logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जकराया साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल न दिल्यास कारखान्यासमोर तीव्र आंदोलन करणार. :- अनिल पाटील. मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल अद्याप दिले नाही कारखान्याला ऊस नेल्यापासून 14 दिवसाच्या आज शेतकऱ्यांना ऊस बिल देणे बंधनकारक असतानाही दिले नाही. बँकांचे हप्ते गेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याला मार्च एंड चा आर्थिक फटका सहन करावा लागला. साखर कारखान्याने त्वरित ऊस बिल न दिल्यास साखर कारखान्यासमूर्तीवर आंदोलन करण्याचा इशारा डिजिटल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल पाटील यांनी दिला आहे.

5 hrs ago
user_गो.रा.  कुंभार
गो.रा. कुंभार
मोहोळ, सोलापूर, महाराष्ट्र•
5 hrs ago

जकराया साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल न दिल्यास कारखान्यासमोर तीव्र आंदोलन करणार. :- अनिल पाटील. मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिल अद्याप दिले नाही कारखान्याला ऊस नेल्यापासून 14 दिवसाच्या आज शेतकऱ्यांना ऊस बिल देणे बंधनकारक असतानाही दिले नाही. बँकांचे हप्ते गेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याला मार्च एंड चा आर्थिक फटका सहन करावा लागला. साखर कारखान्याने त्वरित ऊस बिल न दिल्यास साखर कारखान्यासमूर्तीवर आंदोलन करण्याचा इशारा डिजिटल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल पाटील यांनी दिला आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • लातूर शहरात वाहतुकीचे शिस्तबद्ध नियमन करणे, ध्वनीप्रदूषणावर आळा घालणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी लातूर पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः बुलेट मोटार सायकलींना अनधिकृतरित्या बसविण्यात येणारे मोडिफाईड (फटाका आवाज करणारे) सायलेंसर वापरणाऱ्या वाहनधारकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दि. ०४/०४/२०२६ रोजी लातूर शहरात मोठा आवाज करणारे फटाका सायलेंसर बसविलेल्या बुलेट वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांत खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १) बुलेट मोटार सायकल क्र. MH-24 CC 0229 चे मालक वैजनाथ चंद्रसेन घोडके (वय २२ वर्षे, रा. एकुर्गा, ता. जि. लातूर) यांनी वाहनामध्ये अनधिकृत बदल करून कर्णकर्कश आवाजाचा मोडिफाईड सायलेंसर बसविला होता. सदर वाहन चालक किशोर सुरेश लाळगे (वय २९ वर्षे, रा. हरंगुळ बु., ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन एमआयडीसी, लातूर येथे भारतीय न्याय संहिता २०२३ व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २) बुलेट वाहन क्र. MH-24 BF 0833 चे चालक व मालक सुनील गुरुनाथ बिराजदार (वय ३८ वर्षे, रा. ताजपूर, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ३) बुलेट वाहन क्र. MH-24 AM 1777 चे चालक आलेश व्यंकट सुरवसे (वय २१ वर्षे, रा. चिकुर्डा, ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४) बुलेट वाहन क्र. MH-24 BD 5703 चे चालक प्रणव प्रताप गरड (वय २१ वर्षे, रा. मासुर्डी, ता. औसा, जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे कारवाई करण्यात आली आहे. ५) बुलेट वाहन क्र. MH-24 AQ 4042 चे चालक प्रेम भास्कर चव्हाण (रा. प्रकाश नगर, लातूर) यांच्याविरुद्धही संबंधित कायद्यान्वये पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६)बुलेट मोटार सायकल क्र. MH-14 BG 3121 चे चालक तेजस भास्कर केंद्रे (वय ३३ वर्षे, रा. डोंगरपिंपळा, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याने सदर वाहनाला अनधिकृतरित्या बदल केलेला (मोडिफाईड) सायलेंसर बसविण्यात आला होता. ध्वनी मापन यंत्राद्वारे तपासणी केली असता १०१.७ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला, जो निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ व मोटार वाहन कायद्यांतर्गत पोलीस ठाणे गांधी चौक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७) दिपक दिलीप नवले (वय ३३ वर्षे, रा. चिंचोली (ब), ता. जि. लातूर) याने बुलेट मोटार सायकल क्र. MH-24 BF 6983 ही धोकादायक पद्धतीने चालविताना आढळून आला. सदर वाहनालाही अनधिकृतरित्या मोडिफाईड सायलेंसर बसविण्यात आलेला असून संबंधित कायद्यांनुसार पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८)बालाजी विशवनाथ कांबळे वय 45 वर्ष,राहणार गांधी नगर, उदगीर याने त्याची बुलेट क्र MH 24 BQ 3740 ही इतरांचे जिविताला घोका निर्माण होईल अशा भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाने वाहन चालवुन अनाधिकृतरित्या बदल केलेले मॉडीफाय सायलेन्सर बसून दोन्ही प्रदूषण केले म्हणून पोलीस ठाणे उदगीर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील सर्व प्रकरणांमध्ये संबंधित वाहनधारकांनी सार्वजनिक रस्त्यावर भरधाव वेगात, निष्काळजीपणे व धोकादायक पद्धतीने वाहन चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे आढळून आले. तसेच वाहनांमध्ये अनधिकृतरित्या मोडिफाईड सायलेंसर बसवून कर्णकर्कश आवाज निर्माण करण्यात येत होता. ध्वनी मापन यंत्राद्वारे (डेसीबल मीटर) तपासणी केली असता आवाजाची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले असल्याने वरनमूद आरोपी विरुद्ध कलम 281 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 184,198 मोटार वाहन कायदा, केंद्रीय मोटार बाहन अधिनियम 1989 चे कलम 120 प्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे. या प्रकारामुळे विशेषतः वयोवृद्ध नागरिक, महिला, बालके, तसेच हृदयविकार व इतर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कडक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गित्ते, पोउपनि माधव केंद्रे तसेच वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला. लातूर पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या दुचाकी वाहनांमध्ये कंपनीने दिलेले मूळ सायलेंसरच वापरावेत. कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बदल करू नयेत किंवा मोडिफाईड सायलेंसर बसवू नयेत. ही मोहीम पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई कायम सुरू राहणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व शांततामय वातावरण राखण्यासाठी लातूर पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे.
    1
    लातूर शहरात वाहतुकीचे शिस्तबद्ध नियमन करणे, ध्वनीप्रदूषणावर आळा घालणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी लातूर पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः बुलेट मोटार सायकलींना अनधिकृतरित्या बसविण्यात येणारे मोडिफाईड (फटाका आवाज करणारे) सायलेंसर वापरणाऱ्या वाहनधारकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण तसेच  उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत दि. ०४/०४/२०२६ रोजी लातूर शहरात मोठा आवाज करणारे फटाका सायलेंसर बसविलेल्या बुलेट वाहनांवर कडक कारवाई करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यांत खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१) बुलेट मोटार सायकल क्र. MH-24 CC 0229 चे मालक वैजनाथ चंद्रसेन घोडके (वय २२ वर्षे, रा. एकुर्गा, ता. जि. लातूर) यांनी वाहनामध्ये अनधिकृत बदल करून कर्णकर्कश आवाजाचा मोडिफाईड सायलेंसर बसविला होता. सदर वाहन चालक किशोर सुरेश लाळगे (वय २९ वर्षे, रा. हरंगुळ बु., ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन एमआयडीसी, लातूर येथे भारतीय न्याय संहिता २०२३ व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२) बुलेट वाहन क्र. MH-24 BF 0833 चे चालक व मालक सुनील गुरुनाथ बिराजदार (वय ३८ वर्षे, रा. ताजपूर, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
३) बुलेट वाहन क्र. MH-24 AM 1777 चे चालक आलेश व्यंकट सुरवसे (वय २१ वर्षे, रा. चिकुर्डा, ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४) बुलेट वाहन क्र. MH-24 BD 5703 चे चालक प्रणव प्रताप गरड (वय २१ वर्षे, रा. मासुर्डी, ता. औसा, जि. लातूर) यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे कारवाई करण्यात आली आहे.
५) बुलेट वाहन क्र. MH-24 AQ 4042 चे चालक प्रेम भास्कर चव्हाण (रा. प्रकाश नगर, लातूर) यांच्याविरुद्धही संबंधित कायद्यान्वये पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
६)बुलेट मोटार सायकल क्र. MH-14 BG 3121 चे चालक तेजस भास्कर केंद्रे (वय ३३ वर्षे, रा. डोंगरपिंपळा, ता. अंबाजोगाई, जि. बीड) याने सदर वाहनाला अनधिकृतरित्या बदल केलेला (मोडिफाईड) सायलेंसर बसविण्यात आला होता. ध्वनी मापन यंत्राद्वारे तपासणी केली असता १०१.७ डेसिबल इतका आवाज नोंदविण्यात आला, जो निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ व मोटार वाहन कायद्यांतर्गत पोलीस ठाणे गांधी चौक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
७) दिपक दिलीप नवले (वय ३३ वर्षे, रा. चिंचोली (ब), ता. जि. लातूर) याने बुलेट मोटार सायकल क्र. MH-24 BF 6983 ही धोकादायक पद्धतीने चालविताना आढळून आला. सदर वाहनालाही अनधिकृतरित्या मोडिफाईड सायलेंसर बसविण्यात आलेला असून संबंधित कायद्यांनुसार पोलीस ठाणे गांधी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८)बालाजी विशवनाथ कांबळे वय 45 वर्ष,राहणार गांधी नगर, उदगीर याने त्याची बुलेट क्र MH 24 BQ 3740 ही इतरांचे जिविताला घोका निर्माण होईल अशा भरधाव वेगात हयगय व निष्काळजीपणाने वाहन चालवुन अनाधिकृतरित्या बदल केलेले मॉडीफाय सायलेन्सर बसून दोन्ही प्रदूषण केले म्हणून पोलीस ठाणे उदगीर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
वरील सर्व प्रकरणांमध्ये संबंधित वाहनधारकांनी सार्वजनिक रस्त्यावर भरधाव वेगात, निष्काळजीपणे व धोकादायक पद्धतीने वाहन चालवून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे आढळून आले. तसेच वाहनांमध्ये अनधिकृतरित्या मोडिफाईड सायलेंसर बसवून कर्णकर्कश आवाज निर्माण करण्यात येत होता. ध्वनी मापन यंत्राद्वारे (डेसीबल मीटर) तपासणी केली असता आवाजाची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले असल्याने वरनमूद आरोपी विरुद्ध कलम 281 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 184,198 मोटार वाहन कायदा, केंद्रीय मोटार बाहन अधिनियम 1989 चे कलम 120 प्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे.
या प्रकारामुळे विशेषतः वयोवृद्ध नागरिक, महिला, बालके, तसेच हृदयविकार व इतर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही कडक कारवाई करण्यात येत आहे.
या मोहिमेत वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, पोलीस ठाणे गांधी चौक चे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गित्ते, पोउपनि माधव केंद्रे तसेच वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
लातूर पोलीस दलातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या दुचाकी वाहनांमध्ये कंपनीने दिलेले मूळ सायलेंसरच वापरावेत. कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बदल करू नयेत किंवा मोडिफाईड सायलेंसर बसवू नयेत. ही मोहीम पुढील काळात अधिक तीव्र करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई कायम सुरू राहणार आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व शांततामय वातावरण राखण्यासाठी लातूर पोलीस दल सदैव कटिबद्ध आहे.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • बारामती तालुक्यातील पणदरे धुमाळवाडी भिकोबा नगर या ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले यावेळी युवा नेते जय पवारांनी त्यांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले
    1
    बारामती तालुक्यातील  पणदरे धुमाळवाडी भिकोबा नगर या ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले यावेळी युवा नेते जय पवारांनी त्यांची भेट घेऊन त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • --- (प्रतिनिधी) :- आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील सुपुत्र व नवी मुंबई पनवेल येथून दैनिक युवक आधारच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संपादक संतोष शिवदास आमले यांना World Cultural and Educational Organisation तर्फे ‘Honorary Doctorate Award’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळाल्याने परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर संस्था भारत सरकार मान्यताप्राप्त असून, संस्थेच्या मूल्यांकन मंडळाने संचालक व अध्यक्ष यांच्या अधिकाराने हा सन्मान जाहीर केला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे निष्ठावान, धडाडीचे व समाजाभिमुख कार्य लक्षात घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आमले यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत सामान्य जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यांच्या लेखणीने समाजप्रबोधन घडवून आणत जनजागृतीची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘दैनिक युवक आधार’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, विविध वर्तमानपत्रांमध्ये उपसंपादक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम पाहिले आहे. सध्या ते नवी मुंबई, पनवेल येथे वास्तव्यास असून ‘दैनिक युवक आधार’चे सर्व कामकाज ते समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि जनहिताचा ध्यास स्पष्टपणे दिसून येतो. पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता समाजसेवेचे प्रभावी साधन म्हणून त्यांनी जपले आहे. या सन्मानामुळे अंभोरा गावासह आष्टी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संतोष आमले यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळत असून, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.
    1
    ---
(प्रतिनिधी) :- आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील सुपुत्र व नवी मुंबई पनवेल येथून दैनिक युवक आधारच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे  संपादक संतोष शिवदास आमले यांना World Cultural and Educational Organisation तर्फे ‘Honorary Doctorate Award’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळाल्याने परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर संस्था भारत सरकार मान्यताप्राप्त असून, संस्थेच्या मूल्यांकन मंडळाने संचालक व अध्यक्ष यांच्या अधिकाराने हा सन्मान जाहीर केला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे निष्ठावान, धडाडीचे व समाजाभिमुख कार्य लक्षात घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आमले यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत सामान्य जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यांच्या लेखणीने समाजप्रबोधन घडवून आणत जनजागृतीची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘दैनिक युवक आधार’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, विविध वर्तमानपत्रांमध्ये उपसंपादक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम पाहिले आहे. सध्या ते नवी मुंबई, पनवेल येथे वास्तव्यास असून ‘दैनिक युवक आधार’चे सर्व कामकाज ते समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि जनहिताचा ध्यास स्पष्टपणे दिसून येतो. पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता समाजसेवेचे प्रभावी साधन म्हणून त्यांनी जपले आहे. या सन्मानामुळे अंभोरा गावासह आष्टी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संतोष आमले यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळत असून, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • एकाच अखंड हरिनाम सप्ताहातील दोन कीर्तनकारांची वेगवेगळ्या स्टाईलने एन्ट्री तुम्हाला कोणती आवडली हे नक्की कमेंट करून सांगा.
    1
    एकाच अखंड हरिनाम सप्ताहातील दोन कीर्तनकारांची वेगवेगळ्या स्टाईलने एन्ट्री तुम्हाला कोणती आवडली हे नक्की कमेंट करून सांगा.
    user_Hanumant Shinde
    Hanumant Shinde
    Voice of people बीड, बीड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • वडवणी प्रतिनिधी - आज दिनांक ५/४/२०२६ रविवार रोजी वडवणी शहरात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरराव आंधळे, शिवाजी सानप , मंच्छिद्रनाथ झाटे, संजय आंधळे उपस्थित होते.
    1
    वडवणी प्रतिनिधी - आज दिनांक ५/४/२०२६ रविवार रोजी वडवणी शहरात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरराव आंधळे, शिवाजी सानप , मंच्छिद्रनाथ झाटे, संजय आंधळे उपस्थित होते.
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    10 hrs ago
  • उदगीर शहरातील गांधी नगर व मुसा नगर परिसरात ४ एप्रिलच्या रात्री अचानक तुफान दगडफेक, दोन गटात राडा !! जवळपास 50 लोकांवर गुन्हा दाखल!! पोलिसाच्या जीपचेही मोठे नुकसान!! उदगीर (एल पी उगीले) उदगीर शहरातील गांधीनगर व मुसा नगर परिसरातील दोन गटांमध्ये अचानक वाद उसळल्याने तुफान दगडफेक झाली. याप्रकरणी उसळलेल्या दंगलीला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली खरी मात्र चिडलेल्या जमावाने चक्क पोलीस गाडीवर प्रचंड दगडफेक करून पोलिसाच्या जीपचे मोठे नुकसान केले.  याप्रकरणी पोलिस अंमलदार सतीश भानुदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 99 /26 कलम 132, 121 (1), 125 (A), 189 (2), 191 (2)(3), 190, 324 (3) भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगाने तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 व सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी आरोपी आजम असलम जहागीरदार, आसिफ शेख लातूरकर, शार्दुल रशीद शेख, आशा उर्फ असलम शेख, रोशन ताजुद्दीन शेख (बिलाल), मोहित जागीरदार, जाकीर जागीरदार, बाबर शेख, आरिफ शेख, एजाज फारुख शेख, मोहेल लाला शेख, साहिल लाला शेख, मोईन हैदरसाब शेख, जुबेर मुसा शेख, इब्राहिम मुसा शेख, फिरोज ताहेर शेख, मोहसीन मकदुल मौलासाब शेख, मोहेल शेख, बबलू उर्फ मोहम्मद रफी, सोहेल लाईक लदाफ, वजीर मोईदिन शेख, दस्तगीर मोईदिन शेख, रईस बासू पटेल, सईद मुस्ताक जागीरदार, रोहित मुस्ताम जागीरदार, आदिल नजीर शेख, मोनू कालिया, मुज्जू कडबेवाल, गौस हकानी शेख, अयाज इस्माईल शेख उर्फ वाळूवाला, साहिल चांद पाशा मणियार, सय्यद बलीम अली, सय्यद अलीम इस्माईल, शेख इरफान इम्तियाज, किशोर ईश्वर मोतीराम, दिनेश धीरज कांबळे, सुमित कांबळे, या 37 व्यक्ती शिवाय इतर आठ ते दहा जण असा उल्लेख तक्रारीत करण्यात आलेला आहे.  पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की दिनांक चार एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मौलाना आझाद शाळेजवळ मुसा नगरी येथे आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून तसेच जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून तसेच शासकीय जीपवर दगडफेक करून फिर्यादी जखमी करून सोबतचे सहकारी यांना शासकीय काम करत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलीस जीपचे अंदाजे 15000 रुपयांचे नुकसान केले आहे वगैरे प्रमाणे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील उदगीर शहर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करत आहेत. प्रथमदर्शनी किरकोळ कारणांवरून घडलेल्या या घटनेमुळे  परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडफेकीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडांचा खच आढळून आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    4
    उदगीर शहरातील गांधी नगर व मुसा नगर परिसरात ४ एप्रिलच्या रात्री अचानक तुफान दगडफेक, दोन गटात राडा !! जवळपास 50 लोकांवर गुन्हा दाखल!! पोलिसाच्या जीपचेही मोठे नुकसान!!
उदगीर (एल पी उगीले) उदगीर शहरातील गांधीनगर व मुसा नगर परिसरातील दोन गटांमध्ये अचानक वाद उसळल्याने तुफान दगडफेक झाली. याप्रकरणी उसळलेल्या दंगलीला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली खरी मात्र चिडलेल्या जमावाने चक्क पोलीस गाडीवर प्रचंड दगडफेक करून पोलिसाच्या जीपचे मोठे नुकसान केले. 
याप्रकरणी पोलिस अंमलदार सतीश भानुदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 99 /26 कलम 132, 121 (1), 125 (A), 189 (2), 191 (2)(3), 190, 324 (3) भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगाने तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 व सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याप्रकरणी आरोपी आजम असलम जहागीरदार, आसिफ शेख लातूरकर, शार्दुल रशीद शेख, आशा उर्फ असलम शेख, रोशन ताजुद्दीन शेख (बिलाल), मोहित जागीरदार, जाकीर जागीरदार, बाबर शेख, आरिफ शेख, एजाज फारुख शेख, मोहेल लाला शेख, साहिल लाला शेख, मोईन हैदरसाब शेख, जुबेर मुसा शेख, इब्राहिम मुसा शेख, फिरोज ताहेर शेख, मोहसीन मकदुल मौलासाब शेख, मोहेल शेख, बबलू उर्फ मोहम्मद रफी, सोहेल लाईक लदाफ, वजीर मोईदिन शेख, दस्तगीर मोईदिन शेख, रईस बासू पटेल, सईद मुस्ताक जागीरदार, रोहित मुस्ताम जागीरदार, आदिल नजीर शेख, मोनू कालिया, मुज्जू कडबेवाल, गौस हकानी शेख, अयाज इस्माईल शेख उर्फ वाळूवाला, साहिल चांद पाशा मणियार, सय्यद बलीम अली, सय्यद अलीम इस्माईल, शेख इरफान इम्तियाज, किशोर ईश्वर मोतीराम, दिनेश धीरज कांबळे, सुमित कांबळे, या 37 व्यक्ती शिवाय इतर आठ ते दहा जण असा उल्लेख तक्रारीत करण्यात आलेला आहे. 
पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की दिनांक चार एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मौलाना आझाद शाळेजवळ मुसा नगरी येथे आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून तसेच जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून तसेच शासकीय जीपवर दगडफेक करून फिर्यादी जखमी करून सोबतचे सहकारी यांना शासकीय काम करत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलीस जीपचे अंदाजे 15000 रुपयांचे नुकसान केले आहे वगैरे प्रमाणे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील उदगीर शहर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करत आहेत.
प्रथमदर्शनी किरकोळ कारणांवरून घडलेल्या या घटनेमुळे  परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दगडफेकीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडांचा खच आढळून आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.
परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.. येत्या दोन दिवसात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे देखील पत्रात अभिजित बिचुकले म्हणाले आहेत...
    1
    बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे या निवडणुकीसाठी अभिजीत बिचुकले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.. येत्या दोन दिवसात भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचे देखील पत्रात अभिजित बिचुकले म्हणाले आहेत...
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • वडवणी प्रतिनिधी. दिनांक ५/४/२०२६ रविवार रोजी वडवणी शहरात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न
    1
    वडवणी प्रतिनिधी. दिनांक ५/४/२०२६ रविवार रोजी 
वडवणी शहरात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    10 hrs ago
  • --- अनाधिकृत पुतळे उभारून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी.. बीड जिल्ह्यात गेल्या २७ महिन्यात १२८ अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले असुन नवीन वर्षाच्या ३ महिन्यात ३९ ठिकाणी अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले असुन १०९ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तर ५०० पेक्षा जास्त लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे..राज्य सरकारची परवानगी घेऊन वादग्रस्त नसलेल्या तसेच वाहतुकीस अडथळा नसलेल्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पुतळे उभारणं आवश्यक असताना राजकीय हेतूने प्रेरित काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी सामाजिक सलोखा बिघडवत आहेत आणि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर कारवाई करत नसल्याने हे प्रमाण वाढत आहे.. अनाधिकृत पुतळ्याचे संरक्षण कोण करणार?? विटंबना होऊनही जातीय दंगली होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदार कोण?? त्यामुळे अनाधिकृत पुतळे उभारणी प्रकरणात शासनाने कठोर भूमिका घ्यावी. --- (सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर)
    1
    ---
अनाधिकृत पुतळे उभारून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर  सरकारने कठोर कारवाई करावी.. बीड जिल्ह्यात गेल्या २७ महिन्यात १२८ अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले असुन नवीन वर्षाच्या ३ महिन्यात ३९ ठिकाणी अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले असुन १०९ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तर ५०० पेक्षा जास्त लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे..राज्य सरकारची परवानगी घेऊन वादग्रस्त नसलेल्या तसेच वाहतुकीस अडथळा नसलेल्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पुतळे उभारणं आवश्यक असताना राजकीय हेतूने प्रेरित काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी सामाजिक सलोखा बिघडवत आहेत आणि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर कारवाई करत नसल्याने हे प्रमाण वाढत आहे.. अनाधिकृत पुतळ्याचे संरक्षण कोण करणार?? विटंबना होऊनही जातीय दंगली होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदार कोण?? त्यामुळे अनाधिकृत पुतळे उभारणी प्रकरणात शासनाने कठोर भूमिका घ्यावी.
---
(सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.