चिखलीतील ज्येष्ठ शिक्षक ज़ाकिर हुसैन सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा भावनिक वातावरणात संपन्न चिखली : शहरातील राजा भाऊ बोंद्रे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा येथे ज्येष्ठ व आदर्श शिक्षक ज़ाकिर हुसैन सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आज सकाळी ९ वाजता भव्य व भावनिक निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच सध्याचे शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज़ाकिर हुसैन सर यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळात शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देत हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत असून काहींनी व्यवसाय क्षेत्रातही यश संपादन केले आहे. त्यांच्या शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ व विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पित वृत्तीमुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेले. या निरोप समारंभात चिखली नगर परिषदेचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, उपनगराध्यक्ष वैशाली ताई खेडेकर, नगरसेवक डॉ. निलेश गावंडे, डॉ. इसरार, शिक्षण सभापती रफिक सेठ, मुख्याध्यापक इंगळे सर, तसेच शिक्षक इब्राहिम सर व फिरोज खान सर यांनी आपल्या मनोगतातून ज़ाकिर हुसैन सर यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी सरांच्या शिक्षणसेवेचा आढावा घेत त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक उबेद अली खान, दीपक वाधवानी, संध्या आनंद बांद्रे, सलीम परवेझ खान तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अझीम खान यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या आवडत्या गुरुजनांना निरोप देताना अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भावनिक झाले. मनोगत व्यक्त करताना ज़ाकिर हुसैन सर स्वतःही भावूक झाले. आपल्या सेवाकाळातील अनुभव, विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम व शाळेबद्दलची नाळ व्यक्त करताना त्यांचे अश्रू अनावर झाले. उपस्थितांनाही हा क्षण अत्यंत हळवा करून गेला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळा परिवाराच्या वतीने सरांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी व यशस्वी जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हा निरोप समारंभ कृतज्ञता, सन्मान आणि भावनिकतेने भरलेला ठरला.
चिखलीतील ज्येष्ठ शिक्षक ज़ाकिर हुसैन सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा भावनिक वातावरणात संपन्न चिखली : शहरातील राजा भाऊ बोंद्रे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा येथे ज्येष्ठ व आदर्श शिक्षक ज़ाकिर हुसैन सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आज सकाळी ९ वाजता भव्य व भावनिक निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच सध्याचे शेकडो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज़ाकिर हुसैन सर यांनी आपल्या दीर्घ सेवाकाळात शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देत हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत असून काहींनी व्यवसाय क्षेत्रातही यश संपादन केले आहे. त्यांच्या शिस्तप्रिय, कर्तव्यनिष्ठ व विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पित वृत्तीमुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेले. या निरोप समारंभात चिखली नगर परिषदेचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, उपनगराध्यक्ष वैशाली ताई खेडेकर, नगरसेवक डॉ. निलेश गावंडे, डॉ. इसरार, शिक्षण सभापती रफिक सेठ, मुख्याध्यापक इंगळे सर, तसेच शिक्षक
इब्राहिम सर व फिरोज खान सर यांनी आपल्या मनोगतातून ज़ाकिर हुसैन सर यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी सरांच्या शिक्षणसेवेचा आढावा घेत त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक उबेद अली खान, दीपक वाधवानी, संध्या आनंद बांद्रे, सलीम परवेझ खान तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अझीम खान यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या आवडत्या गुरुजनांना निरोप देताना अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भावनिक झाले. मनोगत व्यक्त करताना ज़ाकिर हुसैन सर स्वतःही भावूक झाले. आपल्या सेवाकाळातील अनुभव, विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम व शाळेबद्दलची नाळ व्यक्त करताना त्यांचे अश्रू अनावर झाले. उपस्थितांनाही हा क्षण अत्यंत हळवा करून गेला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळा परिवाराच्या वतीने सरांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी व यशस्वी जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हा निरोप समारंभ कृतज्ञता, सन्मान आणि भावनिकतेने भरलेला ठरला.
- बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.1
- महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्र खामगाव येथे हा विशेष सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कृषी अधिकारी बुलढाणा मा. विजय पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाबीजचे भागधारक श्री. संतोषराव देशमुख होते. यावेळी भागधारक, बीजोत्पादक, महाबीज विक्रेते, कृषी अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कोल्हे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी केले. तर प्रास्ताविक श्री. सुरेश मोहकर, केंद्र व्यवस्थापक खामगाव यांनी सादर केले. त्यांनी महाबीजच्या मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत नवीन योजना, आधुनिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना शेती, बियाण्यांची गुणवत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले. अध्यक्ष श्री. संतोषराव देशमुख यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, महाबीजची प्रगती अशीच शतकोत्तर वेगाने पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विशेष प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीजोत्पादक, हमाल, कंत्राटी कर्मचारी, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमस्थळी महाबीज उत्पादनांचे आकर्षक दालन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून सुवर्ण महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.1
- बुलढाणा जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन.!!1
- खामगाव : शहरातील नगरपरिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या 'नाना-नानी' पार्कमध्ये आता प्रति व्यक्ती ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये नागरिक आणि पार्कच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती केली आहे. मात्र, आता या ठिकाणी प्रत्येकी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक नागरिक कर्मचाऱ्याला विचारणा करताना म्हणतो, "एका व्यक्तीचे ५ रुपये ठीक आहेत, पण जर कुटुंबातील १०-१२ लोक एकत्र आले, तर ५०-६० रुपये भरावे लागतील. हे नगरपरिषदेचे गार्डन असून, सामान्य माणसाला हे पैसे देणे जड जाते." हे उद्यान लोकांसाठी आहे, मग तिथे प्रवेशासाठी पैसे का मोजावे लागतात?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब फिरायला गेल्यास त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी घेतला आणि जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याबाबत स्पष्टता हवी अशी मागणी होत आहे. या व्हिडिओमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी याला "सामान्य नागरिकांची लूट" असे संबोधले आहे. नगरपरिषदेने अशा सार्वजनिक सुविधांवर शुल्क आकारू नये, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, गार्डनच्या देखभालीसाठी हे शुल्क आहे की अन्य काही कारण, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.1
- राजकीय भूकंप! बच्चू कडूंचा शिंदे गटात प्रवेश ⚡ मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत Bacchu Kadu यांनी मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा ‘गेमचेंजर’ मानला जात आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात बच्चू कडू यांनी शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. यावेळी त्यांनी “सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी आणि विकासाच्या कामांना गती देण्यासाठी हा निर्णय घेतला,” असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडू यांचे स्वागत करत “त्यांच्या येण्याने पक्ष अधिक बळकट होईल,” असा विश्वास व्यक्त केला. शेतकरी, अपंग आणि वंचित घटकांसाठी आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रवेशामुळे विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात शिंदे गटाला मोठी ताकद मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी या निर्णयावर जोरदार टीका केली असून “ही केवळ सत्तेसाठीची राजकीय चाल आहे,” असा आरोप केला आहे. मात्र शिंदे गटाने या प्रवेशाचे स्वागत करत “राजकारणात नवे समीकरण तयार होईल,” असा दावा केला आहे. 👉 या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात याचे दूरगामी परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे1
- जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन1
- तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया1
- मोताळा वन विभागात घोटाळा? परवानगीशिवाय बांधकाम सुरू!1