खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभेचे 'जेल भरो' आंदोलन खामगाव : देशव्यापी संपाच्या हाकेला प्रतिसाद देत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.शेतकरी आणि कामगारांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत 'जेल भरो' आंदोलन छेडले.यावेळी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार सर्व शेतीमालाला कायदेशीर आधारभूत हमीभाव लागू करावा आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे, केंद्र सरकारने लागू केलेल्या चारही कामगार विरोधी संहिता तात्काळ मागे घ्याव्यात,पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गॅसचे वाढते दर नियंत्रित करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा,मनरेगा अंतर्गत कामगारांना दैनिक ५०० रुपयांहून अधिक मजुरी आणि वर्षाला किमान २०० दिवस कामाची हमी मिळावी. या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास आगामी काळात राज्यभर याहून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान सभेचे 'जेल भरो' आंदोलन खामगाव : देशव्यापी संपाच्या हाकेला प्रतिसाद देत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सोमवारी खामगाव येथील उपविभागीय
कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.शेतकरी आणि कामगारांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत 'जेल भरो' आंदोलन छेडले.यावेळी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार सर्व शेतीमालाला कायदेशीर आधारभूत हमीभाव लागू करावा आणि शेतकऱ्यांना संपूर्ण
कर्जमुक्त करावे, केंद्र सरकारने लागू केलेल्या चारही कामगार विरोधी संहिता तात्काळ मागे घ्याव्यात,पेट्रोल,डिझेल आणि घरगुती गॅसचे वाढते दर नियंत्रित करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा,मनरेगा अंतर्गत कामगारांना दैनिक ५००
रुपयांहून अधिक मजुरी आणि वर्षाला किमान २०० दिवस कामाची हमी मिळावी. या मागण्या त्वरित मान्य न झाल्यास आगामी काळात राज्यभर याहून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
- कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची पत का संपवता - शेतकरी नेते रविकांत तुपकर कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची पत का संपवता - शेतकरी नेते रविकांत तुपकर1
- आदिवासी दिवस चान्नी गावामधे साजरा करण्यात आला वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आदिवासी दिवस साजरा उपस्थित गावातील सरपंच आणि सर्व सदस्य4
- अकोटमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर चालला गजराज; १४ झोपड्या जमीनदोस्त वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीसांनी केली संयुक्त कारवाई! अकोटमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर चालला गजराज; १४ झोपड्या जमीनदोस्त वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीसांनी केली संयुक्त कारवाई! अकोट तालुका प्रतिनिधी... अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वडाळी सटवाई येथील गंगानगर परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसाया विरोधात दि.१० ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.सदर झोपड्यांना बांधकामाची परवानगी नसल्याने तसेच ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंदी मध्येही या झोपड्यांची नोंद नसल्याचे समोर आल्यानंतर व या ठिकाणी वेश्यां व्यवसाय चालू असल्याने वडाळी सटवाई ग्रामपंचायत व अकोट ग्रामीण पोलीस यांना माहिती होताच सदर प्रशासनाकडून गंगानगर परीसरातील असलेल्या १४अवैध झोपड्यांवर बुलडोझर फिरवून जमिनदोस्त करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल १ पक्की,१३ टिनाच्या झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अकोला जिल्ह्यात व अकोट तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.सदर कारवाई वडाळी सटवाई ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक तसेच अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्रीधर गुट्टे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली.3
- निलगाईंचा धुमाकूळ; दोन एकर सोयाबीन पीक फस्तऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्याचे मोठे नुकसान; नुकसानभरपाईची मागणी वाशिम जिल्हा प्रतिनिधी : विश्वास कुटे मंगरूळपीर : तालुक्यातील बोरव्हा खु. येथील शेतकरी ओमप्रकाश नारायण ठाकरे यांच्या तीन एकर शेतीपैकी दोन एकर क्षेत्रातील फुलोऱ्यावर आलेले सोयाबीन पीक निलगाईंच्या कळपाने फस्त केल्याची घटना नुकतीच घडली. ऐन उत्पादनाच्या उंबरठ्यावर उभे पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ठाकरे यांनी सोयाबीन पिकासाठी बियाणे, खते, पेरणी, मजुरी, तणनाशक व फवारण्यांवर मोठा खर्च केला होता. वर्षभर मेहनत घेतल्यानंतर पीक फुलोऱ्यावर आले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी निलगाईंच्या कळपाने शेतात प्रवेश करून संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे या पिकातून आता उत्पादन मिळण्याची शक्यता नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले. उद्ध्वस्त झालेले पीक काढून शेत पुढील पिकासाठी तयार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. “एवढा खर्च करून पीक उभे केले; मात्र हातात येण्यापूर्वीच निलगाईंनी फस्त केले. आता शेतीचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी,” अशी मागणी शेतकरी ओमप्रकाश ठाकरे यांनी केली. निलगाई व इतर वन्यप्राण्यांकडून वारंवार होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्येही चिंता वाढली आहे. वनविभाग व प्रशासनाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.3
- इम्तियाज जलील साहब के जन्मदिन पर सिल्लोड के युवाओं ने की समाज सेवा, मरीजों को बांटे फल AQS NEWS सिल्लोड: पूर्व सांसद इम्तियाज जलील के जन्मदिन पर सरकारी अस्पताल में मरीजों को बांटे गए फल | AQS NEWS #Sillod #ImtiazJaleel #AIMIM #SillodNews #AQSNews #SillodYouth #HospitalService #MaharashtraNews #AIMIMMaharashtra #SocialService #SillodCity #NewsUpdate #anisqureshisilood1
- *मंचनपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वाल कंपाऊंडच नाही* *मंचनपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वाल कंपाऊंडच नाही* अकोट तालुका प्रतिनिधी.... अकोट तालुक्या अंतर्गत येत असलेले मंचनपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेला गेल्या 5ते6 वर्षापासून वाल कंपाऊंड पडून झाले मात्र अद्याप पर्यंत या शाळेतील समस्येकडे शिक्षण विभागाने अथवा मंचनपुर येथील ग्रामपंचायत ने लक्ष दिले नाही.सदर भिंती पडक्या अवस्थेत असल्याचे छायाचित्रात दिसून येते.तसेच उभी असलेली भिंत सुद्धा कोसळण्याच्या स्थितीत आहे.तरी सुद्धा प्रशासन कुठलेही दखल घेत नसल्याचे दिसून येते सदर शाळेच्या आवारा मध्ये कुत्रे माजरी व जनावरे जाऊन शाळेमध्ये घाण करीत आहेत.तसेच येथील शिक्षक सुद्धा नेहमीच घाण साफ करतात तसेच येथील शिक्षक सुद्धा या जनावरांना कंटाळले आहेत.तरीही प्रशासन कोणत्याही गोष्टीचे दखल न घेता या शाळेकडे दुर्लक्ष करत आहेत.या जिल्हा परिषद शाळेला लागूनच लहान मुलांन साठी अंगणवाडी सुद्धा असून जनावरांच्या कुत्र्या मांजरांच्या समस्याचा सामना येथील लहान मुलांना करावा लागत आहे.तसेच येथील कुत्र्याच्या पासून शालेय विद्यार्थ्यांना धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. तसेच येथील शिक्षकांनी या गोष्टीसाठी कित्येकदा पाठपुरावा केला आहे . पाठपुरावा करून सुद्धा कुठलीच दखल घेण्यात येत नसल्याने या शाळेत शिकणाऱ्या लहान लहान मुलांच्या आई, वडीलांनी ग्रामपंचायत प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे.सदर शाळा ही मतदान केंद्र असून या शाळेला वॉल कंपाऊंड नसल्यामुळे या शाळेला धोका निर्माण होऊ शकतो तेव्हा या शाळेला कंपाऊंड वॉल बसविण्याची मागणी येथील विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गांनी केली आहे.4
- दमदार पावसामुळे सोयाबीन पिके बहरली,शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण हिंगोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळल्यामुळे सध्या सोयाबीन पिके बहरली असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरामध्ये मागील आठ दिवसापूर्वी झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर व हळद पिके सध्या बहरली आहेत.1
- निंबी मालोकर मे फायरिंग अमोल गजानन मालोकर की मौत 6 राऊंड फायरिंग होईल1