अंबाजोगाईतील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) अजब कारभारामुळे सध्या ६ तालुक्यांमधील हजारो व्यावसायिक वाहनधारकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. येथील 'स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र' (ATS) अजून पूर्णपणे सुरू नसतानाही, परिवहन आयुक्त कार्यालयाने जुन्या पद्धतीने होणाऱ्या वाहन पासिंगचे ऑनलाईन स्लॉट्स बंद केले आहेत. या निर्णयामुळे शेकडो व्यावसायिक वाहने जागेवरच अडकून पडली असून वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या विरोधात 'वाहन मालक-चालक प्रतिनिधी संघटना, अंबाजोगाई'ने उप-प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना नुकतेच एक जाहीर निवेदन दिले आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार, व्यावसायिक वाहनांचे वार्षिक योग्यता प्रमाणपत्र (Fitness Certificate) आता आरटीओ ट्रॅकऐवजी खासगी 'एटीएस' सेंटरमधून मिळवणे अनिवार्य आहे. अंबाजोगाई आरटीओ अंतर्गत एटीएस सेंटर उभारले असले तरी, तांत्रिक अडचणी आणि अपूर्णतेमुळे ते पूर्णपणे बंद आहे. असे असतानाही, परिवहन आयुक्त कार्यालयाने अतिघाई करत १२ जून २०२६ पासून अंबाजोगाई कार्यालयाच्या हद्दीतील वाहनांसाठी जुन्या पद्धतीचे पासिंग स्लॉट्स पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. या तांत्रिक गोंधळामुळे गेल्या काही दिवसांपासून अंबाजोगाई क्षेत्रातील एकाही व्यावसायिक वाहनाला फिटनेस सर्टिफिकेट मिळालेले नाही. योग्यता प्रमाणपत्र संपलेली वाहने रस्त्यावर आणल्यास पोलीस व आरटीओची दंडात्मक कारवाई होत असल्याने ती जागेवरच थांबून आहेत. शिवाय, सिस्टीममध्ये स्लॉट उपलब्ध नसतानाही मुदत संपल्यामुळे वाहनधारकांना दररोज ५० रुपये अतिरिक्त विलंब शुल्क भरावा लागत आहे. प्रशासनाच्या या चुकीमुळे वाहनधारकांना विनाकारण दुहेरी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. स्थानिक केंद्र बंद असल्याने, अंबाजोगाईतील वाहनधारकांना शेजारच्या जिल्ह्यांतील किंवा दुसऱ्या शहरातील एटीएस सेंटरवर जाऊन पासिंग करून घेण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, येथून इतर सेंटर्सचे अंतर १५० ते २०० किलोमीटर असून सध्याच्या गगनाला भिडलेल्या डिझेलच्या किमती आणि मंदीची परिस्थिती पाहता, केवळ पासिंगसाठी एवढ्या दूर वाहन घेऊन जाणे आणि तिथे फेऱ्या मारणे परवडणारे नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांनी दिली आहे. जोपर्यंत अंबाजोगाई येथील स्थानिक एटीएस सेंटर तांत्रिक त्रुटी दूर करून पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही, तोपर्यंत पूर्वीच्याच पद्धतीने आरटीओ ट्रॅकवर वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र देण्याचे स्लॉट्स तात्काळ सुरू करण्यात यावेत, अशी मागणी वाहन मालक-चालक प्रतिनिधी संघटनेने केली आहे. तसेच, आरटीओच्या चुकीमुळे आकारलेला दंडही माफ करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा न काढल्यास आरटीओ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या प्रतिनिधींनी दिला आहे.
अंबाजोगाईतील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) अजब कारभारामुळे सध्या ६ तालुक्यांमधील हजारो व्यावसायिक वाहनधारकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. येथील 'स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र' (ATS) अजून पूर्णपणे सुरू नसतानाही, परिवहन आयुक्त कार्यालयाने जुन्या पद्धतीने होणाऱ्या वाहन पासिंगचे ऑनलाईन स्लॉट्स बंद केले आहेत. या निर्णयामुळे शेकडो व्यावसायिक वाहने जागेवरच अडकून पडली असून वाहनधारकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या विरोधात 'वाहन मालक-चालक प्रतिनिधी संघटना, अंबाजोगाई'ने उप-प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना नुकतेच एक जाहीर निवेदन दिले आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार, व्यावसायिक वाहनांचे वार्षिक योग्यता प्रमाणपत्र (Fitness Certificate) आता आरटीओ ट्रॅकऐवजी खासगी 'एटीएस' सेंटरमधून मिळवणे अनिवार्य आहे. अंबाजोगाई आरटीओ अंतर्गत एटीएस सेंटर उभारले असले तरी, तांत्रिक अडचणी आणि अपूर्णतेमुळे ते पूर्णपणे बंद आहे. असे असतानाही, परिवहन आयुक्त कार्यालयाने अतिघाई करत १२ जून २०२६ पासून अंबाजोगाई कार्यालयाच्या हद्दीतील वाहनांसाठी जुन्या पद्धतीचे पासिंग स्लॉट्स पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. या तांत्रिक गोंधळामुळे गेल्या काही दिवसांपासून अंबाजोगाई क्षेत्रातील एकाही व्यावसायिक वाहनाला फिटनेस सर्टिफिकेट मिळालेले नाही. योग्यता प्रमाणपत्र संपलेली वाहने रस्त्यावर आणल्यास पोलीस व आरटीओची दंडात्मक कारवाई होत असल्याने ती जागेवरच
थांबून आहेत. शिवाय, सिस्टीममध्ये स्लॉट उपलब्ध नसतानाही मुदत संपल्यामुळे वाहनधारकांना दररोज ५० रुपये अतिरिक्त विलंब शुल्क भरावा लागत आहे. प्रशासनाच्या या चुकीमुळे वाहनधारकांना विनाकारण दुहेरी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. स्थानिक केंद्र बंद असल्याने, अंबाजोगाईतील वाहनधारकांना शेजारच्या जिल्ह्यांतील किंवा दुसऱ्या शहरातील एटीएस सेंटरवर जाऊन पासिंग करून घेण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, येथून इतर सेंटर्सचे अंतर १५० ते २०० किलोमीटर असून सध्याच्या गगनाला भिडलेल्या डिझेलच्या किमती आणि मंदीची परिस्थिती पाहता, केवळ पासिंगसाठी एवढ्या दूर वाहन घेऊन जाणे आणि तिथे फेऱ्या मारणे परवडणारे नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांनी दिली आहे. जोपर्यंत अंबाजोगाई येथील स्थानिक एटीएस सेंटर तांत्रिक त्रुटी दूर करून पूर्ण क्षमतेने सुरू होत नाही, तोपर्यंत पूर्वीच्याच पद्धतीने आरटीओ ट्रॅकवर वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र देण्याचे स्लॉट्स तात्काळ सुरू करण्यात यावेत, अशी मागणी वाहन मालक-चालक प्रतिनिधी संघटनेने केली आहे. तसेच, आरटीओच्या चुकीमुळे आकारलेला दंडही माफ करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा न काढल्यास आरटीओ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या प्रतिनिधींनी दिला आहे.
- भारतीय जनता पार्टी, तालुका परळी वैजनाथ यांच्या वतीने मौजे नंदनंज येथील बोरणा प्रकल्प परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेश गित्ते यांनी बोरणा प्रकल्पाच्या पाण्यातून योगसाधना केली. मंत्री ना. पंकजाताई मुंडे आणि मा. खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना, भाजप तालुकाध्यक्ष राजेश गित्ते यांनी योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, सुदृढ आणि संतुलित जीवनशैली असल्याचे प्रतिपादन केले. ताणतणावमुक्त व आरोग्यदायी समाज घडवण्यासाठी नियमित योगाभ्यास करणे काळाची गरज असून, योग ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून, जगभरात योग दिन उत्साहात साजरा केला जातो. नियमित योगाभ्यासामुळे शरीराला ऊर्जा मिळते, मानसिक आरोग्य सुधारते आणि जीवनमान उंचावते, असे आवाहनही याप्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमात तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, बीएलए-२, कार्यकर्ते, पत्रकार बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजपा सचिव अनिल गुट्टे, अनुसूचित मोर्चा अध्यक्ष धुराजी साबळे, जेष्ठ नेते नाथराव (दादा) गुट्टे, नंदनंज उपसरपंच तथा बुथ प्रमुख बालाजी गुट्टे, मिरवट मा. उपसरपंच रामेश्वर महाराज इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी यावेळी योगधर्म, मानवधर्म, राष्ट्रधर्म आणि सेवाधर्म यांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला, तसेच योगाच्या माध्यमातून स्वतःचे आणि समाजाचे आरोग्य सुदृढ करण्याचा संदेश देण्यात आला.1
- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेत कुणबी दाखल्यांना आव्हान देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त झाला आहे. या पत्रकार परिषदेत हाके यांनी कुणबी दाखले रद्द करण्याची आणि चुकीचे कुणबी दाखले देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीनंतर मराठा समाज आक्रमक झाला असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काळकुटे यांनी म्हटले आहे की, लक्ष्मण हाके यांना मानसोपचार तज्ञाची गरज असून, त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. हाकेंना मराठा द्वेशाचा 'कावीळ' झाला असून, त्यांनी बीडमधील बागलाने व मोगले यांची भेट घेऊन उपचार घेतला पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याची त्यांना नितांत गरज असल्याचेही काळकुटे यांनी ठामपणे सांगितले. हाके यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही रस्त्यावरची तसेच संवैधानिक लढाई लढायलाही तयार आहोत, असे गंगाधर काळकुटे यांनी स्पष्ट केले.1
- संजय जाधवांसह सहा खासदारांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे परभणी दौऱ्यावर जात आहेत. 27 जूनपासून दोन दिवसांसाठी उद्धव ठाकरे परभणीत मुक्कामी असतील, जिथे ते शिवसैनिकांशी थेट संवाद साधणार आहेत. बंडानंतर पक्षाची संघटना नव्याने बांधण्यासाठी ठाकरे मैदानात उतरले आहेत.1
- गावात कोट्यवधी रुपये खर्च करून पाणीपुरवठा सुरू असतानाही, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाई वाढल्याने संतप्त गावकऱ्यांनी आज घागर घेऊन निवेदन दिले. ही परिस्थिती अशा वेळी निर्माण झाली आहे, जेव्हा पाणीपुरवठ्यावर मोठा खर्च करण्यात आला आहे; मात्र, ग्रामपंचायतीने पाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावकऱ्यांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी आपली मागणी प्रशासनासमोर मांडण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून घागरी घेऊन निवेदन सादर केले.1
- सांदीपनी पब्लिक स्कूलच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेने या विशेष दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.1
- परळी वैजनाथ येथे एका थार गाडीच्या धडकेत प्रशांत प्रल्हाद देशमुख या युवकाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. संत भगवान बाबा चौक ते तहसीलकडे जाणाऱ्या रस्त्यावर थार गाडीने धडक दिल्यानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला होता. गंभीर जखमी अवस्थेत प्रशांत देशमुख यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, जिथे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, देशमुख कुटुंबीयांनी हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित थार गाडी स्पष्टपणे दिसत असून, फुटेजमध्ये चारचाकी वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने मागून गाडी आणून धडक दिल्याचे दिसून येते. यामुळे घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांसह देशमुख कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमा होत केली. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याने आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचीही त्यांची मागणी होती. दरम्यान, या प्रकरणी परळी पोलिसांनी गुन्हा दाखल करत शोधमोहीम सुरू केली. मध्यरात्रीनंतर पोलिसांनी आरोपी आणि गाडीचा शोध घेण्यात यश मिळवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामे नागेश विश्वनाथ मुडे, रा. भोपळा, याला अटक करण्यात आली असून, थार गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे.1
- लातूर शहरातील एमआयडीसी परिसरातील भागात कोयता गँगने दिवसाढवळ्या आपली दहशत पसरवली आहे. या घटनेचे सविस्तर फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या प्रकारामुळे लातूरकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी थेट लातूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना आवाहन करत या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. दिवसाढवळ्या कोयता गँगचा असा हैदोस सुरू असताना पोलिसांची भीतीच संपली आहे का, असा संतप्त सवालही लातूरकर विचारत आहेत.1