नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी दुपारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान विद्यार्थी व विद्यार्थिनींवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि मारहाणीचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर विद्यार्थी संघटना, विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारवर टीका करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली होती. देशभरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांच्या या संघर्षाला अखेर यश मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. उपस्थितांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम केला आणि हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा व लोकशाही मार्गाने लढलेल्या आंदोलनाचा असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार राहुल बोंद्रे, काँग्रेस पक्षनेत्या डॉ. स्वाती वाकेकर, राजीव गांधी पंचायत राज समितीचे समन्वयक अविनाश उमरकर, तालुकाध्यक्ष ॲड. भाऊराव भालेराव, शहराध्यक्ष ॲड. अमर पाचपोर, संग्रामपूर तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, नगरसेविका वैशाली तायडे, ॲड. संदीप मानकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर, शहराध्यक्ष आजम कुरेशी, सुनील बोदडे, श्रीराम भिडे, रोशन तायडे, विजय सातव यांच्यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी दुपारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान विद्यार्थी व विद्यार्थिनींवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि मारहाणीचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर विद्यार्थी संघटना, विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारवर टीका करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली होती. देशभरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांच्या या संघर्षाला अखेर यश मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. उपस्थितांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम केला आणि हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा व लोकशाही मार्गाने लढलेल्या आंदोलनाचा असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार राहुल बोंद्रे, काँग्रेस पक्षनेत्या डॉ. स्वाती वाकेकर, राजीव गांधी पंचायत राज समितीचे समन्वयक अविनाश उमरकर, तालुकाध्यक्ष ॲड. भाऊराव भालेराव, शहराध्यक्ष ॲड. अमर पाचपोर, संग्रामपूर तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, नगरसेविका वैशाली तायडे, ॲड. संदीप मानकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर, शहराध्यक्ष आजम कुरेशी, सुनील बोदडे, श्रीराम भिडे, रोशन तायडे, विजय सातव यांच्यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
- ड्रग्ज माफियांच्या विरोधात मोठी कारवाई करत २१४ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान एमडी ड्रग्ज आणि स्विफ्ट कारसह आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांना मोठा धक्का बसला आहे.1
- आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावळ्या विठूच्या साजिऱ्या आणि सुंदर रूपाचे वर्णन करण्यात आले आहे. विठुरायाच्या या रूपामध्ये संपूर्ण ब्रह्मांड साठले असल्याची भावना व्यक्त करत आषाढी एकादशीचा भक्तिभाव मांडण्यात आला आहे.1
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल आणि लोकांच्या सकारात्मक सूचनांबद्दल व्यक्त होताना त्यांनी, "थँक यू फ्रेंड्स, तुमच्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल आणि सकारात्मक सूचनांबद्दल मनापासून आभार," असे म्हणत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.1
- शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्याची बातमी समजताच सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह तेथील विद्यार्थिनींमध्ये उत्साहाची आणि आनंदाची लाट पसरली आहे.1
- अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय आंदोलन संपन्न झाले आहे. सुरू असलेल्या या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दर्यापुरात हे सर्वपक्षीय आंदोलन आयोजित करण्यात आले होते.1
- अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात 'ऑपरेशन प्रहार'अंतर्गत मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अवैध देशी दारू वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत दारू वाहतूक उधळली आहे. या कारवाईत पोलिसांनी 500 देशी दारूचे पाऊच आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले मारुती ओमनी वाहन असा एकूण ₹1.20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात वीज दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत खांबावर चढलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना परिसरात वाघ दिसल्याची माहिती मिळताच त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून खांबावरच थांबणे पसंत केले. वाघ परिसरातून निघून गेल्याची खात्री होईपर्यंत हे कर्मचारी सुमारे एक तास विद्युत खांबावरच अडकून राहिले. वन विभाग आणि स्थानिकांकडून परिस्थिती सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांनी खाली उतरून सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, महावितरण कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वाशीम जिल्ह्यातील शेलूबाजार येथे भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. या पर्वाचे औचित्य साधून उपवास करणाऱ्या भाविक व नागरिकांसाठी तब्बल १५० किलो फराळी उसळ तयार करून तिचे वाटप करण्यात आले. धार्मिक पर्वाला सामाजिक सेवेची जोड देण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला शेलूबाजारसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. फराळ वाटप सुरू होताच लहान मुलांपासून महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी विठ्ठल-रुक्मिणीचे नामस्मरण आणि जयघोष करण्यात आल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. प्रत्येक भाविकापर्यंत फराळ पोहोचावा यासाठी आयोजक आणि कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध काम केले. धार्मिक सण-उत्सवांतून सामाजिक बांधिलकी, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याची भावना जोपासली जावी असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला असून, नागरिकांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले आहे.4
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरात पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने आपल्या सासू आणि सासऱ्यावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1