Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील १० स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांवर आता न्यायालयीन वाद सुरू झाला आहे. भाजपच्या माजी नगरसेविकेने या नियुक्त्या बेकायदेशीर ठरवत न्यायालयात आव्हान दिले आहे, ज्यात नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली असून, या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शेख अजहर ताहेर (पत्रकार)
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील १० स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्यांवर आता न्यायालयीन वाद सुरू झाला आहे. भाजपच्या माजी नगरसेविकेने या नियुक्त्या बेकायदेशीर ठरवत न्यायालयात आव्हान दिले आहे, ज्यात नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली असून, या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पुण्यात वाहतूक नियंत्रित करताना एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा संयम सुटला. त्यांनी एका ट्रक चालकावर थेट दगड उगारला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.1
- १२६२ किलो कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातात कवडी नाही; उलट अडत्यालाच द्यावा लागला १ रुपया छत्रपती संभाजीनगर पैठण: लाखो रुपये खर्च करून, उसनेवारी आणि कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. पैठण तालुक्यातील वरुडी गावातील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलधर यांनी तब्बल तीन महिने मेहनत घेऊन तयार केलेला १२६२ किलो कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. मात्र बाजारात कांद्याला मिळालेल्या अत्यल्प दरामुळे हमाली, तोलाई आणि गोणी खर्च वजा जाता त्यांच्या हातात एकही रुपया उरला नाही. उलट अडत्याला १ रुपया द्यावा लागल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी सातबारावर कर्ज काढले, तर काहींनी उसनेवारी करून पैसे उभे केले होते. मात्र बाजारातील पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सरकारी अधिकारी पंचनामे करून फोटो काढून गेले, पण प्रत्यक्ष मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. कांद्याला हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.1
- न्यू मुंबई चायनीज बिडकीन बस स्टॅन्ड समोर आहे. मुंबई चायनीज दुसरी शाखा फारोळा. मुंबई चायनीज मालक इमरान शहा यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .1
- महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ('अ ब क ड') च्या मागणीसाठी मातंग समाजाने छत्रपती संभाजीनगर येथे भव्य मोर्चा काढला. हजारो समाजबांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या.1
- पिण्याच्या पाण्याचे राजकारण थांबवा, अन्यथा 'शिवसेना स्टाईल' आंदोलन; अमोल शिंदेंचा इशारा येवला नगरपालिकेने शहराचा पाणीपुरवठा चार दिवसांआड केल्याच्या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, "येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्याचे राजकारण करू नका, नियमित पाणीपुरवठा करा; अन्यथा शिवसेना स्टाईलने हंडा मोर्चा काढला जाईल," असा गर्भित इशारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला आहे. शहरातील पाणीटंचाईच्या तक्रारी वाढल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शनिवारी गंगासागर तलावाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नगरपालिकेच्या नियोजनावर जोरदार टीका करण्यात आली. अमोल शिंदे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून जे नियोजन तीन दिवसांआड होते, ते आता चार दिवसांवर का गेले? निवडणुकीच्या जाहीरनाम्यात 'रोज पाणी देऊ' असे आश्वासन दिले गेले होते, मात्र आज परिस्थिती उलट झाली आहे. गेल्या २० वर्षांपासून मंत्री छगन भुजबळ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असूनही शहराचा पाणी प्रश्न सुटू शकला नाही, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. शहराचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी, पांडुरंग शेळके,गोरख सुराशे,गोरख दाणे,विजय मोरे, यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास येत्या काळात नगरपालिका प्रशासनाविरुद्ध 'हंडा मोर्चा' निघणार हे निश्चित मानले जात आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- अहिल्यानगर शहरात ब्लॉकस्पॉट पेट्रोलिंग सुरू; सार्वजनिक ठिकाणी मद्यपान व नशा करणाऱ्यांवर कारवाई अहिल्यानगर : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलिसांकडून विशेष “ब्लॉकस्पॉट पेट्रोलिंग” मोहीम राबविण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी, मैदानावर, उड्डाणपूल परिसरात तसेच गर्दीच्या भागात मद्यपान करून गोंधळ घालणारे, नशा करून नागरिकांना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरातील शांतता व नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन रात्रीच्या वेळी विविध भागांमध्ये पोलिस पथकांकडून गस्त वाढविण्यात आली आहे. संशयित हालचाली, सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान किंवा बेकायदेशीर कृत्ये आढळल्यास तात्काळ पोलिस हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क साधावा. नागरिकांच्या सहकार्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखता येईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे. — प्रतिनिधी1
- जय लक्ष्मी कंपनीने सिल्लोडच्या राजनगाव येथील म्हारोळा रोडवरील महार हडूळे अवैधपणे खोदून मुरुमाची वाहतूक सुरू केली आहे. हा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.1
- बिडकीन बस स्टॅन्ड ता. पैठण.जि. औरंगाबाद एस टी महामंडळ पैठण बिडकीन एमआयडीसी बिडकीन बस स्टॅन्ड काम सहा महिन्यापासून बंद आहे. बिडकीन बस स्टँड काम बंद आहे. एसटी बाहेरून जाऊ लागले. बस स्टॅन्ड प्रवाशांना उन्हाळ्यामुळे लय हाल होत आहे. बस स्टॅन्ड मध्ये छत नाही.1