Shuru
Apke Nagar Ki App…
महावितरण च्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू;खा.बळवंत वानखडे यांच्या मध्यस्थीनंतरच मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांची सहमती
Amravati News Update
महावितरण च्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू;खा.बळवंत वानखडे यांच्या मध्यस्थीनंतरच मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांची सहमती
More news from महाराष्ट्र and nearby areas
- महावितरण च्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू;खा.बळवंत वानखडे यांच्या मध्यस्थीनंतरच मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांची सहमती1
- जिल्हा प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रम संपन्न.. अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न झाले1
- धामणगांव रेल्वेत साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी धामणगांव रेल्वेत साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त धामणगांव रेल्वे शहर व तालुक्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच शहरासह तालुक्यातील विविध भागांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमा व पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. संपूर्ण शहर पिवळ्या ध्वजांनी सजले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही सायंकाळी दत्तापूर येथून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत मातंग समाजातील युवक, युवती, महिला, पुरुष तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डीजे, बँजो, आकर्षक देखावे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने शहरातील प्रमुख मार्गांवरून जल्लोषमय वातावरण निर्माण केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जयघोष, पिवळ्या ध्वजांची दिमाखदार शोभा आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण धामणगांव रेल्वे शहर दुमदुमून गेले. युवक, युवती, महिला आणि पुरुषांनी नाचत-गाजत मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जयंती सोहळ्याला अभूतपूर्व उत्साह दिला. ही भव्य मिरवणूक शहरातील मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे पोहोचली. तेथे महाआरती व अभिवादनानंतर मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दत्तापूर पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. शांतता व शिस्तबद्ध वातावरणात संपूर्ण जयंती महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- तिरंगा विजय जल्लोष साजरा करीत असतानाउद्धव ठाकरे यांची जोरदार सभा तिरंगा विजय जल्लोष साजरा करीत असतानाउद्धव ठाकरे यांची जोरदार सभा1
- तांदुळवाडी येथील करुणा बुध्द विहारात प्रवित्र ग्रंथ मिलिंद प्रश्न पठणास आंरभ तांदुळवाडी येथील करुणा बुध्द विहारात प्रवित्र ग्रंथ मिलिंद प्रश्न पठणास आंरभ अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट तालुक्यातील तांदुळवाडी येथील करुणा बुद्ध विहार चैरिटेबल ट्रस्टच्या वतीने दि. २९ जुलै रोजी आषाढ पौर्णिमे पासुन वर्षावास प्रारंभ करण्यात आला.सदर वर्षावास आषाढ पौर्णिमा ते आश्वीन पौर्णिमा या तीन महीन्याच्या कालावधी मध्ये येथील बुद्धविहारामध्ये पवित्र ग्रंथ मिलीद प्रश्न, पठणाला सुरवात झाली असुन ट्रस्टच्या वतीने समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी पवीत्र ग्रंथ ट्रस्ट चे अध्यक्ष राजुभाऊ रायबोले यांनी पठण करावा अशी विनंती करण्यात आल्या नंतर अध्यक्षांनी सर्वाची विनंती स्वीकारून ग्रंथ पठणाला सुरवात केली. यावेळी ट्रस्ट चे उपाध्यक्ष साहेबराव गवारगुरु, ट्रस्टचे कोषाध्यक्ष माणिकराव रायबोले, सचिव सुनील वानखडे, सदस्य बाळकृष्ण रायबोले, शरद बगाडे, डॉ.देविदास आठवले, अशोक रायबोले, व धम्म जागृती उपासिका संघाच्या अध्यक्षा आशाबाई रायबोले, विद्या रायबोले, नर्मदा रायबोले, शिलाबाई हातोले, नंदा गवारगुरु, ललीता गवारगुरु, प्रभावती रायबोले, संध्या पाखरे ,नंदा गायकवाड, दुर्गाबाई रायबोले, बेबी वानखडे, बेबी रायबोले, कांता रायबोले, शेंगाबाई रायबोले, ज्योती आठवले, दुर्गाबाई भारसाकडे, सुर्यकांता आठवले,विद्या जिवन रायबोले ,संगीता आठवले वंदना हातोले,शारदा निशांत रायबोले, कमलाबाई रायबोले, निता वानखडे ,रजनी पाखरे, सुमित्रा इंगळे,सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक सदर मिलिंद प्रश्न या पवित्र ग्रंथाचा आंनद घेत आहेत.या ग्रंथाच्या समारोप कार्यक्रम मोठ्या हर्षात साजरा करण्यात येणार असल्याचे समजते.4
- *"गांजा व दारूविक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही"* वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे *"गांजा व दारूविक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही"* वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 01 ऑगस्ट 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे ॲंटी नार्काेटिक्स पथकास मिळालेल्या गोपणीय माहितीवरून पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील मौजा मदनी वार्ड नं. 02 प्राथमिक शाळेमागे येथे सराईत गुन्हेगार शंकर गुलाब पवार याचे राहते घरी एन.डि.पी.एस. व दारूबंदी कायद्यान्वये रेड केला असता, तेथे आरोपी शंकर पवार याची पत्नी सौ. चंदा शंकर पवार, त्याची अल्पवयीन मुलगी व त्याचा भाऊ राजु गुलाब पवार असे संगणमताने गांजा व दारू मालाची विक्री करतांना मोक्कावर रंगेहाथ मिळुन आल्याने, तसेच झडती दरम्यान त्याचे घरी गांजा व दारूचा माल, मालाची विक्री व वाहतूक करण्याकरिता वापरलेली मोपेड, अवैध मार्गाने प्राप्त केलेली नगदी रक्कम मिळुन आल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपींचे ताब्यातुन निव्वळ 551 ग्रॅम गांजा अमली पदार्थ, देशी- विदेशी व मोहा दारूचा माल, एक सुझुकी बर्गमॅन मोपेड क्र. एम.एच. 32 बि.ए. 7660, नगदी रक्कम, दोन मोबाईलसह जु.कि. 1,97,275 रू चा मुद्देमाल जप्त करून एकुण 04 आरोपीविरुद्ध पो.स्टे. सेवाग्राम येथे एन.डि.पी.एस. व दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद केला. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सिनुकुमार बानोत, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, सागर भोसले, अभिषेक नाईक, पल्लवी बोबडे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.1