वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव येथील ग्रामस्थांमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचे काम रखडल्याने तीव्र नाराजी पसरली आहे. सन २०२३ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली असूनही रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने, संतप्त ग्रामस्थांनी ३१ मे रोजी समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्याच्या बांधकामाची जबाबदारी मध्यप्रदेशस्थित ज्योती कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीकडे होती. मात्र, ठेकेदाराने सुरुवातीला काही प्रमाणात काम करून ते अपूर्ण अवस्थेतच सोडून दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे पांगरी महादेव आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, विशेषतः पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत असल्याने विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावातील रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असून, विविध स्तरांवर पाठपुरावा करूनही ठोस तोडगा निघालेला नाही. दरम्यान, मागील आठवड्यात तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता झळके यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली होती. यावेळी संबंधित ठेकेदाराला ३० मे पूर्वी काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ही मुदत संपत आली तरी कामात अपेक्षित प्रगती दिसून न आल्याने ग्रामस्थांचा संताप आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, ग्रामस्थांनी तहसीलदार, उपअभियंता आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. शासनाच्या निर्देशांचे पालन होत नसल्याचा आरोप करत त्यांनी नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबाबतही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले आहे की, “ज्या समृद्धी महामार्गासाठी आमच्या शेतजमिनी संपादित करण्यात आल्या, त्याच महामार्गावर आता आम्हाला आमच्या हक्काच्या रस्त्यासाठी आंदोलन करावे लागत आहे.” ग्रामस्थांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार ३१ मे रोजी समृद्धी महामार्गावर आंदोलन झाल्यास प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव येथील ग्रामस्थांमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्याचे काम रखडल्याने तीव्र नाराजी पसरली आहे. सन २०२३ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली असूनही रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने, संतप्त ग्रामस्थांनी ३१ मे रोजी समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्याच्या बांधकामाची जबाबदारी मध्यप्रदेशस्थित ज्योती कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीकडे होती. मात्र, ठेकेदाराने सुरुवातीला काही प्रमाणात काम करून ते अपूर्ण अवस्थेतच सोडून दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे पांगरी महादेव आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, विशेषतः पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत असल्याने विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावातील रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असून, विविध स्तरांवर पाठपुरावा करूनही ठोस तोडगा निघालेला नाही. दरम्यान, मागील आठवड्यात तहसीलदार, पोलीस निरीक्षक तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे उपअभियंता
झळके यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली होती. यावेळी संबंधित ठेकेदाराला ३० मे पूर्वी काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ही मुदत संपत आली तरी कामात अपेक्षित प्रगती दिसून न आल्याने ग्रामस्थांचा संताप आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, ग्रामस्थांनी तहसीलदार, उपअभियंता आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे. शासनाच्या निर्देशांचे पालन होत नसल्याचा आरोप करत त्यांनी नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबाबतही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले आहे की, “ज्या समृद्धी महामार्गासाठी आमच्या शेतजमिनी संपादित करण्यात आल्या, त्याच महामार्गावर आता आम्हाला आमच्या हक्काच्या रस्त्यासाठी आंदोलन करावे लागत आहे.” ग्रामस्थांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार ३१ मे रोजी समृद्धी महामार्गावर आंदोलन झाल्यास प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
- वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील उमरी खुर्द ग्रामपंचायतीच्या सेविका बैठकीविनाच पळ काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनुसार, ग्रामपंचायत सेविकाने अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे केले असल्याने त्या बैठकांना टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.1
- शिवसेना अमरावती जिल्हाध्यक्ष सुनील पाटील डीके यांच्यासोबत रोखठोक चर्चा करण्यात आली.1
- जवळा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पहूर येथे अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख ७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक २९ मे २०२६ रोजी पोलिसांना माहिती मिळाली होती की, बोरगाव येथून एक व्यक्ती मोपेडवर देशी दारूच्या पेट्या घेऊन पहूर-नस्करी मार्गाने येत आहे. या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जाधव, जमादार सतीश चौधर, पोलीस अंमलदार राम ढाकणे व विशाल जाधव यांनी पहूर गावाबाहेर सापळा रचला. काही वेळाने संशयित व्यक्ती मोपेडवर दोन पेट्या देशी दारू घेऊन येताना दिसला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पहूर गावातील शिरसकर यांच्या घराजवळील सार्वजनिक रस्त्यावर अडवले. चौकशीत त्याने आपले नाव कुणाल पांडुरंग कावळे (वय ४१ वर्षे, रा. पहूर, ता. व जि. यवतमाळ) असे सांगितले. त्याच्याकडे दारू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नव्हता. तपासणीत दोन पेट्यांमध्ये प्रत्येकी ४८ नग, असे एकूण ९६ नग १८० मिलीचे देशी दारूचे पव्वे आढळले, ज्यांची किंमत ७ हजार ६८० रुपये आहे. वाहतुकीसाठी वापरलेली टीव्हीएस कंपनीची MH-29-CJF-0991 क्रमांकाची मोपेड अंदाजे १ लाख रुपये किमतीची आहे. दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून हा सर्व १ लाख ७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, अवैध मद्यवाहतुकीविरोधात जवळा पोलिसांनी केलेली ही कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.1
- माहूर शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या असून, नगर पंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. या संदर्भात माजी भाजप शहर सरचिटणीस सोनकर प्रमोद अविनाश सोनकर यांनी नगर पंचायत प्रशासनाला निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, पौराणिक महत्त्व असलेल्या भानुतीर्थ तलाव परिसरात सौंदर्यीकरणाचे काम अर्धवट बंद पडल्याने मातीचे ढिगारे जमा झाले असून, यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसराची स्वच्छता करून तलावाभोवती सुरक्षा कठडे उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, जगदंबा हायस्कूललगतचा हातपंप गेल्या महिनाभरापासून नादुरुस्त असल्याने धरमवाडी, बुद्धपुरा, वडरपुरा, कोलामपुरा, मोमीनपुरा, लकडपुरा, बागवान गल्ली, परधान पुरा यासह अनेक भागांतील नागरिकांना पाणी भरण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. हातपंप परिसरात मोठ्या प्रमाणात घाण आणि झाडाझुडपे वाढल्याने साप, विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांचा धोका निर्माण झाला आहे. अंगणवाडीची इमारतही मोडकळीस आली असून ती कोसळण्याच्या स्थितीत असल्याने बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच, वार्डातील नाल्यांची गेल्या महिनाभरापासून सफाई न झाल्याने त्या तुंबून दुर्गंधी पसरली आहे. या सर्व बाबींची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा अप्रिय घटना घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री मा. एकनाथराव शिंदे, जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार माहूर आणि आमदार भिमराव केराम यांनाही पाठवण्यात आली आहे.3
- मिळालेल्या माहितीनुसार, उमरखेडमध्ये रस्ते आणि गटारांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. यामुळे लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.2
- अमरावती येथे, आयुक्त वर्षा लड्डा यांनी विविध कामांची पाहणी केली. या पाहणीनंतर, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.1
- तुगाव येथे एका बौद्ध तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.1
- शेतकऱ्यांनी आपली डिझेलची समस्या घेऊन शिवसेना तालुका प्रमुख निलेश तिवारी यांच्याशी संपर्क साधला. यानंतर, शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेने प्रशासनाशी चर्चा केली.1