Shuru
Apke Nagar Ki App…
पैशांसाठी मुक्या जीवांचा जीवघेणा खेळ; बैल-घोड्यांच्या धोकादायक शर्यती सिल्लोड-जळगाव मार्गावर पैशांसाठी बैल व घोड्यांच्या धोकादायक शर्यती सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या शर्यतींमुळे मुक्या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असून, अपघाताचीही शक्यता आहे. प्राण्यांना वेगाने पळवण्यासाठी त्यांच्यावर ताण आणला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे प्राणीप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Marathi News Point
पैशांसाठी मुक्या जीवांचा जीवघेणा खेळ; बैल-घोड्यांच्या धोकादायक शर्यती सिल्लोड-जळगाव मार्गावर पैशांसाठी बैल व घोड्यांच्या धोकादायक शर्यती सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या शर्यतींमुळे मुक्या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असून, अपघाताचीही शक्यता आहे. प्राण्यांना वेगाने पळवण्यासाठी त्यांच्यावर ताण आणला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे प्राणीप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- डोळ्यांसमोर वाहून गेली घरं, पूल अन् गाड्या; नेपाळमध्ये महापुराचा कहर! नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत महापुराने थैमान घातले असून, पूराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की घरं, पूल आणि वाहने डोळ्यांसमोर वाहून गेल्याचे थरकाप उडवणारे दृश्य समोर आले आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. #NepalFlood #FlashFlood #Nepal #Flood #BreakingNews1
- फुलंब्री येथे ईद ए मिलादुन्नबी निमित्त जलसा-ए-सिरातुन्नबी कार्यक्रम घेण्यात आला,1
- छ संभाजीनगर सहा लाख प्रवासी, तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद ANC - छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. छ संभाजीनगर सहा लाख प्रवासी, तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद ANC - छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. विमानतळावरून मोठ्या प्रमाणात कार्गो वाहतूकही होत असताना गोवा, नागपूर आणि अहमदाबाद या महत्त्वाच्या शहरांसाठीची विमानसेवा बंद झाली आहे. त्यामुळे पर्यटन आणि औद्योगिक राजधानीच्या विकासाला मोठा फटका बसत आहे. विमानसेवा वाढण्याऐवजी कमी होत असल्याने प्रवासी आणि उद्योजकांमध्ये नाराजी आहे. छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन आणि औद्योगिक केंद्र असल्याने देशातील प्रमुख शहरांशी हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याची मागणी होत आहे. विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतानाही अपेक्षित विमानसेवा मिळत नसल्याने केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.1
- 📦 पार्सल पाठवायचंय? मग काळजी कशाला? घरातूनच Parcel Pickup 📦 वेगवान सेवा • सुरक्षित डिलिव्हरी • विश्वासू सेवा तुमचे Documents, Parcels किंवा Gifts कुठेही पाठवा Kiran Courier सोबत. आजच संपर्क करा आणि तुमची Courier Booking करा! 🚚 विश्वासाची कुरिअर सेवा – Kiran Courier 📞 Call Now / WhatsApp Now 9545789966 Hashtags: #KiranCourier #CourierService #Aurangabad #Sambhajinagar #Courier #ParcelDelivery #DoorstepPickup #FastDelivery #SafeDelivery #LocalCourier #CourierServiceAurangabad #ParcelService #DeliveryService1
- पाण्यावरून वाद पेटला, विरोधी पक्षनेते व सत्ता धारी यांच्यात मनपाच्या सभागृहात गदारोळ1
- बंजारा समाजाची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी अशा सांस्कृतिक उत्सवांचे महत्त्व मोठे आहे. सातकुंड-तेलवाडी येथे झालेल्या तिज महोत्सवातूनही याच सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले. सातकुंड-तेलवाडी येथे बंजारा समाजाचा तिज महोत्सव उत्साहात सातकुंड-तेलवाडी : बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक तिज महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजातील महिला, युवक व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत बंजारा समाजाची पारंपरिक संस्कृती, लोकपरंपरा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले. तिज महोत्सव हा बंजारा समाजाच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेला महत्त्वाचा उत्सव मानला जातो. या उत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीने तिजची पूजा, पारंपरिक गीते व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिला व युवतींनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. सातकुंड-तेलवाडी परिसरातील बंजारा समाजबांधवांनी एकत्र येत आपल्या संस्कृतीचे जतन आणि पुढील पिढीपर्यंत परंपरांचा वारसा पोहोचविण्याचा संदेश दिला. तिज महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील महिला व युवकांचा सहभाग वाढविण्यासोबतच सामाजिक एकता आणि बंधुभाव मजबूत करण्यावर भर देण्यात आला. यावेळी पारंपरिक गीते, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे उत्सवाचे वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले. लहान मुले, महिला, युवक तसेच ज्येष्ठ समाजबांधवांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. बंजारा समाजाची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी अशा सांस्कृतिक उत्सवांचे महत्त्व मोठे आहे. सातकुंड-तेलवाडी येथे झालेल्या तिज महोत्सवातूनही याच सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले.1
- ईद-ए-मिलाद-उन-नबी'च्या पवित्र पर्वानिमित्त आज ढोरकीनमध्ये मोठा उत्साह. 'ईद-ए-मिलाद-उन-नबी'च्या पवित्र पर्वानिमित्त आज ढोरकीनमध्ये मोठा उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन पाहायला मिळाले. एका बाजूला मुस्लिम बांधवांनी भव्य आणि शांततापूर्ण जुलूस काढला, तर दुसऱ्या बाजूला 'अल-कुरेशी बॉईज'च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवण्यात आला आहे. पाहूया या विशेष कार्यक्रमाचा सविस्तर वृत्तांत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ढोरकीन शहरात आज भव्य जुलूस काढण्यात आला. तसेच 'अल-कुरेशी बॉईज, ढोरकीन' यांच्या पुढाकाराने राजाबाग सवार दर्गाह येथे भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. "चला रक्तदान मोहीम राबवूया... रक्तदान करून जीव वाचवूया" हा संदेश देत तरुणांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. संकलित झालेले रक्त 'दत्ताजी भाले रक्तकेंद्र' यांच्या माध्यमातून गरजूंसाठी उपलब्ध केले जाणार आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी मौलाना काशिफ रजा, मौलाना अबू, सुफियान कुरेशी, निसार कुरेशी, जावेद कुरेशी, अय्यूब कुरेशी, जब्बार कुरेशी, जुबेर कुरेशी, मोईन कुरेशी, इरफान कुरेशी, मुक्रम कुरेशी, इम्रान कुरेशी, मुजीब कुरेशी, इस्माईल कुरेशी, अजिम कुरेशी, युनुस कुरेशी, फकिर कुरेशी यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांची मोठी उपस्थिती होती.1
- पैशांसाठी मुक्या जीवांचा जीवघेणा खेळ; बैल-घोड्यांच्या धोकादायक शर्यती सिल्लोड-जळगाव मार्गावर पैशांसाठी बैल व घोड्यांच्या धोकादायक शर्यती सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या शर्यतींमुळे मुक्या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असून, अपघाताचीही शक्यता आहे. प्राण्यांना वेगाने पळवण्यासाठी त्यांच्यावर ताण आणला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे प्राणीप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.1