इंदाराम येथील भिमन्ना बोनालु यात्रेला माजी जि.प.अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांनी दर्शविली उपस्थिती अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भिमन्ना बोनालु यात्रा शेकडो भक्तजनांचा उपस्थितीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. या बोनालू यात्रेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ. सोनाली अजय कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसंमवेत उपस्थिती दर्शवून भगवान भिमन्ना देवाची आशीर्वाद घेतले. त्यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी भगवान भिमन्नाकडे प्रार्थना केली. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच भाविक, स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते, समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंदाराम येथील भिमन्ना बोनालु यात्रेला माजी जि.प.अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांनी दर्शविली उपस्थिती अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भिमन्ना बोनालु यात्रा शेकडो भक्तजनांचा उपस्थितीत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. या बोनालू यात्रेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ. सोनाली अजय कंकडालवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसंमवेत उपस्थिती दर्शवून भगवान भिमन्ना देवाची आशीर्वाद घेतले. त्यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी भगवान भिमन्नाकडे प्रार्थना केली. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच भाविक, स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते, समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- चंद्रपूर - खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाविरुद्ध लोकसभा अध्यक्षांकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे. २० एप्रिल २०२६ रोजी आयोजित 'राजमाता राणी हिराई जन्मोत्सव' या शासकीय कार्यक्रमात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राज्य शिष्टाचाराच्या (प्रोटोकॉल) सर्व नियमांना धाब्यावर बसवून एका महिला खासदाराचा आणि संसदेच्या प्रतिष्ठेचा जाणीवपूर्वक अवमान केल्याचा आरोप त्यांनी या पत्राद्वारे केला आहे. या कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या 'ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स'नुसार खासदारांचा दर्जा व भाषण क्रम निश्चित असतानाही, प्रशासनाने कमालीचा पक्षपातीपणा दाखवला. खासदार महोदयांचे भाषण सुरू असतानाच एका आमदाराला जाणीवपूर्वक वाजत-गाजत मंचावर आणले गेले, ज्यामुळे गोंधळ निर्माण होऊन खासदारांना आपले भाषण मध्येच थांबवावे लागले.1
- आज सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे वणीत1
- Post by Dinesh kambli3
- काळी दौलत परिसरात अवकाळी पावसाने झोडपले काळी दौलत सह परीसरात मागील काही दिवसांपासून तप्त उन्हामुळे व प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र सोमवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह काळी दौलत सह परीसरातील गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे शेतातील ज्वारी मका हळद व भाजीपाला सह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे.रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या तांडवामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते या पावसामुळे काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिक भयभीत झाले होते. हवामान विभागाने पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे4
- Post by RAJA news1
- नमो उद्याणास तयार विरोध भिवापूर । उमरेड सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची घेतलेली प्रतिक्रिया1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- चंद्रपूर - प्रदूषणामुळे शेतकरी बेजार, अधिकारी मुजोर, सुधीर मुनगंटीवार यांनी केली पोलिसात तक्रार...महामाया कोल वॉशरीज मुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके प्रदूषणामुळे उध्वस्त झाली, त्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही, शासनाने गठीत केलेल्या समितीने 68 लाखांचे नुकसान कोल वॉशरीज मुळे झाले, त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळायला हवा अशी भरपाई निश्चित केली मात्र प्रदूषण अधिकारी यादव यांनी यावर काही कारवाई न केल्याने भाजपचे जेष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यादव विरुद्ध रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.1