Shuru
Apke Nagar Ki App…
येताय ना...देशविरोधी शक्तींच्या नाकावर टिच्चून, भारताला अखंड महाशक्ती बनवण्याचा संकल्प घेऊन सज्ज झालेल्या प्रत्येक भारतीयाची यात्रा... तिरंगा यात्रा...मी येतोय तुम्ही ही या...
साप्ताहिक माणदेश
येताय ना...देशविरोधी शक्तींच्या नाकावर टिच्चून, भारताला अखंड महाशक्ती बनवण्याचा संकल्प घेऊन सज्ज झालेल्या प्रत्येक भारतीयाची यात्रा... तिरंगा यात्रा...मी येतोय तुम्ही ही या...
More news from Sangli and nearby areas
- येताय ना...देशविरोधी शक्तींच्या नाकावर टिच्चून, भारताला अखंड महाशक्ती बनवण्याचा संकल्प घेऊन सज्ज झालेल्या प्रत्येक भारतीयाची यात्रा... तिरंगा यात्रा...मी येतोय तुम्ही ही या...1
- मिरज तालुक्यातील सलगरे गाव ठरले घरकुल मंजुरीत आघाडीवर. सलगरेला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेचा मोठा लाभ; 3.0 मध्ये तब्बल 319 घरकुले मंजूर... मिरज तालुक्यातील सलगरे गाव ठरले घरकुल मंजुरीत आघाडीवर; 2.0 मध्ये 140, तर 3.0 मध्ये 319 लाभार्थ्यांना मंजुरी... मिरज : मिरज तालुक्यातील सलगरे गावाने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या माध्यमातून घरकुल मंजुरीच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली असून, गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर होणारे गाव म्हणून सलगरची विशेष नोंद झाली आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2.0 अंतर्गत यापूर्वी सलगरे गावातील 140 लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली होती. त्यानंतर आता प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 3.0 अंतर्गत तब्बल 319 घरकुलांना मंजुरी मिळाल्याने गावातील अनेक वर्षांपासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील गरीब, वंचित आणि गरजू कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे पक्के घर मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून सलगरे गावातील पात्र लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 3.0 मध्ये 319 घरकुलांची ऐतिहासिक मंजुरी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 3.0 अंतर्गत सलगर गावासाठी 319 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी 2.0 मध्ये 140 लाभार्थ्यांना मंजुरी मिळाल्यानंतर आता त्यापेक्षा दुपटीहून अधिक घरकुलांना मंजुरी मिळाल्याने ही बाब गावासाठी ऐतिहासिक मानली जात आहे. गावातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, घर नसलेली किंवा कच्च्या घरात राहणारी अनेक कुटुंबे स्वतःच्या पक्क्या घराच्या प्रतीक्षेत होती. या मंजुरीमुळे अशा कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेषतः गावातील वंचित आणि गरजू घटकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. माजी सरपंच तानाजीराव पाटील यांच्याकडून आभार या मोठ्या प्रमाणातील घरकुल मंजुरीबद्दल सहकारी संस्थेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांच्या घराच्या प्रश्नाला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.1
- छात्रों की ज़बरदस्त फुर्ती और तालमेल देखें | #Students #primenews83 #Coordination #StudentSkills #breakingnews #hindinews #ViralVideo #AmazingVideo #TrendingVideo छात्रों की ज़बरदस्त फुर्ती और तालमेल देखें | #Students #primenews83 #Coordination #StudentSkills #breakingnews #hindinews #ViralVideo #AmazingVideo #TrendingVideo1
- कागदपत्राचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक; पोलीस अधिकाऱ्यावर महिलेचे गंभीर आरोप1
- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आनापानसती’; चार तालुक्यांतील ४३ केंद्रप्रमुखांचे बारामती येथे प्रशिक्षण संपन्न पुणे प्रतिनिधी : पुणे जिल्हा परिषद, पुणे विपश्यना समिती व बारामती विपश्यना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या आदेशानुसार मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी बारामती येथे केंद्रप्रमुख शिक्षकांसाठी ‘मित्र उपक्रमांतर्गत आनापानसती प्रशिक्षण’ घेण्यात आले. या प्रशिक्षणात बारामती, इंदापूर, पुरंदर व दौंड या चार तालुक्यांतील ४३ केंद्रप्रमुख शिक्षकांनी सहभाग नोंदविला. परमपूज्य सयाजी ऊ बा खिन यांच्या परंपरेतील आचार्य सत्यनारायण गोयंका यांच्या शिकवणीनुसार हे आनापानसती प्रशिक्षण घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये आनापानसती ध्यानाचा नियमित सराव व्हावा, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षणानंतर संबंधित शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून सकाळी व सायंकाळी दररोज दहा मिनिटे आनापानसतीचा सराव करून घेतला जाणार आहे. या सरावामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, मानसिक स्थैर्य, आत्मशिस्त आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. या प्रशिक्षणासाठी संजयजी गायकवाड सर, राजेशजी खंदारे सर, प्रितीजी धांडे मॅडम, वृषालीजी चव्हाण मॅडम, रोहिणीजी यादव मॅडम, ज्ञानदेवजी बोराटे, अभयजी शहा सर, भारतजी गावडे-पाटील व काळे सर यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धम्मसेवक महेश झेंडे, अनंतजी भोसले सर, केसकर सर, शेळके सर व राजेश प्रधान यांनी सेवा बजावली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार शालेय स्तरावर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, आत्मशिस्त व मानसिक स्थैर्य निर्माण होऊन त्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच मदत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.2
- एका विद्यार्थ्यांच प्रेरणादायी भाषण, छत्रपतींच्या पराक्रमाची जाणीव करून देणारं!1
- तासगाव तालुक्यातील वझरचोंडे येथे मनोज जरागे पाटील यांचे जोरदार स्वागत तासगाव तालुक्यातील वज्रचौंडे येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे ग्रामस्थ युवकांनी जलासात स्वागत केले यावेळी वज्रचौंडे गाव भगवमय झाले व घोषणांनी परिसर दणाणून सोडला1