logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

चांदवडला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या ‘नवचेतना लाभार्थी’ शिबिरात ३२७ लाभार्थी बालकांच्या पालकांना प्रमाणपत्र व आदेशाचे वाटप; बालसंगोपन योजनेचा गरजू लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा- आमदार डॉ. राहुल आहेर यांचे आवाहन अनाथ, निराधार आणि एकल पालकांच्या मुलांना सुरक्षित कौटुंबिक वातावरण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध असून, संगोपनाची गरज असलेल्या बालकांना शासनाच्या बालसंगोपन योजनेमुळे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन संगोपनासाठी पालकांना मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे चांदवड तालुक्यातील प्रत्येक गरजू आणि पात्र लाभार्थ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. चांदवड येथील सेलिब्रेशन लॉन्स येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ‘नवचेतना लाभार्थी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. आहेर यांच्याहस्ते एकूण ३२७ लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व आदेशाचे वाटप करण्यात आले. आमदार डॉ. आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार व गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बालसंगोपन नवचेतना योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ‘नवचेतना कक्ष’ स्थापन करून दोन टप्प्यात एकूण ७११ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात चांदवड तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. जुलै महिन्यात महाराजस्व अभियानात ३८४ व या शिबिरात ३२७ अशा एकूण ७११ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात आला आहे. यावेळी आमदार डॉ. आहेर म्हणाले की, या महत्त्वपूर्ण योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही बालकाच्या शिक्षणावर किंवा संगोपनावर परिणाम होऊ नये, हा आहे. अनाथ व निराधार बालके, आई किंवा वडील गमावलेली बालके, एकल पालकांची बालके, दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके, तसेच विशेष कौटुंबिक किंवा आपत्तीजन्य परिस्थितीतील पात्र बालकांना या योजनेचा थेट लाभ दिला जातो. योजनेअंतर्गत पात्र बालकांच्या सुरक्षित व योग्य संगोपनासाठी दरमहा २,२५० रुपयांचे आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात दिले जाते, ज्यामुळे त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजा पूर्ण होण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगीतले. योजनेच्या माध्यमातून समाजातील अत्यंत गरजू व सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना एक भक्कम आधार मिळणार असल्याने पालकांनी किंवा मुलांची जबाबदारी घेणार्‍या व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा, तसेच शासनाच्या इतरही विविध कल्याणकारी योजनांचा लाभ असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी मच्छींद्र साबळे, नगराध्यक्ष वैभव बागूल, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, बालविकास अधिकारी सचिन शिंदे, अशोक भोसले, अशोक व्यवहारे, गीताताई झाल्टे, योगेश ढोमसे, पिंटू भोईटे, शांताराम भवर आदींसह चांदवड नगरपरिषदेचे नगरसेवक, तालुक्यातील सरपंच, अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, लाभार्थी व पालक उपस्थित होते.

23 hrs ago
user_Mahendra kantubhai Gujrathi
Mahendra kantubhai Gujrathi
Local News Reporter चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
23 hrs ago
654c844c-ee9f-4f38-a29e-c2f9d56870ab

चांदवडला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या ‘नवचेतना लाभार्थी’ शिबिरात ३२७ लाभार्थी बालकांच्या पालकांना प्रमाणपत्र व आदेशाचे वाटप; बालसंगोपन योजनेचा गरजू लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा- आमदार डॉ. राहुल आहेर यांचे आवाहन अनाथ, निराधार आणि एकल पालकांच्या मुलांना सुरक्षित कौटुंबिक वातावरण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध असून, संगोपनाची गरज असलेल्या बालकांना शासनाच्या बालसंगोपन योजनेमुळे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन संगोपनासाठी पालकांना मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे चांदवड तालुक्यातील प्रत्येक गरजू आणि पात्र लाभार्थ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. चांदवड येथील सेलिब्रेशन लॉन्स येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना ‘नवचेतना लाभार्थी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. आहेर यांच्याहस्ते एकूण ३२७ लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व आदेशाचे वाटप करण्यात आले. आमदार डॉ. आहेर, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार व गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बालसंगोपन नवचेतना योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ‘नवचेतना कक्ष’ स्थापन करून दोन टप्प्यात एकूण ७११ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात चांदवड तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. जुलै महिन्यात महाराजस्व अभियानात ३८४ व या शिबिरात ३२७ अशा एकूण ७११ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात आला आहे. यावेळी आमदार डॉ. आहेर म्हणाले की, या महत्त्वपूर्ण योजनेचा मुख्य उद्देश आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही बालकाच्या शिक्षणावर किंवा संगोपनावर परिणाम होऊ नये, हा आहे. अनाथ व निराधार बालके, आई किंवा वडील गमावलेली बालके, एकल पालकांची बालके, दोन्ही पालक दिव्यांग असलेली बालके, तसेच विशेष कौटुंबिक किंवा आपत्तीजन्य परिस्थितीतील पात्र बालकांना या योजनेचा थेट लाभ दिला जातो. योजनेअंतर्गत पात्र बालकांच्या सुरक्षित व योग्य संगोपनासाठी दरमहा २,२५० रुपयांचे आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात दिले जाते, ज्यामुळे त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजा पूर्ण होण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगीतले. योजनेच्या माध्यमातून समाजातील अत्यंत गरजू व सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना एक भक्कम आधार मिळणार असल्याने पालकांनी किंवा मुलांची जबाबदारी घेणार्‍या व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा, तसेच शासनाच्या इतरही विविध कल्याणकारी योजनांचा लाभ असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी मच्छींद्र साबळे, नगराध्यक्ष वैभव बागूल, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, बालविकास अधिकारी सचिन शिंदे, अशोक भोसले, अशोक व्यवहारे, गीताताई झाल्टे, योगेश ढोमसे, पिंटू भोईटे, शांताराम भवर आदींसह चांदवड नगरपरिषदेचे नगरसेवक, तालुक्यातील सरपंच, अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, लाभार्थी व पालक उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • टिपू सुलतान फोटोवरून पुन्हा वाद ! फोटो काढायला लावणार - दादा भुसे मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
    1
    टिपू सुलतान फोटोवरून  पुन्हा वाद !                                                    फोटो काढायला लावणार - दादा भुसे
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं.
आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले.
नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय ​येवला: येथील प्रसिद्ध श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात भौम प्रदोषानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी श्री भौमनाथ महादेवाची विशेष महापूजा आणि आकर्षक भस्मारती पार पडली. भौम प्रदोषानिमित्त श्री भौमनाथ महादेवांचा मनमोहक शृंगार करण्यात आला होता. ​भौमनाथ महादेव हे मंगळ देवाचे स्वामी आणि अत्यंत आवडते रूप मानले जातात. महाआरतीनंतर आयोजित करण्यात आलेल्या भजन संध्येने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय झाला होता. या सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. ​दरम्यान, पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंदिर व्यवस्थापनातर्फे विशेष आवाहन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात प्रदोषानिमित्त ज्या भाविकांना मंदिरात महाप्रसादाची (पंगत) सेवा द्यायची असेल, त्यांनी लवकरात लवकर मंदिर समितीशी संपर्क साधावा. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय
येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय
​येवला:
येथील प्रसिद्ध श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात भौम प्रदोषानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी श्री भौमनाथ महादेवाची विशेष महापूजा आणि आकर्षक भस्मारती पार पडली. भौम प्रदोषानिमित्त श्री भौमनाथ महादेवांचा मनमोहक शृंगार करण्यात आला होता.
​भौमनाथ महादेव हे मंगळ देवाचे स्वामी आणि अत्यंत आवडते रूप मानले जातात. महाआरतीनंतर आयोजित करण्यात आलेल्या भजन संध्येने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय झाला होता. या सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
​दरम्यान, पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंदिर व्यवस्थापनातर्फे विशेष आवाहन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात प्रदोषानिमित्त ज्या भाविकांना मंदिरात महाप्रसादाची (पंगत) सेवा द्यायची असेल, त्यांनी लवकरात लवकर मंदिर समितीशी संपर्क साधावा.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    32 min ago
  • शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य
    1
    शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य
    user_Amol jadhav
    Amol jadhav
    दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .
    1
    दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • पुस्तकांचा तुटवडा निफाड तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तकांच्या १,५२७ संचांची कमतरता; तातडीने पुस्तके द्या, अन्यथा शिक्षण विभागाला टाळे ठोकू : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके पूर्णपणे उपलब्ध झालेली नाहीत. तालुक्यात तब्बल १,५२७ संचांचा तुटवडा असून, पुस्तकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा तुटवडा तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत; अन्यथा शिक्षण विभागाच्या दालनास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी दिला. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक पुस्तकांची मागणी नोंदवून ती जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर वितरित करण्याची व्यवस्था असते. मात्र, यंदा शाळा सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अनेक विद्यार्थ्यांच्या हातात अद्याप पुस्तके पोहोचलेली नाहीत. निफाड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दुसरी, चौथी, पाचवी, सहावी व सातवीच्या पुस्तकांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. विशेषतः दुसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने जुन्या पाठ्यपुस्तकांचा वापर करणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. काही शाळांमध्ये शिक्षकांनी जुनी पुस्तके जमा करून तात्पुरती व्यवस्था केली असली तरी नवीन पुस्तके उपलब्ध नसल्याने अध्यापनात अडथळे येत आहेत. या प्रश्नाबाबत प्रकाश पाटील यांनी निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप व सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे जाब विचारला. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे चर्चेतून समोर आल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी लासलगाव शिवसेना शहरप्रमुख प्रमोद पाटील, लासलगाव शहर विकास समितीचे राजेंद्र कराड, संदीप उगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वर्गनिहाय तुटवडा इयत्ता २ री — ७ संच इयत्ता ४ थी — २७ संच इयत्ता ५ वी — ७६८ संच इयत्ता ६ वी — ६१४ संच इयत्ता ७ वी — १११ संच एकूण — १,५२७ संच “विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारी मोफत पुस्तके वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पुस्तकांचा तुटवडा तातडीने दूर करून सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण संच उपलब्ध करून द्यावेत.” — प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य
    1
    पुस्तकांचा तुटवडा

निफाड तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तकांच्या १,५२७ संचांची कमतरता; तातडीने पुस्तके द्या, अन्यथा शिक्षण विभागाला टाळे ठोकू
: शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही निफाड तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तके पूर्णपणे उपलब्ध झालेली नाहीत. तालुक्यात तब्बल १,५२७ संचांचा तुटवडा असून, पुस्तकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा तुटवडा तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यावीत; अन्यथा शिक्षण विभागाच्या दालनास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी दिला.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत दरवर्षी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक पुस्तकांची मागणी नोंदवून ती जिल्हा, तालुका व केंद्रस्तरावर वितरित करण्याची व्यवस्था असते. मात्र, यंदा शाळा सुरू होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी अनेक विद्यार्थ्यांच्या हातात अद्याप पुस्तके पोहोचलेली नाहीत.
निफाड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दुसरी, चौथी, पाचवी, सहावी व सातवीच्या पुस्तकांचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. विशेषतः दुसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने जुन्या पाठ्यपुस्तकांचा वापर करणे शक्य नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण वाढली आहे. काही शाळांमध्ये शिक्षकांनी जुनी पुस्तके जमा करून तात्पुरती व्यवस्था केली असली तरी नवीन पुस्तके उपलब्ध नसल्याने अध्यापनात अडथळे येत आहेत.
या प्रश्नाबाबत प्रकाश पाटील यांनी निफाड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप व सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे जाब विचारला. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असताना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याबाबत पुरेशी माहिती नसल्याचे चर्चेतून समोर आल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी लासलगाव शिवसेना शहरप्रमुख प्रमोद पाटील, लासलगाव शहर विकास समितीचे राजेंद्र कराड, संदीप उगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
वर्गनिहाय तुटवडा
इयत्ता २ री — ७ संच
इयत्ता ४ थी — २७ संच
इयत्ता ५ वी — ७६८ संच
इयत्ता ६ वी — ६१४ संच
इयत्ता ७ वी — १११ संच
एकूण — १,५२७ संच
“विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणारी मोफत पुस्तके वेळेत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. पुस्तकांचा तुटवडा तातडीने दूर करून सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण संच उपलब्ध करून द्यावेत.”
— प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे. नित्कृष्ठ प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावला आहे. शासनाकडून बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे. अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसेच वितरणाची प्रक्रिया यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. -- --
    1
    आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा

सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे
आंबोडेत अंगणवाडी बालकांना निकृष्ट अंड्यांचा पुरवठा
सरपंचांच्या चौकशीत उडवाउडवीची उत्तरे
सुरगाणा तालुक्यातील आंबोडे येथील अंगणवाडीत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील अंडी निकृष्ट दर्जाची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांत नाराजी व्यक्त होत आहे. बालकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला जात आहे.
नित्कृष्ठ प्रकाराची अंडी बालकांना दिली जात असल्याचे समजताच सरपंच राजेंद्र निकुळे यांनी अंगणवाडीत जात प्रत्यक्ष चौकशी केली. मात्र, यावेळी संबंधितांकडून समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे सरपंचांनी सांगितले. त्यामुळे पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत संशय अधिकच बळावला आहे. शासनाकडून बालकांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, जर निकृष्ट दर्जाची अंडी बालकांना दिली जात असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित विभागाने याची तातडीने चौकशी करणे गरजेचे आहे.
अंगणवाडीतील अंड्यांचा दर्जा, पुरवठ्याचे स्रोत तसेच वितरणाची प्रक्रिया यांची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. दोष आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. बालकांच्या पोषण आहारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका सरपंच राजेंद्र निकुळे यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
--
--
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सार्वजनिक ठिकाण पे गंदगी करने के लिए कौन दिया परवानगी पुच्छी है जनता सार्वजनिक ठिकाण प्रति नाशिक रोड देवदली कॅम्प प्लास्टिक से कितनी बडी गंदगी होती है और बिमारी उपयोग पर रोक लगाने के लिए सरकार ने पुरा कितना प्रार्थना किया पर लोगों को समझ में आना चाहिये लोगों की राय है की सार्वजनिक स्थान पर गंडगी ना करे जब सरकार है पर कार्रवाई लेती है टैब लोगों को समझ में आता है एक सार्वजनिक स्थान पर गंदगी ना करे, यह किसी धर्म किसी मजहब के लिए नहीं हर लोग हर वर्ग के लिए है गंडगी ना करे
    1
    सार्वजनिक ठिकाण पे गंदगी करने के लिए कौन दिया परवानगी पुच्छी है जनता सार्वजनिक ठिकाण प्रति नाशिक रोड देवदली कॅम्प 
प्लास्टिक से कितनी बडी गंदगी होती है और बिमारी उपयोग पर रोक लगाने के लिए सरकार ने पुरा कितना प्रार्थना किया पर लोगों को समझ में आना चाहिये लोगों की राय है की सार्वजनिक स्थान पर गंडगी ना करे जब सरकार है पर कार्रवाई लेती है टैब लोगों को समझ में आता है एक सार्वजनिक स्थान पर गंदगी ना करे, यह किसी धर्म किसी मजहब के लिए नहीं हर लोग हर वर्ग के लिए है गंडगी ना करे
    user_Harish Kumar Gautam
    Harish Kumar Gautam
    Voice of people नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा फोटो, उपमहापौर शाने हिंद यांच्या कार्यालयात पुन्हा लावला फोटो मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा फोटो, मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शाने हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा टिपू सुलतानचा फ़ोटो लावला. त्यामुळे टिपू सुलतानच्या फोटो वरून वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शाने ए हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा लावला टिपू सुलतानचा फोटो..
    1
    मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा
फोटो, उपमहापौर शाने हिंद यांच्या कार्यालयात पुन्हा लावला फोटो
मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा
फोटो, मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शाने हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा टिपू सुलतानचा फ़ोटो लावला. त्यामुळे टिपू सुलतानच्या फोटो वरून वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपमहापौर शाने ए हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा लावला टिपू सुलतानचा फोटो..
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.