logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महापुरुषांची बदनामी करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांचा तीव्र निषेध महापुरुषांची बदनामी करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांचा तीव्र निषेध छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; सकल हिंदू समाजाचे आंदोलन अहिल्यानगर ः महापुरुषांविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाजातर्फे आंदोलन करून सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनात शहरासह परिसरातील सकल हिंदू समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात हे आंदोलन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देत वातावरण दणाणून सोडले. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही”, “महापुरुषांविरोधातील वक्तव्ये तत्काळ मागे घ्या”, अशा घोषणा देत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला. या वेळी आमदार संग्राम जगताप यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना काही धर्मांध लोकांशी, विशेषतः टिपूसोबत करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावणारा आहे. याच निषेधार्थ राज्यभरात तालुकास्तरावर सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर शहरातही हे आंदोलन करण्यात आले.” जगताप पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात काही लोक जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करणारे विचार पेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांविषयी वादग्रस्त विधाने करून समाजात संभ्रम निर्माण करणे हा गंभीर प्रकार आहे. टिपू सुलतानचा इतिहास पाहिला, तर त्याने भारतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडवून आणले, षडयंत्र रचली आणि अत्याचार केले. अशा व्यक्तीशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्यासारखे आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी शांततेत आपला निषेध नोंदवला. मात्र, सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी आणि भविष्यात अशा प्रकारची विधाने करू नयेत, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून, अनेक ठिकाणी निषेध आंदोलन होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य सहन केले जाणार नाही, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

1 hr ago
user_Deepak Vijay Kaswa
Deepak Vijay Kaswa
अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
1 hr ago

महापुरुषांची बदनामी करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांचा तीव्र निषेध महापुरुषांची बदनामी करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांचा तीव्र निषेध छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; सकल हिंदू समाजाचे आंदोलन अहिल्यानगर ः महापुरुषांविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदू समाजातर्फे आंदोलन करून सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनात शहरासह परिसरातील सकल हिंदू समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात हे आंदोलन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देत वातावरण दणाणून सोडले. “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही”, “महापुरुषांविरोधातील वक्तव्ये तत्काळ मागे घ्या”, अशा घोषणा देत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला. या वेळी आमदार संग्राम जगताप यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना काही धर्मांध लोकांशी, विशेषतः टिपूसोबत करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावणारा आहे. याच निषेधार्थ राज्यभरात तालुकास्तरावर सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर शहरातही हे आंदोलन करण्यात आले.” जगताप पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात काही लोक जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करणारे विचार पेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांविषयी वादग्रस्त विधाने करून समाजात संभ्रम निर्माण करणे हा गंभीर प्रकार आहे. टिपू सुलतानचा इतिहास पाहिला, तर त्याने भारतात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडवून आणले, षडयंत्र रचली आणि अत्याचार केले. अशा व्यक्तीशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्यासारखे आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलकांनी शांततेत आपला निषेध नोंदवला. मात्र, सपकाळ यांनी आपल्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी आणि भविष्यात अशा प्रकारची विधाने करू नयेत, अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून, अनेक ठिकाणी निषेध आंदोलन होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य सहन केले जाणार नाही, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • डंपरचे चाक महिलेच्या पायावरून... बोल्हेगावात थरारक अपघात... अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी थरारक अपघात झाला. वीटाने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली आल्याने एका महिलेचा पाय गंभीर जखमी झाला आहे. वारंवार अपघात होणाऱ्या या ठिकाणी गतीरोधक नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी पावणे दहा ते दहाच्या सुमारास वीटाने भरलेल्या डंपरच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली. डंपरचे चाक थेट महिलेच्या पायावरून गेल्याने तिचा पाय निकामी झाला आहे.या परिसरात रस्ता वारंवार खचत असल्यामुळे सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, गतीरोधक नसल्याने येथे सातत्याने अपघात घडत आहेत. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.अपघात होताच नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. याच वेळी सनफार्मा विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र धस यांनी परिस्थिती हाताळत जखमी महिलेला रिक्षातून तात्काळ रुग्णालयात दाखल केले.घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या परिसरात तातडीने गतीरोधक बसवावेत; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे."या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. प्रशासनाने गतीरोधक बसवले नाहीत, तर आम्ही आंदोलन करू." असा इशारा नागरिकांनी दिला आहे.बोल्हेगाव फाटा परिसरात वारंवार होणारे अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.
    1
    डंपरचे चाक महिलेच्या पायावरून...
बोल्हेगावात थरारक अपघात...
अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी थरारक अपघात झाला. वीटाने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली आल्याने एका महिलेचा पाय गंभीर जखमी झाला आहे. वारंवार अपघात होणाऱ्या या ठिकाणी गतीरोधक नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी पावणे दहा ते दहाच्या सुमारास वीटाने भरलेल्या डंपरच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली. डंपरचे चाक थेट महिलेच्या पायावरून गेल्याने तिचा पाय निकामी झाला आहे.या परिसरात रस्ता वारंवार खचत असल्यामुळे सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, गतीरोधक नसल्याने येथे सातत्याने अपघात घडत आहेत. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.अपघात होताच नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. याच वेळी सनफार्मा विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र धस यांनी परिस्थिती हाताळत जखमी महिलेला रिक्षातून तात्काळ रुग्णालयात दाखल केले.घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या परिसरात तातडीने गतीरोधक बसवावेत; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे."या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. प्रशासनाने गतीरोधक बसवले नाहीत, तर आम्ही आंदोलन करू." असा इशारा नागरिकांनी दिला आहे.बोल्हेगाव फाटा परिसरात वारंवार होणारे अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.
    user_Deepak Vijay Kaswa
    Deepak Vijay Kaswa
    अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    44 min ago
  • अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
    1
    अहिल्यानगरच्या भिंगारजवळ आलमगीर परिसरातील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करण्यात आला. सोमवारी सकाळी वन विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Farmer Nagar, Ahmednagar•
    13 hrs ago
  • शिरूर-आमदाबाद-मलठण अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणी Shirur Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदाबाद (ता. शिरूर) हद्दीत आमदाबाद फाट्यापुढे, माषेरेमळा येथे थोरात तलाठी यांच्या घरासमोर हा अपघात घडला. टोयोटा ग्लांजा (क्र. एमएच १२ एक्सएक्स २४८६) या चारचाकी वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून समोरील वाहनास जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात धीरज राजू पवळे (वय २४), त्यांची पत्नी वैभव धीरज पवळे (वय २१) व सासू गोपिका राजू पवळे (वय ४५, सर्व रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले. तिघांनाही डोक्याला, हात-पायांना तसेच छाती व मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात त्यांचा तीन वर्षांचा मुलगा विराज धीरज पवळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींना तातडीने शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या प्रकरणी शिवम सत्यवान साळवे (वय २८, रा. मलठण, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संदीप प्रभाकर पुंडे (रा. कान्हूरमेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ)(ब), ३२४ (४), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा क्रमांक १३३/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
    1
    शिरूर-आमदाबाद-मलठण अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रकरणी Shirur Police Station येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदाबाद (ता. शिरूर) हद्दीत आमदाबाद फाट्यापुढे, माषेरेमळा येथे थोरात तलाठी यांच्या घरासमोर हा अपघात घडला. टोयोटा ग्लांजा (क्र. एमएच १२ एक्सएक्स २४८६) या चारचाकी वाहनाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून समोरील वाहनास जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
या अपघातात धीरज राजू पवळे (वय २४), त्यांची पत्नी वैभव धीरज पवळे (वय २१) व सासू गोपिका राजू पवळे (वय ४५, सर्व रा. कोयाळी, ता. खेड, जि. पुणे) हे गंभीर जखमी झाले. तिघांनाही डोक्याला, हात-पायांना तसेच छाती व मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात त्यांचा तीन वर्षांचा मुलगा विराज धीरज पवळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जखमींना तातडीने शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या प्रकरणी शिवम सत्यवान साळवे (वय २८, रा. मलठण, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संदीप प्रभाकर पुंडे (रा. कान्हूरमेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ)(ब), ३२४ (४), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा क्रमांक १३३/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    5 hrs ago
  • 💪
    1
    💪
    user_Shaikh Irfan
    Shaikh Irfan
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • बालेपीर भागातील नागरिकांची मागणी तीन ते चार दिवसाला पाणी सोडण्यात यावे.
    1
    बालेपीर भागातील नागरिकांची मागणी तीन ते चार दिवसाला पाणी सोडण्यात यावे.
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सिल्लोड शहरात शोककळा, माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचा निधन. अंत्ययात्रा मध्ये हजारो नागरिकांनी...
    1
    सिल्लोड शहरात शोककळा, माजी मंत्री  आ.अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन, सिल्लोड शहराच्या माजी नगराध्यक्षा नफीसा बेगम अब्दुल सत्तार यांचे निधन सिल्लोड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या नगराध्यक्षा नफिसा बेगम यांचा निधन. अंत्ययात्रा मध्ये हजारो नागरिकांनी...
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ​ पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये येवला शहराने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. राज्य स्तरावर ६ वा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून येवला नगर परिषदेने ७५ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे. ​शहरात राबवलेले मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण, मियावाकी वने, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर आणि प्लास्टिकमुक्त उपक्रमांना मिळालेला नागरिकांचा सक्रिय पाठिंबा या यशाचे गमक ठरला. या कामगिरीबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष वर्षा गायकवाड व सर्व नगरसेवक यांनी येवलाकरांचे कौतुक केले आहे. ​मिळालेल्या बक्षीस रकमेतून शहरात नवीन हरित क्षेत्रे विकसित करणे, जलसंवर्धन प्रकल्प आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जेला प्रोत्साहन देणारी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत, ज्यामुळे येवला शहर पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेल ठरेल. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला.
    1
    ​ पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये येवला शहराने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. राज्य स्तरावर ६ वा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून येवला नगर परिषदेने ७५ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे.
​शहरात राबवलेले मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण, मियावाकी वने, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर आणि प्लास्टिकमुक्त उपक्रमांना मिळालेला नागरिकांचा सक्रिय पाठिंबा या यशाचे गमक ठरला. या कामगिरीबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष वर्षा गायकवाड  व सर्व नगरसेवक यांनी येवलाकरांचे कौतुक केले आहे.
​मिळालेल्या बक्षीस रकमेतून शहरात नवीन हरित क्षेत्रे विकसित करणे, जलसंवर्धन प्रकल्प आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जेला प्रोत्साहन देणारी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत, ज्यामुळे येवला शहर पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेल ठरेल.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • एसटीच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय सहली धोक्यात | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? जिल्ह्यातील शालेय सहली आता धोक्यात आल्या आहेत! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत… आणि आता अनेक शाळांनी सहलींना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर… अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाची कोकण दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीसाठी तारकपूर आगाराकडून पाच बसेस देण्यात आल्या. मात्र प्रवास सुरू झाल्यानंतर काही अंतरावरच एका बसचा बिघाड झाला. शिरूरजवळ बस अचानक बंद पडली… विद्यार्थ्यांचा ताफा रस्त्यात अडकला. शिरूर आगारातून सीएनजी बस मागविण्यात आली,पण ती घाट मार्गासाठी सक्षम नव्हती! तळेगाव दाभाडे येथे पुन्हा बस बदलावी लागली आणि पालीजवळ बसच्या चाकातून धूर निघू लागल्याने आणखी गोंधळ उडाला. विद्यार्थिनींना दाटीवाटीत बसवण्यात आलं… शेवटी श्रीवर्धन आगारातून नवीन बस मागवून सहल कसाबसा पूर्ण करण्यात आली. या सगळ्या प्रकारात विद्यार्थ्यांना शारीरिक थकवा, मानसिक ताण आणि भीतीचा सामना करावा लागला. या घटनेनंतर काही दिवसांतच नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या बसला अपघात झाला. प्राथमिक तपासात समोर आलं की, चालकाला सलग अतिरिक्त ड्युटी देण्यात आली होती.थकलेल्या अवस्थेतच त्याला प्रवासासाठी पाठवण्यात आलं. परिणामी चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली… मात्र अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. शिक्षक संघटनांचा आरोप आहे की – बसची फिटनेस तपासणी होत नाही चालकांची वैद्यकीय तपासणी होत नाही विश्रांती वेळ दिली जात नाही आणि प्रवासासाठी योग्य बस निवडली जात नाही “उत्पन्न वाढवण्यासाठी जुन्या आणि बिघडलेल्या बसेस सहलींसाठी दिल्या जात आहेत”अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षक आणि पालकांनी दिली आहे. या घटनांनंतर अनेक शाळांनी सहली रद्द केल्या आहेत.काहींनी पुढील आदेश येईपर्यंत सहली स्थगित ठेवल्या आहेत. “जोपर्यंत एसटी प्रशासन सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत सहली काढायच्या नाहीत,” अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अनुभवाधारित शिक्षणावरही होणार आहे. काही शाळा खासगी स्कूलबस किंवा ट्रॅव्हल्सचा पर्याय तपासत आहेत. पण अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार? “स्कूलबसने सहल काढली आणि अपघात झाला तर जबाबदार कोण?” असा थेट सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने शाळाही संभ्रमात आहेत. आता एसटी प्रशासनाला शाळांना भेटी देऊन विश्वास निर्माण करावा लागणार आहे. बसची स्थिती, चालकांची पात्रता, आपत्कालीन व्यवस्था, सुरक्षिततेची हमी हे सर्व स्पष्ट करावं लागेल. जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि शालेय सहलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि आधुनिक बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. एसटी प्रशासनाने विश्वासार्हता सिद्ध केली तरच शालेय सहली पुन्हा सुरू होतील. या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे? कॉमेंट करून नक्की सांगा.
    1
    एसटीच्या ढिसाळ नियोजनामुळे शालेय सहली धोक्यात | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ?
जिल्ह्यातील शालेय सहली आता धोक्यात आल्या आहेत!
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत…
आणि आता अनेक शाळांनी सहलींना ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे.
नेमकं काय घडलं? पाहूया सविस्तर…
अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर येथील संतुकनाथ इंग्लिश विद्यालयाची कोकण दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती.
या सहलीसाठी तारकपूर आगाराकडून पाच बसेस देण्यात आल्या.
मात्र प्रवास सुरू झाल्यानंतर काही अंतरावरच एका बसचा बिघाड झाला.
शिरूरजवळ बस अचानक बंद पडली…
विद्यार्थ्यांचा ताफा रस्त्यात अडकला.
शिरूर आगारातून सीएनजी बस मागविण्यात आली,पण ती घाट मार्गासाठी सक्षम नव्हती!
तळेगाव दाभाडे येथे पुन्हा बस बदलावी लागली आणि पालीजवळ बसच्या चाकातून धूर निघू लागल्याने आणखी गोंधळ उडाला.
विद्यार्थिनींना दाटीवाटीत बसवण्यात आलं…
शेवटी श्रीवर्धन आगारातून नवीन बस मागवून सहल कसाबसा पूर्ण करण्यात आली.
या सगळ्या प्रकारात विद्यार्थ्यांना शारीरिक थकवा, मानसिक ताण आणि भीतीचा सामना करावा लागला.
या घटनेनंतर काही दिवसांतच नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या बसला अपघात झाला.
प्राथमिक तपासात समोर आलं की, चालकाला सलग अतिरिक्त ड्युटी देण्यात आली होती.थकलेल्या अवस्थेतच त्याला प्रवासासाठी पाठवण्यात आलं.
परिणामी चालकाचा ताबा सुटून अपघात झाला.
सुदैवाने मोठी जीवितहानी टळली…
मात्र अनेक विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या.
या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
शिक्षक संघटनांचा आरोप आहे की –
बसची फिटनेस तपासणी होत नाही
चालकांची वैद्यकीय तपासणी होत नाही
विश्रांती वेळ दिली जात नाही
आणि प्रवासासाठी योग्य बस निवडली जात नाही
“उत्पन्न वाढवण्यासाठी जुन्या आणि बिघडलेल्या बसेस सहलींसाठी दिल्या जात आहेत”अशी संतप्त प्रतिक्रिया शिक्षक आणि पालकांनी दिली आहे.
या घटनांनंतर अनेक शाळांनी सहली रद्द केल्या आहेत.काहींनी पुढील आदेश येईपर्यंत सहली स्थगित ठेवल्या आहेत.
“जोपर्यंत एसटी प्रशासन सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत सहली काढायच्या नाहीत,”
अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली आहे.
याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अनुभवाधारित शिक्षणावरही होणार आहे.
काही शाळा खासगी स्कूलबस किंवा ट्रॅव्हल्सचा पर्याय तपासत आहेत.
पण अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार?
“स्कूलबसने सहल काढली आणि अपघात झाला तर जबाबदार कोण?”
असा थेट सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नसल्याने शाळाही संभ्रमात आहेत.
आता एसटी प्रशासनाला शाळांना भेटी देऊन विश्वास निर्माण करावा लागणार आहे.
बसची स्थिती, चालकांची पात्रता, आपत्कालीन व्यवस्था, सुरक्षिततेची हमी
हे सर्व स्पष्ट करावं लागेल.
जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि शालेय सहलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि आधुनिक बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही.
एसटी प्रशासनाने विश्वासार्हता सिद्ध केली तरच शालेय सहली पुन्हा सुरू होतील.
या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे?
कॉमेंट करून नक्की सांगा.
    user_Deepak Vijay Kaswa
    Deepak Vijay Kaswa
    अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.