logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*भूकंपामुळे घाबरू नका - याला 'भूकंप-समूह' (swarm earthquake) असे म्हणतात.*

1 day ago
user_Laxman Kisan bagul
Laxman Kisan bagul
Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
1 day ago

*भूकंपामुळे घाबरू नका - याला 'भूकंप-समूह' (swarm earthquake) असे म्हणतात.*

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • देवळा येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आर.पी.आय. (आठवले) गटाचे पोलिसांना निवेदन ​देवळा: अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच यासंदर्भातील अभ्यास गट समितीचा अहवाल जाहीर करून नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) देवळा तालुक्याच्या वतीने देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. ​शासनाकडून अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असून या निर्णयाला समाजाचा तीव्र विरोध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उपवर्गीकरणामुळे मागासवर्गीय समाजाच्या ऐक्याला तडा जाऊन समाजात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी आर.पी.आय.ने केली आहे. ​निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत: ​अहवाल जाहीर करावा: निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गट समितीने तयार केलेला अहवाल, त्यातील निरीक्षणे व शिफारसी सार्वजनिक करण्यात याव्यात. ​हरकती व सूचना मागवाव्यात: अहवाल जाहीर केल्यानंतर नागरिकांना आणि सामाजिक संघटनांना त्यावर हरकती व सूचना मांडण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी देण्यात यावा. ​अधिकारांवर गदा आणू नये: १९३२ च्या ऐतिहासिक पुणे करारामुळे अनुसूचित जातीच्या प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे या समाजाच्या प्रगतीला बाधा आणणारा कोणताही निर्णय शासनाने घेऊ नये. ​हे निवेदन आर.पी.आय.चे देवळा तालुका अध्यक्ष कैलास रमेश पवार यांनी जिल्हा संघटक आय. यु. शांताराम पवार व जिल्हा उपाध्यक्ष कैलास जिभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनास सुपूर्द केले. याप्रसंगी महेंद्र धोंडीराम आदिले, रमेश पवार, राहुलजी शिरे, समाधान कराटे, प्रदीप अशोक पवार, सुनील वसंत पवार, चंद्रभान गोविंद आहिरे, संदीप पवार, सागर आहिरे, सनी पवार, प्रदीप पवार, शुभम आहिरे, महेश बच्छाव, मेहुल पवार, रितेश पवार यांच्यासह आर.पी.आय.चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    2
    देवळा येथे अनुसूचित जाती उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी आर.पी.आय. (आठवले) गटाचे पोलिसांना निवेदन
​देवळा:
अनुसूचित जातीमधील उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच यासंदर्भातील अभ्यास गट समितीचा अहवाल जाहीर करून नागरिकांसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) देवळा तालुक्याच्या वतीने देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले.
​शासनाकडून अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असून या निर्णयाला समाजाचा तीव्र विरोध असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उपवर्गीकरणामुळे मागासवर्गीय समाजाच्या ऐक्याला तडा जाऊन समाजात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी आर.पी.आय.ने केली आहे.
​निवेदनात खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
​अहवाल जाहीर करावा: निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गट समितीने तयार केलेला अहवाल, त्यातील निरीक्षणे व शिफारसी सार्वजनिक करण्यात याव्यात.
​हरकती व सूचना मागवाव्यात: अहवाल जाहीर केल्यानंतर नागरिकांना आणि सामाजिक संघटनांना त्यावर हरकती व सूचना मांडण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी देण्यात यावा.
​अधिकारांवर गदा आणू नये: १९३२ च्या ऐतिहासिक पुणे करारामुळे अनुसूचित जातीच्या प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे या समाजाच्या प्रगतीला बाधा आणणारा कोणताही निर्णय शासनाने घेऊ नये.
​हे निवेदन आर.पी.आय.चे देवळा तालुका अध्यक्ष कैलास रमेश पवार यांनी जिल्हा संघटक आय. यु. शांताराम पवार व जिल्हा उपाध्यक्ष कैलास जिभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनास सुपूर्द केले.
याप्रसंगी महेंद्र धोंडीराम आदिले, रमेश पवार, राहुलजी शिरे, समाधान कराटे, प्रदीप अशोक पवार, सुनील वसंत पवार, चंद्रभान गोविंद आहिरे, संदीप पवार, सागर आहिरे, सनी पवार, प्रदीप पवार, शुभम आहिरे, महेश बच्छाव, मेहुल पवार, रितेश पवार यांच्यासह आर.पी.आय.चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_सुनिलआण्णा सोनवणे
    सुनिलआण्णा सोनवणे
    Farmer देवळा, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • आमदार श्री हिरामण खोसकर यांच्या मतदारसंघात रस्त्यांची दुरवस्था.. अंजनेरी मुळेगाव रस्त्याची बिकट अवस्था नागरिकांना रोज चिखलातूनच करावा लागतोय प्रवास आमदार हिरामण खोसकर रस्ते कामांसाठी निधी मंजूर करून आनतात पण ठेकेदारानी अर्धवट कामे टाकल्याने आमदार श्री हिरामण खोसकर यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे का कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तसेच परिसरातील रस्त्यांची कामे अगदी जोमाने सुरू झाली पण काही ठेकेदारांनी कामे अर्धवट टाकून दिली आहेत या रस्त्याचे काम मागील दोन वर्षापासून चालू आहे त्यामुळे येथे स्थानिक नागरिकांना रोजच या चिखलमेवर रस्त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी करतात तरी काय का अधिकारी ठेकेदारांची पाठराखण करतात हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे आमदार हिरामण कोसकर यांनी आपल्या मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी मंजूर करणारे आमदार म्हणून ओळख पण प्रत्यक्ष मात्र खरोखर निधीचा उपयोग होतोय का रोज कितीतरी नागरिकांना या चिखलमय रस्त्यातूनच प्रवास करावा लागतोय प्रशासनाच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे
    1
    आमदार श्री हिरामण खोसकर यांच्या मतदारसंघात रस्त्यांची दुरवस्था..
अंजनेरी मुळेगाव रस्त्याची बिकट अवस्था नागरिकांना रोज चिखलातूनच करावा लागतोय प्रवास आमदार हिरामण खोसकर  रस्ते कामांसाठी निधी मंजूर करून आनतात पण ठेकेदारानी अर्धवट कामे टाकल्याने आमदार श्री हिरामण खोसकर यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था होत आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे का  कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तसेच परिसरातील रस्त्यांची कामे अगदी जोमाने सुरू झाली पण काही ठेकेदारांनी कामे अर्धवट टाकून दिली आहेत या रस्त्याचे काम मागील दोन वर्षापासून चालू आहे त्यामुळे येथे स्थानिक नागरिकांना रोजच या चिखलमेवर रस्त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी करतात तरी काय का अधिकारी ठेकेदारांची पाठराखण करतात हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे  आमदार हिरामण कोसकर यांनी आपल्या मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी मंजूर करणारे आमदार म्हणून ओळख पण प्रत्यक्ष मात्र खरोखर  निधीचा उपयोग होतोय का रोज कितीतरी नागरिकांना या चिखलमय रस्त्यातूनच  प्रवास करावा लागतोय प्रशासनाच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे
    user_श्री.भगवान आचारी
    श्री.भगवान आचारी
    त्र्यंबक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • शिष्यवृत्ती परिक्षेत जि.प. शाळा मेसनरखेडे शाळेचे घवघवीत यश ! प्रतिनिधी- सुनिल आण्णा सोनवणे महाराष्ट्र आासनाकडुन रखर्थी र-४ थीआणी इयत्ता सातवी च्या स्कॉलरशीप परिक्षा घेतल्या जातात, तरि मेसनखेडे खुर्द शाळेतील इयत्ता ४धी धनश्री गणेश, थोरात, पियुष नितीन पगारे भाग्यश्री दत्तात्रय पवार हे विद्यार्थी व इयत्ता ७वीमधील साई कात्मिक ठोंबरे निकीता बाळू मार्कंड, धनश्री गणेश जाधव ह्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन गुणवत्ता यादीत स्थान मिळविले याकामी शाळेतील सर्व शिक्षकांनी सदर वि‌द्यार्थ्यांना विषय निहाय संपुर्ण मार्गदर्शन केले, तसेच प्रशासनाकडून दिलेल्या सर्व मागदर्शक सुचनांप्रमाणे विद्यार्थांची तयारी करुन घेतल्याने हे यश मिळाले. गाव‌ातील ग्रामपंचायत सदस्य नितीनभाऊ पगारे, दिलिप पगार तसेच शिक्षकही उपश्थित होते. बिडगर, होके, वर्षा अभोणकर वैशाली पवार, गिता माळी, सुरेखा पवार योगिता पगारे अंगणवाडी कर्मचारी देवरे मॅडम उपस्थित होते,
    1
    शिष्यवृत्ती परिक्षेत जि.प. शाळा मेसनरखेडे शाळेचे
घवघवीत यश !
प्रतिनिधी- सुनिल आण्णा सोनवणे
महाराष्ट्र आासनाकडुन रखर्थी र-४ थीआणी इयत्ता सातवी च्या स्कॉलरशीप परिक्षा घेतल्या जातात, तरि मेसनखेडे खुर्द शाळेतील इयत्ता ४धी धनश्री गणेश, थोरात, पियुष नितीन पगारे भाग्यश्री दत्तात्रय पवार हे विद्यार्थी व इयत्ता ७वीमधील साई कात्मिक ठोंबरे निकीता बाळू मार्कंड, धनश्री गणेश जाधव ह्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन गुणवत्ता यादीत स्थान मिळविले
याकामी शाळेतील सर्व शिक्षकांनी सदर वि‌द्यार्थ्यांना  विषय निहाय संपुर्ण मार्गदर्शन केले, तसेच प्रशासनाकडून दिलेल्या सर्व मागदर्शक सुचनांप्रमाणे विद्यार्थांची तयारी करुन घेतल्याने
हे यश मिळाले.  गाव‌ातील ग्रामपंचायत सदस्य नितीनभाऊ पगारे, दिलिप पगार  तसेच शिक्षकही उपश्थित होते.  बिडगर,  होके, वर्षा अभोणकर वैशाली  पवार,  गिता माळी, सुरेखा पवार  योगिता पगारे अंगणवाडी कर्मचारी देवरे मॅडम उपस्थित होते,
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Farmer चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • *सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा जागतिकस्तरावर नावलौकिक उंचवणार-राज्यपाल जिष्णू देव वर्मा* नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे राज्यापाल जिष्णू देव वर्मा यांनी कौतुक केले. कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेले नियोजन पाहता नाशिकचा जागतिकस्तरावर नावलौकिक उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात राज्यपाल श्री. वर्मा यांनी कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त डाॅ. संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे,उपायुक्त नियोजन योगेंद्र चौधरी, त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांचेसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले, कुंभमेळ्याच्या नियोजनामुळे आगामी कुंभ सुंदर, स्मरणीय आणि भव्य होऊन जगात नाशिक त्र्यंबकेश्वरची ओळख प्रस्थापित होईल. उद्योग, पर्यटन, संस्कृती आदी विविध स्तरावर नाशिकची वेगळी ओळख निर्माण होईल. सोहळ्याची भव्यता लक्षात घेता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक चांगले नियोजन करणे शक्य होणार आहे. बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यास समाज माध्यमांद्वारे माहिती मिळणे सुलभ झाल्याने अधिक भाविक येतील. त्यातच यादरम्यान पावसाळा असल्याने नियोजनाचे मोठे आव्हान असेल. विशेषतः स्वच्छता आणि आरोग्याच्या संदर्भात विशेष लक्ष द्यावे लागेल. देशभरातील धार्मिक स्थळावर मोठ्या प्रमाणात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता येणारा कुंभमेळा भव्य- दिव्य ठरेल. आतापर्यंत व्यापक नियोजन केले असले, तरी प्राधिकरणाने प्रयागराज येथील अनुभव लक्षात घेता अधिक तयारी करावी. त्र्यंबकेश्वर येथील नियोजित विकास कामांच्या नियोजनाबाबत राज्यपाल श्री. वर्मा समाधान व्यक्त केले. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश- विदेशातून कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्चून पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ही सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. आगामी कुंभमेळ्याचा कालावधी मोठा आहे. त्यामुळे भाविकांची संख्या नेहमीपेक्षा जास्त राहील. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. पायाभूत सोयीसुविधांची कामे वेळेत पूर्ण करताना त्यांचा दर्जा राखला पाहिजे. याबरोबरच कामांना गती द्यावी लागेल. त्र्यंबकेश्वरचे महत्त्व लक्षात घेऊन दीर्घकालीन कामे करावीत. आवश्यकतेनुसार कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर करावा असेही त्यांनी सांगितले. प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम, आयुक्त श्री. सिंह यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली. महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी रामकाल पथ, मलनि:स्सारण प्रकल्पासह विविध कामांची माहिती दिली.
    1
    *सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा जागतिकस्तरावर नावलौकिक उंचवणार-राज्यपाल जिष्णू देव वर्मा*
नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाचे राज्यापाल जिष्णू देव वर्मा यांनी कौतुक केले. कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेले नियोजन पाहता नाशिकचा जागतिकस्तरावर नावलौकिक उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात राज्यपाल श्री. वर्मा यांनी कुंभमेळा नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त डाॅ. संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, पोलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी, अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे,उपायुक्त नियोजन योगेंद्र चौधरी, त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांचेसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. 
राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले, कुंभमेळ्याच्या नियोजनामुळे आगामी कुंभ सुंदर, स्मरणीय आणि भव्य होऊन जगात नाशिक त्र्यंबकेश्वरची ओळख प्रस्थापित होईल. उद्योग, पर्यटन, संस्कृती आदी विविध स्तरावर नाशिकची वेगळी ओळख निर्माण होईल. सोहळ्याची भव्यता लक्षात घेता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक चांगले नियोजन करणे शक्य होणार आहे.
बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यास समाज माध्यमांद्वारे माहिती मिळणे सुलभ झाल्याने अधिक भाविक येतील. त्यातच यादरम्यान पावसाळा असल्याने नियोजनाचे मोठे आव्हान असेल. विशेषतः स्वच्छता आणि आरोग्याच्या संदर्भात विशेष लक्ष द्यावे लागेल. देशभरातील धार्मिक स्थळावर मोठ्या प्रमाणात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता येणारा कुंभमेळा भव्य- दिव्य ठरेल. आतापर्यंत व्यापक नियोजन केले असले, तरी प्राधिकरणाने प्रयागराज येथील अनुभव लक्षात घेता अधिक तयारी करावी. त्र्यंबकेश्वर येथील नियोजित विकास कामांच्या नियोजनाबाबत राज्यपाल श्री. वर्मा समाधान व्यक्त केले.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश- विदेशातून कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्चून पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ही सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. आगामी कुंभमेळ्याचा कालावधी मोठा आहे. त्यामुळे भाविकांची संख्या नेहमीपेक्षा जास्त राहील. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. पायाभूत सोयीसुविधांची कामे वेळेत पूर्ण करताना त्यांचा दर्जा राखला पाहिजे. याबरोबरच कामांना गती द्यावी लागेल. त्र्यंबकेश्वरचे महत्त्व लक्षात घेऊन दीर्घकालीन कामे करावीत. आवश्यकतेनुसार कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर करावा असेही त्यांनी सांगितले. 
प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम, आयुक्त श्री. सिंह यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध कामांची माहिती दिली. महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी रामकाल पथ, मलनि:स्सारण प्रकल्पासह विविध कामांची माहिती दिली.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • १६० कोटींच्या बनावट शालार्थ घोटाळ्यातील संस्थाचालक जेरबंद नातेपुते येथील फार्महाऊसवरून उपनगर पोलिसांची कारवाई; १,२०० आरोपींचा तपास सुरू बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील प्रमुख आरोपी तथा संस्थाचालक संजय भास्करराव गरूड (वय ६७, रा. के. के. नगर, शेंदुर्णी, ता. जामनेर, जि. जळगाव) याला उपनगर पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फार्महाऊसवरून ताब्यात घेतले. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोणतीही वैयक्तिक मान्यता अथवा शालार्थ प्रस्ताव नसताना बनावट शालार्थ आदेश तयार करून शालार्थ प्रणालीत नोंदी करण्यात आल्या. त्याआधारे वेतन व थकबाकी काढून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक आदींसह अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल असून, तपासादरम्यान सुमारे १,२०० आरोपी निष्पन्न झाले आहेत. तपासात संजय गरूड यांच्या १५ शैक्षणिक संस्थांमधील १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणतीही अधिकृत वैयक्तिक मान्यता नसताना बनावट मान्यता देण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, अटक टाळण्यासाठी गरूड हे नातेपुते (जि. सोलापूर) येथील एका फार्महाऊसवर लपून राहत असल्याची माहिती गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणातून मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नाशिकमध्ये आणून अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके व गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने केली. सदर घोटाळ्याचा पुढील तपास सुरू आहे.
    1
    १६० कोटींच्या बनावट शालार्थ घोटाळ्यातील संस्थाचालक जेरबंद

नातेपुते येथील फार्महाऊसवरून उपनगर पोलिसांची कारवाई; १,२०० आरोपींचा तपास सुरू
बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील प्रमुख आरोपी तथा संस्थाचालक संजय भास्करराव गरूड (वय ६७, रा. के. के. नगर, शेंदुर्णी, ता. जामनेर, जि. जळगाव) याला उपनगर पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फार्महाऊसवरून ताब्यात घेतले.
नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोणतीही वैयक्तिक मान्यता अथवा शालार्थ प्रस्ताव नसताना बनावट शालार्थ आदेश तयार करून शालार्थ प्रणालीत नोंदी करण्यात आल्या. त्याआधारे वेतन व थकबाकी काढून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक आदींसह अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल असून, तपासादरम्यान सुमारे १,२०० आरोपी निष्पन्न झाले आहेत.
तपासात संजय गरूड यांच्या १५ शैक्षणिक संस्थांमधील १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणतीही अधिकृत वैयक्तिक मान्यता नसताना बनावट मान्यता देण्यात आल्याचे समोर आले.
दरम्यान, अटक टाळण्यासाठी गरूड हे नातेपुते (जि. सोलापूर) येथील एका फार्महाऊसवर लपून राहत असल्याची माहिती गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणातून मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नाशिकमध्ये आणून अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके व गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने केली. सदर घोटाळ्याचा पुढील तपास सुरू आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • ​गंगापूर धरणात उत्साहात जलपूजन; नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न मिटला! ​विशेष बातमी | नाशिक: नाशिक शहराला आणि परिसराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख गंगापूर धरण पाण्याच्या जोरदार आवकमुळे काठोकाठ भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याच्या आनंदात आज प्रशासनातर्फे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत गंगापूर धरणावर पारंपरिक पद्धतीने जलपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. ​विधीवत पूजा आणि श्रीफळ अर्पण ​धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. या शुभप्रसंगानिमित्त: ​वैदिक मंत्रोच्चारात वरुण राजाची पूजा करण्यात आली. ​जलाला पुष्पहार व श्रीफळ (नारळ) अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ​नाशिककरांना वर्षभर मुबलक पाणी मिळावे आणि बळीराजावर निसर्गाची कृपा राहो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. ​मान्यवरांची उपस्थिती ​या जलपूजन सोहळ्याला लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. जलपूजनानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी धरणाच्या सद्यस्थितीची पाहणी केली आणि पाण्याच्या नियोजनाबाबत आढावा घेतला. ​नाशिककरांना मोठा दिलासा ​"धरण काठोकाठ भरल्याने शहरावरील पाणीकपातीचे संकट टळले असून वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न सुटला आहे." > — जलसंपदा विभाग/महापालिका प्रशासन ​धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. धरणातील या मुबलक जलसाठ्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
    4
    ​गंगापूर धरणात उत्साहात जलपूजन; नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न मिटला!
​विशेष बातमी | नाशिक: नाशिक शहराला आणि परिसराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख गंगापूर धरण पाण्याच्या जोरदार आवकमुळे काठोकाठ भरले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याच्या आनंदात आज प्रशासनातर्फे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत गंगापूर धरणावर पारंपरिक पद्धतीने जलपूजन मोठ्या उत्साहात पार पडले.
​विधीवत पूजा आणि श्रीफळ अर्पण
​धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. या शुभप्रसंगानिमित्त:
​वैदिक मंत्रोच्चारात वरुण राजाची पूजा करण्यात आली.
​जलाला पुष्पहार व श्रीफळ (नारळ) अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
​नाशिककरांना वर्षभर मुबलक पाणी मिळावे आणि बळीराजावर निसर्गाची कृपा राहो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
​मान्यवरांची उपस्थिती
​या जलपूजन सोहळ्याला लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. जलपूजनानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी धरणाच्या सद्यस्थितीची पाहणी केली आणि पाण्याच्या नियोजनाबाबत आढावा घेतला.
​नाशिककरांना मोठा दिलासा
​"धरण काठोकाठ भरल्याने शहरावरील पाणीकपातीचे संकट टळले असून वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा प्रश्न सुटला आहे." > — जलसंपदा विभाग/महापालिका प्रशासन
​धरणात पाण्याची आवक सुरूच असल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. धरणातील या मुबलक जलसाठ्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Mill Owner नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • संपूर्ण देश पेपर लिकने परेशान आहे तर मालेगावकर पाईप लाईन लिकने परेशान आहेत. फुटलेल्या व लिक झालेल्या मुख्य पाईप लाईनची पाहणी करताना आयुक्त रवींद्र जाधव, मुश्तकीन डिगनिटी, इंजिनिअर! ही परेशानी व कटकट कायमची केव्हा बंद होईल. सर्वजण परेशान आहेत. सेना नगरसेवक निलेश काकडे यांनी पाईप लाईन कामावर होणाऱ्या महासभेच्या बैठकीत चर्चा करणेची मागणी केली आहे.
    1
    संपूर्ण देश पेपर लिकने परेशान आहे तर मालेगावकर पाईप लाईन लिकने परेशान आहेत.
फुटलेल्या व लिक झालेल्या मुख्य पाईप लाईनची पाहणी करताना आयुक्त रवींद्र जाधव, मुश्तकीन डिगनिटी, इंजिनिअर!
ही परेशानी व कटकट कायमची केव्हा बंद होईल. सर्वजण परेशान आहेत. सेना नगरसेवक निलेश काकडे यांनी पाईप लाईन कामावर होणाऱ्या महासभेच्या बैठकीत चर्चा करणेची मागणी केली आहे.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • नाशिकच्या उमराणा एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार... एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर पर राज्यातील कांदा.... नाशिकच्या उमराणा एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार... 20 ते 35 ट्रॅकमधून हलक्या प्रतीचा कांदा आणल्याचा आरोप... उमराणा (देवळा):- नाशिकच्या उमराणा येथील एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर मध्य प्रदेशातून 20 ते 25 ट्रॅक हलक्या प्रतीची कांदा खाली होत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सदर ट्रॅक अडवून धरल्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा जमाव या गोडाऊन जमा झाल्याने काही तणाव निर्माण झाला होता. गोडाऊन दोन संस्था साठविला जातो. मात्र या ठिकाणी मध्य प्रदेशातून हलक्या प्रतीचा कांदा या ठिकाणी उतरण्यात येत असल्याने होता. एन. सी. सी. एफ व नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करताना जाचक नियम व अटी लावून कांदा चांगल्या प्रतीचा कांदाही नाकारण्यात आला. दुसरीकडे नाफेड एन. सी. सी. एफ सहा वेळा दर वाढ करून कांदा उत्पादक शेतकरी खरेदी केंद्राकडे फिरकत नसताना एकाच वेळी 20 ते 25 ट्रॅक कांदा कसा काय या गोडाऊन खाली करण्यासाठी यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होऊन शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडले जात असल्याचा आरोप कांदा उत्पादकांनी केला असून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी कांदा उत्पादकांनी केला आहे. दरम्यान कांदा उत्पादकांनी केलेले आरोप संस्थांनी फेटाळला आहे. -
    4
    नाशिकच्या उमराणा एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार...
एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर पर राज्यातील कांदा....
नाशिकच्या उमराणा एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर धक्कादायक प्रकार...
20 ते 35 ट्रॅकमधून हलक्या प्रतीचा कांदा आणल्याचा आरोप...
उमराणा (देवळा):-  नाशिकच्या उमराणा येथील एन. सी. सी. एफ. खरेदी केंद्रावर मध्य प्रदेशातून 20 ते 25  ट्रॅक हलक्या प्रतीची कांदा खाली होत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी  सदर ट्रॅक अडवून धरल्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा जमाव या गोडाऊन जमा झाल्याने काही तणाव निर्माण झाला होता. गोडाऊन दोन संस्था साठविला जातो. मात्र या ठिकाणी मध्य प्रदेशातून हलक्या प्रतीचा कांदा या ठिकाणी  उतरण्यात येत असल्याने होता. एन. सी. सी. एफ व नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करताना जाचक नियम व अटी लावून कांदा चांगल्या प्रतीचा कांदाही नाकारण्यात आला. दुसरीकडे नाफेड एन. सी. सी. एफ सहा वेळा दर वाढ करून कांदा उत्पादक शेतकरी  खरेदी केंद्राकडे फिरकत नसताना एकाच वेळी 20 ते 25 ट्रॅक कांदा कसा काय या गोडाऊन खाली करण्यासाठी यात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होऊन शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडले जात असल्याचा आरोप कांदा उत्पादकांनी केला असून या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी कांदा उत्पादकांनी केला आहे. दरम्यान कांदा उत्पादकांनी केलेले आरोप  संस्थांनी फेटाळला आहे. -
    user_सुनिलआण्णा सोनवणे
    सुनिलआण्णा सोनवणे
    Farmer देवळा, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.