logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जिंतूर-परभणी मार्गावर एक भीषण अपघात घडला असून, यामध्ये एसटी महामंडळाच्या बसने एका मोटरसायकलला चिरडले. या दुर्घटनेत मोटरसायकलवरील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

on 7 June
user_Ramesh Mulgir
Ramesh Mulgir
मानवत, परभणी, महाराष्ट्र•
on 7 June

जिंतूर-परभणी मार्गावर एक भीषण अपघात घडला असून, यामध्ये एसटी महामंडळाच्या बसने एका मोटरसायकलला चिरडले. या दुर्घटनेत मोटरसायकलवरील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • तुकाराम मुंढे यांनी हॉटेलच्या किचनमध्ये लागू होणाऱ्या नियमांविषयी एक मोठे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानुसार, आता हॉटेलच्या स्वयंपाकघरात काही नियम बंधनकारक असतील.
    1
    तुकाराम मुंढे यांनी हॉटेलच्या किचनमध्ये लागू होणाऱ्या नियमांविषयी एक मोठे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानुसार, आता हॉटेलच्या स्वयंपाकघरात काही नियम बंधनकारक असतील.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • समाजकल्याण विभागाने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरी केली.
    1
    समाजकल्याण विभागाने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरी केली.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • खासदार संजय जाधव यांचा व्यंकटराव शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जंगी सत्कार केला.
    1
    खासदार संजय जाधव यांचा व्यंकटराव शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जंगी सत्कार केला.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    12 hrs ago
  • परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सुपरिचित व्यक्तिमत्त्व कै. वसंत (बापू) मारोतीराव फड यांच्या दशक्रिया विधीचे औचित्य साधून फड परिवाराने एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. कुटुंबाने त्यांच्या शेतात आंब्यासह विविध प्रजातींची एकूण १० झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. स्व. वसंत (बापू) फड यांचे १७ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने फड परिवारासह संपूर्ण कन्हेरवाडी परिसराने एक मनमिळावू, सामाजिक बांधिलकी जपणारे आणि सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व गमावले, अशी भावना व्यक्त होत आहे. गावातील विकासकामे, सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला होता, त्यामुळे पंचक्रोशीत ते 'वसंत बापू' या नावाने सर्वपरिचित होते. त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि पर्यावरण संवर्धनासाठी आपलेही योगदान असावे या उद्देशाने फड परिवाराने आपल्या शेतात आंबा, जांभूळ, आवळा, लिंबू, मोसंबी, वड, पिंपळ, चिंच आणि पेरू यांसारख्या १० वृक्षांची लागवड केली. कुटुंबाने या वृक्षांचे संगोपन करून त्यांना जगविण्याचा संकल्पही केला आहे. सध्या मराठवाड्यासह बीड जिल्हा दुष्काळाचा सामना करत असून, घटलेला पाऊस, वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही चिंताजनक बाब आहे. अशा स्थितीत वृक्षारोपण आणि संवर्धन काळाची गरज असून, फड परिवाराने यातून समाजासमोर पर्यावरण रक्षणाचा आदर्श ठेवला आहे. 'एखादे दगडी स्मारक काळाबरोबर झिजेल, पण लावलेले झाड अनेकांना सावली, फळे, प्राणवायू आणि जीवन देईल,' या विचारातून हा उपक्रम राबवण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी युवक नेते माणिकभाऊ फड, बाळासाहेब फड, सुरेश (नाना) फड, दत्ता मुंडे, भारत फड, फुलचंद फड, अशोक नागरगोजे, रामभाऊ मुंडे, कांचा, आशु, अक्षय मुंडे, गोविंदभाऊ मुंडे, रायचंद फड, वैभव रोडे, सौरभ कदम, राधाबाई वसंतराव फड, सरस्वती नागरगोजे, सुमन अक्का मुंडे, सुनीता फड, शोभा फड, सत्यभामा फड, चंद्रकला मुंडे, अनुसया शेप, आशाताई गित्ते, अरुण अक्का, अर्चना मुंडे, शोभा गुट्टे, स्वाती फड, छाया फड, सायली व वैष्णवी यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. कै. वसंत (बापू) फड यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपली आणि गावाच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांचे पुत्र युवा उद्योजक सुरेश (नाना) फड आणि बाळासाहेब फड हे त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. सुरेश (नाना) फड यांनी सांगितले की, स्व. वसंत (बापू) फड हे कुटुंबाचे आधारवड होते आणि त्यांच्या स्मृती समाजोपयोगी कार्यातून जिवंत राहाव्यात या उद्देशाने दशक्रिया विधीदिनी १० वृक्षांची लागवड केली. पर्यावरण संवर्धन ही सर्वांची जबाबदारी असून, वडिलांनी दिलेल्या संस्कारातून हा उपक्रम राबवला असून प्रत्येक वृक्षात वडिलांचे अस्तित्व जाणवेल, असेही ते म्हणाले.
    4
    परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सुपरिचित व्यक्तिमत्त्व कै. वसंत (बापू) मारोतीराव फड यांच्या दशक्रिया विधीचे औचित्य साधून फड परिवाराने एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. कुटुंबाने त्यांच्या शेतात आंब्यासह विविध प्रजातींची एकूण १० झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली.

स्व. वसंत (बापू) फड यांचे १७ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने फड परिवारासह संपूर्ण कन्हेरवाडी परिसराने एक मनमिळावू, सामाजिक बांधिलकी जपणारे आणि सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व गमावले, अशी भावना व्यक्त होत आहे. गावातील विकासकामे, सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला होता, त्यामुळे पंचक्रोशीत ते 'वसंत बापू' या नावाने सर्वपरिचित होते.

त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि पर्यावरण संवर्धनासाठी आपलेही योगदान असावे या उद्देशाने फड परिवाराने आपल्या शेतात आंबा, जांभूळ, आवळा, लिंबू, मोसंबी, वड, पिंपळ, चिंच आणि पेरू यांसारख्या १० वृक्षांची लागवड केली. कुटुंबाने या वृक्षांचे संगोपन करून त्यांना जगविण्याचा संकल्पही केला आहे. सध्या मराठवाड्यासह बीड जिल्हा दुष्काळाचा सामना करत असून, घटलेला पाऊस, वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही चिंताजनक बाब आहे. अशा स्थितीत वृक्षारोपण आणि संवर्धन काळाची गरज असून, फड परिवाराने यातून समाजासमोर पर्यावरण रक्षणाचा आदर्श ठेवला आहे. 'एखादे दगडी स्मारक काळाबरोबर झिजेल, पण लावलेले झाड अनेकांना सावली, फळे, प्राणवायू आणि जीवन देईल,' या विचारातून हा उपक्रम राबवण्यात आला.

या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी युवक नेते माणिकभाऊ फड, बाळासाहेब फड, सुरेश (नाना) फड, दत्ता मुंडे, भारत फड, फुलचंद फड, अशोक नागरगोजे, रामभाऊ मुंडे, कांचा, आशु, अक्षय मुंडे, गोविंदभाऊ मुंडे, रायचंद फड, वैभव रोडे, सौरभ कदम, राधाबाई वसंतराव फड, सरस्वती नागरगोजे, सुमन अक्का मुंडे, सुनीता फड, शोभा फड, सत्यभामा फड, चंद्रकला मुंडे, अनुसया शेप, आशाताई गित्ते, अरुण अक्का, अर्चना मुंडे, शोभा गुट्टे, स्वाती फड, छाया फड, सायली व वैष्णवी यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. कै. वसंत (बापू) फड यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपली आणि गावाच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांचे पुत्र युवा उद्योजक सुरेश (नाना) फड आणि बाळासाहेब फड हे त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. सुरेश (नाना) फड यांनी सांगितले की, स्व. वसंत (बापू) फड हे कुटुंबाचे आधारवड होते आणि त्यांच्या स्मृती समाजोपयोगी कार्यातून जिवंत राहाव्यात या उद्देशाने दशक्रिया विधीदिनी १० वृक्षांची लागवड केली. पर्यावरण संवर्धन ही सर्वांची जबाबदारी असून, वडिलांनी दिलेल्या संस्कारातून हा उपक्रम राबवला असून प्रत्येक वृक्षात वडिलांचे अस्तित्व जाणवेल, असेही ते म्हणाले.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमदार पवार यांनी संजय दिना पाटील यांचे हे वक्तव्य अत्यंत चुकीचे असल्याचे स्पष्टपणे म्हटले. आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जोर दिला की, असे वक्तव्य लोकशाहीसाठी घातक आहे. त्यांनी हे विधान अतिशय चुकीचे असल्याचे पुनरुच्चारित केले. यावेळी त्यांनी कर्जमाफीसह विविध विषयांवरही पत्रकारांशी चर्चा केली.
    1
    हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांनी खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमदार पवार यांनी संजय दिना पाटील यांचे हे वक्तव्य अत्यंत चुकीचे असल्याचे स्पष्टपणे म्हटले.

आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जोर दिला की, असे वक्तव्य लोकशाहीसाठी घातक आहे. त्यांनी हे विधान अतिशय चुकीचे असल्याचे पुनरुच्चारित केले. यावेळी त्यांनी कर्जमाफीसह विविध विषयांवरही पत्रकारांशी चर्चा केली.
    user_Shankar bhairane
    Shankar bhairane
    Reportar सेनगाव, हिंगोली, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • महानगर पालिकेच्या महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते शाळेसाठी संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमावेळी वृक्षारोपण उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. उद्योजक घनश्याम शेठ गोयल यांनी या कामासाठी तातडीने पुढाकार घेत, सीएसआर निधीतून हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
    1
    महानगर पालिकेच्या महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते शाळेसाठी संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमावेळी वृक्षारोपण उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. उद्योजक घनश्याम शेठ गोयल यांनी या कामासाठी तातडीने पुढाकार घेत, सीएसआर निधीतून हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बीड शहरातील ऐतिहासिक वेस परिसरातील राजूर वेस–कटकटपुरा–बुंदेलपुरा–कबाड गल्ली–माळीवेस पोलीस चौकी परिसरातील रस्ता व नाली बांधकामासाठी तब्बल ₹१,९९,९९,८३९ निधी मंजूर करण्यात आला आहे. १७ एप्रिल २०२६ रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला होता, मात्र दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती मिळाली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, विविध धर्मांतील मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांनी रस्त्याच्या कामाचा प्रतीकात्मक मुहूर्त करत प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. "लोकहितासाठी प्रत्येक दिवस शुभ असतो" अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी संबंधित प्रशासन आणि ठेकेदारांनी काम रखडण्यामागील कारणे स्पष्ट करावीत, तसेच मंजूर निधीचा योग्य वापर करून रस्ता व नालीचे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी मागणी केली आहे. यावेळी प्रा. सनी विष्णू वाघमारे यांनी सांगितले की, हा प्रश्न केवळ एका रस्त्यापुरता मर्यादित नसून तो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. मंजूर कामे वेळेत पूर्ण न झाल्यास सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांनी जबाबदारी स्वीकारून तातडीने काम सुरू करावे, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, या कामातील विलंबाबाबत नागरिकांनी सिताई कन्स्ट्रक्शन या संबंधित ठेकेदारावरही नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन कामाला त्वरित गती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
    1
    बीड शहरातील ऐतिहासिक वेस परिसरातील राजूर वेस–कटकटपुरा–बुंदेलपुरा–कबाड गल्ली–माळीवेस पोलीस चौकी परिसरातील रस्ता व नाली बांधकामासाठी तब्बल ₹१,९९,९९,८३९ निधी मंजूर करण्यात आला आहे. १७ एप्रिल २०२६ रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला होता, मात्र दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती मिळाली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याच पार्श्वभूमीवर, विविध धर्मांतील मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांनी रस्त्याच्या कामाचा प्रतीकात्मक मुहूर्त करत प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. "लोकहितासाठी प्रत्येक दिवस शुभ असतो" अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी संबंधित प्रशासन आणि ठेकेदारांनी काम रखडण्यामागील कारणे स्पष्ट करावीत, तसेच मंजूर निधीचा योग्य वापर करून रस्ता व नालीचे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

यावेळी प्रा. सनी विष्णू वाघमारे यांनी सांगितले की, हा प्रश्न केवळ एका रस्त्यापुरता मर्यादित नसून तो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. मंजूर कामे वेळेत पूर्ण न झाल्यास सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांनी जबाबदारी स्वीकारून तातडीने काम सुरू करावे, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, या कामातील विलंबाबाबत नागरिकांनी सिताई कन्स्ट्रक्शन या संबंधित ठेकेदारावरही नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन कामाला त्वरित गती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • परभणी जिल्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    1
    परभणी जिल्ह्यातून मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.