सगळ्यांनाच शे दोनशे नेत्यांना विधान परिषदेची स्वप्न पडू लागले आहेत. विधानपरिषदेत आमदारकी मिळवण्यासाठी निकष काहीच नसले तरी अगोदर विधानसभा निवडणुकीत उतरुन स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखवून द्यावं लागतं. स्वतःच नेतृत्व तळागाळात रुजवलं गेलं पाहिजे. आजकाल विधान परिषदेत संधी फक्त मर्जीतील लोकांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी केलं जातं. आता 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यात किती नवख्या आणि तरुणांना संधी मिळते हे दुर्बीण लावून शोधावे लागेल. त्यासाठी वेगळे कष्ट लागेल . गोपीचंद पडळकर साहेबांना विधान परिषदेत संधी मिळण्या अगोदर 3 वेळा विधानसभा आणि 1 दा लोकसभेत पराभव झाला तेव्हा त्यांना संधी मिळाली. सगळ्यांनाच शे दोनशे नेत्यांना विधान परिषदेची स्वप्न पडू लागले आहेत. त्यांना आपल्या लोकसभा विधानसभा मतदारसंघात जोमाने काम करुन आपले कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व सिद्ध करावे लागेल. बाकी निष्ठावंत नेत्यांची नावं प्रत्येक वेळी घर चर्चेत येतात. संभाव्य च्या यादीत येतात. आणि केराच्या टोपलीत जातात. निष्ठावंत आहेत त्यांना कमजोर समजलं जातं. मग एखाद्या माॉस लिडर राजकीय परीवारातील लोकांचे राजकीय पुनर्वसन करुन घेतोच. अशा नवीन विधान परिषद आमदारांना शुभेच्छा... बाकी भरपूर इच्छुक आहेत त्यांना येणाऱ्या २०२९ च्या विधानसभा आणि लोकसभेसाठी शुभेच्छा... बाकी निष्ठावंत कार्यकर्ते नेते उचला सतरंज्या जो संघर्ष आणि दंड थोपटून बंड करेल तोच राजकारणात टिकेल अशा लढवय्या नेत्यांनाही शुभेच्छा ...
सगळ्यांनाच शे दोनशे नेत्यांना विधान परिषदेची स्वप्न पडू लागले आहेत. विधानपरिषदेत आमदारकी मिळवण्यासाठी निकष काहीच नसले तरी अगोदर विधानसभा निवडणुकीत उतरुन स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखवून द्यावं लागतं. स्वतःच नेतृत्व तळागाळात रुजवलं गेलं पाहिजे. आजकाल विधान परिषदेत संधी फक्त मर्जीतील लोकांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी केलं जातं. आता 10 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यात किती नवख्या आणि तरुणांना संधी मिळते हे दुर्बीण लावून शोधावे लागेल. त्यासाठी वेगळे कष्ट लागेल . गोपीचंद पडळकर साहेबांना विधान परिषदेत संधी मिळण्या अगोदर 3 वेळा विधानसभा आणि 1 दा लोकसभेत पराभव झाला तेव्हा त्यांना संधी मिळाली. सगळ्यांनाच शे दोनशे नेत्यांना विधान परिषदेची स्वप्न पडू लागले आहेत. त्यांना आपल्या लोकसभा विधानसभा मतदारसंघात जोमाने काम करुन आपले कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व सिद्ध करावे लागेल. बाकी निष्ठावंत नेत्यांची नावं प्रत्येक वेळी घर चर्चेत येतात. संभाव्य च्या यादीत येतात. आणि केराच्या टोपलीत जातात. निष्ठावंत आहेत त्यांना कमजोर समजलं जातं. मग एखाद्या माॉस लिडर राजकीय परीवारातील लोकांचे राजकीय पुनर्वसन करुन घेतोच. अशा नवीन विधान परिषद आमदारांना शुभेच्छा... बाकी भरपूर इच्छुक आहेत त्यांना येणाऱ्या २०२९ च्या विधानसभा आणि लोकसभेसाठी शुभेच्छा... बाकी निष्ठावंत कार्यकर्ते नेते उचला सतरंज्या जो संघर्ष आणि दंड थोपटून बंड करेल तोच राजकारणात टिकेल अशा लढवय्या नेत्यांनाही शुभेच्छा ...
- *भुवन रेती घाटावर अवैध उपसा जोमात; ठेकेदार–महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमताचा आरोप* (एकाच पावतीवर दिवसभर वाळू वाहतूक, कोऱ्या पावत्या आढळल्याने लाखो रुपयांच्या महसूल घोटाळ्याची शक्यता) मंठा तालुक्यातील भुवन येथील रेती घाटावर अवैध रेती उपसा जोमात सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अधिकृत लिलावधारकाच्या ताब्यात घाट देण्यात आला असला तरी, महसूल कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतातून शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याची चर्चा आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, एकाच रॉयल्टी पावतीवर दिवसभर अनेक फेऱ्या मारल्या जात आहेत. दोन ब्रासच्या पावतीवर चार ब्रासची गाडी, तर चार ब्रासच्या पावतीवर सहा ब्रासपर्यंत वाळू भरली जात असल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक पावत्यांवर तारीख, वेळ आणि ब्रासची नोंदच नसून काही पावत्या कोऱ्या आढळल्या आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.1
- बदनापूर येथील कॅनरा बँकेत ७.३१ कोटींचा डल्ला; मॅनेजरसह सुवर्णकार गजाआड जालना: जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळ्याची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच, आता बदनापूर येथील कॅनरा बँकेत तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट सोने गहाण ठेवून आणि मूळ सोन्याची चोरी करून ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे. नेमका प्रकार काय? बदनापूर येथील कॅनरा बँकेत दागिन्यांच्या बदल्यात कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू असताना हा मोठा गैरव्यवहार झाला. बँकेच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन (Quarterly Re-evaluation) प्रक्रियेदरम्यान दागिन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी बँकेच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे आणि त्यांच्या जागी बनावट सोने ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. असा फुटला घोटाळ्याला वाचा: बँकेच्या धोरणानुसार नियमित तपासणी सुरू होती. तपासणीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे आणि काही ठिकाणी बनावट सोने असल्याचे आढळले. बँकेचे अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला 'खरे सोने' असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक करण्यास मदत केली. पोलिसांची कारवाई: या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत: बँक मॅनेजर: पोलिसांच्या ताब्यात. सुवर्णकार (प्रवीण बुऱ्हाडे): पोलिसांच्या ताब्यात. एक अधिकारी: अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. "बनावट सोने ठेवून आणि पदाचा गैरवापर करून बँकेचा विश्वासघात करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली असून, आम्ही दोघांना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे." — मच्छिंद्र सुरवसे (पोलीस निरीक्षक, बदनापूर पोलीस ठाणे) 1
- हदगाव येथील रामलीला मैदान येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगाव तालुका शिवसेना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भव्य दिव्य अशा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या विवाह सोहळ्याला पंचक्रोशीतील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेले आहे. तसेच या विवाह सोहळ्यांच्या पूर्वसंध्येला नामदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे कौतुक केलेले आहे1
- जाकापुर (ता. भोकर) मध्ये भीषण पाणीटंचाई! विहिरी कोरड्या… पाण्यासाठी रात्रभर जागरण… लांब अंतर चालून एक घागर पाणी मिळवण्याची वेळ… ही 2026 मधील वास्तव परिस्थिती आहे! ग्रामस्थांचे हाल पाहूनही प्रशासन शांत का? तात्काळ टँकर सुरू करून दिलासा द्यावा आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी. पाणी हा हक्क आहे, संघर्ष नाही! #जाकापुर #भोकर #पाणीटंचाई #WaterCrisis #Nanded Maharashtra PublicIssue BreakingNews1
- जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड शिवसेना मुखेड प्रसाद सेवा2
- नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे एमआयडीसी स्थापन करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी व्यक्त केली आहे. ही मागणी केल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती.1
- पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆1
- हदगाव येथे शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार बाबुराव कदम कोहलीकर यांच्या वतीने सामूहिक सर्व धर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील विवाह सोहळ्याला हदगाव हिमायतनगर सह नांदेड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे, हा विवाह सोहळा हदगाव येथील रामलीला मैदान येथे ठीक दुपारी एक वाजता होणार असून या विवाह सोहळ्यामध्ये एकूण 30 जोडप्याचे लग्न लागणार आहे. हा विवाह सोहळा वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात आल्याचे लोकनेते आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगितले तसेच नांदेड सह इतरही जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या नेते मंडळींना उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजक आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेले आहे.1
- सामूहिक विवाह सोहळा – सस्नेह निमंत्रण बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगांव शहरात भव्य सामूहिक विवाह मेळावा आयोजित करण्यात आला आहे. समाजातील कुटुंबांवरील विवाह खर्चाचा वाढता भार कमी करून, साधेपणातून सामाजिक ऐक्य, बंधुभाव व आदर्श निर्माण करण्याच्या पवित्र हेतूने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 📅 विवाह मुहूर्त : २६ एप्रिल २०२६ (रविवार) ⏰ वेळ : दुपारी १:०१ वा. 📍 स्थळ : तामसा रोड, रामलीला मैदान, हदगाव (ता. हदगाव, जि. नांदेड) नवदांपत्यांना अक्षदा रूपी आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. विनीत : सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आयोजक : बाबुराव कदम कोहळीकर #सामूहिकविवाह #हदगाव #BalasahebThackeray #ShivSena #WeddingEvent Maharashtra SocialInitiative Blessings1