Shuru
Apke Nagar Ki App…
डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांना योगदान दिल्याबद्दल जाहीर झाला मानाचा पुरस्कार साकोली डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांना अमरावती येथील स्व. सूर्यकांता देवी पोटे चारिटेबल ट्रस्ट कडून., कला व साहित्य क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल व झाडी बोली चळवळ शिखरापर्यंत नेण्यासाठी व अनेक नवोदित साहित्यिक व कलावंतांना पुढे आणण्यासाठी डॉ . हरिश्चंद्र बोरकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षीच्या साहित्यव्रती उ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या या सन्मानाने साकोली तालुका व साहित्य क्षेत्र गौरवान्वित झाले आहे सन्मान व पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन केले जात आहे
मनिषा विजय काशीवार
डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांना योगदान दिल्याबद्दल जाहीर झाला मानाचा पुरस्कार साकोली डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर यांना अमरावती येथील स्व. सूर्यकांता देवी पोटे चारिटेबल ट्रस्ट कडून., कला व साहित्य क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल व झाडी बोली चळवळ शिखरापर्यंत नेण्यासाठी व अनेक नवोदित साहित्यिक व कलावंतांना पुढे आणण्यासाठी डॉ . हरिश्चंद्र बोरकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षीच्या साहित्यव्रती उ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या या सन्मानाने साकोली तालुका व साहित्य क्षेत्र गौरवान्वित झाले आहे सन्मान व पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन केले जात आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by मनिषा विजय काशीवार4
- महागावात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा तडाखा जनजीवन विस्कळीत महागाव : महागाव परिसरात सोमवारी (ता.30) रोजी सायंकाळी अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. दुपारपासून वाढलेला प्रचंड उकाडा आणि दमट वातावरण यानंतर सायंकाळी काळे ढग दाटून आले आणि काही क्षणातच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसासोबतच विजांचा कडकडाट इतका तीव्र होता की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी वीज खंडित झाली असून काही भागात ट्रान्सफॉर्मरवर परिणाम झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विजांच्या सततच्या कडकडाटामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत होते. या मुसळधार पावसामुळे महागावातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन पथक सतर्क झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी वादळी वाऱ्यामुळे काही पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे, झाडाखाली उभे न राहण्याचे आणि विजेपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महागावमध्ये अचानक आलेल्या या नैसर्गिक बदलामुळे जनजीवन काही काळासाठी ठप्प झाले असून, पुढील काही तास हवामान असेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.3
- कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते1
- उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.1
- Post by Samachar king digital1
- सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल1
- छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....1
- Post by मनिषा विजय काशीवार3