अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा - निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीची बैठक संपन्न अहिल्यानगर, दि. २९ जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, साठा व तस्करीवर कठोर भूमिका घेऊन कारवाई करावी, तसेच अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीच्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गिते बोलत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गिते म्हणाले, "शाळा व महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यावर भर देण्यात यावा. ड्रग्स डिटेक्शन किट्स व टेस्टिंग केमिकल्सची उपलब्धता सुनिश्चित करून तपास यंत्रणेला अधिक बळकटी देण्यात यावी. पोलीस विभाग, एनसीबी व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या कारवाईची माहिती एकत्रित करून अद्ययावत डेटाबेस तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या." जिल्ह्यात १ जानेवारी ते २८ एप्रिल २०२६ दरम्यान अमली पदार्थ बाळगणाऱ्या ९ प्रकरणांमध्ये १२ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लागवडीच्या प्रकरणातील २ गुन्ह्यांमध्ये ३ व्यक्तींवर, वाहतुकीसंदर्भातील ३ प्रकरणांमध्ये ८ व्यक्तींवर आणि अमली पदार्थ सेवनाच्या २६ प्रकरणांमध्ये ३२ व्यक्तींवर, अशा प्रकारे अमली पदार्थांच्या एकूण ४० प्रकरणांमध्ये ५५ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती श्री. भोये यांनी यावेळी दिली. #अमलीपदार्थविरोधी #AntiDrugCampaign #अहिल्यानगर #AhalyaNagar #कठोरकारवाई #DrugFreeIndia #पोलीसप्रशासन #PoliceAction #जनजागृती #AwarenessDrive #नार्कोकोऑर्डिनेशन #NCORD #महाराष्ट्रशासन #MaharashtraGovernment #व्यसनमुक्तभारत #SayNoToDrugs #जिल्हाधिकारीकार्यालय #CollectorOffice #सुरक्षितजिल्हा #PublicSafety
अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा - निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीची बैठक संपन्न अहिल्यानगर, दि. २९ जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, साठा व तस्करीवर कठोर भूमिका घेऊन कारवाई करावी, तसेच अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीच्या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गिते बोलत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गिते म्हणाले, "शाळा व महाविद्यालये तसेच गर्दीच्या ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवण्यावर भर देण्यात यावा. ड्रग्स डिटेक्शन किट्स व टेस्टिंग केमिकल्सची उपलब्धता सुनिश्चित करून तपास यंत्रणेला अधिक बळकटी देण्यात यावी. पोलीस विभाग, एनसीबी व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या कारवाईची माहिती एकत्रित करून अद्ययावत डेटाबेस तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या." जिल्ह्यात १ जानेवारी ते २८ एप्रिल २०२६ दरम्यान अमली पदार्थ बाळगणाऱ्या ९ प्रकरणांमध्ये १२ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लागवडीच्या प्रकरणातील २ गुन्ह्यांमध्ये ३ व्यक्तींवर, वाहतुकीसंदर्भातील ३ प्रकरणांमध्ये ८ व्यक्तींवर आणि अमली पदार्थ सेवनाच्या २६ प्रकरणांमध्ये ३२ व्यक्तींवर, अशा प्रकारे अमली पदार्थांच्या एकूण ४० प्रकरणांमध्ये ५५ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती श्री. भोये यांनी यावेळी दिली. #अमलीपदार्थविरोधी #AntiDrugCampaign #अहिल्यानगर #AhalyaNagar #कठोरकारवाई #DrugFreeIndia #पोलीसप्रशासन #PoliceAction #जनजागृती #AwarenessDrive #नार्कोकोऑर्डिनेशन #NCORD #महाराष्ट्रशासन #MaharashtraGovernment #व्यसनमुक्तभारत #SayNoToDrugs #जिल्हाधिकारीकार्यालय #CollectorOffice #सुरक्षितजिल्हा #PublicSafety
- Post by कर्जत लाईव्ह1
- संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकीनसंचालक मार्गदर्शन व मैदानी प्रशिक्षण रवी सर संघर्ष फिजिकल अकॅडमी बिडकिन रवी जाधव सर मो. 9921982615 बिडकिन.ता पैठण.औरगाबाद shaha social media bidkin1
- jas to jasto logon per potwa1
- शहरातील मुख्य रहदारीच्या विंचूर चौफुलीवरील सिग्नल गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटोतकर यांनी 'गांधीगिरी' मार्गाचा अवलंब करत बंद सिग्नलचे पूजन केले. विंचूर चौफुली हा शहरातील अतिशय गजबजलेला परिसर आहे. मात्र, सिग्नल यंत्रणा बंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात आणि वारंवार वाहतूक कोंडी होते. या प्रलंबित प्रश्नाबाबत अनेकदा तक्रारी करूनही दखल न घेतल्याने पाटोतकर यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन केले. "प्रशासन झोपले असेल, तर त्यांना जागे करण्यासाठी हे पूजन केले आहे," असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला. आता तरी प्रशासन जागे होऊन हे सिग्नल पूर्ववत करणार का? असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.1
- पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने जाहीर आवाहन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे1
- फूँक मारकर दिए को बुझा सकते हैं मगर अगरबत्ती को नहीं क्योंकि जो महकता है उसे कौन बुझा सकता है, और जो जलता है वो खुद बुझ जाता है1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- येवला येथील श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात प्रदोष निमित्ताने उत्साहाचे वातावरण होते. यावेळी महादेवांची विधिवत महापूजा आणि मनमोहक भस्म आरती करण्यात आली. विशेष म्हणजे, यंदा महादेवांना प्रभू श्रीरामांच्या स्वरूपात अत्यंत देखणा शृंगार साकारण्यात आला होता. या अलौकिक दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.1