Shuru
Apke Nagar Ki App…
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबागणेश येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. -----------
शेख महेशर ताहेर(पञकार)
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबागणेश येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. -----------
More news from महाराष्ट्र and nearby areas
- (प्रतिनिधी ):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य रक्तदान व सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये मोठ्या संख्येने युवक-युवतींनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध आजारांचे निदान, हाडे, रक्तदाब, शुगर, हिमोग्लोबिन तपासणी आदी सेवा तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात आल्या. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्रपतींच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. रक्तदान हेच जीवनदान असून प्रत्येकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. सार्वजनिक शिव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक संतोष जाधव यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व रक्तदाते, नागरिक, डॉक्टर व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व वैद्यकीय पथक यांनी परिश्रम घेतले.1
- आंदोलन करणाऱ्यावरच गुन्हा दाखल1
- अंबड–घनसावंगी मार्गावर ऊसाचे ट्रॅक्टर पलटी; जिनिंगसमोर उस सांडल्याने वाहतूक ठप्प.. घनसावंगी ते अंबड मुख्य रस्त्यावर सूतगिरणीच्या पुढे जिनिंग जवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना आज १८ फेब्रुवारी बुधवारी सायंकाळी घडली. या अपघातामुळे संपूर्ण रस्ता काही काळासाठी पूर्णपणे बंद झाला असून दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या1
- पोलीस निरीक्षक लक्ष्मणजी केंद्रे यांच्या वतीने शिवजयंती व रमजान निमित्त शांतता राखण्याचे आव्हान1
- छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती; संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती निमित्त रक्तदान शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले रक्तदान हे जीवनदान रक्तदान प्रतिज्ञा वाढवणे जरुरी असून गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे असे प्रतिपादन तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांनी केले. शिवसेना (शिंदे) गट व शिवमुद्रा प्रतिष्ठान मंठा तालुका वतीने येथील प्रल्हादराव बोराडे कॉम्प्लेक्स येथे दिनांक १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ वी जयंती निमित्ताने आणि संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना बोराडे म्हणाले की, रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते कारण ते एखाद्याला नवीन जीवन देऊ शकते एका वेळेच्या रक्तदानातून तीन जणांचे प्राण वाचू शकतात.१८ ते ६५ व्ययोगटातील निरोगी व्यक्तीने दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकते ज्यामुळे रक्तदाब व कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते हृदयविकाराचा धोका कमी होतो रक्तदान हे सुरक्षित असून यातून कोणतेही कायमस्वरूपी नुकसान होत नाही या उलट रक्तदानातून मानवता निर्माण होते असे बोराडे म्हणाले. यावेळी आदर्श ब्लड सेंटरच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले एकुण 96 रक्त दात्यांनी रक्तदान केले.यावेळी रामराव वरकड, योगेश पाटील अवचार,भगवान गायकवाड,दिपक गायकवाड, एडवोकेट राजेश खरात, डॉक्टर संतोष पवार, अक्षय दीप वाघमारे, भीमराव वाघ, दिलीपराव हिवाळे, दत्तात्रय बोराडे, अमोल विरकर, बाळासाहेब देशमुख, माऊली वायाळ, शैलेश मोरे, रतन कळणे, पप्पू बोराडे, गोपीनाथ डेंगळे, विलास बनसोडे, पांडुरंग बोराडे, नाना बोराडे, नाथा दिवटे, विनोद खरात, पिराजी पवळे, सतीश वायाळ, राम वरकुटे, रवी डहाळे, पवन मगर, अलीम कुरेशी, पवन वाघमारे, लिंबाजी बोराडे, भगवान बोराडे, दत्ता खरात, विष्णूपंत मोरे, भरत नरोटे, राम नरोटे उपस्थित होते..1
- भगवा आहे तो, अभिमानाने पण तेवढ्याच जबाबदारीने फडकवायचा असतो….जय शिवराय 🚩🙏🏻 . .1
- पोलीस ठाणे तीर्थपुरी हद्दीत डिजे-मुक्त शिवजयंती साजरी होणार ! सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांचे आवाहन; १८ फेब्रुवारी रोजी शांतता बैठक संपन्न ओमप्रकाश उढाण १९ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे तीर्थपुरी येथे १८ फेब्रुवारी रोजी शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व गावांमध्ये डिजे-मुक्त शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण सर्वांनी डीजे मुक्त शिवजयंती साजरी करावी. शिवजयंती उत्सव हा केवळ उत्साहाचा नव्हे तर समाजप्रबोधनाचा सण आहे. समाजहिताचे उपक्रम हाती घेऊन सर्व कुटुंबांना पाहता येतील, प्रेरणादायी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. त्यांनी पुढे नमूद केले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या जीवनात जपलेले शौर्य, न्यायप्रियता, स्त्रीसन्मान, संघटन कौशल्य आणि स्वराज्याची भावना यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. त्यांच्या विचारांनुसार कृती केल्यासच शिवजयंती साजरी करण्याचा खरा अर्थ साध्य होईल. लहान बालकांमध्येही शिवचरित्राचे बाळकडू रुजवून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी केले. शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीस गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिवजयंती कमिटी सदस्य, व्यापारी बंधु, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.1
- *जालना* हिजाब घालून काही परीक्षार्थी विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर आल्याने गोंदळ... जालना शहरातील परीक्षा केंद्रावरील प्रकार.. समाज व धर्म पाहून विद्यार्थ्यांवर दबाव तंत्र वापरू नका.. एमआयएम पदाधिकाऱ्याचा बारावी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती..1
- *आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी Gigaplex IT Park, ऐरोली वेस्ट येथील Mind Space कंपनीमध्ये एक दुर्दैवी प्रकार घडला. उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक कर्मचारी आपल्या वाहनावर भगवा झेंडा लावून कामावर येत होता.* *सदर कर्मचाऱ्याला प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षा रक्षक विलास शिंदे यांनी गाडीवरील भगवा झेंडा काढण्यास सांगितले. संबंधित कर्मचारी मुकेश जाधव यांनी “मी झेंडा काढणार नाही, गरज असल्यास गाडी बाहेरील पार्किंगमध्ये लावतो” असे सांगितले. मात्र सुरक्षा रक्षकाने बाहेरील पार्किंगमध्ये देखील वाहन लावण्यास नकार देत जबरदस्तीने गाडीवरील भगवा झेंडा काढून घेतला आणि त्यानंतरच प्रवेश दिला.* *ही घटना अत्यंत निषेधार्ह असून शिवप्रेमींच्या भावना दुखावणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त लावलेला भगवा झेंडा काढण्याचा प्रकार हा असंवेदनशील आणि चुकीचा आहे.* *या घटनेची माहिती मिळताच Maharashtra Navnirman Sena तर्फे तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून संबंधित सुरक्षा रक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित व्यवस्थापकांकडून लेखी हमी घेण्यात आली आहे की भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही.* *शिवभक्तांच्या भावना दुखावणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.*1