Shuru
Apke Nagar Ki App…
मुजफ्फरपुर जीरोमाइल में ऑटो वाला से पर्ची के नाम पर पैसा वसूल रहा है #viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #Muzaffarpur #BiharPolice
BIHAR NEWS NOW
मुजफ्फरपुर जीरोमाइल में ऑटो वाला से पर्ची के नाम पर पैसा वसूल रहा है #viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #Muzaffarpur #BiharPolice
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Rohit Mitra1
- कर्तृत्वाला मानाचा मुजरा : चंद्रपूरकरांकडून जी.सी. विनय गौडा यांचा 19 एप्रिल ला भव्य नागरी सत्कार नव्या जिल्हाधिकारी वसूमना पंत देखील होणार सन्मानित चंद्रपूर: जिल्ह्याच्या विकासाला नवे आयाम देत प्रशासनाला लोकाभिमुखतेची धार देणारे माजी जिल्हाधिकारी जी.सी. विनय गौडा यांचे योगदान चंद्रपूरकरांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून गेले आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांची आणि राबवलेल्या उपक्रमांची आठवण आजही नागरिक अभिमानाने करतात. आ सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास प्रकल्पाना प्रशासकीय पातळीवर त्यांनी केलेल्या सकारात्मक सहकार्यामुळे विकास प्रक्रियेला गती मिळाली आहे. या कर्तृत्वाला मानाचा मुजरा देण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे उत्साहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार राहणार असून, कार्यक्रमाला आ कीर्तिकुमार भांगडिया, आ. देवराव भोंगळे, आ करण देवतळे या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विविध सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याचवेळी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची धुरा नुकतीच स्वीकारलेल्या जिल्हाधिकारी श्रीमती वसूमना पंत यांचाही शुभेच्छापर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. नव्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आगामी कार्यासाठी नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होणार आहे. दोन्ही कार्यक्षम आणि लोकाभिमुख सनदी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित हा नागरी सत्कार सोहळा चंद्रपूरच्या सामाजिक ऐक्याचे आणि कृतज्ञतेच्या भावनेचे प्रतीक ठरणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.1
- Post by कु सुषमा डबराल1
- Post by Samachar king digital1
- Post by Ammar haider (ezaan)1
- कामठीत थरार! पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला – आरोपी अटकेत! “कामठी पुन्हा हादरलंय…! मैत्रीतून सुरू झालेला वाद… थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचला…!”कामठी शहरातील जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून थेट जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र हे पिली हवेली चौक परिसरात उभे असताना, त्यांचा परिचित आरोपी शफीक असारी हा तिथे आला. सकाळी दिलेल्या पैशांच्या मागणीवरून वाद सुरु झाला… काही क्षणातच हा वाद विकोपाला गेला… आणि अचानक आरोपीने गाडीच्या डिक्कीतून चाकू काढत तरुणावर थेट छातीवर वार केला! या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जुनी कामठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. IPC कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. “कामठीत वाढता गुन्हेगारीचा ग्राफ… सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!”2
- आ.सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार,झरपट नदी पुनरुज्जीवनाला गती! जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर: आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून झरपट नदीच्या प्रदूषणाच्या प्रश्नावर ठोस हालचाली सुरू झाल्या असून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नदीतील प्रदूषण, गाळ साचणे आणि पाण्याच्या गुणवत्तेतील घसरण याचा आढावा घेतला. मुनगंटीवार यांनी झरपट नदीच्या पुनरुज्जीवनासाठी तातडीने डीपीआर तयार करून ‘निरी’ व आयआयटी पवई यांच्या संयुक्त समितीकडून सविस्तर अहवाल मागविण्याची मागणी केली. तसेच नदीचे खोलीकरण, स्वच्छता व सौंदर्यीकरणासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. यासोबतच नदी पुनर्जीवन प्राधिकरण स्थापन होताच इरई व झरपट नद्यांचा प्राधान्याने समावेश करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.1
- Post by कु सुषमा डबराल1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी नगर परीषदेकडून दोन शवपेटीचं लोकार्पण करण्यातं आलं. नगराध्यक्ष परेश कारिया उपाध्यक्षा सोनल ठाकरे मुख्याधिकारी राजु घोडके आणि नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत शवपेटीचं लोकार्पण करण्यातं आलं. हिंदु स्मशानभूमीत शवपेटी नागरीकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.1