पात्र ११ वृद्ध कलावंतांचा लढा निर्णायक टप्प्यात साखळी उपोषणाला १२ दिवस उलटूनही मगरमठ्ठ प्रशासनाच्या वतीने न्याय नाही; कलावंत उत्तम गवई यांचे आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात पात्र ११ वृद्ध कलावंतांचा लढा निर्णायक टप्प्यात साखळी उपोषणाला १२ दिवस उलटूनही मगरमठ्ठ प्रशासनाच्या वतीने न्याय नाही; कलावंत उत्तम गवई यांचे आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात अकोला प्रतिनिधी... अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक-कलावंत मानधन योजना २०२४–२५ मधील पात्र ११ वृद्ध कलावंतांना न्याय मिळावा, या मागणीसाठी तेल्हारा पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला १२ दिवस उलटूनही तेल्हारा पंचायत समिती मधील मगरमठ्ठ प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने सुरू असलेले आंदोलन पुढील निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.यामगरमठ्ठ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कलावंत उत्तम शालीग्राम गवई यांनी आज, दि. १० ऑगस्टपासून पंचायत समिती तेल्हारा या ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. पात्र ११ वृद्ध कलावंतांना योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी संबंधित प्रशासनाकडे यापूर्वी अनेक वेळा निवेदने सादर करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा, तहसीलदार तेल्हारा तसेच तेल्हारा पोलीस ठाणेदार यांना विविध तारखांना अनेक वेळा निवेदने देण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मात्र, दि. २९ जुलै २०२६ पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला १२ दिवस पूर्ण होऊनही न्याय मिळालेला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय या कलावंतांनी घेतला आहे.आणी त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत सदर आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषण कर्ते उत्तम शालीग्राम गवई यांनी सांगितले आहे. दि. ६ ऑगस्ट रोजी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानुसार आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेल्हारा पंचायत समिती मगरमठ्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष पात्र ११ कलावंतांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, तसेच वृद्ध कलावंतांना त्यांच्या हक्काचा मानधन योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा आणि आंदोलनाची सांगता करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पात्र ११ वृद्ध कलावंतांचा लढा निर्णायक टप्प्यात साखळी उपोषणाला १२ दिवस उलटूनही मगरमठ्ठ प्रशासनाच्या वतीने न्याय नाही; कलावंत उत्तम गवई यांचे आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात पात्र ११ वृद्ध कलावंतांचा लढा निर्णायक टप्प्यात साखळी उपोषणाला १२ दिवस उलटूनही मगरमठ्ठ प्रशासनाच्या वतीने न्याय नाही; कलावंत उत्तम गवई यांचे आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात अकोला प्रतिनिधी... अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक-कलावंत मानधन योजना २०२४–२५ मधील पात्र ११ वृद्ध कलावंतांना न्याय मिळावा, या मागणीसाठी तेल्हारा पंचायत समितीसमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला १२ दिवस उलटूनही तेल्हारा पंचायत समिती मधील मगरमठ्ठ प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने सुरू असलेले आंदोलन पुढील निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.यामगरमठ्ठ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कलावंत उत्तम शालीग्राम गवई यांनी आज, दि. १० ऑगस्टपासून पंचायत समिती तेल्हारा या ठिकाणी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. पात्र ११ वृद्ध कलावंतांना योजनेचा लाभ मिळावा आणि त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी संबंधित प्रशासनाकडे यापूर्वी अनेक वेळा निवेदने सादर करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा, तहसीलदार तेल्हारा तसेच तेल्हारा पोलीस ठाणेदार यांना विविध तारखांना अनेक वेळा निवेदने देण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. मात्र, दि. २९ जुलै २०२६ पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला १२ दिवस पूर्ण होऊनही न्याय मिळालेला नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय या कलावंतांनी घेतला आहे.आणी त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत सदर आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे उपोषण कर्ते उत्तम शालीग्राम गवई यांनी सांगितले आहे. दि. ६ ऑगस्ट रोजी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यानुसार आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेल्हारा पंचायत समिती मगरमठ्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष पात्र ११ कलावंतांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, तसेच वृद्ध कलावंतांना त्यांच्या हक्काचा मानधन योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा आणि आंदोलनाची सांगता करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- *मंचनपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वाल कंपाऊंडच नाही* *मंचनपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वाल कंपाऊंडच नाही* अकोट तालुका प्रतिनिधी.... अकोट तालुक्या अंतर्गत येत असलेले मंचनपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेला गेल्या 5ते6 वर्षापासून वाल कंपाऊंड पडून झाले मात्र अद्याप पर्यंत या शाळेतील समस्येकडे शिक्षण विभागाने अथवा मंचनपुर येथील ग्रामपंचायत ने लक्ष दिले नाही.सदर भिंती पडक्या अवस्थेत असल्याचे छायाचित्रात दिसून येते.तसेच उभी असलेली भिंत सुद्धा कोसळण्याच्या स्थितीत आहे.तरी सुद्धा प्रशासन कुठलेही दखल घेत नसल्याचे दिसून येते सदर शाळेच्या आवारा मध्ये कुत्रे माजरी व जनावरे जाऊन शाळेमध्ये घाण करीत आहेत.तसेच येथील शिक्षक सुद्धा नेहमीच घाण साफ करतात तसेच येथील शिक्षक सुद्धा या जनावरांना कंटाळले आहेत.तरीही प्रशासन कोणत्याही गोष्टीचे दखल न घेता या शाळेकडे दुर्लक्ष करत आहेत.या जिल्हा परिषद शाळेला लागूनच लहान मुलांन साठी अंगणवाडी सुद्धा असून जनावरांच्या कुत्र्या मांजरांच्या समस्याचा सामना येथील लहान मुलांना करावा लागत आहे.तसेच येथील कुत्र्याच्या पासून शालेय विद्यार्थ्यांना धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. तसेच येथील शिक्षकांनी या गोष्टीसाठी कित्येकदा पाठपुरावा केला आहे . पाठपुरावा करून सुद्धा कुठलीच दखल घेण्यात येत नसल्याने या शाळेत शिकणाऱ्या लहान लहान मुलांच्या आई, वडीलांनी ग्रामपंचायत प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे.सदर शाळा ही मतदान केंद्र असून या शाळेला वॉल कंपाऊंड नसल्यामुळे या शाळेला धोका निर्माण होऊ शकतो तेव्हा या शाळेला कंपाऊंड वॉल बसविण्याची मागणी येथील विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गांनी केली आहे.4
- प्रधानमंत्री किसी एक पार्टी के प्रधानमंत्री नही है पुरे देश के प्रधानमंत्री है महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा1
- खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभेचे 'जेल भरो' आंदोलन खामगाव : देशव्यापी संपाच्या हाकेला प्रतिसाद देत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.शेतकरी आणि कामगारांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत 'जेल भरो' आंदोलन छेडले.यावेळी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार सर्व शेतीमालाला कायदेशीर आधारभूत हमीभाव लागू करावा आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, केंद्र सरकारने लागू केलेल्या चारही कामगार विरोधी संहिता तात्काळ मागे घ्याव्यात,पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गॅसचे वाढते दर नियंत्रित करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा,मनरेगा अंतर्गत कामगारांना दैनिक ५०० रुपयांहून अधिक मजुरी आणि वर्षाला किमान २०० दिवस कामाची हमी मिळावी. या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास आगामी काळात राज्यभर याहून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.4
- भाजप शहर जिल्ह्याची मासिक बैठक संपन्न,कार्यक्रम, उपक्रम व अभियान ही औपचारिकता नसून कार्यकर्त्यांच्या नेतृत्व विकासाची संधी,डॉ.नितीन धांडे1
- *आदिवासी दिवस साजरा चान्नी गावातील सर्व गावातील नागरिक उपस्थित *आदिवासी दिवस साजरा, गावातील सरपंच उपस्थितुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि4
- निलगाईंचा धुमाकूळ; दोन एकर सोयाबीन पीक फस्तऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्याचे मोठे नुकसान; नुकसानभरपाईची मागणी वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे मंगरूळपीर : तालुक्यातील बोरव्हा खु. येथील शेतकरी ओमप्रकाश नारायण ठाकरे यांच्या तीन एकर शेतीपैकी दोन एकर क्षेत्रातील फुलोऱ्यावर आलेले सोयाबीन पीक निलगाईंच्या कळपाने फस्त केल्याची घटना नुकतीच घडली. ऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर उभे पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ठाकरे यांनी सोयाबीन पिकासाठी बियाणे, खते, पेरणी, मजुरी, तणनाशक व फवारण्यांवर मोठा खर्च केला होता. वर्षभर मेहनत घेतल्यानंतर पीक फुलोऱ्यावर आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी निलगाईंच्या कळपाने शेतात प्रवेश करून संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे या पिकातून आता उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. उद्ध्वस्त झालेले पीक काढून शेत पुढील पिकासाठी तयार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. “एवढा खर्च करून पीक उभे केले; मात्र हातात येण्यापूर्वीच निलगाईंनी फस्त केले. आता शेतीचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी शेतकरी ओमप्रकाश ठाकरे यांनी केली. निलगाई व इतर वन्यप्राण्यांकडून वारंवार होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही चिंता वाढली आहे. वनविभाग व प्रशासनाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.3
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे - आमदार डॉ संजय कुटे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे - आमदार डॉ संजय कुटे1
- रामापूर येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा बिरसा मुंडांना अभिवादन, पारंपरिक नृत्याने आदिवासी संस्कृतीचा जागर रामापूर येथे विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा बिरसा मुंडांना अभिवादन, पारंपरिक नृत्याने आदिवासी संस्कृतीचा जागर अकोट तालुका प्रतिनिधी.... अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या धारुळ रामापुर येथे 9ऑगस्ट हा दिवस 'विश्व जागतिक आदिवासी दिवस' म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटना UNO च्या कार्यदलाने 1984 मध्ये आदिवासींच्या हक्क, कला आणि संस्कृतीच्या जतनासाठी या दिनाची स्थापना केली. 1992 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर अकोट तालुक्यातील रामापूर येथे 'विश्व आदिवासी दिन महोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोल मडावी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गावातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल-ताशाच्या तालावर आदिवासी नृत्य सादर केले. नृत्य, घोषणाबाजी आणि महापुरुषांच्या विचारांनी संपूर्ण परिसरात आदिवासी एकतेचे दर्शन घडले. अध्यक्षीय भाषणात अमोल मडावी म्हणाले, "आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा जपत आपण शिक्षणाच्या माध्यमातून पुढे गेलो पाहिजे. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन समाजाला मुख्य प्रवाहात आणणे ही काळाची गरज आहे." या महोत्सवासाठी यावेळी कार्यक्रमाला पत्रकार विठ्ठल येवोकार याच्या हस्ते बीरसा मुंडा याच्या फोटो चे हारार्पण व पुजन करण्यात आले.या वेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील आदिवासी बांधवानी परिश्रम घेतले त्यामध्ये कुलदीप मसराम, सुनील मसराम, विजय वरखडे, पद्मा दुरवे, संतोष मरकाम, अनिल टेकाम, अरुण दुरवे, सागर मडावी, हरीदास टेकाम, विठ्ठल वरखडे, केशवराव पुराम, विकी कोकाटे, नरेश उईके, संदीप दुरवे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. आदिवासी दिनानिमित्त रामापूर गावात एकतेचा आणि संस्कृतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.4