प्रशासकीय सेवेतील प्रेरणादायी नेतृत्व रामनिवास झंवर.. ! प्रशासकीय सेवेतील प्रेरणादायी नेतृत्व रामनिवास झंवर.. ! समाजाच्या वाटचालीत काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांचे कार्य हे केवळ पदापुरते मर्यादित राहत नाही; ते लोकांच्या मनात विश्वास, आशा आणि प्रेरणेचा दीप पेटवते. अशा व्यक्तिमत्त्वांमुळे प्रशासन ही केवळ यंत्रणा न राहता समाजाच्या विकासाची शक्ती बनते. अशाच उमद्या आणि लोकाभिमुख नेतृत्वाचे नाव म्हणजे रामनिवास झंवर. मुळचे बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील हिंगणी (बु.) या गावात जन्मलेले रामनिवास झंवर यांचे बालपण कष्ट, साधेपणा आणि संस्कारांच्या वातावरणात घडले. आई रुक्मिणीबाई यांचे प्रेमळ मार्गदर्शन आणि वडील पांडुरंग झंवर यांची प्रामाणिक जीवनशैली यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला मूल्यांचा भक्कम पाया दिला. वारकरी परंपरेत वाढलेल्या या कुटुंबात श्रद्धा, परिश्रम आणि समाजसेवेची भावना अंगीकारली जाते. त्यामुळेच लहानपणापासूनच “समाजासाठी काहीतरी करायचे” हे स्वप्न त्यांच्या मनात अंकुरले. शिक्षणाच्या माध्यमातून जीवन घडवण्याचा दृढ निश्चय त्यांनी केला. गावात माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी बीड येथे उच्च शिक्षण घेतले. बी.ए. आणि एल.एल.बी. नंतर पुण्यातील भारती विद्यापीठातून एल.एल.एम. पदवी संपादन करताना त्यांनी प्रशासन क्षेत्रात काम करण्याचा ध्यास घेतला. मेहनत, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळे २००८ साली त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून मंत्रालयात सहाय्यक म्हणून प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. मात्र त्यांची स्वप्ने यापेक्षा मोठी होती. २०१० मध्ये पुन्हा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत ते महाराष्ट्र शहरी प्रशासन सेवेत मुख्याधिकारी म्हणून नियुक्त झाले आणि तेथून त्यांच्या कार्याची खरी ओळख घडू लागली. २०१० ते २०२५ या काळात त्यांनी अंबाजोगाई, इंदापूर आणि धरणगाव अशा नगरपरिषदांमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करत अनेक विकासात्मक उपक्रम राबवले. त्यांच्या कामात नेहमीच एक गोष्ट ठळकपणे दिसून येते लोककेंद्रित प्रशासन. त्यांच्यासाठी विकास म्हणजे केवळ कागदावरील योजना नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात घडणारा प्रत्यक्ष बदल. २०१४ ते २०१६ या काळात मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे सावट होते. त्या काळात अंबाजोगाई शहरातील पाणीटंचाई ही अत्यंत गंभीर समस्या बनली होती. अशा परिस्थितीत रामनिवास झंवर यांनी विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे, हातपंप व बोअरवेलचे पुनरुज्जीवन करणे अशा उपाययोजना राबवत शहराला नळाद्वारे स्वच्छ पाण्याचा पुरवठा उपलब्ध करून दिला. दुष्काळाच्या कठीण काळात नागरिकांना दिलासा देणारे हे कार्य त्यांच्या संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण ठरले. स्वच्छ भारत अभियानातही त्यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय यश मिळाले. इंदापूर नगर परिषदेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये राष्ट्रीय स्तरावर पश्चिम विभागात ४५ वा क्रमांक मिळाला आणि ५ कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले. पुढच्याच वर्षी २०१९ मध्ये इंदापूरने राष्ट्रीय स्तरावर १० वा क्रमांक मिळवून १० कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले. ही केवळ प्रशासनाची नव्हे तर नागरिक आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांची यशोगाथा होती. यासाठी त्यांचा नवी दिल्ली येथे राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले. धरणगाव नगरपरिषदेत त्यांनी शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणला. पूर्वी १०–१२ दिवसांनी येणारे पाणी त्यांनी नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे केवळ चार दिवसांवर आणले. तसेच बर्तन बँक, स्वतःची रोपवाटिका, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, नागरिकांच्या तक्रारींसाठी मोबाईल व्यवस्था अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली. शहरातील अतिक्रमण नियोजनपूर्वक हटवून नागरिकांना मोकळे रस्ते उपलब्ध करून दिले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अनेक वर्षे प्रलंबित असलेली आर्थिक देणी प्राधान्याने देऊन त्यांनी प्रशासनातील मानवी संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला. यामुळे त्यांचा शासनाच्या 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात विभागात प्रथम क्रमांक आला. त्यांच्या कार्याची दखल शासन आणि विविध संस्थांनीही घेतली आहे. लोकमत दैनिकाकडून मिळालेला “खान्देश रत्न” हा सन्मान त्यांच्या कार्याचा गौरव करणारा मानाचा मुकुट आहे. व्यक्तिगत आयुष्यातही त्यांचे जीवन तितकेच प्रेरणादायी आहे. त्यांच्या पत्नी सौ. सुनैना झंवर या जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. मुलगी आर्या शिक्षण घेत असून मुलगा आदित्य हा उत्कृष्ट बुद्धिबळपटू आहे आणि शालेय स्तरावर अनेक पुरस्कार जिंकत आहे. कुटुंबातील मूल्ये आणि संस्कार हीच त्यांच्या यशाची खरी ताकद आहे. आजच्या काळात प्रशासनात काम करताना संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि लोकांप्रती उत्तरदायित्व जपणे हे मोठे आव्हान असते. परंतु रामनिवास झंवर यांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध केले आहे की योग्य दृष्टी, निष्ठा आणि समाजाविषयीची बांधिलकी असेल तर प्रशासन हे लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवू शकते. त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ एक अधिकारी म्हणून मर्यादित राहत नाही; ते समाजासाठी प्रेरणादायी नेतृत्वाचे प्रतीक बनले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक शहरांना विकासाची नवी दिशा मिळाली आणि असंख्य नागरिकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला. अशा या कर्तृत्ववान, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यास मनःपूर्वक अभिवादन. त्यांच्या पुढील वाटचालीतही अशीच उज्ज्वल कामगिरी घडत राहो आणि समाजसेवेचा हा दीप अधिक तेजाने प्रज्वलित होत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा. © दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
प्रशासकीय सेवेतील प्रेरणादायी नेतृत्व रामनिवास झंवर.. ! प्रशासकीय सेवेतील प्रेरणादायी नेतृत्व रामनिवास झंवर.. ! समाजाच्या वाटचालीत काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांचे कार्य हे केवळ पदापुरते मर्यादित राहत नाही; ते लोकांच्या मनात विश्वास, आशा आणि प्रेरणेचा दीप पेटवते. अशा व्यक्तिमत्त्वांमुळे प्रशासन ही केवळ यंत्रणा न राहता समाजाच्या विकासाची शक्ती बनते. अशाच उमद्या आणि लोकाभिमुख नेतृत्वाचे नाव म्हणजे रामनिवास झंवर. मुळचे बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील हिंगणी (बु.) या गावात जन्मलेले रामनिवास झंवर यांचे बालपण कष्ट, साधेपणा आणि संस्कारांच्या वातावरणात घडले. आई रुक्मिणीबाई यांचे प्रेमळ मार्गदर्शन आणि वडील पांडुरंग झंवर यांची प्रामाणिक जीवनशैली यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला मूल्यांचा भक्कम पाया दिला. वारकरी परंपरेत वाढलेल्या या कुटुंबात श्रद्धा, परिश्रम आणि समाजसेवेची भावना अंगीकारली जाते. त्यामुळेच लहानपणापासूनच “समाजासाठी काहीतरी करायचे” हे स्वप्न त्यांच्या मनात अंकुरले. शिक्षणाच्या माध्यमातून जीवन घडवण्याचा दृढ निश्चय त्यांनी केला. गावात माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी बीड येथे उच्च शिक्षण घेतले. बी.ए. आणि एल.एल.बी. नंतर पुण्यातील भारती विद्यापीठातून एल.एल.एम. पदवी संपादन करताना त्यांनी प्रशासन क्षेत्रात काम करण्याचा ध्यास घेतला. मेहनत, चिकाटी आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळे २००८ साली त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून मंत्रालयात सहाय्यक म्हणून प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. मात्र त्यांची स्वप्ने यापेक्षा मोठी होती. २०१० मध्ये पुन्हा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत ते महाराष्ट्र शहरी प्रशासन सेवेत मुख्याधिकारी म्हणून नियुक्त झाले आणि तेथून त्यांच्या कार्याची खरी ओळख घडू लागली. २०१० ते २०२५ या काळात त्यांनी अंबाजोगाई, इंदापूर आणि धरणगाव अशा नगरपरिषदांमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करत अनेक विकासात्मक उपक्रम राबवले. त्यांच्या कामात नेहमीच एक गोष्ट ठळकपणे दिसून येते लोककेंद्रित प्रशासन. त्यांच्यासाठी विकास म्हणजे केवळ कागदावरील योजना नव्हे, तर नागरिकांच्या जीवनात घडणारा प्रत्यक्ष बदल. २०१४ ते २०१६ या काळात मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे सावट होते. त्या काळात अंबाजोगाई शहरातील पाणीटंचाई ही अत्यंत गंभीर समस्या बनली होती. अशा परिस्थितीत रामनिवास झंवर यांनी विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे, हातपंप व बोअरवेलचे पुनरुज्जीवन करणे अशा उपाययोजना राबवत शहराला नळाद्वारे स्वच्छ पाण्याचा पुरवठा उपलब्ध करून दिला. दुष्काळाच्या कठीण काळात नागरिकांना दिलासा देणारे हे कार्य त्यांच्या संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण ठरले. स्वच्छ भारत अभियानातही त्यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय यश मिळाले. इंदापूर नगर परिषदेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये राष्ट्रीय स्तरावर पश्चिम विभागात ४५ वा क्रमांक मिळाला आणि ५ कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले. पुढच्याच वर्षी २०१९ मध्ये इंदापूरने राष्ट्रीय स्तरावर १० वा क्रमांक मिळवून १० कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले. ही केवळ प्रशासनाची नव्हे तर नागरिक आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नांची यशोगाथा होती. यासाठी त्यांचा नवी दिल्ली येथे राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले. धरणगाव नगरपरिषदेत त्यांनी शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणला. पूर्वी १०–१२ दिवसांनी येणारे पाणी त्यांनी नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे केवळ चार दिवसांवर आणले. तसेच बर्तन बँक, स्वतःची रोपवाटिका, मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, नागरिकांच्या तक्रारींसाठी मोबाईल व्यवस्था अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली. शहरातील अतिक्रमण नियोजनपूर्वक हटवून नागरिकांना मोकळे रस्ते उपलब्ध करून दिले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अनेक वर्षे प्रलंबित असलेली आर्थिक देणी प्राधान्याने देऊन त्यांनी प्रशासनातील मानवी संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला. यामुळे त्यांचा शासनाच्या 100 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात विभागात प्रथम क्रमांक आला. त्यांच्या कार्याची दखल शासन आणि विविध संस्थांनीही घेतली आहे. लोकमत दैनिकाकडून मिळालेला “खान्देश रत्न” हा सन्मान त्यांच्या कार्याचा गौरव करणारा मानाचा मुकुट आहे. व्यक्तिगत आयुष्यातही त्यांचे जीवन तितकेच प्रेरणादायी आहे. त्यांच्या पत्नी सौ. सुनैना झंवर या जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. मुलगी आर्या शिक्षण घेत असून मुलगा आदित्य हा उत्कृष्ट बुद्धिबळपटू आहे आणि शालेय स्तरावर अनेक पुरस्कार जिंकत आहे. कुटुंबातील मूल्ये आणि संस्कार हीच त्यांच्या यशाची खरी ताकद आहे. आजच्या काळात प्रशासनात काम करताना संवेदनशीलता, प्रामाणिकपणा आणि लोकांप्रती उत्तरदायित्व जपणे हे मोठे आव्हान असते. परंतु रामनिवास झंवर यांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध केले आहे की योग्य दृष्टी, निष्ठा आणि समाजाविषयीची बांधिलकी असेल तर प्रशासन हे लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवू शकते. त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ एक अधिकारी म्हणून मर्यादित राहत नाही; ते समाजासाठी प्रेरणादायी नेतृत्वाचे प्रतीक बनले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक शहरांना विकासाची नवी दिशा मिळाली आणि असंख्य नागरिकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण झाला. अशा या कर्तृत्ववान, संवेदनशील आणि दूरदृष्टी असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यास मनःपूर्वक अभिवादन. त्यांच्या पुढील वाटचालीतही अशीच उज्ज्वल कामगिरी घडत राहो आणि समाजसेवेचा हा दीप अधिक तेजाने प्रज्वलित होत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा. © दीपक पवार (संपादक) खान्देश माझा
- Post by Kishor k Patil Patil2
- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमेवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांविरोधात शिरपूरमध्ये नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. शिरपूर फर्स्टच्या वतीने महामार्गावरील खड्ड्यात बसून ‘26 लाखांच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा’ करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला.1
- सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे मका गंजीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे शेतातील मक्काच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमसरी येथील शेतकरी पुंडलिक शामराव बावस्कर यांच्या गट नं. ३१४, क्षेत्र १.३१, शिवना शिवारातील शेतात झाकून ठेवलेल्या मक्काच्या गंजीला दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे शेतकरी पुंडलिक बावस्कर यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.1
- संरक्षण जाळी तोडून खोलीत घुसला बिबट्या; वनविभागाने घटनास्थळी भेट देत केला पंचनामा सोयगाव प्रतिनिधी दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील डाभा परिसरात बिबट्याने हल्ला करून शेतकरी महिलेच्या शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे. डाभा येथील शेतकरी कमलबाई रमेश रगड यांची शेती देऊळगाव – सावळदबारा रस्त्यालगत, गट क्रमांक ८२ मध्ये आहे. येथे शेळीपालनासाठी टीन पत्र्यांची खोली बांधून परिसराला संरक्षणासाठी जाळी लावण्यात आली होती. मात्र, सोमवारी (दि. ९ मार्च २०२६) रात्री वन्य प्राणी बिबट्याने संरक्षण जाळी तोडून आत प्रवेश केला आणि ४ बकऱ्या व २ बोकड असे एकूण ६ शेळ्यांना ठार केले. या खोलीमध्ये पार्टिशन जाळी असल्यामुळे इतर काही शेळ्या वाचल्या असल्या तरी या घटनेमुळे शेतकरी महिलेचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही महिन्यांपासून या भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी तत्काळ अजिंठा वन विभागाला दिल्यानंतर सावळदबारा बीटचे अधिकारी प्रवीण गवळी, वनसेवक युसुफ पठाण तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील कार्यालयीन कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेळीपालन करून उदरनिर्वाह करणाऱ्या कमलबाई रमेश रगड यांना या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच झालेल्या नुकसानीची त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.1
- #jalna#marathinews#1
- भोकरदन बस स्थानकामध्ये आलेल्या बसमध्ये एका वृद्ध महिलेची मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहेत1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- #marathi#news#jalna#1