रामापूर येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा बिरसा मुंडांना अभिवादन, पारंपरिक नृत्याने आदिवासी संस्कृतीचा जागर रामापूर येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा बिरसा मुंडांना अभिवादन, पारंपरिक नृत्याने आदिवासी संस्कृतीचा जागर अकोट तालुका प्रतिनिधी.... अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या धारुळ रामापुर येथे 9ऑगस्ट हा दिवस 'विश्व जागतिक आदिवासी दिवस' म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटना UNO च्या कार्यदलाने 1984 मध्ये आदिवासींच्या हक्क, कला आणि संस्कृतीच्या जतनासाठी या दिनाची स्थापना केली. 1992 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर अकोट तालुक्यातील रामापूर येथे 'विश्व आदिवासी दिन महोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोल मडावी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल-ताशाच्या तालावर आदिवासी नृत्य सादर केले. नृत्य, घोषणाबाजी आणि महापुरुषांच्या विचारांनी संपूर्ण परिसरात आदिवासी एकतेचे दर्शन घडले. अध्यक्षीय भाषणात अमोल मडावी म्हणाले, "आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा जपत आपण शिक्षणाच्या माध्यमातून पुढे गेलो पाहिजे. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन समाजाला मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज आहे." या महोत्सवासाठी यावेळी कार्यक्रमाला पत्रकार विठ्ठल येवोकार याच्या हस्ते बीरसा मुंडा याच्या फोटो चे हारार्पण व पुजन करण्यात आले.या वेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील आदिवासी बांधवानी परिश्रम घेतले त्यामध्ये कुलदीप मसराम, सुनील मसराम, विजय वरखडे, पद्मा दुरवे, संतोष मरकाम, अनिल टेकाम, अरुण दुरवे, सागर मडावी, हरीदास टेकाम, विठ्ठल वरखडे, केशवराव पुराम, विकी कोकाटे, नरेश उईके, संदीप दुरवे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. आदिवासी दिनानिमित्त रामापूर गावात एकतेचा आणि संस्कृतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
रामापूर येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा बिरसा मुंडांना अभिवादन, पारंपरिक नृत्याने आदिवासी संस्कृतीचा जागर रामापूर येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा बिरसा मुंडांना अभिवादन, पारंपरिक नृत्याने आदिवासी संस्कृतीचा जागर अकोट तालुका प्रतिनिधी.... अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या धारुळ रामापुर येथे 9ऑगस्ट हा दिवस 'विश्व जागतिक आदिवासी दिवस' म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटना UNO च्या कार्यदलाने 1984 मध्ये आदिवासींच्या हक्क, कला आणि
संस्कृतीच्या जतनासाठी या दिनाची स्थापना केली. 1992 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर अकोट तालुक्यातील रामापूर येथे 'विश्व आदिवासी दिन महोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोल मडावी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक
वेशभूषेत ढोल-ताशाच्या तालावर आदिवासी नृत्य सादर केले. नृत्य, घोषणाबाजी आणि महापुरुषांच्या विचारांनी संपूर्ण परिसरात आदिवासी एकतेचे दर्शन घडले. अध्यक्षीय भाषणात अमोल मडावी म्हणाले, "आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा जपत आपण शिक्षणाच्या माध्यमातून पुढे गेलो पाहिजे. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन समाजाला मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज आहे." या महोत्सवासाठी यावेळी कार्यक्रमाला पत्रकार विठ्ठल येवोकार याच्या हस्ते बीरसा मुंडा याच्या फोटो चे हारार्पण व पुजन करण्यात
आले.या वेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील आदिवासी बांधवानी परिश्रम घेतले त्यामध्ये कुलदीप मसराम, सुनील मसराम, विजय वरखडे, पद्मा दुरवे, संतोष मरकाम, अनिल टेकाम, अरुण दुरवे, सागर मडावी, हरीदास टेकाम, विठ्ठल वरखडे, केशवराव पुराम, विकी कोकाटे, नरेश उईके, संदीप दुरवे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. आदिवासी दिनानिमित्त रामापूर गावात एकतेचा आणि संस्कृतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
- महाराष्ट्र बटालियन एन सी सी तर्फे तिरंगा महारॅली व जनजागृती अभियान खामगांव : स्थानिक 13 महाराष्ट्र बटालियन एन सी सी तर्फे वंदेमातरम राष्ट्र गाणला 150 वर्षपूर्ती निमित्त आयोजित सप्ताह निमित्त दिनांक 9 ऑगस्ट रोजी 13 महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल ओमेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनात तिरंगा महारॅली, क्षयरोग मुक्ती व नशामुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले.ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल आनंद जोशी यांच्या सूक्ष्म नियोजनात सकाळी साडेआठ वाजता रॅली गजानन महाराज मंदिर, जिल्हा परिषद शाळा सुटाळा खुर्द, अनिकट रोड नांदुरा रोड, बसस्थानक, नगर परिषद इमारत, रेल्वे स्थानक, पोलिस स्टेशन नांदुरा रोड 13महाराष्ट्र बटालियन या मार्गाने संपन्न झाली. रॅली दरम्यान कॅडेट्स नी नशामुक्ती तसेच क्षयरोग मुक्ती अभियानांतर्गत घोषणा दिल्या तसेच भारत माता की जय, वंदेमातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या रैली ला पंचक्रोचोतील नागरिकांनी भर भरून प्रतिसाद दिला. कॅडेट्स च्या शिस्तबद्ध मार्चींग ने नागरिकांमध्ये स्फूर्ती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. सदर रॅलीत एन सी सी ऑफिसर लेफ्टनंट यजुवेंद्रसिंग राजपूत, एन सी सी ऑफिसर गजानन पारधी, गणेश घोराळे, सचिन वानखेडे, सुटाळा खुर्द व वाडी ग्रामपंचायतचे प्रशासन अधिकारी कांबळे,सुभेदार तानाजी भंडलकर, सुभेदार नागोसिंग राठोड, सुभेदार रावण कुमार व समस्त पी आय स्टाफ सहभागी झाला होता.4
- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांचा सत्कार1
- आदिवासी दिवस चान्नी गावामधे साजरा करण्यात आला वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आदिवासी दिवस साजरा उपस्थित गावातील सरपंच आणि सर्व सदस्य4
- कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची पत का संपवता - शेतकरी नेते रविकांत तुपकर कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची पत का संपवता - शेतकरी नेते रविकांत तुपकर1
- बुलढाणा :-मध्य रेल्वेचा ढिसाळ कारभार; महाराष्ट्र एक्सप्रेस बनली ‘झुरळांचं माहेरघर’! महागडं तिकीट, आरामाऐवजी झुरळांचा त्रास; एसी कोचमधील अस्वच्छतेने प्रवासी संतप्त.1
- पात्र ११ वृद्ध कलावंतांचा लढा निर्णायक टप्प्यात साखळी उपोषणाला १२ दिवस उलटूनही मगरमठ्ठ प्रशासनाच्या वतीने न्याय नाही; कलावंत उत्तम गवई यांचे आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात पात्र ११ वृद्ध कलावंतांचा लढा निर्णायक टप्प्यात साखळी उपोषणाला १२ दिवस उलटूनही मगरमठ्ठ प्रशासनाच्या वतीने न्याय नाही; कलावंत उत्तम गवई यांचे आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात अकोला प्रतिनिधी... अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक-कलावंत मानधन योजना २०२४–२५ मधील पात्र ११ वृद्ध कलावंतांना न्याय मिळावा, या मागणीसाठी तेल्हारा पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला १२ दिवस उलटूनही तेल्हारा पंचायत समिती मधील मगरमठ्ठ प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने सुरू असलेले आंदोलन पुढील निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.यामगरमठ्ठ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कलावंत उत्तम शालीग्राम गवई यांनी आज, दि. १० ऑगस्टपासून पंचायत समिती तेल्हारा या ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. पात्र ११ वृद्ध कलावंतांना योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी संबंधित प्रशासनाकडे यापूर्वी अनेक वेळा निवेदने सादर करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा, तहसीलदार तेल्हारा तसेच तेल्हारा पोलीस ठाणेदार यांना विविध तारखांना अनेक वेळा निवेदने देण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मात्र, दि. २९ जुलै २०२६ पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला १२ दिवस पूर्ण होऊनही न्याय मिळालेला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय या कलावंतांनी घेतला आहे.आणी त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत सदर आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषण कर्ते उत्तम शालीग्राम गवई यांनी सांगितले आहे. दि. ६ ऑगस्ट रोजी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानुसार आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेल्हारा पंचायत समिती मगरमठ्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष पात्र ११ कलावंतांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, तसेच वृद्ध कलावंतांना त्यांच्या हक्काचा मानधन योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा आणि आंदोलनाची सांगता करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.1
- आर्वी मे राष्ट्रीय आदिवासी दिवस JKV NEWS 24 Page ko like kariye1
- दमदार पावसामुळे सोयाबीन पिके बहरली,शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळल्यामुळे सध्या सोयाबीन पिके बहरली असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरामध्ये मागील आठ दिवसापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर व हळद पिके सध्या बहरली आहेत.1
- निंबी मालोकर मे फायरिंग अमोल गजानन मालोकर की मौत 6 राऊंड फायरिंग होईल1