उदगीर मध्ये दोन गटात हाणामारी तुफान दगडफेकीमुळे शहरात तणावाचे वातावरण, पोलीस गाडीचे मोठे नुकसान, तीन पोलीस किरकोळ जखमी उदगीर शहरातील गांधी नगर व मुसा नगर परिसरात ४ एप्रिलच्या रात्री अचानक तुफान दगडफेक, दोन गटात राडा !! जवळपास 50 लोकांवर गुन्हा दाखल!! पोलिसाच्या जीपचेही मोठे नुकसान!! उदगीर (एल पी उगीले) उदगीर शहरातील गांधीनगर व मुसा नगर परिसरातील दोन गटांमध्ये अचानक वाद उसळल्याने तुफान दगडफेक झाली. याप्रकरणी उसळलेल्या दंगलीला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली खरी मात्र चिडलेल्या जमावाने चक्क पोलीस गाडीवर प्रचंड दगडफेक करून पोलिसाच्या जीपचे मोठे नुकसान केले. याप्रकरणी पोलिस अंमलदार सतीश भानुदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 99 /26 कलम 132, 121 (1), 125 (A), 189 (2), 191 (2)(3), 190, 324 (3) भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगाने तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 व सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी आजम असलम जहागीरदार, आसिफ शेख लातूरकर, शार्दुल रशीद शेख, आशा उर्फ असलम शेख, रोशन ताजुद्दीन शेख (बिलाल), मोहित जागीरदार, जाकीर जागीरदार, बाबर शेख, आरिफ शेख, एजाज फारुख शेख, मोहेल लाला शेख, साहिल लाला शेख, मोईन हैदरसाब शेख, जुबेर मुसा शेख, इब्राहिम मुसा शेख, फिरोज ताहेर शेख, मोहसीन मकदुल मौलासाब शेख, मोहेल शेख, बबलू उर्फ मोहम्मद रफी, सोहेल लाईक लदाफ, वजीर मोईदिन शेख, दस्तगीर मोईदिन शेख, रईस बासू पटेल, सईद मुस्ताक जागीरदार, रोहित मुस्ताम जागीरदार, आदिल नजीर शेख, मोनू कालिया, मुज्जू कडबेवाल, गौस हकानी शेख, अयाज इस्माईल शेख उर्फ वाळूवाला, साहिल चांद पाशा मणियार, सय्यद बलीम अली, सय्यद अलीम इस्माईल, शेख इरफान इम्तियाज, किशोर ईश्वर मोतीराम, दिनेश धीरज कांबळे, सुमित कांबळे, या 37 व्यक्ती शिवाय इतर आठ ते दहा जण असा उल्लेख तक्रारीत करण्यात आलेला आहे. पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की दिनांक चार एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मौलाना आझाद शाळेजवळ मुसा नगरी येथे आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून तसेच जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून तसेच शासकीय जीपवर दगडफेक करून फिर्यादी जखमी करून सोबतचे सहकारी यांना शासकीय काम करत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलीस जीपचे अंदाजे 15000 रुपयांचे नुकसान केले आहे वगैरे प्रमाणे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील उदगीर शहर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करत आहेत. प्रथमदर्शनी किरकोळ कारणांवरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडफेकीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडांचा खच आढळून आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उदगीर मध्ये दोन गटात हाणामारी तुफान दगडफेकीमुळे शहरात तणावाचे वातावरण, पोलीस गाडीचे मोठे नुकसान, तीन पोलीस किरकोळ जखमी उदगीर शहरातील गांधी नगर व मुसा नगर परिसरात ४ एप्रिलच्या रात्री अचानक तुफान दगडफेक, दोन गटात राडा !! जवळपास 50 लोकांवर गुन्हा दाखल!! पोलिसाच्या जीपचेही मोठे नुकसान!! उदगीर (एल पी उगीले) उदगीर शहरातील गांधीनगर व मुसा नगर परिसरातील दोन गटांमध्ये अचानक वाद उसळल्याने तुफान दगडफेक झाली. याप्रकरणी उसळलेल्या दंगलीला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली खरी मात्र चिडलेल्या जमावाने चक्क पोलीस गाडीवर प्रचंड दगडफेक करून पोलिसाच्या जीपचे मोठे नुकसान केले. याप्रकरणी पोलिस अंमलदार सतीश भानुदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 99
/26 कलम 132, 121 (1), 125 (A), 189 (2), 191 (2)(3), 190, 324 (3) भारतीय न्याय संहितेच्या अनुषंगाने तसेच सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 व सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी आजम असलम जहागीरदार, आसिफ शेख लातूरकर, शार्दुल रशीद शेख, आशा उर्फ असलम शेख, रोशन ताजुद्दीन शेख (बिलाल), मोहित जागीरदार, जाकीर जागीरदार, बाबर शेख, आरिफ शेख, एजाज फारुख शेख, मोहेल लाला शेख, साहिल लाला शेख, मोईन हैदरसाब शेख, जुबेर मुसा शेख, इब्राहिम मुसा शेख, फिरोज ताहेर शेख, मोहसीन मकदुल मौलासाब शेख, मोहेल शेख, बबलू उर्फ मोहम्मद रफी, सोहेल लाईक लदाफ, वजीर मोईदिन शेख, दस्तगीर मोईदिन शेख,
रईस बासू पटेल, सईद मुस्ताक जागीरदार, रोहित मुस्ताम जागीरदार, आदिल नजीर शेख, मोनू कालिया, मुज्जू कडबेवाल, गौस हकानी शेख, अयाज इस्माईल शेख उर्फ वाळूवाला, साहिल चांद पाशा मणियार, सय्यद बलीम अली, सय्यद अलीम इस्माईल, शेख इरफान इम्तियाज, किशोर ईश्वर मोतीराम, दिनेश धीरज कांबळे, सुमित कांबळे, या 37 व्यक्ती शिवाय इतर आठ ते दहा जण असा उल्लेख तक्रारीत करण्यात आलेला आहे. पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की दिनांक चार एप्रिल रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मौलाना आझाद शाळेजवळ मुसा नगरी येथे आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून तसेच जिल्हाधिकारी यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून तसेच शासकीय जीपवर दगडफेक करून फिर्यादी जखमी करून सोबतचे सहकारी यांना शासकीय
काम करत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलीस जीपचे अंदाजे 15000 रुपयांचे नुकसान केले आहे वगैरे प्रमाणे तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील उदगीर शहर पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे करत आहेत. प्रथमदर्शनी किरकोळ कारणांवरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडफेकीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडांचा खच आढळून आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- नांदेड हादरले! गँगवॉरमधून तिहेरी खून नांदेड शहरात शुक्रवारी मध्यरात्री भीषण गँगवॉर उफाळून आला. वर्चस्वाच्या वादातून दोन गट आमनेसामने येत तलवारी-खंजरांनी हल्ला केला. ⚔️ 👉 ई-स्क्वेअर परिसरात दोघांचा जागीच खून 👉 काही तासांतच रुग्णालयात सूडाने तिसऱ्याची हत्या 👉 शहरात दहशतीचे वातावरण भररस्त्यात झालेल्या या रक्तरंजित घटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथेच मध्यरात्री घडलेल्या सूडाच्या हल्ल्यामुळे भीती आणखी वाढली. 👮♂️ पोलिसांचा तपास वेगात 👉 काही संशयित ताब्यात 👉 फरार आरोपींचा शोध सुरू ⚠️ सलग तिहेरी हत्येमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर #Nanded #CrimeNews #GangWar #TripleMurder #BreakingNews Maharashtra LawAndOrder1
- श्री.स्वामी समर्थाच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमीत्त येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजीत धर्मसंकीर्तन महोत्सवात गोवा येथील कीर्तनकार सुहास वझे यांच्या गोमंतक संत मंडळ संचलीत कीर्तन विद्यालयातील बाल युवा कीर्तनकारांची उत्कृष्ट कीर्तने स्वामी दरबारात संपन्न झाली. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मधील धर्मसंकीर्तन महोत्सवात बालकीर्तनकारांची कीर्तन मैफील रंगल्याने गोव्यातील बाल युवा कीर्तनकारांच्या चक्री कीर्तनाने धर्मसंकीर्तन महोत्सवाचे दुसरे पुष्प बहरले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी उत्सव धर्मसंकीर्तन महोत्सवात आज दुसरे पुष्प बालयुवा कीर्तनकार ह.भ.प.कु.सना साटेलकर ह.भ.प. कु.श्रुती घोडके, ह.भ.प.कु. सावली गावकर, ह.भ.प.कु.श्रीया साळगावकर यांची एकाचवेळी कीर्तनं संपन्न झाली. या चक्री कीर्तन सेवेतून त्यांनी पुर्व रंगात आपल्या कीर्तनातुन नश्वर मनुष्य देहाच्या उन्नतीसाठी देवभक्ती, देशभक्ती, व गुरु भक्ती अंगी रुजविण्यासाठी आपल्या जीवनातील कांही वेळ द्यावा असे आवाहन केले. अनेक राष्ट्रपुरूष व समाज सुधारकांनी त्यांच्या जीवनातील जवळपास सर्वच वेळ समाजासाठी अर्पण केला, म्हणुन आज आपण सुखाचे क्षण अनुभवत आहोत, पण त्यात विकारी वृत्तीने धुमाकूळ घातला आहे. सोशल मिडीयाचा वापर चुकीच्या मार्गाने जास्त प्रमाणात होत असून याचा परिणाम समाजाच्या नुकसानीत आहे. समाज संघटीत झाला तर असे बिकट प्रसंग निर्माण होणार नाहीत. माणसात नराचा नारायण होण्याची क्षमता आहे त्यासाठी योग्य साधन आपणास पाहिजे हे साधन फक्त संत चरित्राचा आभ्यास व आचरणातुन मिळेल असे विवेचन केले. कीर्तन सेवेच्या उत्तर रंगात संत चरित्र समजून घेवून त्याचं आचरण झालं तर समाज प्रगतशील होईल असेही विचार त्यांनी अनेक समाज पुरुष व संतांची दाखले देवुन व्यक्त करीत वेगवेगळ्या देव, देश, धर्म, संस्कृती तसेच हिंदू संस्कार, संताचे विचार, संत चरित्र, देश भक्तीचे विचार या चक्री कीर्तनात सांगितले. या कीर्तन सेवेत कीर्तनकार ह.भ.प.कु.सना साटेलकर ह.भ.प. कु.श्रुती घोडके, ह.भ.प.कु. सावली गावकर, ह.भ.प.कु.श्रीया साळगावकर यांना तबल्यावर उमेश नाईक, हार्मोनियमवर सुहास वझे, चिपळी साथ संदीप गावकर, दामोदर कामत यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी ओंकार पाठक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कीर्तनकार व सर्व मान्यवर कलाकारांचा श्री.स्वामी समर्थांचा प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. या प्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीमुख जगदाळे, बाळासाहेब कुलकर्णी, अक्षय सरदेशमुख, अमर पाटील, रमेश शिंदे, श्रीशैल गवंडी, एम.बी.पाटील सर, प्रसाद पाटील सर, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, सागर गोंडाळ, स्वामी लोणारी, काशिनाथ इंडे, रवि महिंद्रकर, गिरीश पवार, संतोष पराणे, संजय पवार, मोहन जाधव, तुषार मोरे, बाळासाहेब एकबोटे आदींसह अनेक पुरुष व महिला स्वामी भक्त उपस्थित होते.1
- वडवणी प्रतिनिधी. दिनांक ५/४/२०२६ रविवार रोजी वडवणी शहरात भाजपा च्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न1
- Post by Dr krishna karade1
- श्री गरुड पुराणकथा (कथा प्रवक्ते) श्री.ह.भ.प. हनुमंत महाराज शिंदे. संपर्क :9529144913.1
- --- (प्रतिनिधी) :- आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील सुपुत्र व नवी मुंबई पनवेल येथून दैनिक युवक आधारच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संपादक संतोष शिवदास आमले यांना World Cultural and Educational Organisation तर्फे ‘Honorary Doctorate Award’ या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सन्मान मिळाल्याने परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर संस्था भारत सरकार मान्यताप्राप्त असून, संस्थेच्या मूल्यांकन मंडळाने संचालक व अध्यक्ष यांच्या अधिकाराने हा सन्मान जाहीर केला आहे. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचे निष्ठावान, धडाडीचे व समाजाभिमुख कार्य लक्षात घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आमले यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत सामान्य जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यांच्या लेखणीने समाजप्रबोधन घडवून आणत जनजागृतीची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘दैनिक युवक आधार’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून, विविध वर्तमानपत्रांमध्ये उपसंपादक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम पाहिले आहे. सध्या ते नवी मुंबई, पनवेल येथे वास्तव्यास असून ‘दैनिक युवक आधार’चे सर्व कामकाज ते समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी, प्रामाणिकपणा आणि जनहिताचा ध्यास स्पष्टपणे दिसून येतो. पत्रकारितेला केवळ व्यवसाय न मानता समाजसेवेचे प्रभावी साधन म्हणून त्यांनी जपले आहे. या सन्मानामुळे अंभोरा गावासह आष्टी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संतोष आमले यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळत असून, जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.1
- हिमायतनगरात शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलन तात्पुरते स्थगित छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर सुरू असलेले आंदोलन सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलकांनी 21 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. तसेच 22 तारखेला संपूर्ण ‘गाव बंद’ ठेवण्याची हाकही देण्यात आली आहे. ⚠️ प्रशासनासमोर मोठे आव्हान ⚠️ नागरिकांचे लक्ष पुढील निर्णयाकडे 👉 पुढे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे... जय शिवराय! 🚩 #Himayatnagar #ShivajiMaharaj #Andolan #GavBandh #BreakingNews Maharashtra Maratha Shivray NewsUpdate SocialMedia1
- एकाच अखंड हरिनाम सप्ताहातील दोन कीर्तनकारांची वेगवेगळ्या स्टाईलने एन्ट्री तुम्हाला कोणती आवडली हे नक्की कमेंट करून सांगा.1
- --- अनाधिकृत पुतळे उभारून सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी.. बीड जिल्ह्यात गेल्या २७ महिन्यात १२८ अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले असुन नवीन वर्षाच्या ३ महिन्यात ३९ ठिकाणी अनाधिकृत पुतळे उभारण्यात आले असुन १०९ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत तर ५०० पेक्षा जास्त लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे..राज्य सरकारची परवानगी घेऊन वादग्रस्त नसलेल्या तसेच वाहतुकीस अडथळा नसलेल्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाची परवानगी घेऊन पुतळे उभारणं आवश्यक असताना राजकीय हेतूने प्रेरित काहीजण स्वतःच्या स्वार्थासाठी सामाजिक सलोखा बिघडवत आहेत आणि मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर कारवाई करत नसल्याने हे प्रमाण वाढत आहे.. अनाधिकृत पुतळ्याचे संरक्षण कोण करणार?? विटंबना होऊनही जातीय दंगली होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदार कोण?? त्यामुळे अनाधिकृत पुतळे उभारणी प्रकरणात शासनाने कठोर भूमिका घ्यावी. --- (सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर)1