*नवीन नाशिक महापालिका विभागीय कार्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरे* नवीन नाशिक येथील महापालिका विभागीय कार्यालयात आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सभापती बाळकृष्ण शिरसाठ तसेच विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्षाबंधनानिमित्त उपस्थित भगिनींनी उपस्थित मान्यवरांना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ केले. यावेळी आमदार सीमा हिरे यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत बंधुभाव, सामाजिक एकोपा आणि परस्पर स्नेह जपण्याचा संदेश दिला. महापालिका विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या आनंददायी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने कार्यालयात आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.
*नवीन नाशिक महापालिका विभागीय कार्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरे* नवीन नाशिक येथील महापालिका विभागीय कार्यालयात आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सभापती बाळकृष्ण शिरसाठ तसेच विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्षाबंधनानिमित्त उपस्थित भगिनींनी उपस्थित मान्यवरांना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ केले. यावेळी आमदार सीमा हिरे यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत बंधुभाव, सामाजिक एकोपा आणि परस्पर स्नेह जपण्याचा संदेश दिला. महापालिका विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या आनंददायी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने कार्यालयात आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.
- *नवीन नाशिक महापालिका विभागीय कार्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरे* नवीन नाशिक येथील महापालिका विभागीय कार्यालयात आमदार सीमा हिरे यांच्या उपस्थितीत रक्षाबंधनाचा सण उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी सभापती बाळकृष्ण शिरसाठ तसेच विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्यासह महापालिका अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्षाबंधनानिमित्त उपस्थित भगिनींनी उपस्थित मान्यवरांना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचे नाते अधिक दृढ केले. यावेळी आमदार सीमा हिरे यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत बंधुभाव, सामाजिक एकोपा आणि परस्पर स्नेह जपण्याचा संदेश दिला. महापालिका विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या आनंददायी उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने कार्यालयात आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.4
- येडशीत १५०१ वी जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात; धार्मिक मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन येडशीत १५०१ वी जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात; धार्मिक मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन दिव्य भारत बीएसएम न्यूज धाराशिव (उस्मानाबाद) : (प्रतिनिधी : सुभान शेख):- धाराशिव (उस्मानाबाद) तालुक्यातील येडशी येथे मुस्लिम समाजाच्या वतीने पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त १५०१ वी जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि सामाजिक सलोखा जपत साजरी करण्यात आली. गुरुवार, दिनांक . २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजता पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेल्या जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीत (जुलूस) मुस्लिम समाजबांधवांसह गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. येडशी गावात अनेक वर्षांपासून धार्मिक परंपरा आणि रितीरिवाजानुसार ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव साजरा केला जातो. यंदाच्या उत्सवासाठी जामा मस्जिद कमिटी, मौलवी तसेच मुस्लिम समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष नियोजन केले होते. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावातील विविध भागांत सजावट करण्यात आली होती. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रजा बेकरीपासून मिरवणुकीला सुरुवात जुना चमडा बाजार परिसरातील जमादार बाबा नगर भागात असलेल्या रजा बेकरीपासून जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला उपस्थित मुस्लिम समाजबांधवांना सरबत देण्यात आले. त्यानंतर धार्मिक वातावरणात मिरवणूक पुढे मार्गस्थ झाली. विविध ठिकाणी करण्यात आलेली आकर्षक सजावट आणि मिरवणुकीतील उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या मौलवींनी नात पठणास सुरुवात केली. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवनकार्याचा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या नात पठणामुळे वातावरण भक्तिमय झाले. मुस्लिम समाजातील महिला, पुरुष आणि युवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मिरवणूक मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांच्या वतीने सहभागी बांधवांसाठी अल्पोपहार व खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. वाटेत मुस्लिम समाजबांधवांनी वडापावचा आस्वाद घेतला. तसेच दोन ठिकाणी केळीचे वाटप करण्यात आले. गावात परतल्यानंतर शिरा व सरबताची व्यवस्था करण्यात आली होती. छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीदरम्यान बसस्थानक चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश दिला. त्यानंतर मिरवणूक तुळजाभवानी चौकात पोहोचली. येथे मुस्लिम समाजबांधवांनी उत्साहात घोषणा देत आपला आनंद व्यक्त केला. गावातील विविध भागांतून मिरवणूक पुढे जात असताना नागरिकांनी ती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. नागरिकांकडूनही सहकार्य मिरवणूक छत्रपती शहाजी राजे महाराज चौकात पोहोचल्यानंतर माजी उपसरपंच गजानन नलावडे यांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी नागरिकांना बिस्किटांचे पुडे वाटप करण्यात आले. या उपक्रमात गजानन नलावडे, अमोल पवार, गणेश पवार, आबा पवार, अशोकराव देशमुख, बालाजी नकाते, बालाजी नागटिळक, सुरेश देशमुख आदींनी सहभाग घेतला. तसेच सुनील शेळके यांच्या वतीनेही बिस्किटांचे पुडे वाटप करण्यात आले. विजयकुमार सस्ते यांच्या वतीने मिरवणुकीतील मुस्लिम समाजबांधवांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. विविध समाजघटकांकडून करण्यात आलेल्या या सहकार्यामुळे येडशीतील सामाजिक सलोखा आणि परस्पर बंधुभावाचे चित्र अधोरेखित झाले. विविध भागांतून जुलूस मार्गस्थ मिरवणूक पुढे गुरव गल्ली, नलावडे गल्ली, सुभाषनगर आणि इंगळे गल्ली या भागांतून मार्गस्थ झाली. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेकांनी सहभागी बांधवांचे स्वागत केले. धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने गावातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. मिरवणुकीदरम्यान समाजबांधवांनी शांतता आणि शिस्त राखत धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला. पारंपरिक पद्धतीने नात पठण, घोषणा आणि विविध ठिकाणी करण्यात आलेल्या सेवाभावी उपक्रमांमुळे उत्सवाला सामाजिक आणि मानवतावादी स्वरूप प्राप्त झाले. जामा मस्जिदसमोर मिरवणुकीचा समारोप गावातील विविध भागांतून मार्गक्रमण केल्यानंतर जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक जामा मस्जिदसमोर पोहोचली. तेथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थित मौलवी व समाजबांधवांनी धार्मिक कार्यक्रम पार पाडला. उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडल्याबद्दल आयोजकांनी सहभागी नागरिकांचे आभार मानले. या जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी उत्सवाच्या आयोजनामध्ये जामा मस्जिद कमिटीचे अध्यक्ष जब्बार यासीन पटेल, उपाध्यक्ष अशफाक पटेल, खजिनदार सल्लाऊद्दीन शेख, सदस्य महामुद पटेल, मंजूर उस्मान पटेल, युसूफ कोतवाल, लतीफ शेख तसेच जामा मस्जिदचे मौलवी अमजद पटेल यांनी मार्गदर्शन व नियोजन केले. पोलिसांचा चोख बंदोबस्त उत्सव शांततेत पार पडावा यासाठी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला होता. पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी मिरवणुकीच्या मार्गावर उपस्थित राहून सुरक्षा व्यवस्था सांभाळली. मिरवणूक कोणत्याही अडथळ्याविना आणि शांततेत पार पडल्याने आयोजकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले. पोलीस प्रशासनाच्या वतीनेही मुस्लिम समाजबांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. प्रशासन, आयोजक आणि नागरिक यांच्या समन्वयामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला. सामाजिक सलोख्याचा संदेश येडशी येथे पार पडलेल्या १५०१ व्या जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी उत्सवातून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याचा संदेश देण्यात आला. विविध समाजातील नागरिकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला तसेच ठिकठिकाणी पाणी, बिस्किटे, सरबत, केळी आणि अल्पोपहाराची व्यवस्था करून सहभागी नागरिकांचे स्वागत केले. गावातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणुकीचा आनंद घेतला. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा आणि परस्पर आदराची भावना अधिक दृढ होत असल्याचे यावेळी दिसून आले. येडशीतील १५०१ वी जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साह, भक्तिभाव, शिस्त आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत शांततेत संपन्न झाली. दिव्य भारत बीएसएम न्यूज येडशी प्रतिनिधी : सुभान शेख3
- *नाशिकमध्ये तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’* *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन* *प्रवेश विनामूल्य, नाशिककरांसह भाविकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन* नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे नाशिक शहरात शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 पासून कुंभ भक्ती संगमास प्रारंभ होत आहे. तीन दिवस विविध अध्यात्मिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. 30 ऑगस्ट 2026 पर्यंत ठक्कर डोम येथे हा महोत्सव होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर उदघाटन सोहळ्यास उपस्थित राहतील. या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून, तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नसल्याने नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. या महोत्सवाचे २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल. उद्घाटनानंतर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन होणार असून, रात्री ८ ते १० या वेळेत राहुल देशपांडे ‘अभंगवारी’ सादर करतील. *29 ऑगस्टला भक्ती संमेलनासह कीर्तन-भजन* २९ ऑगस्ट हा दिवस ‘भक्ती संमेलन’ आणि विविध भक्ति कार्यक्रमांच्या सादरीकरणांनी समृद्ध असेल. सकाळी १० ते १२ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत दोन सत्रांमध्ये भक्ती संमेलन होईल. पहिल्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ असून पराग महाराज चातुर्मासे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात शिवाजी महाराज मोरे, डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, महंत श्रीमानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप सहभागी होतील. दुसऱ्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ असून, डॉ. सदानंद मोरे हे सत्र समन्वयक असतील. श्री राणा महाराज वासकर, डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, जनार्दन हरिजी महाराज, रामकृष्ण महाराज वीर, मंदार बुवा रामदासी आणि महंत श्री. चिरडे बाबा यांचा या सत्रात सहभाग असेल. भक्ती संमेलनानंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन, तर रात्री ८ ते १० या वेळेत कु. मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. *गुरबाणीपासून मणिपूरच्या नट संकिर्तनापर्यंत* महोत्सवाच्या ३० ऑगस्टच्या अंतिम दिवशी देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरांचा विशेष अनुभव घेता येणार आहे. दुपारी ३ ते ४ या वेळेत श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होईल. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण होईल. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल. या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री महाजन यांनी केले आहे....1
- पटना से बड़ी खबर सामने आ रही है। आदित्य पटना हाईकोर्ट पहुंचा है और FIR की कॉपी लेकर न्याय की मांग कर रहा है। मामले में वरीय पुलिस अधिकारियों पर गंभीर आरोप लगाए गए हैं। आखिर पूरा मामला क्या है? पुलिस पर क्या आरोप हैं और हाईकोर्ट में क्या हुआ? जानिए इस वीडियो में पूरी जानकारी वीडियो पसंद आए तो Like 👍, Share 🔄 और Channel को Subscribe 🔔 जरूर करें। पटना से बड़ी खबर सामने आ रही है। आदित्य पटना हाईकोर्ट पहुंचा है और FIR की कॉपी लेकर न्याय की मांग कर रहा है। मामले में वरीय पुलिस अधिकारियों पर गंभीर आरोप लगाए गए हैं। आखिर पूरा मामला क्या है? पुलिस पर क्या आरोप हैं और हाईकोर्ट में क्या हुआ? जानिए इस वीडियो में पूरी जानकारी वीडियो पसंद आए तो Like 👍, Share 🔄 और Channel को Subscribe 🔔 जरूर करें।1
- साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरती आज रक्षाबंधन निमित्ताने सुंदर अशी फुलांची आरास कळवण तालुक्यातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यपीठ समाजाला सप्तशृंगी गडावरती आज रक्षाबंधनच्या औचित्य साधून आज सुंदर अशी फुलांची आरासही करण्यात आली होती . आज पावसाने उसंत घेतल्यानंतर सप्तशृंगी गडावर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळेस सप्तशृंगी देवीच्या मंदिर गाभाऱ्यामध्ये नाशिक येथील नगरसेवक प्रविण तिदमे यांनी पौर्णिमेचा औचित्य साधून सुंदर अशी फुलांची आरास ही सप्तशृंगी माता मंदिर गाभाऱ्याला केलेली होती हे आरास पाहून भाविकांचे मन हे प्रसन्न वाटत होते आज सप्तशृंगी गडावरती रक्षाबंधन व श्रावणी पौर्णिमा असल्याने आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती यासाठी न्यासाने चौक बंदोबस्त ही ठेवला होता व मंदिर गाभारात शांततेत भाविकांनी दर्शन घ्यावे घेण्याचे आवाहन सुनील कासार यांनी केले आहे . शामराव सोनवणे सप्तशृंगी गड कळवण1
- रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बोरगावच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बोरगावच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी बोरगाव (प्रतिनिधी) : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर बोरगाव येथील बाजारपेठेत शुक्रवारी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बहिणींकडून भावांना राखी बांधण्याच्या या सणासाठी विविध प्रकारच्या आकर्षक राख्या, मिठाई, फळे तसेच कपडे व भेटवस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली. बाजारपेठेत विविध रंगांच्या व आकर्षक डिझाईनच्या राख्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून, लहान मुलांपासून महिलांपर्यंत सर्वांमध्ये राखी खरेदीचा उत्साह दिसून आला. सणामुळे मिठाई व इतर वस्तूंच्या दुकानांमध्येही ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत वाढलेली गर्दी पाहता व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदी-विक्रीला चांगली चालना मिळाल्याचे चित्र आहे.1
- व्यापारी विनोद शिरसाठ यांच्याकडून सामाजिक बांधिलकी; स्वखर्चातून अंगणवाडीचे केले नूतनीकरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण; मान्यवरांकडूनही अंगणवाडीसाठी विशेष सहकार्याची ग्वाही गावाच्या सर्वांगीण विकासात आपलेही योगदान असावे आणि लहान चिमुकल्यांना शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उदात्त हेतूने विंचूर येथील प्रतिष्ठित व्यापारी विनोद भाऊ शिरसाठ यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शेजारील अंगणवाडीचे संपूर्ण नूतनीकरण त्यांनी स्वखर्चातून पूर्ण केले असून, या नूतनीकृत वास्तूचा लोकार्पण सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उद्घाटनप्रसंगी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, पाटील मॅडम, खांदवे मॅडम, कैलास सोनवणे, गंगा नाना गोरे तसेच विंचूरचे ग्रामविकास अधिकारी मगर यांनी आपले मनोगत व्यक्त करत विनोद शिरसाठ यांच्या या सामाजिक उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. दरम्यान, अंगणवाडीतील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भौतिक सुविधा अधिक बळकट करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, सरपंच सचिन दरेकर, कैलास सोनवणे व ग्रामसेवक मगर यांनी अंगणवाडी करता विशेष योगदान देण्याचे जाहीर केले. अंगणवाडी ही ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची आणि संस्कारांची पहिली पायरी असते. या चिमुकल्यांना प्रसन्न, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याबद्दल अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक वर्ग तसेच समस्त विंचूर ग्रामस्थांच्या वतीने विनोद शिरसाठ यांचे आभार मानून कौतुक करण्यात आले.4
- संसार करने वाली खबर उत्तर प्रदेश बलरामपुर के एक उतरौला निजी अस्पताल सरकार के एक बच्चे की नाज़ुक स्थिति में उसको बाहर निकाल दिया गया तड़पता हुआ बच्चा दिल झगजोर देने वाली खबर एक नन्हा सा बालक उसको अस्पताल से बाहर कर दिया गया उत्तर प्रदेश उतरौला निजी अस्पताल tadapti Hui man roti Rahi to doctoron ko sharm nahin aaya system khokhla ho chuka hai Sarkar bolati Hai Ham garibon ke liye bahut kuchh karte Hain sacchai dekhiae aap log ke samne1