पंढरपूर आषाढी वारीतील लाखो वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी वाशिम जिल्ह्यातून पहिल्यांदाच एक विशेष आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक पंढरपूरकडे रवाना झाले आहे. स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद उपक्रम राबविला जात आहे. हे पथक वारीच्या कालावधीत पंढरपूर परिसरात २४ तास कार्यरत राहून भाविकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत, बचावकार्य, प्रथमोपचार, गर्दी व्यवस्थापन आणि हरवलेल्या व्यक्तींना मदत देण्याचे काम करणार आहे. या पथकाची उभारणी वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच किशोर देशमुख व सचिन राणे यांच्या समन्वयातून करण्यात आली आहे. वारीदरम्यान चंद्रभागा नदी परिसर, वाळवंट क्षेत्र आणि मंदिर परिसरात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी या प्रशिक्षित स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कारंजा येथील गुरू मंदिर संस्थानच्या वतीने या पथकाच्या प्रवासासाठी विनामूल्य रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांच्या या समाजसेवेच्या भावनेबद्दल विशेष आभार मानण्यात आले आहेत. मंगरुळपीर येथे आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते नारळ फोडून या पथकाला शुभेच्छा देऊन रवाना करण्यात आले. यावेळी आमदार खोडे यांनी स्वयंसेवकांचे कौतुक करत, "वारकऱ्यांच्या सेवेसाठी केलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून, मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे," असे सांगितले. या प्रसंगी मंगरुळपीर नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गावंडे, तहसीलदार सुधाकर अनासुने, सामाजिक कार्यकर्ते किशोर इंगोले, किशोर भोयर, चंद्रकांत लोहाना यांच्यासह स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील युवकांनी सामाजिक आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या या कामात घेतलेल्या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
पंढरपूर आषाढी वारीतील लाखो वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी वाशिम जिल्ह्यातून पहिल्यांदाच एक विशेष आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक पंढरपूरकडे रवाना झाले आहे. स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद उपक्रम राबविला जात आहे. हे पथक वारीच्या कालावधीत पंढरपूर परिसरात २४ तास कार्यरत राहून भाविकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत,
बचावकार्य, प्रथमोपचार, गर्दी व्यवस्थापन आणि हरवलेल्या व्यक्तींना मदत देण्याचे काम करणार आहे. या पथकाची उभारणी वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच किशोर देशमुख व सचिन राणे यांच्या समन्वयातून करण्यात आली आहे. वारीदरम्यान चंद्रभागा नदी परिसर, वाळवंट क्षेत्र आणि मंदिर परिसरात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी या
प्रशिक्षित स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कारंजा येथील गुरू मंदिर संस्थानच्या वतीने या पथकाच्या प्रवासासाठी विनामूल्य रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांच्या या समाजसेवेच्या भावनेबद्दल विशेष आभार मानण्यात आले आहेत. मंगरुळपीर येथे आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते नारळ फोडून या पथकाला शुभेच्छा देऊन रवाना करण्यात आले. यावेळी आमदार खोडे यांनी स्वयंसेवकांचे कौतुक करत, "वारकऱ्यांच्या सेवेसाठी केलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून,
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे," असे सांगितले. या प्रसंगी मंगरुळपीर नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गावंडे, तहसीलदार सुधाकर अनासुने, सामाजिक कार्यकर्ते किशोर इंगोले, किशोर भोयर, चंद्रकांत लोहाना यांच्यासह स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील युवकांनी सामाजिक आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या या कामात घेतलेल्या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
- पंढरपूर आषाढी वारीतील लाखो वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी वाशिम जिल्ह्यातून पहिल्यांदाच एक विशेष आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक पंढरपूरकडे रवाना झाले आहे. स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने हा ऐतिहासिक आणि अभिमानास्पद उपक्रम राबविला जात आहे. हे पथक वारीच्या कालावधीत पंढरपूर परिसरात २४ तास कार्यरत राहून भाविकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत, बचावकार्य, प्रथमोपचार, गर्दी व्यवस्थापन आणि हरवलेल्या व्यक्तींना मदत देण्याचे काम करणार आहे. या पथकाची उभारणी वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच किशोर देशमुख व सचिन राणे यांच्या समन्वयातून करण्यात आली आहे. वारीदरम्यान चंद्रभागा नदी परिसर, वाळवंट क्षेत्र आणि मंदिर परिसरात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी या प्रशिक्षित स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कारंजा येथील गुरू मंदिर संस्थानच्या वतीने या पथकाच्या प्रवासासाठी विनामूल्य रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांच्या या समाजसेवेच्या भावनेबद्दल विशेष आभार मानण्यात आले आहेत. मंगरुळपीर येथे आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते नारळ फोडून या पथकाला शुभेच्छा देऊन रवाना करण्यात आले. यावेळी आमदार खोडे यांनी स्वयंसेवकांचे कौतुक करत, "वारकऱ्यांच्या सेवेसाठी केलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून, मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे," असे सांगितले. या प्रसंगी मंगरुळपीर नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गावंडे, तहसीलदार सुधाकर अनासुने, सामाजिक कार्यकर्ते किशोर इंगोले, किशोर भोयर, चंद्रकांत लोहाना यांच्यासह स्वामी विवेकानंद आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील युवकांनी सामाजिक आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या या कामात घेतलेल्या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.4
- दिल्लीतील जंतर मंतर येथे न्यूज नॅशनल 81 च्या टीमकडून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येत आहे.1
- मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार तानाजी मुटकुळे यांनी या कार्यक्रमांच्या आयोजनाबाबतची माहिती दिली आहे. या वाढदिवसानिमित्त मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.1
- अमरावती तालुक्यातील वनारसी गावात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून शासन आणि प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. पत्रकार विशाल तायडे यांनी दिलेल्या वृत्तांतानुसार, गावातील विविध भागांत पसरलेल्या या घाणीच्या समस्येकडे संबंधित प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कानाडोळा करत आहेत.1
- अमरावती येथे बोगस बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी जिल्हा युवक काँग्रेसने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट धडक मोर्चा काढण्यात आला. बोगस बियाणे कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली आहे.1
- मुंबईतील बॉलिवूडच्या प्रसिद्ध 'सिने स्टिल टीव्ही अँड मोशन फोटोग्राफर्स असोसिएशन'तर्फे दरवर्षीप्रमाणे २०२६ या वर्षातही असोसिएशनच्या सदस्यांच्या पाल्यांना मोफत नोटबुकचे वाटप करण्यात आले आहे. समाजसेवक, निर्माते आणि पत्रकार तसेच संस्थेचे मानद आजीवन सदस्य के. रवि (दादा) यांच्या 'एक लिया मीडिया लिंक एंड इवेंटस मैनेजमेंट'च्या पुढाकाराने आणि सौजन्याने संस्थेच्या कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ही संस्था दरवर्षी आपल्या फोटोग्राफर सदस्यांच्या मुलांसाठी मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करते. या उपक्रमाबद्दल संस्थेचे सरचिटणीस अतुल राजकुले आणि अध्यक्ष जनाब अप्पी वारसी यांनी संपूर्ण समितीच्या वतीने श्री. के. रवि (दादा) यांचे मनापासून आभार मानले आहेत. के. रवि (दादा) यांचे सामाजिक कार्यांमधील योगदान अनेक वर्षांपासून सुरू असून बॉलिवूड क्षेत्रासाठीही ते सातत्याने मदत करत असतात. त्यांच्या या 'मोफत नोटबुक वाटप' कार्याबद्दल असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त करत कौतुक केले आहे.2
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर हा लाठीमार केला.1