भरती प्रक्रियासंबंधी अभिप्राय पाठवा* विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांचे आवाहन ,भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती १६ सप्टेंबरला नागपुरात *नागपूर, दि. १३* : भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा नागपूर येथील संवाद कार्यक्रमाच्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्य बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे भेट देणार आहेत. राज्यातील स्पर्धा परीक्षार्थींच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रक्रियेत नागपूर महसूल विभागातील सर्व संबंधित घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या सूचना व अभिप्राय समितीसमोर सादर करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले. विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभाकक्षात याबाबत आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड तसेच माहिती व जनसंपर्क कार्यालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी मनपा तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीनुसार, राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी, नागरिक आणि अन्य संबंधित घटकांकडून परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्य बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, सिव्हिल लाईन्स येथे कामकाजाच्या अनुषंगाने भेट देणार आहेत. त्यापूर्वी नागपूर विभागातील संबंधित घटकांकडून सूचना व अभिप्राय संकलित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. सूचना व अभिप्राय निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्याकडे सादर करता येतील. प्रत्यक्ष सूचना निवासी उपजिल्हाधिकारी यांची स्वीय शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे स्वीकारण्यात येतील. तसेच ई-मेलवरही लेखी अभिप्राय पाठविता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांनी विहित मुदतीत ई-मेलद्वारे आपले अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यमान परीक्षा प्रणाली व विविध विभाग, प्राधिकरणे तसेच परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या कार्यपद्धतीचा आढावा, परीक्षा अधिक सुरक्षित, निष्पक्ष, पारदर्शक व उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून निकाल प्रक्रियेपर्यंतची सुरक्षा, प्रश्नपत्रिकेचे मॉडरेशन, डिजिटल अथवा मुद्रित वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, प्रतिसाद नोंदणी आणि मूल्यांकन याबाबत सूचना अपेक्षित आहेत. तसेच बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल्स आणि सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पेपरफुटी, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय व उत्तरदायित्व निश्चित करणे याबाबतही अभिप्राय मागविण्यात आले आहेत. इतर राज्ये अथवा देशांतील यशस्वी व आधुनिक परीक्षा पद्धतींचा अभ्यास, परीक्षा केंद्रांसाठी किमान पायाभूत व सुरक्षा मानके, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग आणि परीक्षा संस्थांमधील समन्वय तसेच उमेदवारांसाठी जलद व पारदर्शक तक्रार निवारण प्रणाली याबाबतही सूचना देता येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहेत. समिती या सूचना व शिफारशींचा सखोल अभ्यास करून राज्य शासनाला सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे. यासाठी सर्व संबंधित घटकांनी आपल्या सूचना व अभिप्राय समिती समोर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भरती प्रक्रियासंबंधी अभिप्राय पाठवा* विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांचे आवाहन ,भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती १६ सप्टेंबरला नागपुरात *नागपूर, दि. १३* : भरती परीक्षा पद्धतीच्या सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा नागपूर येथील संवाद कार्यक्रमाच्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्य बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, सदर पोलीस स्टेशनच्या मागे, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे भेट देणार आहेत. राज्यातील स्पर्धा परीक्षार्थींच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रक्रियेत नागपूर महसूल विभागातील सर्व संबंधित घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या सूचना व अभिप्राय समितीसमोर सादर करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केले. विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभाकक्षात याबाबत आढावा बैठक घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड तसेच माहिती व जनसंपर्क कार्यालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी मनपा तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीनुसार, राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी, नागरिक आणि अन्य संबंधित घटकांकडून परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्य बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, सिव्हिल लाईन्स येथे कामकाजाच्या अनुषंगाने भेट देणार आहेत. त्यापूर्वी नागपूर विभागातील संबंधित घटकांकडून सूचना व अभिप्राय संकलित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. सूचना व अभिप्राय निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्याकडे सादर करता येतील. प्रत्यक्ष सूचना निवासी उपजिल्हाधिकारी यांची स्वीय शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे स्वीकारण्यात येतील. तसेच ई-मेलवरही लेखी अभिप्राय पाठविता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या नागरिकांनी विहित मुदतीत ई-मेलद्वारे आपले अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यमान परीक्षा प्रणाली व विविध विभाग, प्राधिकरणे तसेच परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या कार्यपद्धतीचा आढावा, परीक्षा अधिक सुरक्षित, निष्पक्ष, पारदर्शक व उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून निकाल प्रक्रियेपर्यंतची सुरक्षा, प्रश्नपत्रिकेचे मॉडरेशन, डिजिटल अथवा मुद्रित वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, प्रतिसाद नोंदणी आणि मूल्यांकन याबाबत सूचना अपेक्षित आहेत. तसेच बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल्स आणि सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, पेपरफुटी, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय व उत्तरदायित्व निश्चित करणे याबाबतही अभिप्राय मागविण्यात आले आहेत. इतर राज्ये अथवा देशांतील यशस्वी व आधुनिक परीक्षा पद्धतींचा अभ्यास, परीक्षा केंद्रांसाठी किमान पायाभूत व सुरक्षा मानके, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग आणि परीक्षा संस्थांमधील समन्वय तसेच उमेदवारांसाठी जलद व पारदर्शक तक्रार निवारण प्रणाली याबाबतही सूचना देता येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहेत. समिती या सूचना व शिफारशींचा सखोल अभ्यास करून राज्य शासनाला सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे. यासाठी सर्व संबंधित घटकांनी आपल्या सूचना व अभिप्राय समिती समोर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- धान उत्पादक शेतकऱ्यांच्या २० हजार रुपयांच्या बोनसचा प्रश्न अधांतरी; शासन निर्णयानंतरही मदत खात्यात जमा नाहीच गोंदिया/भंडारा: महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेला प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस नऊ महिने उलटूनही बँक खात्यात जमा न झाल्याने विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाकडून धान उत्पादकांना हेक्टरी २०,००० रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने १८०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूदही केली होती, मात्र प्रत्यक्षात ही रक्कम अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. प्रहार संघटनेचे आंदोलन व शेतकऱ्यांची मागणी बोनसची हक्काची रक्कम तात्काळ खात्यात वर्ग करण्यात यावी, यासाठी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत 'प्रहार जनशक्ती संघटने'च्या वतीने निदर्शने व आंदोलने करण्यात आली आहेत. शासनाने शासन निर्णय (GR) काढून निधी निश्चित केल्यानंतरही वितरण प्रक्रिया थांबल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सध्या या बोनसबाबत राजकीय क्षेत्रात दोन वेगळे प्रवाह पाहायला मिळत आहेत: * निधीच्या कमतरतेची भीती: राज्य सरकारकडून राबवली जाणारी कर्जमाफी, 'लाडकी बहीण योजना', 'पीएम किसान' आणि 'नमो शेतकरी महासन्मान निधी' या योजनांमुळे तिजोरीवर भार असून यंदा धान बोनस मिळणार नाही, असा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. * महायुतीचा दावा: महायुतीतील लोकप्रतिनिधी आणि घटक पक्षांचे नेते मात्र हा बोनस शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळेल, अशी भूमिका मांडत आहेत. इतर प्रलंबित समस्या आणि ई-पीक पाहणी धान बोनसच्या मुद्द्यासोबतच ग्रामीण भागातील खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला आहे. याशिवाय, शासनाच्या नवीन अपडेटनुसार शेतकऱ्यांना स्वतःच्या 'फार्मर आयडी' (Farmer ID) द्वारे 'ई-पीक पाहणी'ची नोंदणी करावी लागणार आहे. शासनाने दिलेला शब्द पाळून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम तात्काळ जमा करावी, अशी आग्रही मागणी आता झाडीबोली पट्ट्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.1
- कु.रविना रवी रंगारी हिचा सत्कार एकोडी येथील रहिवासी कु.रविना रवि रंगारी ही पवित्र पोर्टल अंतर्गत रयत शिक्षण संस्था सातारा येथे क्रीडा शिक्षकम्हणून नियुक्ती झाली त्या करिता नवनिकेतन नाट्य कला संच एकोडी च्या वतीने घरी जाऊन रविना चा स्मृती चिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. रविना ही अत्यंत मेहनती मुलगी लहानपनापासून क्रीडा क्षेत्राची आवड, धनुर्विद्या तिचा आवडता खेळ व त्या खेळात ती राष्ट्रीय पातळीपर्यत खेडायला गेली आई वडिलांचे संस्कार , कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने बोलणे हा तिचा स्वभाव सर्वांना आवडत असतो त्या निमित्ताने तिच्या मेहनतीने जिद्द चिकाटीने तिने पवित्र पोर्टल अंतर्गत सातारा येथे क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. सत्कार करतांना नवनिकेतन नाट्य कला संचाचे पदाधिकारी कलावंत ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, सुकराम बन्सोड, कमलाकर चांदेवार,एकनाथ कोटांगले, फिरोज कोटांगले, टिकाराम द्रगकर, राधेश्याम चौधरी,अमित भैसारे,कैलास जांभूळकर,कार्तिक मेश्राम, संदिप कोटांगले, पूरणदास निपाने, रंजना रंगारी, रवीकुमार रंगारी उपस्थित होते.1
- डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, पुसद वसंत नगर पोलीसांची कारवाई डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे व कर्णकर्कश आवाजावर बंदी असताना नियमांचे उल्लंघन करणारे वाहन पुसद वसंतनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात डीजेचे १० मोठे स्पीकर बॉक्स व बँजोचे साहित्य जप्त केले १४ सप्टेंबर रोजी दुपारी नवीन पुसद येथील एका मंडळाकडे डीजे वाजविण्यासाठी जात असताना एमएच २९ एम बारा ७१ क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. चालक नारायण पांढरे व मालक नरेश खंडागळे यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.1
- भंडारा में ध्वनि प्रदूषण और यातायात नियमों के उल्लंघन को लेकर पुलिस ने डीजे वाहन पर कारवाई की है। गणेश चतुर्थी के मद्देनजर पुलिस प्रशासन द्वारा जिले के सभी गणेश मंडलों को तेज आवाज वाले डीजे और धुमाल का इस्तेमाल नहीं करने की स्पष्ट सूचना दी गई थी। 14 सितंबर 2026 को गणेश प्रतिमा स्थापना के दौरान भंडारा पुलिस की पेट्रोलिंग टीम को झूलेलाल चौक में एक बड़ा डीजे वाहन खड़ा दिखाई दिया। वाहन से यातायात में बाधा उत्पन्न हो रही थी और कुछ ही समय में डीजे बजाने की तैयारी थी। पुलिस ने तत्काल वाहन चालक को हिरासत में लेकर पूछताछ की। चालक ने अपना नाम जांभोरा निवासी दिनेश सुरेश सपाटे उम्र 32 वर्ष बताया। पूछताछ में उसने बताया कि झूलेलाल चौक स्थित विघ्नहर्ता गणेश मंडल के अध्यक्ष राजेश गंगवानी ने ₹25,000 में यह डीजे वाहन गणेश स्थापना के लिए बुलाया था। जांच में वाहन के लिए आवश्यक परिवहन अनुमति नहीं मिली। साथ ही बड़े स्पीकर लगाकर वाहन मॉडिफाई किया जाने की बात सामने आई। इसके बाद चालक मालिक, मंडल अध्यक्ष और अन्य सदस्यों के खिलाफ भंडारा पुलिस स्टेशन में विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस ने डीजे वाहन डिटेन कर आगे की कारवाई के लिए आरटीओ को पत्र भेजा है। पुलिस ने सभी गणेश मंडलों से नियमों का पालन करने की अपील की है। भंडारा में ध्वनि प्रदूषण और यातायात नियमों के उल्लंघन को लेकर पुलिस ने डीजे वाहन पर कारवाई की है। गणेश चतुर्थी के मद्देनजर पुलिस प्रशासन द्वारा जिले के सभी गणेश मंडलों को तेज आवाज वाले डीजे और धुमाल का इस्तेमाल नहीं करने की स्पष्ट सूचना दी गई थी। 14 सितंबर 2026 को गणेश प्रतिमा स्थापना के दौरान भंडारा पुलिस की पेट्रोलिंग टीम को झूलेलाल चौक में एक बड़ा डीजे वाहन खड़ा दिखाई दिया। वाहन से यातायात में बाधा उत्पन्न हो रही थी और कुछ ही समय में डीजे बजाने की तैयारी थी। पुलिस ने तत्काल वाहन चालक को हिरासत में लेकर पूछताछ की। चालक ने अपना नाम जांभोरा निवासी दिनेश सुरेश सपाटे उम्र 32 वर्ष बताया। पूछताछ में उसने बताया कि झूलेलाल चौक स्थित विघ्नहर्ता गणेश मंडल के अध्यक्ष राजेश गंगवानी ने ₹25,000 में यह डीजे वाहन गणेश स्थापना के लिए बुलाया था। जांच में वाहन के लिए आवश्यक परिवहन अनुमति नहीं मिली। साथ ही बड़े स्पीकर लगाकर वाहन मॉडिफाई किया जाने की बात सामने आई। इसके बाद चालक मालिक, मंडल अध्यक्ष और अन्य सदस्यों के खिलाफ भंडारा पुलिस स्टेशन में विविध धाराओं के तहत मामला दर्ज किया गया। पुलिस ने डीजे वाहन डिटेन कर आगे की कारवाई के लिए आरटीओ को पत्र भेजा है। पुलिस ने सभी गणेश मंडलों से नियमों का पालन करने की अपील की है।1
- गावाच्या विकासा करीता काम करण्याचे प्रयत्न - शितल राजुरकर ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचे प्रयत्न भिवापूर (shuru ॲप ) नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे. सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली ) अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.1
- खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर चार लोग फंसे अचानक बारिश से झरने का बढ़ा पानी, बीच में फंसे नागपुर के चार लोग छिंदवाड़ा: खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर नागपुर से घूमने गए चार लोग अचानक बढ़े झरने के पानी के बीच फंस गए। बताया जा रहा है कि अचानक हुई तेज बारिश के कारण झरने में पानी का बहाव बढ़ गया, जिससे चारों लोग बीच में ही फंस गए। खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर चार लोग फंसे अचानक बारिश से झरने का बढ़ा पानी, बीच में फंसे नागपुर के चार लोग छिंदवाड़ा: खोपड़ी कपड़ा पिकनिक स्पॉट पर नागपुर से घूमने गए चार लोग अचानक बढ़े झरने के पानी के बीच फंस गए। बताया जा रहा है कि अचानक हुई तेज बारिश के कारण झरने में पानी का बहाव बढ़ गया, जिससे चारों लोग बीच में ही फंस गए। घटना की सूचना मिलते ही उन्हें सुरक्षित बाहर निकालने के लिए रेस्क्यू शुरू किया गया। करीब एक से दो घंटे की मशक्कत के बाद चारों लोगों को सुरक्षित बाहर निकाल लिया गया। बारिश के मौसम में पिकनिक स्पॉट पर सावधानी बरतने की अपील की गई है।1
- बॅगेत काय होतं? ‘राजा’ कोण? आणि वरिष्ठ अधिकारी मौन का बाळगत आहेत? कचऱ्यातील बॅगेचं रहस्य, ‘राजा’ची चर्चा आणि प्रशासनावर मोठे सवाल! कामठी शहरात सध्या दोन चर्चित प्रकरणांनी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. कळमना मार्गावर कचरा वेचणाऱ्या मुलांना कथितरित्या रोख रक्कम आणि आक्षेपार्ह वस्तू असलेली बॅग सापडल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, ‘कलेक्शन एजंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीबाबत विविध चर्चा आणि आरोप समोर येत आहेत. यासोबतच दारू, रेती, मुरूम, गिट्टी, गोवंश तस्करी आणि कोळशाच्या कथित अवैध कारोबारांबाबत नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ⚠️ महत्त्वाची सूचना: या व्हिडिओमधील माहिती वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित बातम्या, स्थानिक चर्चा आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलेल्या प्रश्नांवर आधारित आहे. Public To PM News 24 कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवत नाही. संबंधित बाबींवर निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, हीच अपेक्षा आहे. #Kamthi #KamthiNews #BreakingNews #KamthiPolice #NagpurNews #MaharashtraNews #Investigation #LocalNews #CrimeNews #KamthiUpdate #PublicVoice #TrendingNews #ViralNews #QuestionToAdministration #GroundReport #NewsAlert #LatestNews #KamthiCity #Jb Sharma1
- 17 अतिक्रमण धारकांचे पक्के घरे असल्याची सरपंच राजुरकर यांची माहिती पत्रपरिषदेत दाखविले पक्के घरांचे फोटो व कागदपत्रे अतिक्रमण धारकांनी झोपडी ( कुणीही राहत नाही ), गुराचा गोठा तयार केला भिवापूर (shuru ॲप ) नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे. सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली ) अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.1