अजिंठा लेणीत महिन्यात तिसऱ्यांदा मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला छत्रपती संभाजीनगर : अजिंठा लेणीत पुन्हा एकदा मधमाशांच्या हल्ल्याची घटना घडली असून देश-विदेशातील पर्यटक जखमी झाले आहेत. या घटनेत सुमारे ६० पर्यटक, लहान मुले तसेच एक कर्मचारी जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर फर्दापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर काहींनी बाहेरगावी जाऊन उपचार घेतले. विशेष म्हणजे या महिन्यात पर्यटकांवर मधमाशांच्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. १० मार्च रोजी दुपारी सुमारे चारच्या सुमारास लेणीच्या पायथ्याशी जंगल परिसरात असलेल्या मोहळातून अचानक मधमाशा बाहेर पडल्या आणि परिसरातील पर्यटकांवर हल्ला चढवला. त्या वेळी श्रीलंकेवरून आलेल्या सुमारे १०० पर्यटकांचा गट तेथे होता. या हल्ल्यात त्यांपैकी सुमारे ४० जण जखमी झाले. परिणामी हे पर्यटक लेणी न पाहताच परत गेले. याच वेळी मध्यप्रदेशातील जबलपूर येथून आलेल्या पर्यटकांवरही मधमाशांनी हल्ला केला. यात काही लहान मुले जखमी झाली. भारतीय पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी उखर्डू रावळकर यांनाही मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. बचावासाठी काही पर्यटक बुकिंग कार्यालयात धावले, तर काही जण रेस्टॉरंटमध्ये किंवा बसमध्ये आश्रय घेताना दिसले. या संपूर्ण प्रकारात विदेशी पर्यटक, लहान मुले आणि इतर पर्यटक मिळून सुमारे ६० जण जखमी झाले.
अजिंठा लेणीत महिन्यात तिसऱ्यांदा मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला छत्रपती संभाजीनगर : अजिंठा लेणीत पुन्हा एकदा मधमाशांच्या हल्ल्याची घटना घडली असून देश-विदेशातील पर्यटक जखमी झाले आहेत. या घटनेत सुमारे ६० पर्यटक, लहान मुले तसेच एक कर्मचारी जखमी झाले असून काहींना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर फर्दापूर येथील खासगी
रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर काहींनी बाहेरगावी जाऊन उपचार घेतले. विशेष म्हणजे या महिन्यात पर्यटकांवर मधमाशांच्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. १० मार्च रोजी दुपारी सुमारे चारच्या सुमारास लेणीच्या पायथ्याशी जंगल परिसरात असलेल्या मोहळातून अचानक मधमाशा बाहेर पडल्या आणि परिसरातील पर्यटकांवर हल्ला चढवला. त्या वेळी श्रीलंकेवरून
आलेल्या सुमारे १०० पर्यटकांचा गट तेथे होता. या हल्ल्यात त्यांपैकी सुमारे ४० जण जखमी झाले. परिणामी हे पर्यटक लेणी न पाहताच परत गेले. याच वेळी मध्यप्रदेशातील जबलपूर येथून आलेल्या पर्यटकांवरही मधमाशांनी हल्ला केला. यात काही लहान मुले जखमी झाली. भारतीय पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी उखर्डू रावळकर यांनाही
मधमाशांनी चावा घेतल्याने ते जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. बचावासाठी काही पर्यटक बुकिंग कार्यालयात धावले, तर काही जण रेस्टॉरंटमध्ये किंवा बसमध्ये आश्रय घेताना दिसले. या संपूर्ण प्रकारात विदेशी पर्यटक, लहान मुले आणि इतर पर्यटक मिळून सुमारे ६० जण जखमी झाले.
- #marathi#newsjalna#1
- सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..1
- आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली1
- सोयगाव पंचायत समिती सभापतीपदी उत्तम चव्हाण; उपसभापतीपदी गयाबाई घोडे सोयगाव प्रतिनिधी : सोयगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे उत्तम महारू चव्हाण यांची तर उपसभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) च्या गयाबाई गोविंदा घोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे सोयगाव पंचायत समितीवर भाजप-शिवसेना (शिंदे) युतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे. मंगळवारी (दि. १० मार्च) पंचायत समिती सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी एकनाथ बांबळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी उत्तम चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, तर उपसभापती पदासाठी गयाबाई गोविंदा घोडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत एकमेकांचे अभिनंदन केले. यावेळी ईदरीस मुलतानी, पुष्पाताई काळे नारायण कोलते, शिवाजी बुढाळ, प्रदीप चव्हाण, दारासिंग शेषमल चव्हाण, रहीम पठाण, गुलाबराव कोलते, जयप्रकाश चव्हाण, गणेश लोखंडे, युसुफ पठाण, शेख निसार, मोहम्मद नूर, अजित खान, अजीज खान, हरी भांबरे, प्रभाकर सूर्यवंशी व भाजपा तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.1
- मां-बहन की गाली देने वालों की अब खैर नहीं! देश के भीतर इस जगह लागू हुई सख्त व्यवस्था, बच्चाें की पढ़ाई के दौरान मोबाइल-टीवी रहेंगे बंद महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले के कोलगांव गांव ने एक अनोखा नियम लागू किया है. यानी अब अगर कोई व्यक्ति मां-बहन से जुड़ी गालियां देता है तो उस पर 500 रुपये का जुर्माना लगाया जाएगा. ग्राम सभा में पास हुए इस प्रस्ताव का मकसद गांव में सम्मानजनक माहौल बनाना और महिलाओं की गरिमा की रक्षा करना है. जिसकी खूब चर्चा हो रही है.समझते हैं पूरी बात.1
- कस्तुरबा गांधी मुलींच्या वस्तीग्रह जालना येथे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला1
- इसराइल और ईरान के युद्ध में भारत पर क्या असर पड़ सकता है देखें पूरी खबर नकारात्मक और सकारात्मक प्रभाव क्या हो सकते हैं1
- महाराष्ट्र : बीड शहर के बालपीर इलाके में एक तेज रफ्तार ऑटो रिक्शा का आगे वाला पहिया अचानक निकल गया, जिसके बाद रिक्शा हवा में उछलते हुए अनियंत्रित होकर दोपहिया वाहनों से जा टकराया. इस दुर्घटना में रिक्शा में सवार महिलाओं समेत 3–4 लोग घायल हुए, जिन्हें इलाज के लिए अस्पताल में भर्ती कराया गया है1