महापालिकेच्या विविध उपक्रमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; ‘भीम गीत पहाट’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद परभणी (प्रतिनिधी) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक समता सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत सोमवारी (दि. १४ एप्रिल) सकाळी ६ वाजता महानगरपालिका प्रभाग समिती (ब) समोर “भीम गीत पहाट” हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर सय्यद इक्बाल व आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त गजानन जाधव, सांस्कृतिक व क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मुंबई येथील सुप्रसिद्ध गायक चेतन चोपडे, वैभव खुणे, ‘मी होणार सुपरस्टार’ फेम कु. प्रांजळ बोधक, स्वरलक्ष्मी लहाने यांसह इतर कलाकारांनी सादर केलेल्या भीमगीतांनी उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. महापौर सय्यद इक्बाल यांनी “दिवाळी पहाट”च्या धर्तीवर “भीम पहाट” कार्यक्रम सुरू करण्याची नागरिकांची मागणी पूर्ण केल्याचे सांगितले. स्थानिक व बाहेरील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. हा उपक्रम पुढेही नियमितपणे सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त नितीन नार्वेकर यांनी सामाजिक समतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. यानंतर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, आमदार राजेश विटेकर, महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. महाड येथील चवदार तळे सत्याग्रहावर आधारित चित्र रेखाटल्याबद्दल प्रा. सिद्धार्थ नागठाणकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. खासदार संजय जाधव यांच्या हस्ते महापालिकेच्या “अल्पोहार” उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना अल्पोहाराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कवी केशव खटींग यांचे व्याख्यान झाले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महानगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
महापालिकेच्या विविध उपक्रमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; ‘भीम गीत पहाट’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद परभणी (प्रतिनिधी) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक समता सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत सोमवारी (दि. १४ एप्रिल) सकाळी ६ वाजता महानगरपालिका प्रभाग समिती (ब) समोर “भीम गीत पहाट” हा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर सय्यद इक्बाल व आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहायक आयुक्त गजानन जाधव, सांस्कृतिक व क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मुंबई येथील सुप्रसिद्ध गायक चेतन चोपडे, वैभव खुणे, ‘मी होणार सुपरस्टार’ फेम कु. प्रांजळ बोधक, स्वरलक्ष्मी लहाने यांसह इतर कलाकारांनी सादर केलेल्या भीमगीतांनी उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. महापौर सय्यद इक्बाल यांनी “दिवाळी पहाट”च्या धर्तीवर “भीम पहाट” कार्यक्रम सुरू करण्याची नागरिकांची मागणी पूर्ण केल्याचे सांगितले. स्थानिक व बाहेरील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. हा उपक्रम पुढेही नियमितपणे सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त नितीन नार्वेकर यांनी सामाजिक समतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. यानंतर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, आमदार राजेश विटेकर, महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. महाड येथील चवदार तळे सत्याग्रहावर आधारित चित्र रेखाटल्याबद्दल प्रा. सिद्धार्थ नागठाणकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. खासदार संजय जाधव यांच्या हस्ते महापालिकेच्या “अल्पोहार” उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना अल्पोहाराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी कवी केशव खटींग यांचे व्याख्यान झाले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महानगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
- Post by Ramesh Mulgir1
- येथील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात **अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे** आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवामुळे संपूर्ण डासाळा परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने आणि भक्तीरसाने न्हाऊन निघाला आहे. साप्ताहिकाच्या कालावधीत दररोज पहाटे काकडा आरती, सकाळी विष्णूसहस्त्रनाम, दुपारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि सायंकाळी हरिपाठ असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. रात्री प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने होत असून, या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. ### **उत्सवाची वैशिष्ट्ये:** * **शिस्तबद्ध नियोजन:** गावातील तरुण मंडळ आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाचे चोख नियोजन करण्यात आले आहे. * **सामुदायिक भोजन:** दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून, संपूर्ण गाव एकत्र येऊन प्रसादाचा लाभ घेत आहे. * **हरिपाठ सोहळा:** सायंकाळी होणाऱ्या हरिपाठात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण मोठ्या तन्मयतेने सहभागी होत आहेत. या सप्ताहाची सांगता भव्य **काल्याच्या कीर्तनाने** आणि महाप्रसादाने होणार आहे. 'विठ्ठल विठ्ठल' च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात डासाळा गाव भक्तिमय झाले असून, या धार्मिक कार्यामुळे गावातील सामाजिक एकता अधिक वृद्धिंगत होताना दिसत आहे. ग्रामस्थांच्या वतीने परिसरातील सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1
- परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.1
- जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी1
- Post by Turab Sayyad1
- मंठा तालुक्यातील नवनिर्वाचित नगरसेवक शरद भाऊ मोरे यांचा भोंगाने दहिफळ गावच्या वतीने व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद गावातील ग्रामस्थ यांचा सहभाग होता.1
- धक्कादायक प्रकार! नाशिक कार्यालयात लैंगिक छळ व जबरदस्ती धर्मांतराचे आरोप; व्हायरल व्हिडिओ ! #Everyonehighlightfollowers सोशल मीडियावर मैत्री करून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. त्यांचे अश्लील फोटो-व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याची माहितीही उघड झाली आहे. या प्रकरणी आरोपी अटक करण्यात आली असून, या घटनेने अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.1
- नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत बाईक रॅली1