीर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंती मिरवणुकीत डीजेचा आवाज शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळी पोलिसांनी संबंधित व्यक्तींना आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र नियमांचे पालन झाले नाही. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्याने, पोलीस अधिकारी रविंद्र शंकर काळे यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात शेषराव नाईक, गणेश नागनाथ म्हैत्रे आणि सुनील पांडुरंग कसबे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत. प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका आणि उत्सवांमध्ये ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
    1
    उदगीर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी उदगीर शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंती मिरवणुकीत डीजेचा आवाज शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यावेळी पोलिसांनी संबंधित व्यक्तींना आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र नियमांचे पालन झाले नाही.

सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्याने, पोलीस अधिकारी रविंद्र शंकर काळे यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात शेषराव नाईक, गणेश नागनाथ म्हैत्रे आणि सुनील पांडुरंग कसबे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत. प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका आणि उत्सवांमध्ये ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
    user_संग्राम पवार विक्रांत न्युज
    संग्राम पवार विक्रांत न्युज
    Press advisory उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • गुजरातमध्ये एका रस्त्याच्या मधोमध एक होर्डिंग अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.
    1
    गुजरातमध्ये एका रस्त्याच्या मधोमध एक होर्डिंग अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.
    user_Prime news 83
    Prime news 83
    Solapur South, Maharashtra•
    16 hrs ago
  • बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिकमास तपपूर्ती सोहळ्याची आणि भव्य दिव्य महिला कीर्तन महोत्सवाची सांगता प्रसिद्ध कथाकार ह.भ.प. कविताताई साबळे, शिर्डी यांच्या अमृततुल्य कीर्तनाने झाली. या सोहळ्याला महानंदच्या संचालिका आदरणीय सौ. प्रजाक्ताताई सुरेश आण्णा धस, पाटोदा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. दिपालीताई राजू भैय्या जाधव, काला महापंगतीचे यजमान सौ. मिरा सुदर्शन चव्हाण, संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. सतीश महाराज उरणकर आणि महिला सप्ताहाचे आयोजक सौ. सुनंदाताई सतीश महाराज उरणकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी श्रीमती सुनिता उगले मॅडम आणि सौ. आशाताई सोमिनाथ कोल्हे यांच्यासह पाटोदा शहरातील मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता.
    1
    बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिकमास तपपूर्ती सोहळ्याची आणि भव्य दिव्य महिला कीर्तन महोत्सवाची सांगता प्रसिद्ध कथाकार ह.भ.प. कविताताई साबळे, शिर्डी यांच्या अमृततुल्य कीर्तनाने झाली. या सोहळ्याला महानंदच्या संचालिका आदरणीय सौ. प्रजाक्ताताई सुरेश आण्णा धस, पाटोदा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. दिपालीताई राजू भैय्या जाधव, काला महापंगतीचे यजमान सौ. मिरा सुदर्शन चव्हाण, संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. सतीश महाराज उरणकर आणि महिला सप्ताहाचे आयोजक सौ. सुनंदाताई सतीश महाराज उरणकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी श्रीमती सुनिता उगले मॅडम आणि सौ. आशाताई सोमिनाथ कोल्हे यांच्यासह पाटोदा शहरातील मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    पाटोदा, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील बेळगाववस्ती येथील एका शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, जिथे सर्पदंशामुळे त्यांच्या दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर बीड जिल्हा रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकरणाची कोणतीही नोंद न घेतल्याने हे कुटुंब शासनाच्या 'राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह' अनुदान योजनेपासून वंचित राहिल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे. बेळगाववस्ती येथील शेतकरी रोहिदास कोळपे आपल्या कुटुंबासह घरासमोरील अंगणात झोपले असताना पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास, इयत्ता चौथी उत्तीर्ण झालेल्या त्यांचा मुलगा सोहम रोहिदास कोळपे झोपेतच किंचाळला. त्याने उजव्या पायावर साप चावल्याचे सांगितल्यावर, पिंडरीवर दातांच्या खुणा व रक्त दिसले. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने सोहमला बीडकडे उपचारासाठी नेले. प्रथम एका खासगी रुग्णालयात उपचार न मिळाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ओपीडीतील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही वैद्यकीय नोंद, पोलिस माहिती अथवा आवश्यक प्रक्रिया न करता त्यांना मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले गेले. निरक्षर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या या शेतकरी कुटुंबाने मुलाचा मृतदेह गावी नेऊन अंत्यसंस्कार केले. ही गंभीर बाब डॉ. गणेश ढवळे यांनी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली असता उघडकीस आली. डॉ. ढवळे यांनी स्पष्ट केले की, 'राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह' योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यास दीड लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. मात्र, यासाठी एफआयआर, पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू दाखला आणि शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक असते. जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी प्रकरणाची नोंदच घेतली नसल्यामुळे, या गरीब कुटुंबाला शासनाच्या या महत्त्वाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच सोहम कोळपे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून सानुग्रह अनुदान मिळवून द्यावे, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंकी यांच्याकडे केली आहे. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका गरीब शेतकरी कुटुंबाचे मुलाच्या मृत्यूसह शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहण्याचे दुहेरी नुकसान झाले असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी डॉ. ढवळे यांनी लावून धरली आहे.
    1
    बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील बेळगाववस्ती येथील एका शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, जिथे सर्पदंशामुळे त्यांच्या दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर बीड जिल्हा रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकरणाची कोणतीही नोंद न घेतल्याने हे कुटुंब शासनाच्या 'राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह' अनुदान योजनेपासून वंचित राहिल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे.

बेळगाववस्ती येथील शेतकरी रोहिदास कोळपे आपल्या कुटुंबासह घरासमोरील अंगणात झोपले असताना पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास, इयत्ता चौथी उत्तीर्ण झालेल्या त्यांचा मुलगा सोहम रोहिदास कोळपे झोपेतच किंचाळला. त्याने उजव्या पायावर साप चावल्याचे सांगितल्यावर, पिंडरीवर दातांच्या खुणा व रक्त दिसले. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने सोहमला बीडकडे उपचारासाठी नेले. प्रथम एका खासगी रुग्णालयात उपचार न मिळाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ओपीडीतील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही वैद्यकीय नोंद, पोलिस माहिती अथवा आवश्यक प्रक्रिया न करता त्यांना मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले गेले. निरक्षर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या या शेतकरी कुटुंबाने मुलाचा मृतदेह गावी नेऊन अंत्यसंस्कार केले.

ही गंभीर बाब डॉ. गणेश ढवळे यांनी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली असता उघडकीस आली. डॉ. ढवळे यांनी स्पष्ट केले की, 'राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह' योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यास दीड लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. मात्र, यासाठी एफआयआर, पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू दाखला आणि शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक असते. जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी प्रकरणाची नोंदच घेतली नसल्यामुळे, या गरीब कुटुंबाला शासनाच्या या महत्त्वाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच सोहम कोळपे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून सानुग्रह अनुदान मिळवून द्यावे, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंकी यांच्याकडे केली आहे. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका गरीब शेतकरी कुटुंबाचे मुलाच्या मृत्यूसह शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहण्याचे दुहेरी नुकसान झाले असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी डॉ. ढवळे यांनी लावून धरली आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • कुरनूर येथे युवा नेते चेतन मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी युवा नेते चेतन मोरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नगरसेवक महेश इंगळे यांनी चेतन मोरे यांचा श्री स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना, चेतन मोरे यांनी त्यांच्या पुढील जीवनाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चेतन मोरे यांनी या सत्काराबद्दल मनोगत व्यक्त करताना सांगितले की, त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व आप्तेष्ट आणि मित्रमंडळींकडून मिळालेल्या शुभेच्छा त्यांच्या जीवन प्रवासात नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या आहेत, याचा त्यांना निश्चितच अभिमान आहे. तसेच, नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते झालेला सत्कार आणि त्यातून लाभलेले स्वामींचे आशीर्वाद ही त्यांच्यासाठी सर्वात अमूल्य भेट असल्याचे त्यांनी म्हटले. आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेट देऊन आनंद आणि उत्साह द्विगुणीत केल्याबद्दल चेतन मोरे यांनी नगरसेवक महेश इंगळे यांच्यासह उपस्थित सर्व आप्तेष्ट आणि मित्रमंडळींचे आभार मानले. या सोहळ्याला पंचायत समिती सदस्य विनोद मोरे, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, रमेश शिंदे सर, समर्थ स्वामी, तुषार मोरे, पत्रकार सचिन पवार, बाळासाहेब एकबोटे, श्रीकांत मलवे आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
    1
    कुरनूर येथे युवा नेते चेतन मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी युवा नेते चेतन मोरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

नगरसेवक महेश इंगळे यांनी चेतन मोरे यांचा श्री स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी बोलताना, चेतन मोरे यांनी त्यांच्या पुढील जीवनाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. चेतन मोरे यांनी या सत्काराबद्दल मनोगत व्यक्त करताना सांगितले की, त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व आप्तेष्ट आणि मित्रमंडळींकडून मिळालेल्या शुभेच्छा त्यांच्या जीवन प्रवासात नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या आहेत, याचा त्यांना निश्चितच अभिमान आहे. तसेच, नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते झालेला सत्कार आणि त्यातून लाभलेले स्वामींचे आशीर्वाद ही त्यांच्यासाठी सर्वात अमूल्य भेट असल्याचे त्यांनी म्हटले.

आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष भेट देऊन आनंद आणि उत्साह द्विगुणीत केल्याबद्दल चेतन मोरे यांनी नगरसेवक महेश इंगळे यांच्यासह उपस्थित सर्व आप्तेष्ट आणि मित्रमंडळींचे आभार मानले. या सोहळ्याला पंचायत समिती सदस्य विनोद मोरे, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, रमेश शिंदे सर, समर्थ स्वामी, तुषार मोरे, पत्रकार सचिन पवार, बाळासाहेब एकबोटे, श्रीकांत मलवे आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • शहादा तालुक्यातील बोराळे गावात शनिवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोड्या करून पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. या घटनेत गावातील दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या धाडसी चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युवराज माळी आणि किशोर पाटील यांच्या घरांच्या मागील दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटे फोडून मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरून नेण्यात आली. चोरीचा हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, तर उपविभागीय पोलीस अधिकारी दत्त पवार यांनीही भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. अज्ञात चोरट्यांच्या शोधासाठी श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरात तोरखेडा, फेस आणि आता बोराळे येथे झालेल्या सलग घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. परिसरात गेल्या वर्षभरात अनेक चोरीच्या घटना घडल्या असल्या तरी, बहुतांश गुन्ह्यांचा तपास अद्याप लागलेला नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आता थेट प्रश्न विचारत आहेत की, "चोरटे मोकाट, नागरिक धास्तावले; पोलिसांचा धाक संपला का?".
    1
    शहादा तालुक्यातील बोराळे गावात शनिवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोड्या करून पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. या घटनेत गावातील दोन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या धाडसी चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युवराज माळी आणि किशोर पाटील यांच्या घरांच्या मागील दरवाजांचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील कपाटे फोडून मौल्यवान दागिने व रोख रक्कम चोरून नेण्यात आली. चोरीचा हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, तर उपविभागीय पोलीस अधिकारी दत्त पवार यांनीही भेट देऊन तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. अज्ञात चोरट्यांच्या शोधासाठी श्वानपथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरात तोरखेडा, फेस आणि आता बोराळे येथे झालेल्या सलग घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. परिसरात गेल्या वर्षभरात अनेक चोरीच्या घटना घडल्या असल्या तरी, बहुतांश गुन्ह्यांचा तपास अद्याप लागलेला नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आता थेट प्रश्न विचारत आहेत की, "चोरटे मोकाट, नागरिक धास्तावले; पोलिसांचा धाक संपला का?".
    user_सुमन नागनाथ अलमलकर
    सुमन नागनाथ अलमलकर
    Local News Reporter शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.