Shuru
Apke Nagar Ki App…
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांचा सत्कार
Amravati News Update
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांचा सत्कार
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पात्र ११ वृद्ध कलावंतांचा लढा निर्णायक टप्प्यात साखळी उपोषणाला १२ दिवस उलटूनही मगरमठ्ठ प्रशासनाच्या वतीने न्याय नाही; कलावंत उत्तम गवई यांचे आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात पात्र ११ वृद्ध कलावंतांचा लढा निर्णायक टप्प्यात साखळी उपोषणाला १२ दिवस उलटूनही मगरमठ्ठ प्रशासनाच्या वतीने न्याय नाही; कलावंत उत्तम गवई यांचे आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात अकोला प्रतिनिधी... अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक-कलावंत मानधन योजना २०२४–२५ मधील पात्र ११ वृद्ध कलावंतांना न्याय मिळावा, या मागणीसाठी तेल्हारा पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला १२ दिवस उलटूनही तेल्हारा पंचायत समिती मधील मगरमठ्ठ प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने सुरू असलेले आंदोलन पुढील निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.यामगरमठ्ठ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कलावंत उत्तम शालीग्राम गवई यांनी आज, दि. १० ऑगस्टपासून पंचायत समिती तेल्हारा या ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. पात्र ११ वृद्ध कलावंतांना योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी संबंधित प्रशासनाकडे यापूर्वी अनेक वेळा निवेदने सादर करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा, तहसीलदार तेल्हारा तसेच तेल्हारा पोलीस ठाणेदार यांना विविध तारखांना अनेक वेळा निवेदने देण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मात्र, दि. २९ जुलै २०२६ पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला १२ दिवस पूर्ण होऊनही न्याय मिळालेला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय या कलावंतांनी घेतला आहे.आणी त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत सदर आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषण कर्ते उत्तम शालीग्राम गवई यांनी सांगितले आहे. दि. ६ ऑगस्ट रोजी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानुसार आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेल्हारा पंचायत समिती मगरमठ्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष पात्र ११ कलावंतांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, तसेच वृद्ध कलावंतांना त्यांच्या हक्काचा मानधन योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा आणि आंदोलनाची सांगता करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.1
- आदिवासी दिवस चान्नी गावामधे साजरा करण्यात आला वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आदिवासी दिवस साजरा उपस्थित गावातील सरपंच आणि सर्व सदस्य4
- आयुष्यमान कार्ड नोंदणीसाठी शहर भागातील वाढणी या मोहीम राबवा *आयुष्मान कार्ड नोंदणीसाठी शहरीभागात वार्डनिहाय मोहिम राबवा* *- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर* *जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्य वर्धीनी समितीचा आढावा* वर्धा, आयुष्मान भारत जनआरोग्य योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतून सर्वसामान्य नागरिकांना विनामुल्य आरोग्य सुविधा उपलब्ध होतात. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिक योजनेंतर्गत पात्र होण्यासाठी शहरी भागात वार्डनिहाय मोहिम राबवा, अशा सूचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्य वर्धीनी समितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आ.सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ.रा.ज.पराडकर यांच्यासह सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात आयुष्मान कार्ड नोंदणीचे ग्रामीण भागातील प्रमाण 90 टक्केपेक्षा अधिक आहे. परंतू शहरी भागात नोंदणी कमी असल्याने ही नोंदणी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. शहरी भागात नगरसेवकांना सोबत घेऊन त्यांच्या सहकार्याने वार्डनिहाय मोहिम राबविणे अधिक उपयुक्त ठरेल. यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरसेवक, तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांमधील आरोग्य सुविधा अधिक अद्यावत कशा करता येतील तसेच या संस्थांसाठी कोणत्या पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे, याबाबत सविस्तर प्रस्ताव करण्यात यावा. याबाबत आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन सुविधांच्या पुर्ततेसाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करु. जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आवश्यक आरोग्य कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्याची खात्री विभागाने करावी. ज्याज्या ठिकाणी शस्त्रक्रियागृह आहेत, ते सुस्थितीत आणि वापरात असणे आवश्यक असल्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोलर यंत्रणा बसविण्यात आली आहे, परंतू वानरांच्या उपद्रवामुळे काही ठिकाणी ही यंत्रणा नादुरुस्त होते. सोलर बसवितांनाचा संबंधित कंत्राटदाराने दहा वर्ष या यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करावी, अशी अट ठेवण्यात यावी. यापुढे सोलर बसवितांना संरक्षक पिंजरा त्याभोवती असावा, अशी तरतूद करण्यात यावी. जिल्ह्याला क्षयरोगमुक्त करण्यासाठी डिसेंबर अखेरचे उद्दिष्ट ठेवण्यात यावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. केंद्र शासनाच्या नव्या व्हीबीजी रामजी या योजनेतून आरोग्य संस्थांची दुरुस्ती, वॅाल कम्पाऊंडसारखी कामे करता येऊ शकतात. त्यामुळे या योजनेतून कामे प्रस्तावित करावी, असे आ.वानखेडे म्हणाले. आष्टी तालुक्यात आणखी एक 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, कारंजा येथील ट्रॅामा केअर सेंटर पुर्ण क्षमतेते कार्यान्वित व्हावे, आर्वी येथे वैद्यकीय अधिकारी पदे देण्यात यावी, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये बायोमेट्रीक प्रणाली बसवावी, असे आ.वानखेडे म्हणाले. सुरुवातीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुमंत वाघ यांनी जिल्ह्याच्या आरोग्य विषयक कामकाजाचा आढावा सादर केला.1
- महाराष्ट्र बटालियन एन सी सी तर्फे तिरंगा महारॅली व जनजागृती अभियान खामगांव : स्थानिक 13 महाराष्ट्र बटालियन एन सी सी तर्फे वंदेमातरम राष्ट्र गाणला 150 वर्षपूर्ती निमित्त आयोजित सप्ताह निमित्त दिनांक 9 ऑगस्ट रोजी 13 महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल ओमेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनात तिरंगा महारॅली, क्षयरोग मुक्ती व नशामुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात आले.ॲडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल आनंद जोशी यांच्या सूक्ष्म नियोजनात सकाळी साडेआठ वाजता रॅली गजानन महाराज मंदिर, जिल्हा परिषद शाळा सुटाळा खुर्द, अनिकट रोड नांदुरा रोड, बसस्थानक, नगर परिषद इमारत, रेल्वे स्थानक, पोलिस स्टेशन नांदुरा रोड 13महाराष्ट्र बटालियन या मार्गाने संपन्न झाली. रॅली दरम्यान कॅडेट्स नी नशामुक्ती तसेच क्षयरोग मुक्ती अभियानांतर्गत घोषणा दिल्या तसेच भारत माता की जय, वंदेमातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या रैली ला पंचक्रोचोतील नागरिकांनी भर भरून प्रतिसाद दिला. कॅडेट्स च्या शिस्तबद्ध मार्चींग ने नागरिकांमध्ये स्फूर्ती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. सदर रॅलीत एन सी सी ऑफिसर लेफ्टनंट यजुवेंद्रसिंग राजपूत, एन सी सी ऑफिसर गजानन पारधी, गणेश घोराळे, सचिन वानखेडे, सुटाळा खुर्द व वाडी ग्रामपंचायतचे प्रशासन अधिकारी कांबळे,सुभेदार तानाजी भंडलकर, सुभेदार नागोसिंग राठोड, सुभेदार रावण कुमार व समस्त पी आय स्टाफ सहभागी झाला होता.4
- मराठीचे शिलेदार 'गुरूवार ते शनिवार' स्पर्धेतील आदर्श कवींचे संगीतमय सन्मानपत्र मराठीचे शिलेदार 'गुरूवार ते शनिवार' स्पर्धेतील आदर्श कवींचे संगीतमय सन्मानपत्र मुख्य संपादक राहुल पाटील ७३८५३६३०८८ काव्य समूहात सहभागी होण्यासाठी वरील क्रमांकावर आपला परिचय पाठवा.1
- humne Nagpur se general dibbe mein Ujjain Tak ka safar Kiya aur bheed itni thi ki sarkar Ne do bhoge extra lagana chahie do bhogi ki jo yatri Hai ek Hi bhogi mein Na wapas pair rakhne ke liye jagah na baithane ke liye jagah bathroom emergency agar lagi to vah bhi suvidha andar Se bathroom Tak ka Ja nahin sakte ladiss problem Mera anurodh hai ki rail mantri is baat Ko aur is baat ke upar mein vivas vimarsh Karen vichar Karen ticket to Puri leti Hai Lekin seat ke hisab se general bogi mein bhi nahin log baithana chahie jitne ki avashyakta hai1
- अभिजीत दिपके यांचं दिल्ली येथील आंदोलन मेंढपाळंपर्यंत पोहोचले1
- निंबी मालोकर मे फायरिंग अमोल गजानन मालोकर की मौत 6 राऊंड फायरिंग होईल1