तळेगावरोही येथे वर्षावास निमित्त वृक्षारोपण व भोजनदानाचा कार्यक्रम; बुद्ध विहार परिसरात ५० हून अधिक विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड; वृक्षांचे संवर्धन हीच खरी धम्मसेवा- भन्ते चंद्र बोधी यांचे प्रतिपादन चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील बुद्ध विहार स्मारक समिती गट नं १०२० च्या राखीव जागेत वर्षावासाच्या पवित्र पर्वानिमित्त वृक्षारोपण व भोजनदानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व शांततामय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी बुद्ध धम्माचे पूज्य भन्ते दिपणकर थेरो, भन्ते उपालीबोधी, भन्ते सारीपुत्त यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून समता सैनिक दलाचे आत्माराम वानखेडे, भास्कर संसारे, सुखराम वानखेडे, दीपक अहिरे, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष अमोल पगारे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते व भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्ध विहार परिसरात पिंपळ, वड, चिंच, आंबा आदी ५० हून अधिक विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी भन्ते चंद्र बोधी यांनी बुद्धांच्या करुणा, मैत्री व अहिंसेचा संदेश देत ‘वृक्ष हे पृथ्वीचे अलंकार असून त्यांचे संवर्धन करणे हीच खरी धम्मसेवा आहे’, असे प्रतिपादन केले. वर्षावास काळात पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक उपासकाचे कर्तव्य आहे, असेही आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास बुद्ध विहार समितीचे संचालक सुखदेव केदारे, अंबादास केदारे, अॅड. राहुल गायकवाड, रवींद्र केदारे, शशिकांत केदारे, गावचे पोलीस पाटील अविनाश अहिरे यांच्यासह बौद्ध उपासक, महिला मंडळ, व गावातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सदर जागेवर अतिक्रमण करणार्यांकडून समितीच्या पदाधिकार्यांना धमक्या येत असतानाही, समस्त ग्रामस्थांनी एकजूट दाखवत पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवल्याचे समितीचे अंबादास केदारे यांनी सांगीतले. शांततेचा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा आदर्श या निमित्ताने घालून देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बुद्ध विहार स्मारक समिती, तळेगावरोहीच्या सर्व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
तळेगावरोही येथे वर्षावास निमित्त वृक्षारोपण व भोजनदानाचा कार्यक्रम; बुद्ध विहार परिसरात ५० हून अधिक विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड; वृक्षांचे संवर्धन हीच खरी धम्मसेवा- भन्ते चंद्र बोधी यांचे प्रतिपादन चांदवड तालुक्यातील तळेगावरोही येथील बुद्ध विहार स्मारक समिती गट नं १०२० च्या राखीव जागेत वर्षावासाच्या पवित्र पर्वानिमित्त वृक्षारोपण व भोजनदानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व शांततामय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी बुद्ध धम्माचे पूज्य भन्ते दिपणकर थेरो, भन्ते उपालीबोधी, भन्ते सारीपुत्त यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून समता सैनिक दलाचे आत्माराम वानखेडे, भास्कर संसारे, सुखराम वानखेडे, दीपक अहिरे, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष अमोल पगारे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते व भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्ध विहार परिसरात पिंपळ, वड, चिंच, आंबा आदी ५० हून अधिक विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी भन्ते चंद्र बोधी यांनी बुद्धांच्या करुणा, मैत्री व अहिंसेचा
संदेश देत ‘वृक्ष हे पृथ्वीचे अलंकार असून त्यांचे संवर्धन करणे हीच खरी धम्मसेवा आहे’, असे प्रतिपादन केले. वर्षावास काळात पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक उपासकाचे कर्तव्य आहे, असेही आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास बुद्ध विहार समितीचे संचालक सुखदेव केदारे, अंबादास केदारे, अॅड. राहुल गायकवाड, रवींद्र केदारे, शशिकांत केदारे, गावचे पोलीस पाटील अविनाश अहिरे यांच्यासह बौद्ध उपासक, महिला मंडळ, व गावातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनदानाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सदर जागेवर अतिक्रमण करणार्यांकडून समितीच्या पदाधिकार्यांना धमक्या येत असतानाही, समस्त ग्रामस्थांनी एकजूट दाखवत पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवल्याचे समितीचे अंबादास केदारे यांनी सांगीतले. शांततेचा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा आदर्श या निमित्ताने घालून देण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बुद्ध विहार स्मारक समिती, तळेगावरोहीच्या सर्व पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
- माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!" काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो! रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार? अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे. गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात! तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा2
- शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी काढले रेल्वे अडवणाऱ्या शेतकरी पुत्राचे कांद्यावर तैलचित्र लासलगाव येथे रेल्वे अडवल्यानंतर गणेश निंबाळकर यांचे कांद्यावर चित्र काढून त्यांना पाठिंबा वअभिनंदन करण्यासाठी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रेखाटले कांद्यावरच गणेश निंबाळकर यांचे चित्र1
- मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो मालेगांव कॉरपोरेशन डिप्टी मेयर शान ए हिंद की ऑफ़िस ग्रैंड ओपनिंग, फ़िर लगा टीपू सुल्तान का फ़ोटो1
- टिपू सुलतान फोटोवरून पुन्हा वाद ! फोटो काढायला लावणार - दादा भुसे मालेगाव महापालिकेच्या उपमहापौर दालनात पुन्हा एकदा लागला टिपू सुलतान यांचा फोटो लागल्याचं पाहायला मिळालं. आता, या फोटोवरुन पुन्हा नवा वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक महापुरुषांच्या फोटो समवेत लागला टिपू सुलतान यांचा फोटो झळकला. कार्यालयाच्या नूतनीकरणानंतर टिपू सुलतान यांचा फोटो कार्यालयात लावणार असल्याचे शान ए हिंद यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यावरून मालेगावात पुन्हा वादंग उठले असून यापूर्वी देखील वाद झाल्याचं पाहायला मिळालं. आता, पुन्हा फोटो लावल्याने वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शान ए हिंद यांनी आज नूतनीकरण केलेल्या दालनात प्रवेश केला. त्यावेळी, टिपू सुलतान यांनी देशासाठी बलिदान दिल्याने त्यांचा फोटो कार्यालयात लावल्याचा पुनरुच्चार उपमहापौर शान-ए-हिंद यांनी केला. त्यामुळे, आता मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या या भूमिकेवर इतर विरोधी पक्षातील सदस्य काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे. त्यात, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मला माहिती नाही, पण फोटो असेल तर काढायला लावणार असे स्पष्ट केले. नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानचा फोटो लावला आहे का, याची माहिती घेईल आणि तसे असेल तर फोटो काढण्यासाठी सूचना करणार असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं. त्यामुळे, आता टिपू सुलतान यांच्या फोटोवरुन नवा वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.1
- नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस' रोखली! "रॅकमध्ये सडका अन् खराब कांदा"; गणेश निंबाळकरांचा नाफेडवर गंभीर आरोप लासलगाव (विशेष प्रतिनिधी) : नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफच्या (NCCF) वतीने दिल्लीसाठी रवाना होणाऱ्या मालगाडीमध्ये (कांदा एक्सप्रेस) अत्यंत निकृष्ट, सडका आणि खराब कांदा पाठवला जात असल्याचा खळबळजनक आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख गणेश निंबाळकर यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या निंबाळकर यांनी शेतकऱ्यांसह थेट लासलगाव रेल्वे स्थानकाचा मालधक्का गाठून 'कांदा एक्सप्रेस' रोखून धरली. [1, 2, 3] गोण्या उघडून दाखवण्याची मागणी आणि आंदोलन: आधीच विविध सोपस्कार आणि पॅकिंगअभावी सुमारे १६ तास रखडलेली ही मालगाडी बुधवारी रवाना होण्याच्या तयारीत होती. मात्र, गाडीत भरलेला माल खराब असल्याचा संशय आल्याने गणेश निंबाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. "कांद्याच्या गोण्या उघडून दाखवा," अशी मागणी करत त्यांनी रेल्वे रुळावर आणि गाडीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. हा सडका कांदा दोन दिवसांत पूर्णपणे खराब होईल आणि यामुळे खुल्या बाजारातील चांगल्या शेतमालाचे भाव पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.1
- येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय येवला येथे श्री ऋणमुक्तेश्वर मंदिरात भौम प्रदोष व महापूजा उत्साह: भस्मआरती आणि भजनाने मंदिर परिसर भक्तिमय येवला: येथील प्रसिद्ध श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात भौम प्रदोषानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी श्री भौमनाथ महादेवाची विशेष महापूजा आणि आकर्षक भस्मारती पार पडली. भौम प्रदोषानिमित्त श्री भौमनाथ महादेवांचा मनमोहक शृंगार करण्यात आला होता. भौमनाथ महादेव हे मंगळ देवाचे स्वामी आणि अत्यंत आवडते रूप मानले जातात. महाआरतीनंतर आयोजित करण्यात आलेल्या भजन संध्येने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय आणि चैतन्यमय झाला होता. या सोहळ्याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. दरम्यान, पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून मंदिर व्यवस्थापनातर्फे विशेष आवाहन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात प्रदोषानिमित्त ज्या भाविकांना मंदिरात महाप्रसादाची (पंगत) सेवा द्यायची असेल, त्यांनी लवकरात लवकर मंदिर समितीशी संपर्क साधावा. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य1
- مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام مالیگاؤں: جشنِ عید میلاد النبی ﷺ کی خوبصورت تقریب، شیداء کیمپس میں نعتیہ پروگرام1