नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सुकळी (गुपचूप) ग्रामपंचायतीमध्ये दलित निधीतून सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. कामाच्या ठिकाणी अनिवार्य असलेला माहिती फलक लावलेला नसून निधीचा तपशील, प्रशासकीय मंजुरी आणि कंत्राटदाराची माहिती लपविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप कार्यकर्ते दिनेश कोडापे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा आरोप केला आणि संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी किशोर डाखोळे यांनी रविवार असल्यामुळे कंत्राटदाराने काम सुरू केले असावे असे सांगत, पाहणी करून आवश्यक माहिती फलक तातडीने लावण्याचे स्पष्ट केले. तर हिंगणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप गोडशलवार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे. चौकशीत कोणतीही अनियमितता, नियमभंग किंवा शासकीय निधीच्या वापरात त्रुटी आढळल्यास जबाबदार ग्रामविकास अधिकारी, कंत्राटदार व संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सुकळी (गुपचूप) ग्रामपंचायतीमध्ये दलित निधीतून सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. कामाच्या ठिकाणी अनिवार्य असलेला माहिती फलक लावलेला नसून निधीचा तपशील, प्रशासकीय मंजुरी आणि कंत्राटदाराची माहिती लपविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप कार्यकर्ते दिनेश कोडापे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा आरोप केला आणि संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी किशोर डाखोळे यांनी रविवार असल्यामुळे कंत्राटदाराने काम सुरू केले असावे असे सांगत, पाहणी करून आवश्यक माहिती फलक तातडीने लावण्याचे स्पष्ट केले. तर हिंगणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप गोडशलवार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे. चौकशीत कोणतीही अनियमितता, नियमभंग किंवा शासकीय निधीच्या वापरात त्रुटी आढळल्यास जबाबदार ग्रामविकास अधिकारी, कंत्राटदार व संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सुकळी (गुपचूप) ग्रामपंचायतीमध्ये दलित निधीतून सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. कामाच्या ठिकाणी अनिवार्य असलेला माहिती फलक लावलेला नसून निधीचा तपशील, प्रशासकीय मंजुरी आणि कंत्राटदाराची माहिती लपविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप कार्यकर्ते दिनेश कोडापे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा आरोप केला आणि संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी किशोर डाखोळे यांनी रविवार असल्यामुळे कंत्राटदाराने काम सुरू केले असावे असे सांगत, पाहणी करून आवश्यक माहिती फलक तातडीने लावण्याचे स्पष्ट केले. तर हिंगणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप गोडशलवार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे. चौकशीत कोणतीही अनियमितता, नियमभंग किंवा शासकीय निधीच्या वापरात त्रुटी आढळल्यास जबाबदार ग्रामविकास अधिकारी, कंत्राटदार व संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.1
- पवनी येथील बाम्हणी येथे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी बाम्हणी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात ग्रामस्थांनी एकत्र येत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत केले. या कार्यक्रमाला कोंढा केंद्राचे केंद्रप्रमुख मा. मानप्रकाशजी येळेकर हे पूर्णवेळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचेही मनापासून अभिनंदन केले.1
- विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर येथील धापेवाडा येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तांचा मोठा जनसागर उसळला आहे. या धार्मिक उत्सवातील मुख्य सोहळा ३० जुलै रोजी पार पडणार आहे.1
- 'बिरसा मिसाईल फोर्स'मध्ये सहभागी होण्यासाठी आजच ७९८७५६७५२५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1
- नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर शहरात अन्यायकारक पद्धतीने लादण्यात आलेल्या वाढीव घरकराच्या विरोधात सोमवार, २८ जुलै रोजी कळमेश्वर नगरपरिषद कार्यालयावर धडक मोर्चा आणि तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार थांबवून ही घरकरवाढ तात्काळ रद्द करावी व नागरिकांना दिलासा द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून हा मोर्चा बाजार चौक कळमेश्वर ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत काढला जाणार आहे. शहरातील नागरिकांवर आर्थिक भार टाकणारे निर्णय प्रशासनाने तात्काळ मागे घ्यावेत, अशी मुख्य मागणी आयोजकांनी केली आहे. "जनतेच्या हक्कासाठी संघर्ष, अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करूया!" असे आवाहन करत या आंदोलनात सर्व नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हक्काच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- उमरेड येथे नुकतेच रुजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांनी भिवापूर पोलिस स्टेशनला भेट देऊन तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत ठाणेदार रवींद्र मस्कर यांच्याशी चर्चा केली. शहरात चालणारे अवैध दारू व्यवसाय, सट्टापट्टी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शहरात रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करण्याच्या कडक सूचना उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी ठाणेदारांना दिल्या. या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी उपस्थित महिला दक्षता समितीच्या सदस्यांशी विविध विषयांवर संवाद साधला. महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तसेच ठाणेदार रवींद्र मस्कर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी किरण नागरीकर, निलीमा नागोसे, निशा जांभुळे, वैशाली पेंदाम, मंजुषा समर्थ, अर्चना मोटघरे, वैशाली खंडारे आणि संयोगिता बांबोळे उपस्थित होत्या.1
- दिल्लीतील आंदोलनाला यश मिळाल्यानंतर वर्ध्याच्या हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या बॅनरखाली युवकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत विजय जल्लोष साजरा केला. सरकारचा निर्णय हा जनतेच्या संघर्षाचा विजय असल्याचे सांगत युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, संघटित आणि शांततापूर्ण आंदोलनामुळे अखेर सरकारला युवकांच्या आवाजासमोर झुकावे लागले आणि आपला निर्णय बदलावा लागला. हा विजय लोकशाहीचा असून तो केवळ एका संघटनेचा नसून सर्वसामान्य जनता आणि युवकांच्या एकजुटीच्या संघर्षाचे फळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या आनंदात युवकांनी एकमेकांना मिठाई भरवून अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी जनतेच्या समस्या आणि युवकांच्या हितासाठी भविष्यातही लोकशाही मार्गाने अशाच प्रकारे आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पार पडलेल्या या विजय उत्सवाने शहरवासीयांचेही विशेष लक्ष वेधून घेतले.1
- अलिबाग शहरातील बाजारपेठेत आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडी सोहळ्यात अलिबाग येथील स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बाजारपेठ परिसरात आयोजित करण्यात आलेला हा दिंडी सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.1