दिग्रस येथे भूमी अभिलेखच्या लाचखोर उपअधीक्षकांसह भूमापक एसीबीच्या जाळ्यात बक्षीस पत्राचे फेरफार करण्याकरिता पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर उपअधीक्षकांसह परीरक्षण भूमापक याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक यवतमाळ यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी केली. या कारवाईने कार्यालयात एकच खळबळ उडाली. आरोपी सखाराम नरसिंग पवार उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस व आशिष काशिनाथ शेलोकर नझुल परीरक्षण भूमापक, भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस असे लाचखोर अधिकाऱ्यांचे नावे आहे. दिग्रस भूमी अभिलेख कार्यालयात भूमापक आशिष शेलोकार यांनी तक्रारदार यांच्या कडुन पंचासमक्ष लाच स्वीकारली.रक्कमेतील दोन हजार पाचशे रुपये ठेऊन उर्वरित रक्कम दोन हजार पाचशे रुपये उपअधीक्षक सखाराम नरसिंग पवार यांना दिले. दोन्ही आरोपींना उप अधीक्षक भूमी अभिलेख याचे कक्षामध्ये रंगेहाथ पकडण्यात आले आहे. हि कारवाई पोलीस अधीक्षक बापु बागर, अँटी करप्शन ब्युरो अमरावती, सचित्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती, व पोलीस उपअधीक्षक अभय अष्टेकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, यवतमाळ, अंमलदार अतुल मत्ते, सुधीर कांबळे, सचिन भोयर, राकेश सावसाकडे, पोलीस शिपाई सुरज मेश्राम, आकाश सहारे, महिला पोलिस मयुरी कोल्हे, चालक अतुल नागमोते यांनी सापळा यशस्वी केला.
दिग्रस येथे भूमी अभिलेखच्या लाचखोर उपअधीक्षकांसह भूमापक एसीबीच्या जाळ्यात बक्षीस पत्राचे फेरफार करण्याकरिता पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर उपअधीक्षकांसह परीरक्षण भूमापक याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक यवतमाळ यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवारी दि. ३ फेब्रुवारी रोजी केली. या कारवाईने कार्यालयात एकच खळबळ उडाली. आरोपी सखाराम नरसिंग पवार उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस व आशिष काशिनाथ शेलोकर नझुल परीरक्षण भूमापक, भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस असे लाचखोर अधिकाऱ्यांचे नावे आहे. दिग्रस भूमी अभिलेख कार्यालयात भूमापक आशिष शेलोकार यांनी तक्रारदार यांच्या कडुन पंचासमक्ष लाच स्वीकारली.रक्कमेतील दोन हजार पाचशे रुपये ठेऊन उर्वरित रक्कम दोन हजार पाचशे रुपये उपअधीक्षक सखाराम नरसिंग पवार यांना दिले. दोन्ही आरोपींना उप अधीक्षक भूमी अभिलेख याचे कक्षामध्ये रंगेहाथ पकडण्यात आले आहे. हि कारवाई पोलीस अधीक्षक बापु बागर, अँटी करप्शन ब्युरो अमरावती, सचित्र शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती, व पोलीस उपअधीक्षक अभय अष्टेकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ, पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट, यवतमाळ, अंमलदार अतुल मत्ते, सुधीर कांबळे, सचिन भोयर, राकेश सावसाकडे, पोलीस शिपाई सुरज मेश्राम, आकाश सहारे, महिला पोलिस मयुरी कोल्हे, चालक अतुल नागमोते यांनी सापळा यशस्वी केला.
- मालेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या अवलिया महाराज संस्थान काळा माथा येथे नवसाला पावणारा देव अशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या संत अवलिया महाराज यांच्या यात्रेला सुरुवात झाली असून भाविक भक्तांनी दर्शनासाठी मंदिरामध्ये गर्दी केली आहे1
- जय श्री श्याम1
- भाजप कार्यालय राळेगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने घेण्यात आली पत्रकार परिषद राळेगाव शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सहा वाजता भाजपा कार्यालयात राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत राळेगाव शहरातील विकास कामे पतदिव्यांचा प्रलंबित प्रश्न व नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून व डॉ. अशोकराव उईके यांच्या नेतृत्वात मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत पत्रकारांना माहिती देण्यात आली नजीकच्या काळात ही योजना लवकर कार्यान्वित होईल यासाठी योजना आखण्यात आली या पत्रकार परिषदेला भाजपा तालुका अध्यक्ष छायाताई पिंपरे, शुभम मुके व इतर पदाधिकारी व शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.1
- महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार स्मृति श्रद्धांजलि कार्यक्रम वर्धा में आयोजित किया1
- 🌿🌼 चिंचा लगडल्या! निसर्गाची देणगी 🌼🌿 यंदा तालुक्यातील शेतशिवारात चिंचेची झाडे आंबट-गोड फळांनी लगडली असून सर्वत्र निसर्गसंपन्नतेचे सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे. 🌳 संतुलित पाऊस आणि अनुकूल हवामानामुळे चिंच उत्पादन भरघोस होण्याची शक्यता असून ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे. घरगुती वापरासोबतच बाजारपेठेतही चिंचेची लगबग सुरू झाली आहे. ✨ निसर्गाची ही देणगी जपुया, झाडे आणि पर्यावरणाचे संरक्षण करूया. #चिंचा_लगडल्या #चिंच_उत्पादन #निसर्गाची_देणगी #ग्रामीण_भारत #शिवार_बहरले शेतकरी_समाधान पर्यावरण_संवर्धन आंबटगोड_चव तालुका_बातमी1
- वर्धा1
- आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी जाणून घेतल्या राळेगाव शहरातील नागरिकांच्या समस्या राळेगाव राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी तीन वाजता राळेगाव शहराला सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी शहरातील नागरिकांच्या भेटी घेऊन विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्लसिंह चौहान, भाजपा तालुकाध्यक्ष सौ. छायाताई पिंपरे, शहराध्यक्ष शुभम मुके यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (मजीप्रा) दिलेल्या माहितीनुसार, शहानूर मध्यम प्रकल्पातील वीज निर्मिती संच पुनर्संस्थापित करण्याच्या दुरुस्ती कामामुळे शहानूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या ७९ गावांचा पाणीपुरवठा दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. मध्यम व लघु पाटबंधारे उपविभाग क्र. १, अचलपूर यांच्या पत्राच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असून दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहील. याबाबत व्यवस्थापन उपविभाग, अंजनगाव सुर्जीचे उपविभागीय अभियंता विजय शेंडे यांनी संबंधित सर्व गावांतील नागरिकांना आगाऊ पाणीसाठा करून ठेवण्याचे तसेच पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. #MJP #महाराष्ट्रजीवनप्राधिकरण #NewsUpdate #viralpost2026シ #दैनिकजागरमराठी #जागरमराठी #jagarmarathi #anjangaonsurji1