logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांनी भेट देऊन विश्वशांती बुद्ध विहाराची पाहणी करून बुद्ध वंदना घेतली

5 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
5 hrs ago

उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांनी भेट देऊन विश्वशांती बुद्ध विहाराची पाहणी करून बुद्ध वंदना घेतली

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माजी मंत्री आ. अमित देशमुख अवमान प्रकरणी उदगीरात निषेध....  उदगीर (प्रतिनिधी) लातूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरण संदर्भात  आंदोलन झाले. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे. पण सदरील आंदोलन भरकटले गेले असा आरोप मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने  राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर यांच्या वतीने करण्यात आला. विषय आरक्षण वर्गीकरणाचा होता पण त्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व  दिले नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विटंबना करण्यात आली , अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. अपमानजनक भाषा वापरण्यात आली. पाय बांधण्यात येतील असेही यावेळी  आंदोलनकर्ते  म्हणाले. आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन असताना दुसराच विषय मध्ये विनाकारण घुसवून लातूरचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची बदनामी करण्यात आली. माजी मंत्री आ. यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वैयक्तिक आकासापोटी बदनामी करण्याच्या हेतूने सदरील प्रकार घडवून आणल्याची टीका यावेळी पॅंथर नेते गौतम दादा सोमवंशी यांनी केली . सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर व पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. सदरील  असंविधानिक भाषा वापरणाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे, भारतीय दलित पॅंथरचे युवक प्रदेशाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी, राहुल चौधरी, राम काळे, श्रीआनंद उपाध्ये, आकाश दयानंद माने, कृष्णा मोगले,अक्षय सावंत इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    3
    माजी मंत्री आ. अमित देशमुख अवमान प्रकरणी उदगीरात निषेध.... 
उदगीर (प्रतिनिधी)
लातूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरण संदर्भात  आंदोलन झाले. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे. पण सदरील आंदोलन भरकटले गेले असा आरोप मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने  राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर यांच्या वतीने करण्यात आला. विषय आरक्षण वर्गीकरणाचा होता पण त्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व  दिले नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विटंबना करण्यात आली , अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. अपमानजनक भाषा वापरण्यात आली. पाय बांधण्यात येतील असेही यावेळी  आंदोलनकर्ते  म्हणाले. आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन असताना दुसराच विषय मध्ये विनाकारण घुसवून लातूरचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची बदनामी करण्यात आली. माजी मंत्री आ. यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वैयक्तिक आकासापोटी बदनामी करण्याच्या हेतूने सदरील प्रकार घडवून आणल्याची टीका यावेळी पॅंथर नेते गौतम दादा सोमवंशी यांनी केली .
सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर व पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. सदरील  असंविधानिक भाषा वापरणाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे, भारतीय दलित पॅंथरचे युवक प्रदेशाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी, राहुल चौधरी, राम काळे, श्रीआनंद उपाध्ये, आकाश दयानंद माने, कृष्णा मोगले,अक्षय सावंत इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    17 min ago
  • लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून  घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला.
👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.
तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
    user_Satish Chande
    Satish Chande
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • हडोळती परिसरातील वीज व्यवस्थेचा बोजवारा; नागरिकांत तीव्र नाराजी हडोळती येथील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांनी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून पदाचा कार्यभार स्वीकारला असला, तरी परिसरातील अनेक ग्राहकांना आजही त्यांची ओळख नाही. ते नेमके कधी येतात, कधी जातात याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून कार्यालयीन कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हडोळती उपकेंद्रातून तब्बल २५ गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र अनेक ठिकाणी डीपींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. डीपीवरील वायर तुटलेल्या, किटकॅट जळालेल्या, तसेच वेलींनी वेढलेल्या अवस्थेत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देखभाल व दुरुस्तीसाठी येणारे साहित्य नेमके कुठे वापरले जाते, याबाबतही नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. अपुर्‍या देखभालीमुळे दोन दिवसांपूर्वी स्पार्किंग होऊन एका नागरिकाचे घर जळाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महादेव मंदिरासमोरील डीपीला अचानक स्पार्किंग होऊन आग लागली. सुदैवाने वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. या सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महावितरण प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नियमित मेंटेनन्स करावे, जीर्ण डीपी दुरुस्त कराव्यात तसेच वाढत्या भारानुसार नवीन डीपी बसवाव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
    2
    हडोळती परिसरातील वीज व्यवस्थेचा बोजवारा; नागरिकांत तीव्र नाराजी
हडोळती येथील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांनी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून पदाचा कार्यभार स्वीकारला असला, तरी परिसरातील अनेक ग्राहकांना आजही त्यांची ओळख नाही. ते नेमके कधी येतात, कधी जातात याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून कार्यालयीन कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हडोळती उपकेंद्रातून तब्बल २५ गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र अनेक ठिकाणी डीपींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. डीपीवरील वायर तुटलेल्या, किटकॅट जळालेल्या, तसेच वेलींनी वेढलेल्या अवस्थेत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देखभाल व दुरुस्तीसाठी येणारे साहित्य नेमके कुठे वापरले जाते, याबाबतही नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे.
अपुर्‍या देखभालीमुळे दोन दिवसांपूर्वी स्पार्किंग होऊन एका नागरिकाचे घर जळाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महादेव मंदिरासमोरील डीपीला अचानक स्पार्किंग होऊन आग लागली. सुदैवाने वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
या सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महावितरण प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नियमित मेंटेनन्स करावे, जीर्ण डीपी दुरुस्त कराव्यात तसेच वाढत्या भारानुसार नवीन डीपी बसवाव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
    user_Vishwanath Hengne
    Vishwanath Hengne
    अहमदपूर, लातूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
    1
    नांदेड : कंधार तालुक्यातील मानार प्रकल्पाच्या कोठा–जगडा मार्गावर असलेल्या अरुंद पुलावरून एक कार खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार अरुंद पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने वाहन थेट पुलाखाली कोसळले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले.
जखमींना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे त्या मार्गावरील पुलाची सुरक्षितता पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    36 min ago
  • ज्या ज्या गावला ब्रेकर आहे त्या त्या गावचे लोकांनी साथ द्यावा ही कळकळीची विनंती कारण की आपल्याला एवढे ब्रेकर मूळ आपले पेशंट नांदेड पर्यंत सुद्धा पोहोचत नाहीत याची काळजी घेणं फार गरजेचं आहे त्यासाठी हा टोल अधिकारी म्हणतोय ज्या गावचे ब्रेकर काढायचा आहे त्या गावचा ठराव मागते ग्रामपंचायतचा त्यासाठी ब्रेकर चा त्रास आहे त्यांनी सहकार्य करावं हे कळकळीची विनंती
    1
    ज्या ज्या गावला ब्रेकर आहे त्या त्या गावचे लोकांनी साथ द्यावा ही कळकळीची विनंती कारण की आपल्याला एवढे ब्रेकर मूळ आपले पेशंट नांदेड पर्यंत सुद्धा पोहोचत नाहीत याची काळजी घेणं फार गरजेचं आहे त्यासाठी हा टोल अधिकारी म्हणतोय ज्या गावचे ब्रेकर काढायचा आहे त्या गावचा ठराव मागते ग्रामपंचायतचा त्यासाठी ब्रेकर चा त्रास आहे त्यांनी सहकार्य करावं हे कळकळीची विनंती
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.
    1
    सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    1 hr ago
  • चाकूर येथे दोन बेपत्ता अल्पवयीन मुलांपैकी एकाचा मृतदेह आढळला; पोलिसांची तातडीची शोधमोहीम व सखोल तपास सुरू. सुरू ॲप इन मराठी न्यूज. रविवार दिनांक 19 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाणे हद्दीत दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची गंभीर घटना घडून त्यापैकी एका मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत लातूर जिल्हा पोलिसांनी तातडीने व्यापक शोधमोहीम राबवून सखोल तपास सुरू केला आहे. दि. 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 07.00 वाजल्यापासून जुने महादेव मंदिर गल्ली, चाकूर येथील दोन अल्पवयीन मुले 1) साइचरण दिनेश स्वामी (वय 10 वर्षे) व 2) देवंश मंगेश स्वामी (वय 7 वर्षे) हे घरातील कोणालाही न सांगता बाहेर गेल्याची माहिती दुपारी 01.00 वाजता पोलिसांना प्राप्त झाली. सदर माहिती मिळताच चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बालाजी भांडे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, दुपारी सुमारे 14.10 वाजता शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. तपास व शोधकार्य सुरू असतानाच बेपत्ता मुलांपैकी देवंश मंगेश स्वामी (वय 7 वर्षे) हा मुलगा चाकूर ते उजळंब रोडलगत नरेंद्र मनमथ आप्पा शेटे यांच्या जुन्या घराजवळील मोकळ्या जागेत मृत अवस्थेत आढळून आला. सदर बाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय, चाकूर येथे हलविण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे , अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चौधर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व तपासाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चाकूर तसेच स्थानिक गुन्हे शाखेची एकूण चार पथके तयार करून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक देखील कार्यरत करण्यात आले. सदर घटनेचा तपास फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकाच्या सहाय्याने विविध अंगांनी सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याबरोबरच अज्ञात आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. तसेच दुसऱ्या बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठीही पोलिसांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. लातूर जिल्हा पोलीस दल या घटनेकडे अत्यंत संवेदनशीलतेने व गांभीर्याने पाहत असून, सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
    1
    चाकूर येथे दोन बेपत्ता अल्पवयीन मुलांपैकी एकाचा मृतदेह आढळला; पोलिसांची तातडीची शोधमोहीम व सखोल तपास सुरू.
सुरू ॲप इन मराठी न्यूज. 
रविवार दिनांक 19 एप्रिल 2026.
लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाणे हद्दीत दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची गंभीर घटना घडून त्यापैकी एका मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेत लातूर जिल्हा पोलिसांनी तातडीने व्यापक शोधमोहीम राबवून सखोल तपास सुरू केला आहे.
दि. 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 07.00 वाजल्यापासून जुने महादेव मंदिर गल्ली, चाकूर येथील दोन अल्पवयीन मुले 1) साइचरण दिनेश स्वामी (वय 10 वर्षे) व 2) देवंश मंगेश स्वामी (वय 7 वर्षे) हे घरातील कोणालाही न सांगता बाहेर गेल्याची माहिती दुपारी 01.00 वाजता पोलिसांना प्राप्त झाली. सदर माहिती मिळताच चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बालाजी भांडे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून शोधमोहीम सुरू केली.
दरम्यान, दुपारी सुमारे 14.10 वाजता शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली. तपास व शोधकार्य सुरू असतानाच बेपत्ता मुलांपैकी देवंश मंगेश स्वामी (वय 7 वर्षे) हा मुलगा चाकूर ते उजळंब रोडलगत नरेंद्र मनमथ आप्पा शेटे यांच्या जुन्या घराजवळील मोकळ्या जागेत मृत अवस्थेत आढळून आला. सदर बाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय, चाकूर येथे हलविण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे , अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चौधर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व तपासाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे चाकूर तसेच स्थानिक गुन्हे शाखेची एकूण चार पथके तयार करून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी रवाना करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक देखील कार्यरत करण्यात आले.
सदर घटनेचा तपास फॉरेन्सिक टीम तसेच श्वान पथकाच्या सहाय्याने विविध अंगांनी सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याबरोबरच अज्ञात आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. तसेच दुसऱ्या बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठीही पोलिसांकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.
लातूर जिल्हा पोलीस दल या घटनेकडे अत्यंत संवेदनशीलतेने व गांभीर्याने पाहत असून, सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे तसेच कोणतीही संशयास्पद माहिती त्वरित कळवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by Laxman Ugile
    1
    Post by Laxman Ugile
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.