बिलोली येथे तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाची यशस्वी व थाटामाटात सांगता.. रविवार दि.२६ बिलोली येथे श्री शिव हनुमान मंदिर देशमुख नगर बिलोली या संस्थानच्या वतीने तीन दिवसीय नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .या कीर्तन महोत्सवाची सांगता शनिवार दिनांक २५ रोजी ह. भ. प. सौ.स्नेहल पित्रे,मुंबई यांच्या कीर्तनाने झाली. या कीर्तन महोत्सवा दरम्यान गुरुवार दिनांक २३ रोजी ह. भ. प. सौ. मृण्मयी कुलकर्णी, नागपूर यांचे कीर्तन संपन्न झाले, तर शुक्रवारी दि.२४ रोजी पुणे येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज धानोरकर यांचे कीर्तन संपन्न झाले. अशाप्रकारे तीन दिवसीय कीर्तनाची सांगता यशस्वीपणे झाली.यादरम्यान संगीत, नृत्य, नाट्य यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. शेवटच्या दिवशी श्रोत्यांसाठी व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सहा ते आठ महाप्रसाद झाल्यानंतर स्वागत व सत्कारानंतर कीर्तनाला सुरुवात झाली. अनेक कीर्तनकारांनी निरूपणातून व आपल्या कथेतून भारतीय संस्कृती, संत परंपरा व ईश्वराचे महत्त्व प्रतिपादन केले. यावेळी समाजाने काय करायला पाहिजे हे ही त्यांनी आपल्या प्रबोधनातून सांगितले. बिलोली व परिसरातील अनेक महिला व पुरुष भाविकांनी या कीर्तनाचा आनंद व लाभ घेतला. हा कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री शिव हनुमान मंदिर संस्थान देशमुख नगर, बिलोली येथील पदाधिकारी,संचालक मंडळ व परिसरातील भाविकांनी भरभरून प्रयत्न केले. तीनही दिवसातील कीर्तनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. सदर कीर्तन हे युट्युब वर आहे. व अनेक दिवस राहील. त्यावेळी आपण सर्वांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा. अशाप्रकारे या तीन दिवसीय नारदीय कीर्तन महोत्सवाची सांगता यशस्वीपणे व थाटामाटात झाली.
बिलोली येथे तीन दिवसीय कीर्तन महोत्सवाची यशस्वी व थाटामाटात सांगता.. रविवार दि.२६ बिलोली येथे श्री शिव हनुमान मंदिर देशमुख नगर बिलोली या संस्थानच्या वतीने तीन दिवसीय नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते .या कीर्तन महोत्सवाची सांगता शनिवार दिनांक २५ रोजी ह. भ. प. सौ.स्नेहल पित्रे,मुंबई यांच्या कीर्तनाने झाली. या कीर्तन महोत्सवा दरम्यान गुरुवार दिनांक २३ रोजी ह. भ. प. सौ. मृण्मयी कुलकर्णी, नागपूर यांचे कीर्तन संपन्न झाले, तर शुक्रवारी दि.२४ रोजी पुणे येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज धानोरकर यांचे कीर्तन संपन्न झाले. अशाप्रकारे तीन दिवसीय कीर्तनाची सांगता यशस्वीपणे झाली.यादरम्यान संगीत, नृत्य, नाट्य यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. शेवटच्या दिवशी श्रोत्यांसाठी व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सहा ते आठ महाप्रसाद झाल्यानंतर स्वागत व सत्कारानंतर कीर्तनाला सुरुवात झाली. अनेक कीर्तनकारांनी निरूपणातून व आपल्या कथेतून भारतीय संस्कृती, संत परंपरा व ईश्वराचे महत्त्व प्रतिपादन केले. यावेळी समाजाने काय करायला पाहिजे हे ही त्यांनी आपल्या प्रबोधनातून सांगितले. बिलोली व परिसरातील अनेक महिला व पुरुष भाविकांनी या कीर्तनाचा आनंद व लाभ घेतला. हा कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री शिव हनुमान मंदिर संस्थान देशमुख नगर, बिलोली येथील पदाधिकारी,संचालक मंडळ व परिसरातील भाविकांनी भरभरून प्रयत्न केले. तीनही दिवसातील कीर्तनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. सदर कीर्तन हे युट्युब वर आहे. व अनेक दिवस राहील. त्यावेळी आपण सर्वांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा. अशाप्रकारे या तीन दिवसीय नारदीय कीर्तन महोत्सवाची सांगता यशस्वीपणे व थाटामाटात झाली.
- जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड शिवसेना मुखेड प्रसाद सेवा2
- नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे एमआयडीसी स्थापन करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी व्यक्त केली आहे. ही मागणी केल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती.1
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथे कर्जबाजारीपणामुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना २५ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकरी आर्थिक अडचणी व वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे मानसिक तणावाखाली होता. शेतीतील उत्पन्न घटल्याने आणि कर्जफेडीचा ताण वाढल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक कारण समोर येत आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- जाकापुर (ता. भोकर) मध्ये भीषण पाणीटंचाई! विहिरी कोरड्या… पाण्यासाठी रात्रभर जागरण… लांब अंतर चालून एक घागर पाणी मिळवण्याची वेळ… ही 2026 मधील वास्तव परिस्थिती आहे! ग्रामस्थांचे हाल पाहूनही प्रशासन शांत का? तात्काळ टँकर सुरू करून दिलासा द्यावा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी. पाणी हा हक्क आहे, संघर्ष नाही! #जाकापुर #भोकर #पाणीटंचाई #WaterCrisis #Nanded Maharashtra PublicIssue BreakingNews1
- हदगाव येथील रामलीला मैदान येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगाव तालुका शिवसेना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भव्य दिव्य अशा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या विवाह सोहळ्याला पंचक्रोशीतील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेले आहे. तसेच या विवाह सोहळ्यांच्या पूर्वसंध्येला नामदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे कौतुक केलेले आहे1
- पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆1
- मुखेड शहरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा संपन्न. अनावरण सोहळा दिनांक : २५ एप्रिल २०२६ वेळ : सायं. ०६:०० वाजता स्थळ : जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय प्रांगण,मुखेड जि.नांदेड.1