खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! - हिंदु जनजागृती समिती आधी राज्याच्या मुख्यालयातील अन्नाचा दर्जा कधी सुधारणार ? महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गणेशोत्सव व आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षेचा बडगा दाखवताना, केवळ हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांतील ‘महाप्रसाद’ आणि ‘भंडारा’ यांचाच विशेष उल्लेख करून कारवाईचा इशारा दिला आहे. अन्न सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या धार्मिक परंपरांना परवाने, नोंदणी आणि नियमांच्या जंजाळात अडकवण्याचा हा प्रयत्न अत्यंत पक्षपाती व प्रशासकीय दुटप्पीपणाचे उत्तम उदाहरण आहे. बकरी ईद, रमझान ईद, इफ्तार पार्ट्या, नाताळ (ख्रिसमस) किंवा गुड फ्रायडे यांसारख्या इतर धर्मीयांच्या सणांच्या वेळी शिजवले जाणारे अन्न आणि होणारे सार्वजनिक अन्न वितरण एफडीएला दिसत नाही का? त्या वेळी अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जाते का, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे. इतर धर्मीयांच्या सणांनाही हे नियम लागू करून त्यावर कारवाई केली जाणार का, हे एफडीएने जाहीर करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले आहे. तुकाराम मुंढे हे चांगले काम असले, तरी केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य करण्याची भूमिका अजिबात स्वीकारली जाणार नाही, असेही श्री. घनवट यांनी नमूद केले आहे. श्री. घनवट पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ नुसार कायदा सर्वांना समान लागू झाला पाहिजे, तसेच अनुच्छेद १५ अनुसार शासनाला धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. असे असताना केवळ हिंदूंच्या श्रद्धेशी जोडलेल्या अन्नदानावर आणि भंडाऱ्यांवरच कडक कारवाईची भाषा करणे हा पक्षपात आहे. जनतेला अन्नाच्या दर्जाचे धडे देणाऱ्या प्रशासनाला स्वतःच्या इमारतींमधील अस्वच्छता दिसत नाही, हे दुर्दैवी आहे. राज्याचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालय, आमदार निवास आणि विधान भवन येथील कँटीनमधील अन्नाच्या निकृष्ट दर्जाबाबत खुद्द लोकप्रतिनिधींनीच वारंवार तक्रारी केल्या आहेत. कँटीन व्यवस्थापनाशी आमदारांचे हातघाईवर आल्याचे प्रसंगही महाराष्ट्राने पाहिले आहेत. शासकीय रुग्णालये आणि वसतिगृहांमध्ये रुग्ण व विद्यार्थ्यांना दिले जाणारे अन्न अत्यंत सुमार दर्जाचे असते. स्वतःच्या शासकीय व्यवस्थांमध्ये सुरक्षित अन्न पुरवू न शकणारे अधिकारी निष्काम सेवाभावाने तयार होणाऱ्या ‘महाप्रसादा’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, हा संतापजनक प्रकार आहे. अन्न सुरक्षेचे नियम लागू करायचे असतील, तर ते सर्व धर्मीयांच्या सण-उत्सवांतील अन्न वितरणाला समान रीतीने लागू करावेत. एफडीएने सर्वप्रथम मंत्रालय, आमदार निवास आणि सर्व शासकीय कँटीन्सची झाडाझडती घेऊन तिथल्या अन्नाच्या दर्जाचा अहवाल सार्वजनिक करावा. हिंदूंची मंदिरे, गणेशोत्सव आणि नवरात्रीतील सार्वजनिक मंडळांना परवान्यांच्या नावाखाली त्रास देण्याचा प्रकार करू नये. तसेच अन्नदानाच्या सेवाभावी प्रक्रियेत बाधा निर्माण करू नये, असेही श्री. घनवट यांनी शेवटी म्हटले आहे.
खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! - हिंदु जनजागृती समिती आधी राज्याच्या मुख्यालयातील अन्नाचा दर्जा कधी सुधारणार ? महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गणेशोत्सव व आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षेचा बडगा दाखवताना, केवळ हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांतील ‘महाप्रसाद’ आणि ‘भंडारा’ यांचाच विशेष उल्लेख करून कारवाईचा इशारा दिला आहे. अन्न सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या धार्मिक परंपरांना परवाने, नोंदणी आणि नियमांच्या जंजाळात अडकवण्याचा हा प्रयत्न अत्यंत पक्षपाती व प्रशासकीय दुटप्पीपणाचे उत्तम उदाहरण आहे. बकरी ईद, रमझान ईद, इफ्तार पार्ट्या, नाताळ (ख्रिसमस) किंवा गुड फ्रायडे यांसारख्या इतर धर्मीयांच्या सणांच्या वेळी शिजवले जाणारे अन्न आणि होणारे सार्वजनिक अन्न वितरण एफडीएला दिसत नाही का? त्या वेळी अन्न सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जाते का, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे. इतर धर्मीयांच्या सणांनाही हे नियम लागू करून त्यावर कारवाई केली जाणार का, हे एफडीएने जाहीर करावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले आहे. तुकाराम मुंढे हे चांगले काम असले, तरी केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य करण्याची भूमिका अजिबात स्वीकारली जाणार नाही, असेही श्री. घनवट यांनी नमूद केले आहे. श्री. घनवट पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ नुसार कायदा सर्वांना समान लागू झाला पाहिजे, तसेच अनुच्छेद १५ अनुसार शासनाला धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. असे असताना केवळ हिंदूंच्या श्रद्धेशी जोडलेल्या अन्नदानावर आणि भंडाऱ्यांवरच कडक कारवाईची भाषा करणे हा पक्षपात आहे. जनतेला अन्नाच्या दर्जाचे धडे देणाऱ्या प्रशासनाला स्वतःच्या इमारतींमधील अस्वच्छता दिसत नाही, हे दुर्दैवी आहे. राज्याचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालय, आमदार निवास आणि विधान भवन येथील कँटीनमधील अन्नाच्या निकृष्ट दर्जाबाबत खुद्द लोकप्रतिनिधींनीच वारंवार तक्रारी केल्या आहेत. कँटीन व्यवस्थापनाशी आमदारांचे हातघाईवर आल्याचे प्रसंगही महाराष्ट्राने पाहिले आहेत. शासकीय रुग्णालये आणि वसतिगृहांमध्ये रुग्ण व विद्यार्थ्यांना दिले जाणारे अन्न अत्यंत सुमार दर्जाचे असते. स्वतःच्या शासकीय व्यवस्थांमध्ये सुरक्षित अन्न पुरवू न शकणारे अधिकारी निष्काम सेवाभावाने तयार होणाऱ्या ‘महाप्रसादा’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, हा संतापजनक प्रकार आहे. अन्न सुरक्षेचे नियम लागू करायचे असतील, तर ते सर्व धर्मीयांच्या सण-उत्सवांतील अन्न वितरणाला समान रीतीने लागू करावेत. एफडीएने सर्वप्रथम मंत्रालय, आमदार निवास आणि सर्व शासकीय कँटीन्सची झाडाझडती घेऊन तिथल्या अन्नाच्या दर्जाचा अहवाल सार्वजनिक करावा. हिंदूंची मंदिरे, गणेशोत्सव आणि नवरात्रीतील सार्वजनिक मंडळांना परवान्यांच्या नावाखाली त्रास देण्याचा प्रकार करू नये. तसेच अन्नदानाच्या सेवाभावी प्रक्रियेत बाधा निर्माण करू नये, असेही श्री. घनवट यांनी शेवटी म्हटले आहे.
- नवी दिल्ली : राष्ट्र उभारणी, शिक्षण व मानवतेच्या कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जळगाव येथील प्रा. सुरेश रामचंद्र वाघ यांना ‘पद्मश्री गौरव सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २३ ऑगस्ट २०२६ रोजी द्वारका, नवी दिल्ली येथील रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. प्रा. वाघ यांनी साने गुरुजी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत असताना विविध राज्य व राष्ट्रस्तरीय पुरस्कार प्राप्त करून ते महाविद्यालयाला अर्पण केले. सेवानिवृत्तीनंतर आधुनिक पद्धतीने केळी उत्पादन करत शेती क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. तसेच सामाजिक व राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग घेत महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये संघटनात्मक कार्याचा विस्तार केला. शिक्षण क्षेत्रात अनेक डॉक्टर, अभियंते घडविण्यासह विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. यावेळी ‘द झेनिथ इंटरनॅशनल ह्युमन राइट्स कमिशन’कडून त्यांना आजीवन सभासदत्वाची मान्यताही प्रदान करण्यात आली. हा सन्मान आपल्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सहकाऱ्यांना आणि राष्ट्राला अर्पण करत असल्याचे प्रा. वाघ यांनी सांगितले.1
- Dhule Crime News | धुळ्यात 'त्या' एका फोटोवरून उलगडले गावठी कट्ट्याचे बिंग; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात... - जुन्या धुळे परिसरात एका तरुणाच्या हातात गावठी कट्टा असलेल्या फोटोवरून धुळे LCB ने मोठी कारवाई केली आहे. पो. नि. ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून डी-मार्ट जवळ सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले - गावठी कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल, बुलेटच्या सीटखाली कट्टा लपवणारा कल्पेश यादव आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. या कारवाईत 40 हजारांचा एक गावठी कट्टा, 4 हजारांच्या 4 जिवंत काडतुसे आणि 1 लाखांची बुलेट असा एकूण 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई SP विशाल आनंद, Additional SP अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली. #DhuleNews #DhuleCrime #LCBAction #GavthiKatta #DhulePolice Dhule Crime News | धुळ्यात 'त्या' एका फोटोवरून उलगडले गावठी कट्ट्याचे बिंग; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, अल्पवयीन मुलासह चौघे ताब्यात... - जुन्या धुळे परिसरात एका तरुणाच्या हातात गावठी कट्टा असलेल्या फोटोवरून धुळे LCB ने मोठी कारवाई केली आहे. पो. नि. ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरून डी-मार्ट जवळ सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले - गावठी कट्टा विकणारा सागर जोंधळे, कुंतेश बागुल, बुलेटच्या सीटखाली कट्टा लपवणारा कल्पेश यादव आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. या कारवाईत 40 हजारांचा एक गावठी कट्टा, 4 हजारांच्या 4 जिवंत काडतुसे आणि 1 लाखांची बुलेट असा एकूण 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई SP विशाल आनंद, Additional SP अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने केली. #DhuleNews #DhuleCrime #LCBAction #GavthiKatta #DhulePolice1
- छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग छत्रपती संभाजीनगरमध्ये दशमेश नगरातील आईस्क्रीम शॉपला आग छत्रपती संभाजीनगर येथील दशमेश नगर परिसरातील आईस्क्रीम शॉपला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीमुळे दुकानातील साहित्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.1
- कन्नड पिशोर खांडित भीषण अपघात झाला असून दोन्ही गाडीचे चालक किनर गंभीर जखमी आहे. कन्नड :- पिशोर खांडित चंदन नाल्याजवळ दोन वाहनाचा समोरासमोर अपघात झाला असून चालक आणि किनर गंभीर जखमी झाले आहे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पण स्थानिक पोलीस प्रशासन/ वन विभाग तातडीने लक्ष घालून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.1
- ईद-ए-मिलादनिमित्त जाधववाडीत भव्य रक्तदान शिबीर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद1
- चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा! चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा!1
- धुळे: शेतातील विहिरींवरील मोटार चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद; निजामपूर पोलिसांची कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त Dhule Crime News | धुळे: शेतातील विहिरींवरील मोटार चोरणारी 6 जणांची टोळी जेरबंद; निजामपूर पोलिसांची कारवाई, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त - धुळे / साक्री - बळसाणे शिवारात शेत विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर चोरी करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला निजामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 2,04,350 रुपयांचे 10 मोटर पंप जप्त केले आहेत. अटक आरोपींची नावे: शुभम रतनसिंग गिरासे (22) वसीमखाँ युसुफखाँ पठाण (32) रावसाहेब हिम्मत सोनवणे (24) रतनसिंग हिम्मतसिंग ठाकूर (26) करण अर्जुन ठाकरे (18) नवनाथ छोटू गायकवाड (19) - सर्व रा. बळसाणे, ता. साक्री फिर्यादी चैत्राम न्याहळदे यांच्या शेतात 22 ऑगस्ट रोजी झालेल्या चोरीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात या टोळीने इतरही चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपींना दि. 29/08/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. #DhuleCrime #NizampurPolice #DhuleNews #MotorPumpChori #Sakri1
- गणपती वर्गणीच्या वादातून सुरगाण्याच्या युवकाची सापुताऱ्यात हत्या मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादाचा राग; चाकूने तीन वार केल्याचा तक्रारीत उल्लेख गुजरातमधील सापुतारा येथे गणपती वर्गणीच्या कारणावरून झालेल्या वादातून सुरगाणा येथील २९ वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना दि. २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या प्रकरणी कुणाल किरण परदेशी (रा. सुरगाणा) याच्याविरुद्ध सापुतारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत युवकाचे नाव हेमंत उर्फ विकी सूर्यवंशी (वय २९, रा. होळी चौक बसस्टॉपजवळ, सुरगाणा) असे आहे. पोलिस तक्रारीनुसार, हेमंत व आरोपी कुणाल परदेशी यांच्यात मागील वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाद झाला होता. या जुन्या वादाचा राग आरोपीच्या मनात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दि. २६ ऑगस्ट रोजी हेमंत हा त्याचे मित्र विजय खंबायत, माधव गवळी व राज गाडेकर यांच्यासोबत सापुतारा येथे मॉनसून फेस्टिव्हल पाहण्यासाठी गेला होता. रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास हे मित्र बडोदा बँकेच्या एटीएमजवळील पावभाजीच्या दुकानात गेले होते. गेले होते. पोलिस तक्रारीतील माहितीनुसार, त्याच ठिकाणी कुणाल किरण परदेशी व प्रदीप रविंद्र पवार हे देखील आले. पावभाजी खाल्ल्यानंतर हेमंत व राज गाडेकर तेथे थांबले असताना कुणाल व हेमंत यांच्यात मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादासह यावर्षीच्या गणपती वर्गणीवरून पुन्हा वाद झाला. वाद वाढल्यानंतर कुणाल याने चाकूसदृश तीक्ष्ण हत्याराने हेमंतच्या पोटावर दोन वार व छातीच्या खालील भागात एक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर कुणाल मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगण्यात आले. हेमंतला त्याचे मित्र तातडीने मोटारसायकलवरून बोरगाव येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी वणी येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तक्रारीनुसार, दि. २७ ऑगस्ट रोजी रात्री १.१० वाजता हेमंतचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हेमंतची आई पद्माबेन सूर्यवंशी, त्यांचे पती व नातेवाईक वणी रुग्णालयात दाखल झाले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.1