खुलताबाद पोलिसांची तत्परता; उत्तर प्रदेशातील महिलेची हरवलेली पर्स शोधून केली सुखरूप परत छत्रपती संभाजीनगरहून वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील महिलेची सुमारे ₹६४ हजारांची रोकड व सोन्याचे दागिने असलेली हरवलेली पर्स खुलताबाद पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे शोधून सुखरूप परत केली. आज दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीमती दयावती राजकुमार वर्मा (वय ३६, रा. अमरगड, झाशी, उत्तर प्रदेश) या सिटी बसने वेरूळ येथे दर्शनासाठी येत असताना त्यांची पर्स बसमध्येच अनावधानाने राहून गेली. पर्समध्ये ₹४ हजार रोख रक्कम आणि अंदाजे ₹६० हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र होते. पर्स हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासून तपासाची चक्रे गतिमान केली. दिवसभराच्या तपासानंतर सदर पर्स कसाबखेडा येथील गोविंद शर्मा यांना मिळाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन पोलिसांनी रोकड व सोन्याच्या दागिन्यांसह पर्स हस्तगत केली. पोलिसांनी ही पर्स श्रीमती दयावती वर्मा यांच्या ताब्यात सुरक्षितपणे दिली. टेलरिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वर्मा यांनी मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने खुलताबाद पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बोडखे, सहाय्यक फौजदार आव्हाड आणि पोलीस अंमलदार ठोंबरे यांनी केली.
खुलताबाद पोलिसांची तत्परता; उत्तर प्रदेशातील महिलेची हरवलेली पर्स शोधून केली सुखरूप परत छत्रपती संभाजीनगरहून वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील महिलेची सुमारे ₹६४ हजारांची रोकड व सोन्याचे दागिने असलेली हरवलेली पर्स खुलताबाद पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे शोधून सुखरूप परत केली. आज दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीमती दयावती राजकुमार वर्मा (वय ३६, रा. अमरगड, झाशी, उत्तर प्रदेश) या सिटी बसने वेरूळ येथे दर्शनासाठी येत असताना त्यांची पर्स बसमध्येच अनावधानाने राहून गेली. पर्समध्ये ₹४ हजार रोख रक्कम आणि अंदाजे ₹६० हजार किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र होते. पर्स हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासून तपासाची चक्रे गतिमान केली. दिवसभराच्या तपासानंतर सदर पर्स कसाबखेडा येथील गोविंद शर्मा यांना मिळाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन पोलिसांनी रोकड व सोन्याच्या दागिन्यांसह पर्स हस्तगत केली. पोलिसांनी ही पर्स श्रीमती दयावती वर्मा यांच्या ताब्यात सुरक्षितपणे दिली. टेलरिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या वर्मा यांनी मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने खुलताबाद पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बोडखे, सहाय्यक फौजदार आव्हाड आणि पोलीस अंमलदार ठोंबरे यांनी केली.
- मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली ; उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज भासली. पाटोदा येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना सलाईन देण्यात आली आणि रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, २० दिवसांचे उपोषण संपवल्यानंतर जरांगे पाटील बीडमधून छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.1
- दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चारित्र्याहनन होत आहे, हे थांबलं पाहिजे -उद्धव ठाकरे दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चारित्र्याहनन होत आहे, हे थांबलं पाहिजे -उद्धव ठाकरे दिशा सर्व मृत्यू प्रकरणाशी आपल्या कुटुंबाचा किंवा पक्षाचा कोणताही संबंध नसल्याची उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले या प्रकरणाचा राजकीय तुम्ही वापर केला जात असल्याचा आरोप उद्योग ठाकरे यांनी केला वारंवार होणाऱ्या आरोपामुळे चारित्र्य आनंद होत असून हे थांबले पाहिजे अन्यथा कायदेशीर मार्ग ओळखण्याचा इशारा दिला पत्रकारांनाही उद्देशून या प्रकरणात कोणाचीही नाव जोडले जाऊ शकते असे त्यांनी म्हटले1
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री शहरात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे,1
- SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा। SC-ST के हक का फंड वापस लेंगे। मंत्री संजय शिरसाट के घर पर मोर्चा।1
- ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत देशभक्तीपर वातावरणात हुतात्म्यांना अभिवादन फुलंब्री प्रतिनिधी : भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा तब्बल १३ महिने निजामाच्या जुलमी राजवटीखाली होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील मुक्ती चळवळ, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या खंबीर भूमिकेमुळे आणि भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन पोलो' लष्करी कारवाईनंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाड्याची निजामाच्या राजवटीतून मुक्तता झाली. त्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मरणार्थ रिधोरा येथे मराठवाडा मुक्तीदिन उत्साहात साजरा करण्यात आला.सुट्टी वर आलेले सैनिक यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आजी सैनिक अर्जुन कोलते व संतोष शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच अश्विनी कोलते, ग्रामपंचायत सदस्य शरद कोलते , बाळू घागरे, अनिल देशमुख, अंगणवाडी सेविका व कर्मचारी , आशा सेविका, शिक्षक खरात सर, कासार मॅडम , पोलीस पाटील गजानन कोलते,कय्युम पठाण,राजू बंडूगे, रमेश कोलते, भाऊसाहेब शिंदे, सुनील शिंदे, बद्रीनाथ कोलते,विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या कार्याचे स्मरण करून देशभक्तीपर वातावरणात कार्यक्रम उत्साहात पार पडला.4
- कन्नड तालुक्यातील पिशोर येथे भगवान श्री विश्वकर्मा जयंती सोहळा उत्साहात; पाहा विशेष रिपोर्ट!1
- मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच मोकाट कुत्रे सोडले; निफाडमध्ये युवा सेनेचा निषेध निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचा आरोप करत युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक आंदोलन केलं. मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात कुत्रे सोडून निषेध करण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे यांनी कारवाई न झाल्यास संपूर्ण शहरातील कुत्रे पकडून नगरपंचायतीत सोडण्याचा इशारा दिला.1
- पिशोर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू ;तिघे गंभीर; मृतांच्या कुटुंबीयांना २४ तासांत मदत देण्याची हर्षवर्धन जाधवांची मागणी छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील पिशोर येथे वीज पडून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २४ तासांत शासकीय मदत देण्याची मागणी केली. दुर्घटनेतील कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शासनाने तत्काळ कार्यवाही करावी, असे जाधव यांनी म्हटले आहे.1