logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

बीड शहरातील ऐतिहासिक वेस परिसरातील राजूर वेस–कटकटपुरा–बुंदेलपुरा–कबाड गल्ली–माळीवेस पोलीस चौकी परिसरातील रस्ता व नाली बांधकामासाठी तब्बल ₹१,९९,९९,८३९ निधी मंजूर करण्यात आला आहे. १७ एप्रिल २०२६ रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला होता, मात्र दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती मिळाली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, विविध धर्मांतील मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांनी रस्त्याच्या कामाचा प्रतीकात्मक मुहूर्त करत प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. "लोकहितासाठी प्रत्येक दिवस शुभ असतो" अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी संबंधित प्रशासन आणि ठेकेदारांनी काम रखडण्यामागील कारणे स्पष्ट करावीत, तसेच मंजूर निधीचा योग्य वापर करून रस्ता व नालीचे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी मागणी केली आहे. यावेळी प्रा. सनी विष्णू वाघमारे यांनी सांगितले की, हा प्रश्न केवळ एका रस्त्यापुरता मर्यादित नसून तो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. मंजूर कामे वेळेत पूर्ण न झाल्यास सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांनी जबाबदारी स्वीकारून तातडीने काम सुरू करावे, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, या कामातील विलंबाबाबत नागरिकांनी सिताई कन्स्ट्रक्शन या संबंधित ठेकेदारावरही नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन कामाला त्वरित गती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

6 hrs ago
user_बालाजी जगतकर
बालाजी जगतकर
Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
6 hrs ago

बीड शहरातील ऐतिहासिक वेस परिसरातील राजूर वेस–कटकटपुरा–बुंदेलपुरा–कबाड गल्ली–माळीवेस पोलीस चौकी परिसरातील रस्ता व नाली बांधकामासाठी तब्बल ₹१,९९,९९,८३९ निधी मंजूर करण्यात आला आहे. १७ एप्रिल २०२६ रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला होता, मात्र दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती मिळाली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, विविध धर्मांतील मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांनी रस्त्याच्या कामाचा प्रतीकात्मक मुहूर्त करत प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. "लोकहितासाठी प्रत्येक दिवस शुभ असतो" अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी संबंधित प्रशासन आणि ठेकेदारांनी काम रखडण्यामागील कारणे स्पष्ट करावीत, तसेच मंजूर निधीचा योग्य वापर करून रस्ता व नालीचे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी मागणी केली आहे. यावेळी प्रा. सनी विष्णू वाघमारे यांनी सांगितले की, हा प्रश्न केवळ एका रस्त्यापुरता मर्यादित नसून तो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. मंजूर कामे वेळेत पूर्ण न झाल्यास सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांनी जबाबदारी स्वीकारून तातडीने काम सुरू करावे, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, या कामातील विलंबाबाबत नागरिकांनी सिताई कन्स्ट्रक्शन या संबंधित ठेकेदारावरही नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन कामाला त्वरित गती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बीड शहरातील ऐतिहासिक वेस परिसरातील राजूर वेस–कटकटपुरा–बुंदेलपुरा–कबाड गल्ली–माळीवेस पोलीस चौकी परिसरातील रस्ता व नाली बांधकामासाठी तब्बल ₹१,९९,९९,८३९ निधी मंजूर करण्यात आला आहे. १७ एप्रिल २०२६ रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला होता, मात्र दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती मिळाली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर, विविध धर्मांतील मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांनी रस्त्याच्या कामाचा प्रतीकात्मक मुहूर्त करत प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. "लोकहितासाठी प्रत्येक दिवस शुभ असतो" अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी संबंधित प्रशासन आणि ठेकेदारांनी काम रखडण्यामागील कारणे स्पष्ट करावीत, तसेच मंजूर निधीचा योग्य वापर करून रस्ता व नालीचे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी मागणी केली आहे. यावेळी प्रा. सनी विष्णू वाघमारे यांनी सांगितले की, हा प्रश्न केवळ एका रस्त्यापुरता मर्यादित नसून तो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. मंजूर कामे वेळेत पूर्ण न झाल्यास सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांनी जबाबदारी स्वीकारून तातडीने काम सुरू करावे, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, या कामातील विलंबाबाबत नागरिकांनी सिताई कन्स्ट्रक्शन या संबंधित ठेकेदारावरही नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन कामाला त्वरित गती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
    1
    बीड शहरातील ऐतिहासिक वेस परिसरातील राजूर वेस–कटकटपुरा–बुंदेलपुरा–कबाड गल्ली–माळीवेस पोलीस चौकी परिसरातील रस्ता व नाली बांधकामासाठी तब्बल ₹१,९९,९९,८३९ निधी मंजूर करण्यात आला आहे. १७ एप्रिल २०२६ रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला होता, मात्र दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही प्रत्यक्ष कामाला अपेक्षित गती मिळाली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याच पार्श्वभूमीवर, विविध धर्मांतील मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांनी रस्त्याच्या कामाचा प्रतीकात्मक मुहूर्त करत प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. "लोकहितासाठी प्रत्येक दिवस शुभ असतो" अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी संबंधित प्रशासन आणि ठेकेदारांनी काम रखडण्यामागील कारणे स्पष्ट करावीत, तसेच मंजूर निधीचा योग्य वापर करून रस्ता व नालीचे बांधकाम त्वरित सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

यावेळी प्रा. सनी विष्णू वाघमारे यांनी सांगितले की, हा प्रश्न केवळ एका रस्त्यापुरता मर्यादित नसून तो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. मंजूर कामे वेळेत पूर्ण न झाल्यास सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांनी जबाबदारी स्वीकारून तातडीने काम सुरू करावे, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, या कामातील विलंबाबाबत नागरिकांनी सिताई कन्स्ट्रक्शन या संबंधित ठेकेदारावरही नाराजी व्यक्त केली असून, प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन कामाला त्वरित गती द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सुपरिचित व्यक्तिमत्त्व कै. वसंत (बापू) मारोतीराव फड यांच्या दशक्रिया विधीचे औचित्य साधून फड परिवाराने एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. कुटुंबाने त्यांच्या शेतात आंब्यासह विविध प्रजातींची एकूण १० झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली. स्व. वसंत (बापू) फड यांचे १७ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने फड परिवारासह संपूर्ण कन्हेरवाडी परिसराने एक मनमिळावू, सामाजिक बांधिलकी जपणारे आणि सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व गमावले, अशी भावना व्यक्त होत आहे. गावातील विकासकामे, सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला होता, त्यामुळे पंचक्रोशीत ते 'वसंत बापू' या नावाने सर्वपरिचित होते. त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि पर्यावरण संवर्धनासाठी आपलेही योगदान असावे या उद्देशाने फड परिवाराने आपल्या शेतात आंबा, जांभूळ, आवळा, लिंबू, मोसंबी, वड, पिंपळ, चिंच आणि पेरू यांसारख्या १० वृक्षांची लागवड केली. कुटुंबाने या वृक्षांचे संगोपन करून त्यांना जगविण्याचा संकल्पही केला आहे. सध्या मराठवाड्यासह बीड जिल्हा दुष्काळाचा सामना करत असून, घटलेला पाऊस, वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही चिंताजनक बाब आहे. अशा स्थितीत वृक्षारोपण आणि संवर्धन काळाची गरज असून, फड परिवाराने यातून समाजासमोर पर्यावरण रक्षणाचा आदर्श ठेवला आहे. 'एखादे दगडी स्मारक काळाबरोबर झिजेल, पण लावलेले झाड अनेकांना सावली, फळे, प्राणवायू आणि जीवन देईल,' या विचारातून हा उपक्रम राबवण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी युवक नेते माणिकभाऊ फड, बाळासाहेब फड, सुरेश (नाना) फड, दत्ता मुंडे, भारत फड, फुलचंद फड, अशोक नागरगोजे, रामभाऊ मुंडे, कांचा, आशु, अक्षय मुंडे, गोविंदभाऊ मुंडे, रायचंद फड, वैभव रोडे, सौरभ कदम, राधाबाई वसंतराव फड, सरस्वती नागरगोजे, सुमन अक्का मुंडे, सुनीता फड, शोभा फड, सत्यभामा फड, चंद्रकला मुंडे, अनुसया शेप, आशाताई गित्ते, अरुण अक्का, अर्चना मुंडे, शोभा गुट्टे, स्वाती फड, छाया फड, सायली व वैष्णवी यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. कै. वसंत (बापू) फड यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपली आणि गावाच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांचे पुत्र युवा उद्योजक सुरेश (नाना) फड आणि बाळासाहेब फड हे त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. सुरेश (नाना) फड यांनी सांगितले की, स्व. वसंत (बापू) फड हे कुटुंबाचे आधारवड होते आणि त्यांच्या स्मृती समाजोपयोगी कार्यातून जिवंत राहाव्यात या उद्देशाने दशक्रिया विधीदिनी १० वृक्षांची लागवड केली. पर्यावरण संवर्धन ही सर्वांची जबाबदारी असून, वडिलांनी दिलेल्या संस्कारातून हा उपक्रम राबवला असून प्रत्येक वृक्षात वडिलांचे अस्तित्व जाणवेल, असेही ते म्हणाले.
    4
    परळी तालुक्यातील कन्हेरवाडी येथील सुपरिचित व्यक्तिमत्त्व कै. वसंत (बापू) मारोतीराव फड यांच्या दशक्रिया विधीचे औचित्य साधून फड परिवाराने एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. कुटुंबाने त्यांच्या शेतात आंब्यासह विविध प्रजातींची एकूण १० झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली.

स्व. वसंत (बापू) फड यांचे १७ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने फड परिवारासह संपूर्ण कन्हेरवाडी परिसराने एक मनमिळावू, सामाजिक बांधिलकी जपणारे आणि सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व गमावले, अशी भावना व्यक्त होत आहे. गावातील विकासकामे, सामाजिक आणि धार्मिक कार्यांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला होता, त्यामुळे पंचक्रोशीत ते 'वसंत बापू' या नावाने सर्वपरिचित होते.

त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात आणि पर्यावरण संवर्धनासाठी आपलेही योगदान असावे या उद्देशाने फड परिवाराने आपल्या शेतात आंबा, जांभूळ, आवळा, लिंबू, मोसंबी, वड, पिंपळ, चिंच आणि पेरू यांसारख्या १० वृक्षांची लागवड केली. कुटुंबाने या वृक्षांचे संगोपन करून त्यांना जगविण्याचा संकल्पही केला आहे. सध्या मराठवाड्यासह बीड जिल्हा दुष्काळाचा सामना करत असून, घटलेला पाऊस, वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही चिंताजनक बाब आहे. अशा स्थितीत वृक्षारोपण आणि संवर्धन काळाची गरज असून, फड परिवाराने यातून समाजासमोर पर्यावरण रक्षणाचा आदर्श ठेवला आहे. 'एखादे दगडी स्मारक काळाबरोबर झिजेल, पण लावलेले झाड अनेकांना सावली, फळे, प्राणवायू आणि जीवन देईल,' या विचारातून हा उपक्रम राबवण्यात आला.

या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी युवक नेते माणिकभाऊ फड, बाळासाहेब फड, सुरेश (नाना) फड, दत्ता मुंडे, भारत फड, फुलचंद फड, अशोक नागरगोजे, रामभाऊ मुंडे, कांचा, आशु, अक्षय मुंडे, गोविंदभाऊ मुंडे, रायचंद फड, वैभव रोडे, सौरभ कदम, राधाबाई वसंतराव फड, सरस्वती नागरगोजे, सुमन अक्का मुंडे, सुनीता फड, शोभा फड, सत्यभामा फड, चंद्रकला मुंडे, अनुसया शेप, आशाताई गित्ते, अरुण अक्का, अर्चना मुंडे, शोभा गुट्टे, स्वाती फड, छाया फड, सायली व वैष्णवी यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. कै. वसंत (बापू) फड यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपली आणि गावाच्या विकासासाठी योगदान दिले. त्यांचे पुत्र युवा उद्योजक सुरेश (नाना) फड आणि बाळासाहेब फड हे त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. सुरेश (नाना) फड यांनी सांगितले की, स्व. वसंत (बापू) फड हे कुटुंबाचे आधारवड होते आणि त्यांच्या स्मृती समाजोपयोगी कार्यातून जिवंत राहाव्यात या उद्देशाने दशक्रिया विधीदिनी १० वृक्षांची लागवड केली. पर्यावरण संवर्धन ही सर्वांची जबाबदारी असून, वडिलांनी दिलेल्या संस्कारातून हा उपक्रम राबवला असून प्रत्येक वृक्षात वडिलांचे अस्तित्व जाणवेल, असेही ते म्हणाले.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • महानगर पालिकेच्या महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते शाळेसाठी संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमावेळी वृक्षारोपण उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. उद्योजक घनश्याम शेठ गोयल यांनी या कामासाठी तातडीने पुढाकार घेत, सीएसआर निधीतून हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
    1
    महानगर पालिकेच्या महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते शाळेसाठी संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. याच कार्यक्रमावेळी वृक्षारोपण उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. उद्योजक घनश्याम शेठ गोयल यांनी या कामासाठी तातडीने पुढाकार घेत, सीएसआर निधीतून हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    54 min ago
  • आंबेहोळ गावात गेल्या चार महिन्यांपासून गटारांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गावातील गटारांवर जाळ्या टाकल्यामुळे घाण साचून पाणी पूर्णपणे वाहून जात नाही. यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, इतर गटारांमध्येही पाणी तुंबलेले आहे. या गंभीर परिस्थितीकडे सरपंच मनोहर लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात असून, त्यांच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
    1
    आंबेहोळ गावात गेल्या चार महिन्यांपासून गटारांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गावातील गटारांवर जाळ्या टाकल्यामुळे घाण साचून पाणी पूर्णपणे वाहून जात नाही. यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, इतर गटारांमध्येही पाणी तुंबलेले आहे. या गंभीर परिस्थितीकडे सरपंच मनोहर लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात असून, त्यांच्या निष्क्रिय कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
    user_Asim Shaikh
    Asim Shaikh
    उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • बदनापूर पोलीस ठाण्यात सर्व समाज बांधवांच्या वतीने एक निवेदन सादर करण्यात आले आहे, ज्यात महापुरुष फुले-शाहू-आंबेडकर यांचा जाहीर अवमान करून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी संजय इचे आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. २४ जून २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आयोजित एका जाहीर सभेत आरोपींनी ही आक्षेपार्ह वक्तव्ये केली, ज्यामुळे कोट्यवधी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्याचे निवेदनात म्हटले आहे. या सभेत, आरोपी संजय इचे (राहणार: जालना) याने जाहीरपणे माईकवरून बोलताना "हा फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र नाही" असे अत्यंत आक्षेपार्ह, भडकवू आणि महापुरुषांची मानहानी करणारे निंदनीय विधान केले. त्याचवेळी, व्यासपीठावरून भाषण करणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने (दुसरा आरोपी) परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदरणीय कुटुंबाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये करत त्यांची जाहीरपणे बदनामी केली. या दोन्ही आरोपींच्या प्रक्षोभक भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर (फेसबुक, व्हॉट्सॲप इत्यादी) मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले असून ते व्हायरल झाले आहेत, असे निवेदनात पुराव्या दाखल नमूद आहे. निवेदनानुसार, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सर्वोच्च प्रेरणास्थान आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक आहेत. संजय इचेने जाणीवपूर्वक व हेतुपरस्सर या महापुरुषांचा अवमान करून संपूर्ण बहुजन समाजाच्या तसेच शिव-शाहू-फुले-आंबेडकरवादी जनतेच्या धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या आहेत. दुसऱ्या आरोपीने कोट्यवधी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या आंबेडकर कुटुंबावर चिखलफेक करून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन्ही आरोपींच्या द्वेषयुक्त आणि बेजबाबदार वक्तव्यांमुळे शांतताप्रिय महाराष्ट्र राज्यात जातीय तेढ, सामाजिक वैमनस्य आणि अशांतता निर्माण होण्याची दाट शक्यता असून, हा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा एक जाणीवपूर्वक केलेला कट असल्याचे निवेदनात गंभीरपणे म्हटले आहे. हे कृत्य भारतीय संविधानाचा आणि लोकशाही मूल्यांचा घोर अपमान करणारे आहे. महाराष्ट्रातील सामाजिक व जातीय शांतता अबाधित राखण्यासाठी आणि महापुरुषांचा व त्यांच्या कुटुंबांचा असा जाहीर अवमान रोखण्यासाठी, दोषी संजय इचे आणि संबंधित अनोळखी व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांन्वये, तसेच पूर्वीच्या भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम १५३-अ (दोन गटांत वैमनस्य पसरवणे), २९५-अ (धार्मिक किंवा सामाजिक भावना दुखावणे), ५०५(१)(क) (सार्वजनिक शांतता बिघडवणारे वक्तव्य) व अन्य संबंधित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
    1
    बदनापूर पोलीस ठाण्यात सर्व समाज बांधवांच्या वतीने एक निवेदन सादर करण्यात आले आहे, ज्यात महापुरुष फुले-शाहू-आंबेडकर यांचा जाहीर अवमान करून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी संजय इचे आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. २४ जून २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आयोजित एका जाहीर सभेत आरोपींनी ही आक्षेपार्ह वक्तव्ये केली, ज्यामुळे कोट्यवधी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या सभेत, आरोपी संजय इचे (राहणार: जालना) याने जाहीरपणे माईकवरून बोलताना "हा फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र नाही" असे अत्यंत आक्षेपार्ह, भडकवू आणि महापुरुषांची मानहानी करणारे निंदनीय विधान केले. त्याचवेळी, व्यासपीठावरून भाषण करणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने (दुसरा आरोपी) परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदरणीय कुटुंबाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये करत त्यांची जाहीरपणे बदनामी केली. या दोन्ही आरोपींच्या प्रक्षोभक भाषणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर (फेसबुक, व्हॉट्सॲप इत्यादी) मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले असून ते व्हायरल झाले आहेत, असे निवेदनात पुराव्या दाखल नमूद आहे.

निवेदनानुसार, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सर्वोच्च प्रेरणास्थान आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक आहेत. संजय इचेने जाणीवपूर्वक व हेतुपरस्सर या महापुरुषांचा अवमान करून संपूर्ण बहुजन समाजाच्या तसेच शिव-शाहू-फुले-आंबेडकरवादी जनतेच्या धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या आहेत. दुसऱ्या आरोपीने कोट्यवधी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या आंबेडकर कुटुंबावर चिखलफेक करून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन्ही आरोपींच्या द्वेषयुक्त आणि बेजबाबदार वक्तव्यांमुळे शांतताप्रिय महाराष्ट्र राज्यात जातीय तेढ, सामाजिक वैमनस्य आणि अशांतता निर्माण होण्याची दाट शक्यता असून, हा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा एक जाणीवपूर्वक केलेला कट असल्याचे निवेदनात गंभीरपणे म्हटले आहे. हे कृत्य भारतीय संविधानाचा आणि लोकशाही मूल्यांचा घोर अपमान करणारे आहे.

महाराष्ट्रातील सामाजिक व जातीय शांतता अबाधित राखण्यासाठी आणि महापुरुषांचा व त्यांच्या कुटुंबांचा असा जाहीर अवमान रोखण्यासाठी, दोषी संजय इचे आणि संबंधित अनोळखी व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या संबंधित कलमांन्वये, तसेच पूर्वीच्या भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम १५३-अ (दोन गटांत वैमनस्य पसरवणे), २९५-अ (धार्मिक किंवा सामाजिक भावना दुखावणे), ५०५(१)(क) (सार्वजनिक शांतता बिघडवणारे वक्तव्य) व अन्य संबंधित कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    Construction Contractor बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एका वस्तीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या निवास व उपलब्ध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि विविध समस्यांची माहिती जाणून घेतली. वस्तीगृहातील आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
    1
    पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एका वस्तीगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या निवास व उपलब्ध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि विविध समस्यांची माहिती जाणून घेतली. वस्तीगृहातील आवश्यक सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
    user_Salman Fayyaz khan
    Salman Fayyaz khan
    Video editing service Aurangabad, Maharashtra•
    3 hrs ago
  • बीड येथे भारतीय बौद्ध महासभा आणि राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मिरवणुकीचा समारोप राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला, जिथे त्यानंतर एक जाहीर सभा आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. व्ही. बनसोडे हे होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष महालिंग निकाळजे यांच्यासह महासभेचे इतर पदाधिकारी, सदस्य आणि विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे मान्यवर उपस्थित होते. महिला, पुरुष, युवक, युवती तसेच बालक-बालिका यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शाहू महाराजांना अभिवादन केले. वक्त्यांनी आपल्या भाषणातून राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि आरक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या अतुलनीय कार्याचा गौरव केला. शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आणि सामाजिक समतेसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
    2
    बीड येथे भारतीय बौद्ध महासभा आणि राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

मिरवणुकीचा समारोप राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला, जिथे त्यानंतर एक जाहीर सभा आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. व्ही. बनसोडे हे होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष महालिंग निकाळजे यांच्यासह महासभेचे इतर पदाधिकारी, सदस्य आणि विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे मान्यवर उपस्थित होते. महिला, पुरुष, युवक, युवती तसेच बालक-बालिका यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शाहू महाराजांना अभिवादन केले.

वक्त्यांनी आपल्या भाषणातून राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि आरक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या अतुलनीय कार्याचा गौरव केला. शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आणि सामाजिक समतेसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • अहमदनगर जिल्ह्यातील बहिरोबावाडी-कर्जत मार्गावर एका मालवाहू टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे आगीचे स्वरूप अत्यंत भीषण होते.
    1
    अहमदनगर जिल्ह्यातील बहिरोबावाडी-कर्जत मार्गावर एका मालवाहू टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे आगीचे स्वरूप अत्यंत भीषण होते.
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.