ऑटो रिक्षा - मीटर टॅक्सी चालकांनी योजनांच्या लाभासाठी सभासद नोंदणी करावी अहिल्यानगर, दि. १० : राज्यातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनाने ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन केले आहे. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी चालकांनी ऑनलाईन सभासद नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी केले आहे. मंडळाच्या उपक्रमांमध्ये चालकांसाठी जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य सुविधा, कर्तव्यावर असताना झालेल्या दुखापतीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य, पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, तसेच कामगार कौशल्यवृद्धीसाठी विशेष प्रशिक्षण अशा विविध योजनांचा समावेश आहे. या लाभांसाठी इच्छुक चालकांनी सर्वप्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासद नोंदणीसाठी अर्ज https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावा. नोंदणी करताना वाहनाचा नोंदणी क्रमांक, परवाना, अनुज्ञप्ती, रेशनकार्ड, आधार व पॅन क्रमांक, तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती नमूद करावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांचे फोटो अपलोड करावेत. सादर केलेला अर्ज संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठवला जाईल. सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर अर्ज मंजूर केला जाईल. मात्र, अर्जात त्रुटी असल्यास संबंधित परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज मंजूर झाल्यावर सभासद नोंदणी शुल्क भरण्याबाबतचा संदेश अर्जदाराच्या मोबाईलवर प्राप्त होईल. शुल्क भरण्यापूर्वी https://ananddighekalyankarimandal.org/home/checkstatus या लिंकवर नोंदणी स्थिती तपासावी. सभासद नोंदणी शुल्क ५०० रुपये व वार्षिक सभासद शुल्क ३०० रुपये अशी एकूण ८०० रुपये रक्कम भरल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर “अभिनंदन! आपण सभासद झाला आहात” असा पुष्टी संदेश अर्जदाराला प्राप्त होईल. नोंदणीची पावती डाउनलोड करून सुरक्षित ठेवावी, असेही परिवहन विभागाकडून कळविण्यात आले आहे. #महाराष्ट्रशासन #GovernmentOfMaharashtra #AnandDigheKalyankariMandal #RickshawDriversWelfare #AutoRickshawNews #TransportDepartment #SocialSecurity #AhilyanagarRTO #DriverBenefitScheme #AnandDigheMandal #InsuranceForDrivers #ScholarshipForKids #MaharashtraTransport #RickshawUnion #रिक्षा_चालक_कल्याण
ऑटो रिक्षा - मीटर टॅक्सी चालकांनी योजनांच्या लाभासाठी सभासद नोंदणी करावी अहिल्यानगर, दि. १० : राज्यातील ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने शासनाने ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन केले आहे. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी चालकांनी ऑनलाईन सभासद नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी केले आहे. मंडळाच्या उपक्रमांमध्ये चालकांसाठी जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य सुविधा, कर्तव्यावर असताना झालेल्या दुखापतीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य, पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, तसेच कामगार कौशल्यवृद्धीसाठी विशेष प्रशिक्षण अशा विविध योजनांचा समावेश आहे. या लाभांसाठी इच्छुक चालकांनी सर्वप्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासद नोंदणीसाठी अर्ज https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावा. नोंदणी करताना वाहनाचा नोंदणी क्रमांक, परवाना, अनुज्ञप्ती, रेशनकार्ड, आधार व पॅन क्रमांक, तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती नमूद करावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांचे फोटो अपलोड करावेत. सादर केलेला अर्ज संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठवला जाईल. सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर अर्ज मंजूर केला जाईल. मात्र, अर्जात त्रुटी असल्यास संबंधित परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज मंजूर झाल्यावर सभासद नोंदणी शुल्क भरण्याबाबतचा संदेश अर्जदाराच्या मोबाईलवर प्राप्त होईल. शुल्क भरण्यापूर्वी https://ananddighekalyankarimandal.org/home/checkstatus या लिंकवर नोंदणी स्थिती तपासावी. सभासद नोंदणी शुल्क ५०० रुपये व वार्षिक सभासद शुल्क ३०० रुपये अशी एकूण ८०० रुपये रक्कम भरल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर “अभिनंदन! आपण सभासद झाला आहात” असा पुष्टी संदेश अर्जदाराला प्राप्त होईल. नोंदणीची पावती डाउनलोड करून सुरक्षित ठेवावी, असेही परिवहन विभागाकडून कळविण्यात आले आहे. #महाराष्ट्रशासन #GovernmentOfMaharashtra #AnandDigheKalyankariMandal #RickshawDriversWelfare #AutoRickshawNews #TransportDepartment #SocialSecurity #AhilyanagarRTO #DriverBenefitScheme #AnandDigheMandal #InsuranceForDrivers #ScholarshipForKids #MaharashtraTransport #RickshawUnion #रिक्षा_चालक_कल्याण
- राहुरीत पोलिसांवर काही तरुणांनी चा हल्ला हल्ला करणारे तीन तरुण पोलिसांनी अटक करून भर बाजारपेठेमध्ये त्यांची धिंड काढले आहे1
- Post by कर्जत लाईव्ह1
- सिल्लोड : IPS परीक्षेत निवड झाल्याबद्दल जळगाव सपकाळ येथील सुपुत्र भिकन रोजेकर यांचा व त्यांच्या आई-वडिलांचा सिल्लोड येथे शिवसेना भवन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला1
- खुलताबाद-पळसवाडी जवळ धावत्या एसटी बसला आग; ४८ प्रवाशांचा थरार, सर्वजण बचावले1
- तालुक्यातील अंगुलगाव येथे पीरसाईबाबा यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 'खासदार समीर भुजबळ क्रिकेट करंडक २०२६' चा शुभारंभ अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला. अचानक भयानक क्रिकेट क्लब आणि आयोजक येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती देविदास निकम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मान्यवर दिलीप अण्णा खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम पथकाने झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिस्तबद्ध सादरीकरणाने उपस्थित क्रीडाप्रेमींची मने जिंकली. "ग्रामीण भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि गावातील क्रीडा संस्कृती अधिक प्रगल्भ व्हावी," असा विश्वास आयोजक देविदास निकम यांनी यावेळी व्यक्त केला. ही स्पर्धा मिशन हॉस्पिटल जवळील 'अचानक भयानक' मैदानावर खेळवली जात असून, यात येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील नामवंत संघ सहभागी झाले आहेत. उपस्थित मान्यवर: या सोहळ्याला सरपंच बाजीराव जाधव, परमानंद जाधव, पोलीस पाटील समाधान झाल्टे, उपसरपंच महेंद्र झाल्टे, भारमचे सरपंच प्रवीण गांजे, काशिनाथ साबळे, सोपान जगझाप, कारभारी आगवन, कृष्णा जानराव, प्रवीण गायकवाड, भाऊसाहेब धनवटे, विनोद ठोंबरे,राहुल चिंचोले यांसह अंगुलगावचे ग्रामस्थ व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील काही दिवस या मैदानात चुरशीचे सामने रंगणार असून, क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेला मोठी गर्दी केली आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- मांजरी बुद्रुक ब्रिजखालील बोगद्यात कचऱ्याचा खच मांजरी बुद्रुक येथील ब्रिजखालील बोगद्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. काही बेफिकीर नागरिकांमुळे दुर्गंधी पसरत असून स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. कचरा टाकणाऱ्यांवर महानगरपालिकेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- सिल्लोड पंचायत समिती सभापती उपसभापती निवडीवरून सुनील मिरकर नाराज असल्याचे दिसून आले त्यांनी लगेच फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल केली व आपली नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की...1